Thursday, 10 January 2019

नेता काय करु शकतो...!

नेता काय करु शकतो...!
: भास्कर भोजने

गेल्या तीन वर्षापासून देशात जे सरकार आहे, त्या सरकारला हे हिंदु राष्ट्र म्हणून निर्माण करायचे आहे...!
     हिंदू राष्ट्र निर्माण करण्यात संविधान हा सर्वात मोठा अडथळा आहे...!
संविधान बदलणे हा मुख्य हेतू घेऊन आरएसएस आणि मनुवादी कार्यरत आहेत.
    संविधान बदलण्यासाठी जे बहुमत पाहिजे त्या साठी धार्मिक धृवीकरण करुन पाशवी बहुमताचे गणित मांडले जात आहे...!
    त्याचाच भाग म्हणून इथल्या अल्पसंख्याक समुहाला टारगेट केल्या जात आहे....!
म्हणून गेली तीन वर्षे झालीत सर्वात मोठा अल्पसंख्याक समुह मुस्लिम यांना हेरुन हेरुन त्यांच्या वर अन्याय अत्याचार केले जात आहेत...!
    जिथं जिथं शक्य आहे तिथं मुस्लिम बांधवावर अन्याय केला जात आहे. परंतु हा  सर्वात मोठा समुदाय निमुटपणे हे सर्व सहन करीत आहे. कारण मुस्लिम समुदायाकडे नेतृत्व नाही. जे जे नेते म्हणवून घेतात ते नेते नसुन ते प्यादे आहेत...!
    कुणी काँग्रेस चं ,कुणी भाजपचं तर कुणी समाजवादी, बसपाचं प्याद आहे, नेता नाही.
   दलित समुदाय हा १२ % अल्पसंख्याक समुदाय आहे. या घटकावरही गेल्या तीन वर्षात अन्याय अत्याचार वाढलेतं परंतु दलित समुह अन्याय, अत्याचार निमुटपणे सहन करीत नाही तर प्रतिकार करतो आहे...!
      गुजरात मधील ऊना कांड झाले. दलितांनी प्रतिकार केला. अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी ऊना ला जाऊन दलितांना ऊपदेश केला, हिंदू धर्म सोडा धर्मांतर करा...!
  दलित स्काँलर रोहित वेमुला वर अन्याय झाला अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीत मोर्चाकाढला आणि मनुवादी सरकारला जबाब विचारला...!
  भिमाकोरेगांव ला दलित समुहावर दगडफेक केली अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद ची हाक दिली आणि मनुवादी भिडे आणि एकबोटे ला आरोपी म्हणून सरकारला कार्यवाही करायला भाग पाडले...!
    दिल्ली पर्यंत सर्वांना जबाब विचारला.दलित अत्याचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविला...!
    समाजाला नेता असेल तर त्या समाजाचं दु:ख निवारणासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात .परंतु समाजाला नेताचं नसेल तर दाद कशी मागणारं....!
   नेता म्हणजे मंत्री, मुख्यमंत्री, खासदार आमदार नव्हे....!
  नेता म्हणजे व्यवस्थेला जबाब विचारणारं आणि शासन संस्थेला कायदा राबविण्यासाठी बाध्य करणारं व्यक्तीमत्व...!

डाव्यांचे उजवे रंग - सुमित वासनिक.

डाव्यांचे उजवे रंग - सुमित वासनिक.
महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असतांना या सरकार मधील सरंजाम आणि जातीय राजकारण्यांनी उच्छाद मांडलेला होता. दलित, आदिवासी अत्याचार आणि भ्रष्टाचाराची रोज नवीन प्रकरणे उघड होत होती. अश्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार विरोधात ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संघटनांनी आणि CPI, CPM सारख्या डाव्या राजकीय पक्षांनी महाराष्ट्र लोकशाही आघाडीची स्थापना केली होती. ही आघाडी 2018 पर्यंत कार्यरत होती. पण 2018 मध्ये भंडारा मतदारसंघातील निवडणुकिवेळी CPI या पक्षाने भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास समर्थन देऊन आपला प्रवास डावी कडुन उजवी कडे सुरू केला असल्याचे आपण पाहत आहोत.
ज्या राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात जनतेच्या प्रश्नांवर लढा उभारण्यासाठी महाराष्ट्र लोकशाही आघाडी तयार झाली होती त्या हेतुलाच हरताळ फासत CPI ने  भंडारा निवडणुकीत खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवारास समर्थन दिले. भंडारा निवडणुकी नंतर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे संविधान बचाव रॅलीत CPI आणि CPM या पक्षांनी ते पूर्णपणे काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आहेत असे दाखवून दिले. पुढे CPI आणि CPM या पक्षांनी काँग्रेसच्या महाआघाडी संबंधित बैठकांना हजेरी लावणेही सुरू केले. आपल्या या वागणुकीतून डाव्यांनी आपण आता महाराष्ट्र लोकशाही आघाडी सोबत नाही असा स्पष्ट संदेश दिला. पण काँग्रेस-राष्ट्रवादी धार्जिणी आपली ही भूमिका बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी डाव्यांनी ऍड.बाळासाहेब आंबेडकरांनि एमआयएम या पक्षा सोबत युति केल्याचे कारण दिले. हे कारण देतांना डावे हुशारीने लपवतात की ओवेसी वंचित बहुजन आघाडीत यायच्या आधीच डाव्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर जायचा निर्णय घेतला होता. त्याच बरोबर धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली एमआयएमला विरोध करतांना डाव्यांनी स्वतः केरळ मध्ये मुस्लिम लीगच्या सोबत युति करून निवडणुका लढविलेल्या आहेत, मुस्लिम लीग सोबत बसून आपण सत्ता उपभोगली आहे हे CPI आणि CPM हे पक्ष विसरतात. मुळात या पक्षांना एमआयएमचा प्रॉब्लेम नाही, 5-6 वर्षे भारिप सोबत असतांना हे पक्ष आपल्या संघटनेत एकही नवीन माणूस जोडण्यात अपयशी ठरले हे यांचे खरे दुखणे आहे. आपण अपयशी ठरलो आणि ऍड.बाळासाहेब आंबेडकर आपला पक्ष वाढविण्यात यशस्वी झाले, आपल्याला जे करायचे होते त्याचे अगदी उलटे झाले या जातीयवादी मानसिकतेतूनच डाव्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत संधान साधले आहे. डाव्यांनी काँग्रेस सोबत गेल्यानंतर काँग्रेसने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमधे डाव्यांसोबत एकाही राज्यात युति केली नाही तरीही डावे काँग्रेस-राष्ट्रवादी धार्जिणे राजकारण सोडण्यास तयार नाहीत यामागील एकमेव कारण म्हणजे ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांचे वाढते राजकीय वजन रोखण्याची जातीयवादी भूमिका हेच होय.
भाजप-सेनेच्या धर्मांध राजकारणापासून देशाला वाचविण्यासाठी आपण काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर आहोत हे असे डावे पक्ष सांगतात आणि आपल्या या जातीयवादी राजकारणाला लपवू पाहतात, पण सत्य काही केल्यास समोर येतेच. CPI चा विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस सोबत फिरून भाजपपासून देश वाचवायच्या गोष्टी करतो आहे तर दुसरीकडे हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अहमदनगर महानगरपालिकेत भाजपला मतदान करून भाजप सोबत बसला आहे. डावे जर खरोखरच भाजप विरोधात असतेतर त्यांनी अहमदनगर प्रकरणी राष्ट्रवादीच्या भूमिकेला विरोध केला असता आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राजकीय संबंध तोडले असते पण डाव्यांनी याविषयी साधा विरोधही दर्शविलेला नाही. डाव्यांना भाजपचे वावडे नाही हे महाराष्ट्रातील CPM चे नेते नरसैय्या आडम मास्तर यांनी सोलापूर येथील प्रधानमंत्री मोदींच्या कार्यक्रमात हजेरी लाऊन आणि मोदींवर स्तुतीसुमने उधळून स्पष्टच केले आहे. डावे पक्ष एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी आर्थिक आरक्षणावर भाजपला संसदेत समर्थन देऊन ते संविधानाच्या विरोधात असल्याचेही दाखवून दिले आहे. डावे पक्ष एकानंतर एक भाजपला पूरक अश्या भूमिका घेत आहेत आणि त्याचवेळी ते वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याचा अपप्रचारही करीत आहेत, यावरून डाव्या पक्षांचा जातीयवादी चेहरा खुलून समोर आला आहे.
आंबेडकरी चळवळीत ज्याप्रमाणे अनेक संघटना आणि पक्ष आहेत त्याचप्रमाणे मार्क्सवादी चळवळीतही अनेक संघटना आणि पक्ष आहेत. अनेक डाव्या संघटना आजही ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहेत तर CPI आणि CPM हे पक्ष बाळासाहेबांची साथ सोडून सरंजामी भांडवलदारांना शरण गेल्या आहेत.  CPI आणि CPM सारखे डावे पक्ष वंचित बहुजन आघाडीच्या, ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात गेल्याने बाळासाहेबांचे कोणतेही नुकसान होणार नाही, उलट बाळासाहेबांसोबत असल्यामुळे डाव्या चळवळी बद्दल लोकांना जी आपुलकी वाटायला लागली होती त्या आपुलकीला डाव्यांनी वंचित बहुजन आघाडिला विरोध करून तिरस्कारात परावर्तित केले आहे. हे डाव्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान आहे, येणाऱ्या काळात याचे गंभीर परिणाम यांना भोगावे लागतील. डाव्यांचे समोर आलेले हे उजवे रंग पाहून त्यांनी मानवमुक्तीच्या लढ्यासोबत दगाबाजी केली आहे हे सिध्द झाले आहे, मार्क्सच्या तत्वज्ञानाला या पक्षांनी भांडवली आणि ब्राह्मणवादी पक्षांच्या समर्थनात जुंपले आहे. काळ कोणालाच विसरत नाही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निवडणुकि वेळी डांगेंनी घेतलेल्या भूमिका प्रमाणे 2018-19 मधील डाव्यांच्या या भूमिका काळया अक्षरात भविष्याच्या पटलावर ठळकपणे दिसत राहतील आणि डाव्यांच्या जातीयवादी राजकारणाची साक्ष देत राहतील.

तुमची " दलाली "उघडी पडली...!

तुमची " दलाली "उघडी पडली...!
: भास्कर भोजने
       डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतील "आरक्षण "हा विषय लिहितांना अगदी स्पष्ट शब्दात त्याचा ऊद्देश सांगितला आहे...!
  "आरक्षण " हे सामाजिक न्यायासाठी दिले जाणार आहे...!
  म्हणून आरक्षणाचे तत्व लागू करतांना निकष हा "सामाजिक मागासलेपणा " असला पाहिजे...!
   ही भारतीय राज्यघटनेची चौकट आहे,ही चौकट मोडून कुणीही नवं धोरण आखु शकतं नाही असा निर्णय सुप्रिम कोर्टाचा आहे...!
   तरीही मनुवादी मोदी सरकारने सवर्णांना आरक्षण देतांना आरक्षणाचा निकष हा "आर्थिक " लावला आणि सवर्णांना १० टक्के आरक्षण लागू केले...!
   ही भारतीय राज्यघटनेची मोडतोड करण्याची सर्वात कुटिल अशी चालं आहे...!
    भारताच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत जेव्हा या १२४ व्या घटना दुरुस्ती बिलावर चर्चा होतं होती तेव्हा सच्चे " आंबेडकरवादी " या दुरुस्तीला कडाडून विरोध करतील अशी प्रत्येक सुज्ञ माणसाची अपेक्षा होती...!
   डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमाने जे राजकीय आरक्षण मिळाले त्यामुळे आम्ही संसदेत आहो ही भावना एस.सी.एस.टी.खासदारामध्ये असेलचं अशीही धारणा जनतेच्या मनात होती...!
    डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण करणा-या नेतृत्वाने तरी यावेळी आपलं प्रांजळ मतं मांडून ही घटना दुरुस्ती घटनाबाह्य आहे अशी  "जिभ " हालवून बोलावे अशी माफक अपेक्षा आंबेडकरी जनतेची होती...!
      परंतु जेव्हा या १२४ व्या घटना दुरुस्ती बिलावर चर्चा झाली तेव्हा राखीव जागेवर निवडून आलेले " दलाल " हे विचाराने आंबेडकरी नाहीत तर संधी साधून घेण्यासाठी मनुवादी पक्षांचे दलाल आहेत हे त्यांनी आपल्या कृतीने दाखवून दिले आहे...!
     जे जे राखीव जागेवरुन निवडून आले आहेत आणि तिथं खुर्च्या गरम करीत आहेत त्यांना राज्यघटनेशी आणि आंबेडकरी तत्वज्ञानाशी काही एक देणेघेणे नाही...!
    त्यांना दलाली करुन पोट भरायचे आहे,मालक नाराज होऊ नये म्हणून हे गुलाम वृत्तीचे लोकं साधी औपचारिकता  देखील दाखवू शकले नाहीत, यांनी जिभं सुद्धा हलविली नाही,यांनी साधा निषेध नोंदवला नाही,यांची वैचारिक बांधिलकी ही पोटाशी,पैशाशी आणि,लाचारीशी आहे हे यांनी दाखवून दिले आहे..!
  शेर कभी घास खाते नहीं.हेच खरे आहे..!
आणि नामर्द कभी लढाई लढते नहीं.
वैचारिक बांधिलकी असलेली माणसे कुठंही आणि केव्हाही आपल्या ध्येय्यापासुन तसुभरही मागे हटतं नाहीत...!
   जेव्हा संसदेत १२४ व्या घटना दुरुस्ती बिलावर चर्चा सुरू होती तेव्हा भाजपचे मनुवादी सरकार राज्यघटनेवरचं घाव घालीत आहे हे पटवून देण्यासाठी एम आय एम पक्षाचे असोदऊद्दीन ओवेशी, इंडियन युनियन मुस्लिम लिगचे ईटी बशीर मुहम्मद आणि पि.के. कुंजलकुटी हे या बिलाचा कडाडून विरोध करीत होते.,त्यांनी या बिलाच्या विरोधी मतं नोंदवून आपली वैचारिक बांधिलकी सिद्ध केली...!
  मात्र राखीव जागेवरुन निवडून आलेल्या दलालांची दलाली ऊघड झाली आहे...!
  मित्रहो हे घरभेदी आता यापुढे लक्षात ठेवा...!
राजकीय आरक्षणामुळे " दलालांची " नवी जातं निर्माण झाली आहे हेही या निमित्ताने सिद्ध झाले आहे...!
  जयभीम.
- भास्कर भोजने.

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...