शांतीदुताच्या भुमिकेत बाळासाहेब आंबेडकर...!
- भास्कर भोजने
सत्ताधारी वर्ग सत्तेसाठी साम,दाम,दंड,भेद या अस्त्रांचा वापर करीत असतो...!
यापैकी दंड देणें हे अस्त्र वापरतांना आपल्या देशात जातीय दंगली वा धार्मिक दंगली पेटवून अल्पसंख्याक समुहाला दंड देण्याची जणू काही रितचं बनली आहे...!
महाराष्ट्रात आंबेडकरी समुहाला दंड देण्यासाठी इथल्या प्रतिक्रांतीवाद्यांनी नेहमी जातीय दंगली पेटवून आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे...!
या दंड देण्याच्या अस्त्राचा परिणाम इतका भयावह असतो की,मानवता कलंकित होते.,मनुष्यत्व हिनवलं जातं., कित्येक आयुष्ये बरबाद होतात.,अब्रू वेशीवर टांगली जाते., तरुणांच्या पिढ्या बरबाद होतात., आर्थिक दारिद्रय पदरात येते आणि मग मना-मनात भिती,भयग्रस्तता ठाण मांडून बसते.आणि म्हणूनचं मग लाचारी पत्करण्या शिवाय पर्याय शिल्लक राहतं नाही...!
अशा लाचार समुहाला पाहिजे तसं वापरुन घेता येते.आणि सत्ता राबविता येते.असा हा प्रयोग आहे...!
अशा अल्पसंख्याक समुहाचे नेतृत्व करणे सहज सोपी बाब नाही...!
या समुहाच्या नेतृत्वाला प्रतिक्रांतीवाद्यांचे मनसुबे ओळखुन समाजाला दंड या अस्त्रा पासुन वाचविण्यासाठी अतिशय उच्च कोटिचे बौद्धिक कौशल्य वापरावे लागते...!
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नंतर आंबेडकरी समुहासाठी अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी शांतीदुताची भुमिका घेऊन आपले नेतृत्व कसोटीवर घासून सिद्ध केले आहे...!
अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी सार्वजनिक जीवनाला १९८० पासुन सुरुवात केली आहे. तेव्हा पासून वेळोवेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी आंबेडकरी समुहासाठी शातीदुताची भुमिका घेऊन आंबेडकरी समुहाला दंड या अस्त्राची शिकार होऊ दिले नाही...!
१) १९७६ मध्ये महाराष्ट्रात शरद पवार यांनी नामांतराचा प्रश्न ऊभा केला आणि तो प्रश्न कॉंग्रेस पक्षाने चिघडविला म्हणून नामांतराचे आंदोलन उभे राहिले.हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांच्या मार्फत प्रचंड दडपशाही करण्यात आली.आंबेडकरी चळवळीला मुळासकट उखडून टाकण्याचाही प्रयत्न त्यावेळी झाला.त्यासाठी शिवसेनेसारख्या जातीयवादी संघटनांना सोबतं घेऊन आंबेडकरी समुहाला एकांगी पाडण्यात आले होते.त्या आंदोलनात आंबेडकरी समुहाचे अपरिमीत नुकसान झाले.त्यावेळी त्या परिस्थितीला बदलणे, शांतता प्रस्थापित करणे महत्त्वाचे होते...!
अशावेळी अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्याचा दौरा केला, मराठवाड्यातील गावोगावी जाऊन भांडणं मिटविणे, सामंजस्य निर्माण करणे,यासारखी कामे केली आणि शांतीदुताची भुमिका निभावली...!
नामांतराच्या आंदोलनात मनातुन खचलेल्या आंबेडकरी समुहाला नैतिक बळ देण्यासाठी अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी १९८३ साली नाशिक ते मुंबई हा २ मार्च ते ८ मार्च असा लाॅंगमार्च काढला आणि खचलेल्या समुहाला भयग्रस्त अवस्थेतून बाहेर काढण्याची भुमिका निभावली...!
२) १९८७ साली रिडल्स इन हिंदूइझम या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथावरुन वातावरण पेटविण्यात आले...!
शिवसेनेच्या बाळ ठाकरे यांनी मुंबई मध्ये धर्माचा आधार घेऊन चिथावणीखोर वक्तव्य करून आंबेडकरी समुह विरुद्ध हिंदू समुह अशी आग लावण्याचा प्रयत्न चालविला तेव्हा, अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी, दिनांक ७ फेब्रुवारी १९८८ ला हुतात्मा चौकाला सामुदायिक अभिवादन करायचे असे फर्मान काढले.सगळेजण अवाक् झाले कारण परिस्थिती अतिशय स्फोटक होती.दुस-या दिवशी हुतात्मा स्तंभाला सामुदायिक अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला,ही बातमी मुंबईमध्ये वा-यासारखी पसरली आणि दंगली घडवायले सरसावलेले हात एकदम थप्प झाले...!
बाळासाहेब आंबेडकरांनी होणारी दंगल थांबविली,शांतीदुताची भुमिका निभावली...!
३) अॅड बाळासाहेब आंबेडकर अकोला जिल्ह्यात आलें तेव्हां अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील समाजमन हे अस्वस्थ होते, कारणं अकोला जिल्ह्यत गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते श्री.बलदेवराव म्हैसने पाटिल हे ग्रामीण भागात बलाची उपासना करण्यासाठी म्हणून आखाडे निर्माण करीत असतं परंतु ते ज्या गावात जात असतं त्या गावात बौद्ध विरुद्ध मराठा असा जातीय झगडा होतचं असे, त्यामुळे बलदेवराव पाटिल म्हणजे बौद्धांचा कर्दनकाळ असे ग्रामीण भागात समिकरणचं तयार झाले होते...!
अशा अस्वस्थ समाज अवस्थेचा बाळासाहेब आंबेडकर यांनी अभ्यास केला आणि १९९९ च्या अकोला जिल्हा परिषद निवडणुकीत बलदेवराव पाटिल यांच्या पत्नी सौ.चित्रलेखाताई म्हैसने यांना बाळासाहेब आंबेडकर यांनी व्याळा जि.प.सर्कलची उमेदवारी दिली त्यांना निवडून आणले आणि महिला व बालकल्याण सभापती बनविले, त्यामुळे जिल्ह्यातील बौद्ध आणि मराठा समाजात होणारे जातीय झगडे थांबले, शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा प्रयोग यशस्वी झाला, बाळासाहेब आंबेडकर यांनी शांतीदुताची भुमिका निभावली...!
४) आत्ता २०१६ साली मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक मराठा लाख मराठा अशी हाक देऊन जातीयवादी वातावरण तयार करण्यात यशस्वी झाले होते, त्यावेळी प्रतिमोर्चे काढून मराठ्यांना प्रतिऊत्तर देऊ अशी खेळी रचल्या गेली आणि मराठा विरुद्ध आंबेडकरी समुह अशी दंगल घडविण्याचा मनसुबा ठरला होता परंतु अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रतिमोर्चे नको ही भुमिका घेतली आणि बिघडणा-या परिस्थिती वर नियंत्रण मिळविले,शांतीदुताची भुमिका निभावली.होणारा अनर्थ टळला...!
५) कोपर्डी बलात्कार प्रकरणातही जातीय दंगल घडविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला त्याही वेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी शांतीदुताची भुमिका निभावली आहे...!
६) नाशिक येथिल बौद्ध वस्तीवरील हल्ले,नगर येथील बौद्ध वस्तीवरील हल्ले आणि सातारा जिल्ह्यातील बौद्ध वस्तीवरील हल्ले यावेळी सुद्धा अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी शांतीदुताची भुमिका घेतली आणि होणारा अनर्थ टाळला...!
७) १ जानेवारी २०१८ चा भ्याड हल्ला .जर अॅड बाळासाहेब आंबेडकर भुमिका घेतं नाहीत तर प्रतिक्रांतीवादी निश्र्चितपणे आंबेडकरी समुहाला टार्गेट करुन पोलिसी अत्याचाराचा बळी केल्याशिवाय राहणार नव्हते.यावेळीही बाळासाहेब आंबेडकर यांनी शांतीदुताची भुमिका निभावली आहे आणि समाजाच्या होणा-या अपरिमित हानी ला थोपविले आहे...!
असहिष्णूतेच्या काळात देशातील अल्पसंख्याक समुहाला टिकाव धरणेही कठीण कर्म असते अशा अस्वस्थ काळात अॅड बाळासाहेब आंबेडकर हे आंबेडकरी समुहाला ,संरक्षण तर देतचं आहेत परंतु त्याही पलिकडे आंबेडकरी समुहाच्या राजकीय सत्तेचे यशस्वी समिकरणंही मांडत आहेत...!
जयभीम.
-भास्कर भोजने.