Wednesday, 26 December 2018

काव्यबाण - संविधान हाती घ्या रे - विकास साळवे

संविधान हाती घ्या रे
-----------------------------
विषारी नागाचे फणे आता डोलु लागले रे,
चावा घेण्या तोंड आता खोलु लागले रे..
सावधान व्हा गड्यांनो सावधान व्हा रे,
विषारी नागं ठेचण्या हाती संविधान घ्या रे..
लागले गळाला जे जे लाचार जाहले रे,
दलाल समाजाचे तिथे हजार जाहले रे..
सावधान व्हा गड्यांनो सावधान व्हा रे,
विषारी नागं ठेचण्या हाती संविधान घ्या रे..
आपले कोण परके कोण कळेना कुणाला रे,
घात तिथेच करती कसे कळेना मनाला रे..
सावधान व्हा गड्यांनो सावधान व्हा रे,
विषारी नागं ठेचण्या हाती संविधान घ्या रे..
विझवु चला सारे आज स्वार्थाच्या चुली रे,
सुरक्षित ठेवण्या आमुच्याच त्या मुली रे..
सावधान व्हा गड्यांनो सावधान व्हा रे,
विषारी नागं ठेचण्या हाती संविधान घ्या रे..
मनसुभे मनुचे आज इथे सुरक्षित जाहले रे,
लुटण्या अब्रु आईची आरक्षित जाहले रे..
सावधान व्हा गड्यांनो सावधान व्हा रे,
विषारी नागं ठेचण्या हाती संविधान घ्या रे..
उध्वस्त करण्या आयुष्य हे काळ डागलाय रे,
लढण्या अंधा-या आयुष्याशी सुर्य जागलाय रे..
सावधान व्हा गड्यांनो सावधान व्हा रे,
विषारी नागं ठेचण्या हाती संविधान घ्या रे..
विकृत धर्माधांने काल मेंदुच चोरला रे,
त्यासाठीच बुध्द भिमाने काळजात कोरला रे..
सावधान व्हा गड्यांनो सावधान व्हा रे,
विषारी नागं ठेचण्या हाती संविधान घ्या रे..
*विकास साळवे,पुणे*
*+919822559924...✍*

Tuesday, 25 December 2018

अशोक चव्हाणांचा वैयक्तिक स्वार्थ व कॉंग्रेसची अडचन.

अशोक चव्हाणांचा वैयक्तिक स्वार्थ व कॉंग्रेसची अडचन.
- मनोज काळे, ठाणे.
मित्रांनों, भाजपा व आरएसएस विरुद्ध देशभरात मागील साडेचार वर्ष एकमेव बाळासाहेब आंबेडकरांनी रान उठवले आहे, बाकी कॉंग्रेससह सर्वच विरोधक शांतपने पहात बसले होते, बाळासाहेबांनी अखंडपने अविरत भाजप च्या सर्व हलचालींवर लक्ष ठेवुन त्यावर नियंत्रन मिळवण्यासाठी आवाज बुलंद केला आहे हे सर्वांनाच माहीत आहे, निवडणुका जवळ आल्यावरच जनतेचे प्रश्न रेटण्याचा भंपकपना आंबेडकरांमध्ये नाही हे सर्व भारत देशाने पाहीले. इव्हिएम बंदीसाठी मोर्चा, इव्हिएम चे प्रतिकात्मक दहन, नोटबंदी घोटाळा, राफेल घोटाळा, रोहीत वेमुला हत्या, झुंडशाही या सर्व प्रश्नांवर परखड मत मांडणारे एकमेव बाळासाहेबच होते, आर एस एस कडील अवैध शस्त्रसाठा जप्त करावा व होऊ घातलेल्या दंगली रोखाव्या यासाठी जनतेचा रेटा वाढवुन या देशावर उपकार करणारेही एकमेव बाळासाहेब आंबेडकरच आहेत, सत्तर वर्ष ज्या भारतीय नागरिकांना किंवा समाजांना राजकीय प्रतिनिधित्व मिळाले नाही त्यांना सत्तेत बसवण्याचे, लोकशाही तळागाळापर्यंत पोचऊन लोकशाहीला यशस्वी करण्यासाठी झटणारे एकमेव बाळासाहेबच...
हे सर्व पाहुन, बाळासाहेबांची स्वच्छ व निस्वार्थी भुमिका हेरुन सर्व आदिवासी, भटके विमुक्त, छोटे ओबीसी, आलुतेदार बलुतेदार, मातंग, मुस्लिम, धनगर व इतर वंचित घटकांनी समाजांचे नेतृत्व बाळासाहेबांवर सोपवले आहे, कॉंग्रेस पेक्षा जास्त ताकद आज वंचित बहुजन आघाडी कडे आहे. तरीही फक्त हिटलरवादी हुकुमशाही व संविधानाच्या शत्रुंना सत्तेपासुन रोखण्यासाठी बाळासाहॆबांनी कॉंग्रेस सोबत युती करुन राजकीय लढा द्यायचा निर्णय केला व कॉंग्रेस कडे त्या बारा जागा मागितल्या ज्या जागा कॉंग्रेस मागील तीन निवडणुकात सतत हरत आले आहेत, त्या जागा देऩे कॉंग्रेस ला का कठीन जात आहे?
कॉंग्रेस ज्या जागा निवडुण आणु शकत नाही त्या जागा वंचित बहुजन आघाडी निश्चितपने जिंकेल हे कॉंग्रेसलाही माहीत आहे पन त्यांना तिसरा पर्याय नको आहे, त्यांना आंबेडकरी नेतृत्वाची ताकद वाढलेले नको आहे, गांधी घराण्यापुढे लोटांगन घालणार्यांना आंबेडकर नावाचा नेता नको आहे हे यातुन अधोरेखित होते.
एमआयएम ला अशोक चव्हाणांकडुन इतका कट्टर विरोध म्हणजे स्वतःची नांदेड ची राजकीय हुकुमत जपण्याच्या स्वार्था पलिकडे काहीही नाही, एमआयएम व भारिप बहुजन महासंघ एकजिवाने एकत्र आले तर नांदेड मधुन अशोक चव्हाणांचे दुकान कायमचे बंद होइल व त्यांना महाराष्ट्रात दुसरे कुठुन निवडणुक लढुन जिंकुन येणे अशक्याहुन अशक्य आहे, फक्त या एका स्वार्थासाठी अशोक चव्हाण कॉंग्रेस पक्षालाच आज अडचनित आनत आहेत, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे असतानाही अशोक चव्हाणांची लुडबुड व एमआयएम ला भारिप ने सोडावे हा हट्ट त्यांच्या वैयक्तिक राजकिय अस्तित्व टिकवण्यासाठीचा केविलवाना प्रयत्न आहे हे स्पष्टपने दिसते.
अशोकराव कॉंग्रेसपेक्षा मोठे बनायचा तुमचा प्रयत्न भाजप चा पथ्यावर पडेल असे तुम्हाला वाटत नाही का?
आदर्श घोटाळ्यातुन सुटलात पन जनतेच्या रेट्यापुढे तुमचा हा रडीचा डाव चालनार नाही, आज तुमच्या कॉंग्रेस पेक्षा वंचित बहुजन आघाडी मोठी ताकद आहे हे सत्य मान्य करा व बाळासाहेबांना शरन जा.
काल एका चर्चेत कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे प्रवक्ते ( वाघमारे व गजभिये)  बाळासाहेबांना वारंवार "प्रकाश आंबेडकर आमचे दैवत आहेत“ असा उल्लेख करताना पाहीले, आता बाळासाहेबांना दैवत म्हणता तर त्यांना शरन यायची लाज बाळगु नका.
आजवर बाळासाहेबांशी किंवा इतर रिपाई नेत्यांशी जसे वागत आलात तसे आता वागायची घोडचुक करु नका, तोंडघुशी पडाल, आता तुम्ही पैशाने वंचितांचे मत विकत घेऊ शकनार नाहीत, आमचे मतदार तुमचे पैसे तर घेतील पन मतदान वंचित बहुजन आघाडीलाच करतील हे लक्षात ठेवा.
भाजपाला हरवायचे आहे, भाजप संविधान विरोधी आहे,  हे सर्व मुद्दे बाळासाहेबांचेच कॉपी मारताय तसे त्यांच्याशी सन्मानाने चर्चा करा व राजकीय अस्तित्व जपा. पुर्वीची परंपरागत मग्रुरी आता वंचित समाज कदापी सहन करणार नाही, वैयक्तिक स्वार्थ सोडा अन्यथा तेलंगना प्रमाणे कॉंग्रेस व भाजपा दोघांना लाथाडुन येथे वंचित सत्तेवर बसतील, आता हे वंचित समुहांचे पक्के ठरलेले आहे. तुम्ही स्वतःचा मतदार संघातील हुकुमत महत्वाची वाटत असेल पन आम्हाला या सर्व देशावर प्रेम आहे व आम्ही सर्व देशासाठी, देशातील वंचितांसाठी प्राण पनाला लावुन ही निवडणुक अस्तित्वाची लढाई म्हणुन लढणार आहोत हे लक्षात राहु द्या.
जय भिम जय संविधान
- मनोज काळे, ठाणे,  8169291009

----------------------------------------

काँग्रेसच्या नेत्यांनो दलित/बौद्ध/ वंचित बहुजनांना इमोशनल ब्लॅकमेलिंग करणे सोडा।

काँग्रेसच्या नेत्यांनो दलित/बौद्ध/ वंचित बहुजनांना इमोशनल ब्लॅकमेलिंग करणे सोडा।

-
विश्वजीत गजभिये।

नुकत्याच आलेल्या बातमीनुसार अशोक चव्हाणांनी जाहीर केले की वंचित बहूजन आघाडीशी जर युती झाली नाही तरी अकोला लोकसभेची जागा प्रकाश आंबेडकर यांना सोडू।

मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या तमाम जनतेस लक्षात आणून देऊ इच्छितो की महाराष्ट्र राज्याचे लोकसभा प्रभारी मा.मल्लिकार्जुन खरगे असल्यामुळे, जागा वाटापासंदर्भात सर्व निर्णय मा.खरगेजी व दिल्लीतील हाय कमांड घेत असते त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही काँग्रेस नेत्याला हा अधिकार नाही.सबब मेन स्ट्रीम मिडियामध्ये अशोक चव्हाण वा इतर कुणी नेते वंचित बहुजन आघाडीच्या युतीसंबंधी बोलत असतील तर तो शुद्ध कावेबाजपणा आहे,

ज्याअर्थी निर्णय घेणारे खरगेजी व दिल्लीतील हाय कमांड असल्यामुळे राज्यातील नेत्यांना युतीवर बोलण्याचा नैतिक अधिकार राहत नाही।

तर,

आपण मूळ विषयाकडे वळूयात, अशोक चव्हाणांनी वक्तव्य केलं की वंचित बहुजन आघाडीशी युती झाली नाही तरी अकोला लोकसभा सिट प्रकाश आंबेडकरांसाठी सोडू।

वरील वक्तव्यावरून अशोक चव्हाणांचा भंपकपणा उघडकीस येतो।

माझा चव्हाणांना थेट सवाल हा आहे की आत्ताच म्हणजे 2019 लाच बाळासाहेब आंबेडकरांवर एवढे प्रेम उतू का येतंय.???

तर याला दोन कारणे असावीत एक म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा झंझावात बघून तमाम काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे।
आणि दुसरे म्हणजे बाळासाहेबांबद्दल इमोशनल करून इथल्या दलित/वंचित समूहाच्या संपूर्ण मतांवर डल्ला मारायचा आहे।

असेच प्रेम 2004, 2009, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत का उतू गेले नाही.???

वर नमूद केलेल्या वर्षी भाजपा वर्सेस बाळासाहेब आंबेडकर अशी सरळ लढत असतांना तिनही वेळेस काँग्रेसने माती खाल्ली आहे।

सण 2004 ची आकडेवारी अभ्यासली असता असे दिसून येते की भाजपाचे  संजय धोत्रे 313324 मते मिळवून विजयी झाले होते त्यावेळी बाळासाहेबांना 170000 च्या आसपास मते होती, केवळ बाळासाहेबांना पाडण्यासाठी काँग्रेसकडून लक्ष्मणराव तायडे यांना उमेदवारी देण्यात आली होती व त्यांनी 206912 मते मिळवली होती,

जर काँग्रेस पक्षाने तायडेंच्या रुपात बौद्धांची मते खाण्यासाठी डमी उमेदवार दिला  नसता तर बाळासाहेब सहज निवडून आले असते।

सण 2009 ची आकडेवारी अभ्यासली असता असे दिसून येते की भाजपाचे विजयी उमेदवार धोत्रे यांना 2,87,526 मते पडली तर बाळासाहेब आंबेडकर यांना 2,22,678 मते पडली म्हणजे बाळासाहेबांचा केवळ 64,858 इतक्या कमी मतांनी पराभव झाला होता।
यावेळी सुद्धा काँग्रेसने बाबासाहेब धाबेकर यांना उमेदवारी देऊन दलित/ बहुजनांची 1,82,787 मते फोडली होती।

यावेळी काँग्रेसचे बाळासाहेब आंबेडकरांवर प्रेम का नव्हते.???
सांगा ना चव्हाण साहेब,  ....सांगा।

सण 2014 ची आकडेवारी अभ्यासली असता असे दिसून येते की भाजपाचे विजयी उमेदवार धोत्रे यांना 456472 मते मिळाली होती तर बाळासाहेब आंबेडकर यांना 238776 मते मिळाली होती।

यावेळी काँग्रेसने केवळ बाळासाहेबांचा पराभव करण्यासाठी बौद्ध वर्सेस मुस्लिम अशी कावेबाज व धूर्त खेळी खेळून हिदायतउल्ला पटेल या मुस्लिम उमेदवाराला मुस्लिमांची मते खाण्यासाठी उमेदवारी दिली होती। यात त्यांनी 2,53,356 मते मिळवली।

बाळासाहेबांच्या मतांची व पटेलांच्या मतांची बेरीज केली असता बाळासाहेब सहज निवडून आले असते मग त्यावेळी काँग्रेसचे त्यांच्यावर प्रेम का नव्हते.???

केवळ बाळासाहेब आंबेडकरांना पाडायचे म्हणून मुस्लिम उमेदवार देण्यात आला होता काय.??

सांगा ना चव्हाण साहेब,,,.......सांगा।

आता 2019लाच बाळासाहेबांवर इतके प्रेम का.????

केवळ एक जागा सोडून संपूर्ण दलित/मुस्लिम/वंचित बहुजनांच्या मतांवर डल्ला मारायचा आहे काय.???

तुम्ही आम्हाला मूर्ख समजता काय.???

आकडेवारीचा खेळ/ सामाजिक ध्रुवीकरनाचा खेळ आम्हाला कळत नाही काय.????

सांगा ना चव्हाण साहेब,,,.... सांगा।

मला व माझ्यासारख्या कित्येक तरुणांना आज काँग्रेस जे दलितांसोबत  80/90 च्या दशकातील राजकारण करीत आहे त्यावर प्रचंड हसू येत आहे, अरे बाबांनो 2 खासदारकी, 3/4 आमदार, 2/3 महामंडळे, 3/4शासकीय समित्याच्या बदल्यात संपूर्ण राज्यातील तमाम दलित/बौद्ध/मुस्लिम/वंचित बहुजनांचे मतांवर डल्ला मारण्याचे दिवस गेलेत।

इतके वर्ष आम्हाला मूर्ख  बनवलात, आमची फसवणूक केलीत ते आम्ही विसरतो मात्र आता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणतील तेच होणार। आमचा राजकीय वाटा आम्हाला द्या,

चव्हाण साहेब तुमच्या कुठलेही इमोशनल ब्लॅकमेलिंगला आता आम्ही बळी पडणार नाही म्हणून तुमच्या अधिकारात नसलेले व  बालिशपणाचे  वक्तव्य करू नका। आता या वंचित बहुजन समाजाला मूर्ख बनवणे तुम्हास जमणार नाही।

विश्वजीत गजभिये।
25/12/2018

Monday, 24 December 2018

..पन का ? हा विचार करुन पहा.

..पन का ? हा विचार करुन पहा.

प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जगात ओळख आहे ती पुस्तकप्रेमी_बाबासाहेब म्हणुनच....
पुस्तकांसाठी घर बांधणारा सृष्टीच्या इतिहासातील एकमेव महामानव, घरात राशन नसले तरी चालेल पन घरात नविन पुस्तके आणली पाहीजेत असेच त्यांचे पुर्ण जिवन गेले, पुस्तके गोळा करणे, वाचणे, नविन विषयांवर पुस्तके लिहीणे यातच जीवन गेले..

पन याच पुस्तकप्रेमी बाबासाहेबांनी एक पुस्तक अक्षरशः जाळुन खाक केले...ते पुस्तक म्हणजेच #मनुस्मृती.
आज आपन ज्या ज्या गोष्टींना वाईट, नालायकपनाचे, अन्यायकारक समजतो त्या सर्व गोष्टींना मनुस्मृतीत कायद्याचे रुप दिले होते व सारा देशाने त्यानुसार जगायची सवय लावुन घेतली होती.
त्या जुलमी कायद्यापासुन भारतीयांची सुटका करायला व ते पुस्तक जाळायला बाबासाहेबांसारखा पुस्तकप्रेमीलाही ते पुस्तक जाळावे लागले.

- मनोज काळे

वंचीत बहुजन आघाडी,एक्सप्रेस सुसाट धावणार आहे

वंचीत बहुजन आघाडी,एक्सप्रेस सुसाट धावणार आहे
-------------------------------------------------------------
विधानसभेत आणि लोकसभेत जाणाऱ्या प्रस्तापितांच्या राजकीय बुलेट ट्रेना मध्ये फक्त प्रस्तापित लोकांच्या पाहुणे-राहुन्याचेच टिकट बुक असतात. प्रस्तापितांच्या राजकीय बुलेट ट्रेन या खालील प्रमाणे आहेत.
१) काँग्रेस राजकीय बुलेट ट्रेन
२) भाजपा राजकीय बुलेट ट्रेन
३) राष्ट्रवादी राजकीय बुलेट ट्रेन
४) शिवसेना राजकीय बुलेट ट्रेन
           ह्या बुलेट ट्रेंन मधून इतरांना म्हणजेच मराठा समाज १६९ घरांणे सोडून,मुस्लिम,धनगर,बोद्ध, ख्रिचंन,माळी, तेली,साळी, कोळी,मांग,चांभार,ढोर,होलार, घिसडी,कुंभार,कैकाडी,पारधी,भिल,आदिवासी,लिंगायत,सिंपी इत्यादी  घटकांना प्रवास करून विधानसभेत व लोकसभेत न जाण्याची भरदार अशी मजबूत आपल्या, आपल्या पाहुण्या-राहुण्याच्या, धनदांडग्याच्या व एखांद्या आपल्या पाळलेल्या कुत्र्याच्या हिताची व्यवस्था करून ठेवली आहे. म्हणून तर या राजकीय बुलेट ट्रेनच्या माध्यमातून विधानसभेत व लोकसभेत फक्त हे प्रस्तापित लोकं जाऊन बसतात.आणि या राजकीय बुलेट ट्रँनच्या माध्यमातून सत्ते मध्ये आपणच कशे येऊन बसू याची पुरेपूर काळजी घेतली जाते.
         या बुलेट ट्रेनला धुनं, रिपेरिंग करणं, डाग-डुग करणं, ग्रीसिंग करणं , नट बोल्ट टाईट करणं, झाड-झुड करणं, लाईट,as, कलर,राजकीय बुलेट ट्रेन च्या पट्रीची देख-रेख करणं असे असंख्य तडक्लास ची कामं हे वर दिलेल्या वंचीत घटकांच्या वाटेला दिले जातात. ( पक्ष वाढीचं काम हे वरील दिलेल्या वंचीत घटका कडून भावनिकतेच्या आधारावर करून घेतलं जातं जसे की राम मंदिर,हिंदू,गोमाता, खोटारडा पुरोगामी पणा ) यांनी फक्त दिलेत तेवढेच कामं करायचे , यांना या राजकीय बुलेट ट्रेन मध्ये बसून थेट विधानसभा,लोकसभा मध्ये जाण्याची मुभा नाही. जर यांना या राजकीय बुलेट ट्रेन मध्ये बसवलच तर फार-फार  ग्रामपंचायत,पंच्यात समिती किंवा लैच-लैच झालं तर जिल्हा परिषद मध्ये नेऊन सोडल्या जाते. पुढे विधानसभा व लोकसभा सोडून बोलो.
       याच वंचीत घटकांना विधानसभेत व लोकसभेत नेण्याण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी अशी  एक राजजकीय एक्सप्रेस तयार केली आहे. कि, ती प्रस्थापितांच्या राजकीय बुलेट ट्रेनला टक्कर देऊन पुढे जाणारी आहे. ती वंचितांना थेट विधानसभेत व लोकसभेत घेऊन जाणारी आहे. आता फक्त निर्यय घ्यायचा आहे तो इथल्या वंचीत घटकांना. तो असा, प्रस्थापितांच्या राजकीय बुलेट ट्रेनचे काम करून प्रस्थापितांनाच त्या राजकीय बुलेट ट्रेन मध्ये बसून विधानसभेत व लोकसभेत पाठवायचं? कि बाळासाहेबांनी तयार केल्येल्या वंचीत बहुजन आघाडी एक्सप्रेसचे काम (ज्यात आपलं हित आहे.)करून  ईच्यातच बसून आपण स्वतः विधान सभेत व लोकसभेत जायचं?  ज्या-ज्या वंचीत घटकांचं प्रतींनिधित्व विधानसभेत व लोक सभेत पाठवायचं आहे त्या-त्या सर्व वंचीत घटकाणे २०१९ डोळ्या समोर लक्ष ठेऊन ,वंचीत बहुजन आघाडीचे काम तन, मन,धनाने करावं. कारण आता विधानसभा मतदारसंघ-लोकसभा मतदारसंघ to विधानभवन-संसदभवन "वंचीत बहुजन आघाडी एक्सप्रेस" सुसाट धावणार आहे.

                  --संदीप साळवे,जालना.
                  मो.नं.८६९१९५५२०२

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...