कॉंग्रेस पक्ष संविधानवादी आहे का..??
: भास्कर भोजने
कॉंग्रेस हा पक्ष ब्राम्हण्यवादी आहे अशी धारणा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची होती.,म्हणूनचं बाबासाहेब आंबेडकर कॉंग्रेस पक्षाला "जळतं घर म्हणायचे " ही धारणा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुभवातून निर्माण झाली होती...!
कॉंग्रेस पक्षाने गेल्या सत्तर वर्षात अधिकाधिक काळ,देशाची आणि प्रांताची सत्ता आपल्या अंकित ठेवली आहे...!
ज्या संविधानावर देशाचा कार्यभार चालतो त्या संविधानातील पहिली घटना दुरुस्ती पं.जवाहरलाल नेहरू यांनी १९५७ साली केली, आणि पहिली घटना दुरुस्ती ही आरक्षणाच्या विषयावर करण्यात आली, तेव्हा पासून तर आजपर्यंत राज्यघटनेत १२४ वेळा घटना दुरुस्ती केल्या गेली...!
संविधानाचा सन्मान करण्याऐवजी स्वहितासाठी, संविधान राबविण्यात कॉंग्रेस पक्षाने धन्यता मानली आहे...!
कॉंग्रेस पक्षाच्या व्यतिरिक्त इतर पक्षांचे राज्यसरकार घालवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने ३५६कलमाचा कित्येकदा गैरवापर केला आहे, आणि संविधानाचा पायदळी तुडवीले आहे...!
१९७५ साली देशात आणीबाणी लादून कॉंग्रेस पक्षाने संविधानाचे महत्व झुगारुन अतिरेक केला आहे...!
कॉंग्रेस पक्षाच्या राजवटीत " राष्ट्रपती " हे पद रबरी स्टॅम्प आहे अशी छबी तयार करण्यात आली...!
कॉंग्रेस पक्षाच्या कारकिर्दीतच "निवडणूक आयुक्त " यांचे अधिकार कुणालाही माहित नव्हते हे वास्तव आहे,१९९० च्या अगोदर निवडणुकीतील प्रचार हा रात्रीचे बारा वाजेपर्यंत चाले, निवडणूक काळात सरकार अर्थात कॉंग्रेस पक्ष कोणतीही घोषणा करुन जनतेला आमिष देतं असतं आणि निवडणूका जिंकतं असतं.ही सर्रास संविधानाची पायमल्ली होती...!
१९८९ ला टि.एन शेषण निवडणूक आयुक्त झाले आणि निवडणूक आयोगाचे अधिकार जनतेला कळू लागले.यापुर्वी कॉंग्रेस पक्षाने संविधानाची पायमल्ली केली आहे...!
१९७३साली कॉंग्रेस पक्षाने गरीबी हटाव चा नारा दिला मात्र अद्याप गरीबी हटवू शकले नाही ,त्या ऊलटं भांडवली व्यवस्था ऊभी करण्यात कुठलीही कसर सोडली नाही, हा एक प्रकारे संविधान द्रोह नाही का..??
संविधानाचा उघडं ऊघडं विरोध करणारे आरएसएस आणि भाजपाचे मंत्री संविधान बदलण्याची भाषा करीत असतांना कॉंग्रेस पक्षाने कुठलीही भुमिका घेतली नाही,असे का.??
संविधानाच्या प्रति दिल्ली येथील जतंरमंतरवर जाळण्यात आल्या तेव्हा कॉंग्रेस पक्षाची भूमिका काय...??
केवळ निवडणुका आल्या की, संविधान बचाव भुमिका घ्यायची म्हणजे आपणं संविधानवादी आहोत अशी प्रतिमा तयार होईल या भ्रमात आता कॉंग्रेस पक्षाने राहू नये...!
कॉंग्रेस पक्ष खरेच संविधानवादी असेल तर आता कॉंग्रेस पक्षाला ठोस भूमिका घ्यावी लागेल...!
बोलायचं एक आणि वागायचे भलतेचं ही लबाडी आत्ता जनतेच्या लक्षात आली आहे, म्हणून लेखी स्वरूपात कॉंग्रेस पक्षाने भुमिका घेतली पाहिजे की, आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी आम्ही काय करु हा आराखडा कॉंग्रेस पक्षाने दिला पाहिजे...!
जर अशाप्रकारचा आराखडा कॉंग्रेस पक्षाने दिला नाही तर कॉंग्रेस हा पक्ष संविधानवादी नाही हेही सिद्ध होईल...!
आता भारतीय संविधान धोक्यात आहे, अशावेळी संविधानवादी आणि संविधान विरोधक यांच्यामधील भेदरेषा स्पष्ट असली पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे...!
अशा आणिबाणीच्या काळात जर ढोंगी पक्षाच्या,तकलादू आणि फसव्या भुमिकेवर विश्र्वास ठेवला तर संविधान बचाव करताचं येणार नाही म्हणूनच कॉंग्रेस पक्षाने आपणं सच्चे संविधानवादी आहोत हे प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केले पाहिजे ही काळाची गरज आहे...!
जयभीम.
Wednesday, 13 February 2019
कॉंग्रेस पक्ष संविधानवादी आहे का..??
Subscribe to:
Posts (Atom)
संदर्भासह स्पष्टीकरण...!
** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...