Friday, 22 March 2019
तुमचा मतदानाचा तो एक प्रामाणिक क्षण इतिहास घडवेल - मनोज नागोराव काळे
Sunday, 17 March 2019
चित भी मेरी, पट भी मेरी और अंटी भी मेरे बाप की ! - भिमराव तायडे.
चित भी मेरी, पट भी मेरी और अंटी भी मेरे बाप की !
- भिमराव तायडे.
अशी गत सुप्रिम कोर्टाचे निव्रुत्त न्यायाधीश बी जी कोळसे यांनी वंचित बहुजन आघाडी बद्दल जे स्टेटमेंट दिले यावरुन वाटते. खरे तर ते दिशाभूल करणारे आहे।
एकतर ते वंचित बहुजन आघाडी मध्ये सामील नसून त्यांनी vba ला पाठिंबा दिलेला होता. त्यांना जनता दल (एस) या पक्षाकडून लढायचे होते त्यास एड. प्रकाश आंबेडकर यांनी संमती दिली होती. पण कोळसे-पाटील हे जर कॉंग्रेस महाआघाडी झाली तरच ते निवडणूक लढवतील अशी त्यांनी आपली भूमिका सुध्दा मांडली होती. म्हणजेच त्यांनाही VBA चा पाठिंबा होता, ते VBA मध्ये सामील नव्हते.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर चर्चेच्या वंचित बहुजन आघाडीच्या अनेक फैरी झाल्यात. पण युती झाली नाही. याबद्दलची इत्तंभूत माहिती वाचकांना जाणीव असेलच. पुन्हा नव्याने या ठिकाणी मांडत नाही.
इकडे कोळसे-पाटील यांचे दोन्ही कॉंग्रेसशी स्वतःचे बोलणे सुरुच होते व एड प्रकाश आंबेडकर यांना युती होणे किती जरुरी आहे अशी त्यांची बतावणी सुध्दा सुरु होती.
अखेर युती झाली नाही, म्हणून औरंगाबादच्या एका जागेसाठी तरी दोन्ही कॉंग्रेसने पाठिंबा द्यावा अशी मागणी कोळसे-पाटील यांनी केल्यावरही ती कॉंग्रेस कडून नाकारल्या गेली. त्यांना खात्री होती की, जनता दल (एस) ची युती कर्नाटक मध्ये कॉंग्रेसशी असल्याने कॉंग्रेस त्यांना पाठिंबा देईल, पण सगळं मुसळ केरात !
एड प्रकाश आंबेडकर यांनी केवळ 4/5 जागांवर महाआघाडीत समझोता करुन युती करावयास पाहीजे होती असे कोळसे-पाटील यांची आग्रहाची भूमिका होती.
तर, एकून असे प्रकरण होउन बी जी कोळसे-पाटील यांची माघार झालेली आहे. यात वंचित बहुजन आघाडी कडून त्यांना तिकीट नाकारण्यात कोणतीही कारवाई झालेली नाही.
आता प्रश्न असा आहे की, निव्रुत्त न्यायाधीश बी जी कोळसे-पाटील कोणती भूमिका घेतात ते ?
का ते कॉंग्रेस/ राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाणार आहेत का ?
त्यांची शरद पवार यांचेशी एव्हढी जवळीक कशी ?
ते वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करणार नाहीत का ?
त्यांना सॉफ्ट हिंदुत्ववाली कॉंग्रेस जवळची का वाटते ?
जशी कोळसे-पाटील यांची RSS बद्दल विरोधी भूमिका आहे तशी दोन्ही कॉंग्रेसची का नाही ? तरीही कॉंग्रेसला समर्थन का ?
-भीमराव तायडे, 9420452123
नांदुरा (जि: बुलडाणा - 443404)
Friday, 15 March 2019
वचितांचा नविन 'ट्रेंड सेट' झालाय.. -राजेंद्र पातोडे
वचितांचा नविन 'ट्रेंड सेट' झालाय..
-राजेंद्र पातोडे
वंचीत हा शब्द तसा लौकिकार्थाने "डिप्रेस क्लास" चे मराठी भाषांतर.डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी हाच शब्द इथल्या शोषित पिडीत सर्वहारा समुहासाठी वापरला होता.मात्र कालांतराने त्याला 'दलित' किंवा 'पददलित' ठरवुन त्याची लढण्याची उर्मी घालविण्यात आली.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कालानुरूप त्यांच्या संस्था संघटना आणि पक्षाचे नाव बदलविताना काळाची मुस बदलून टाकली होती.
अगदी तोच ट्रेंड आता एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी सेट केला आहे.वंचित म्हणजे सत्ता आणि संधी वंचित असलेल्या अठरा पगड जाती ,अलुतेदार बलुतेदार,आदिवासी, अल्पसंख्याक अश्या सर्व बहुजनांच्या वर्जमुठीला एक व्यापक आकार दिला आहे.त्याला महाराष्ट्रभर मिळणारा प्रतिसाद हा चर्चेचा विषय न ठरता तर नवलच होते.
वंचितच्या सभांना अभूतपूर्व गर्दी असली तरी ती मतदानात रूपांतर होईल का असा एक बुरसटलेला सवाल सोयीने चर्चेत आणला गेला.परन्तु ही गर्दी नुसते भाषणं ऐकायला आलेली नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. भरउन्हात दुपारी १ पासून रात्री १० वाजेपर्यंत तप्त मैदानावर बसलेला हा समूह पहिल्यांदा काही तरी ठरवून आलेला आहे.नाही तर नुसते भाषण ऐकायचे असते तर लाईव्ह होणाऱ्या सभा चॅनेल वर आणि मोबाईलवर अधिक चांगल्या पद्धतीने पाहता येतात.हा नवा बदल कुणी समजून घेत असेल तर तो फक्त वंचित समूह आहे.
त्या नंतर नवा ट्रेंड साहेबांनी सेट केलाय, तो म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या मुजोर आणि आश्रित बनविणाऱ्या राजकीय समझोता आम्हाला मान्य नसेल हे ठणकावून सांगितले गेले. एक जागा घ्या आणि बदल्यात सर्व आंबेडकरी बहुजन मतदान काँग्रेसचे ही सौदेबाजी मोडीत काढली.तुम्ही आम्हाला जागा देणारे कोण हा प्रश्न विचारला गेला.
आघाडी करायची असेल तर ती 'रामदासी अग्रीमेंट' नसेल. स्वाभिमान आणि समान वागणूक दिली पाहिजे हे ठासून सांगितले गेले.त्यासाठी सहा महिन्याआधी आघाडी साठी काँग्रेस कडे प्रस्ताव पाठविला गेला.
शेवटच्या क्षणापर्यंत आघाडीसाठी झुलवायचे आणि शेवटच्या क्षणी बाद करायचं हा काँग्रेसी खेळ ह्या वेळी मोडून काढला गेला.
तिसरा ट्रेंड सेट झाला तो मीडिया बाबत.ह्या आधी निवडणूक जाहीर झाल्या झाल्या आंबेडकरी पक्ष हे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडीया मधून बेदखल असायचे.त्यांचे अस्तित्वच नसल्या प्रमाणे निवडणूक काळात सैराट झालेला मीडिया वागत असे.जाहिराती आणि पेडन्यूज असतील तर कव्हरेज मिळेल. हा ट्रेंड देखील ह्या वेळी मोडीत निघाला आहे.
वंचित आघाडीचे प्रणेते एड बाळासाहेब आंबेडकर काय बोलतात, कुठली भूमिका घेतात ही मिडीया मध्ये लीड न्यूज असते. किंवा ब्रेकिंग न्यूज असते.सलग तीन दिवसांत तीन पत्रकार परिषद घेतल्या तरी त्या प्रेस साठी पत्रकार मंडळी गर्दी करतात हे दुर्मिळ चित्र आज बाळासाहेबांनी बदलेले आहे.
अधिक एक महत्त्वाचा ट्रेंड जो सेट होणार आहे तो म्हणजे येतील वंचीत समुहाला प्रथमच आपल्या अल्पसंख्या प्लस केली की विजय हमखास आहे हे पटणार आहे.सत्ता आणि संधी वंचित असलेल्या अठरा पगड जाती ,अलुतेदार बलुतेदार,आदिवासी, अल्पसंख्याक लहान लहान समूहाची बेरीज ही ४०% होते.आणि एकमेकाला मदत आणि मतदान केले की तेच विंनिंग कॉम्बिनेशन ठरते.२९% मतावर भाजप देशाची सत्ता मिळवते तर ४०% वंचित सहज सत्ताधीश होऊ शकतात.हा नवा फंडा ह्या वेळी असणार आहे.
हे सर्व ट्रेंड सर्वात आधी थोरल्या पवारांनी ओळ्खले आणि निवडणुकीतून माघार घेतली आहे.
काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेकांना हे उमगले आहे त्या मुळे वंचित सुनामीत आपल्या राजकीय कारकिर्दीची वाट लागणार हे ओळखून अनेकांनी लढायलाच नकार दिला आहे. किंवा आपल्या चिल्यापिल्याना भाजप सेनेच्या सेवेत रुजू केले आहे. ही राजकीय दहशत ह्या पूर्वी फक्त शेड्युल्ड कास्ट फेडरेशन मध्ये होती ती बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी परत आणली आहे.
२०१९ ची निवडणूक त्या अर्थाने "डिप्रेस क्लासेस" अर्थात "वंचित बहुजनांच्या" राजकीय शक्तीच्या उदयाने अनेक प्रस्थापित राजकीय पक्षाचे भवितव्य बिघडविल्या शिवाय राहणार नाही ह्यात शंकाच नाही
राजेंद्र पातोडे
प्रदेश प्रवक्ता
भारिप बहुजन महासंघ
वंचित बहूजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश
9422160101
Tuesday, 26 February 2019
निखिल वागळेंचे चाललेय काय?
पश्चिम महाराष्ट्रात जमीन ९०% मराठा समाजाकडे आहे. सहकारी संस्थांमधे ९९% मराठा आहेत. कारखान्यांमधे ९९% मराठा आहेत. शिक्षण संस्था ९०% मराठा समाजाच्या आहेत. ग्रामपंचायतींमधे कुणबी आणि मराठा हे ओबीसींचं आरक्षण मारून टाकतात. तेच विधानसभेला. इतर समाजाला प्रतिनिधित्व देण्याची दानत कॉंग्रेसमधे नाही.
जनता दलाच्या प्रयोगानंतर माझ्या पिढीने भाजप ८८ पर्यंत पोहोचली म्हणून कॉंग्रेसला मतदान केले. कॉंग्रेसने त्याचे पांग खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाद्वारे अनुसूचित जातीचे सरकारी नोकरीतले प्रतिनिधित्व घटवून फेडले. सरकारी कॉलेजेस वाढली नाहीत. सरकारी शाळांची दुरवस्था केली. शेती उद्ध्वस्त केली. याचा परिणाम आपण मराठा मोर्चा आणि शेतकरी संपामधे पाहिला. मात्र या दुरावस्थेचे कारण ध्यानात येऊ नये यासाठी मराठा आरक्षणाचा डाव टाकून एकाच वेळी आपले अपयश झाकणे, बौद्धांच्या विरोधात ध्रुवीकरण करणे आणि भाजपला अडचणीत आणणे असे घाणेरडे राजकारण खेळले गेले. मराठा मोर्च्याच्या काळात बौद्धांना गावकुसाबाहेर राहू देणार नाही असा प्रचार महाराष्ट्रभर करणारे देव गायकवाड हे फेक प्रोफाईल पुढे मुख्यमंत्र्यांच्या महिला अधिका-याची बदनामी करताना पकडले गेले. पण ते आजही मुक्त आहे. या व्यक्तीने व्हॉट्सअॅप वरून नाशकात दंगली घडवताना बौद्ध गांवांवर हल्ले चढवले.
आणि आता तर भिडे हे जयंत पाटलांच्या घरी असतात. कोरेगाव भीमा प्रकरणी वॉरंट निघाले तेव्हांहॊ होते असे समोर येत आहे.
युती केली तर आमची मतं प्रामाणिकपणे पडतात. त्यांची पडत नाहीत. इतक्या वर्षात त्यांना आपल्या मतदाराच्या मानसिकतेत बदल करटा आलेला नाही हे कसले धर्मनिरपेक्षतेच्या आणि पुरोगामित्वाच्या गप्पा मारतात ?
नसतील तर आघाडीचं एकतर्फी प्रेशर प्रकाश आंबेडकरांवर नकोय.
भारतातल्या सर्वात मोठ्या राज्यात कॉंग्रेसचे नेमके काय चाललेय ?
Monday, 18 February 2019
ये भीड कहासे आती है ? - राजेंद्र पातोडे
संदर्भासह स्पष्टीकरण...!
** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...

