Thursday, 3 January 2019

जात आणि धर्माच्या धोकादायक वळणावर राष्ट्र! - राजेंद्र पातोडे.

जात आणि धर्माच्या धोकादायक वळणावर राष्ट्र!
- राजेंद्र पातोडे.
भाजपवाले सत्तेसाठी कुठल्या स्तराला जातील याला काहीच मर्यादा उरली नाही.माणसेच नव्हे तर हिंदू समाजाची आराध्य असलेल्या देवांना निवडणुकीत मतासाठी वापरन्यात ते पटाईत आहेत.राम मंदिर मुद्दा घेऊन पाच राज्यातील निवडणुकीत उतरताना भाजपवाल्यानी पध्द्तशीरपणे नंतर हनुमानाच्या जातीचा संदर्भ घेऊन घमासान सुरु केले. हा घमासान निवडणुका संपल्या तरी काही संपण्याची लक्षणे दिसत नाहीत.आधी पासून राजकारणासाठी रामाचा वापर करण्यात भाजपवाले सज्ज होतेच, त्यात आता चक्क हनुमानालाच ‘टार्गेट’ केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीत अलवर येथील जाहीर सभेला संबोधित करताना हनुमान हे दलित होते, असे वादग्रस्त विधान केले होते. २७ नोव्हेंबर रोजी अलवर येथे भाषण करताना "हनुमान हे वनवासी, वंचित आणि दलित असल्याचा दिव्य शोध “ आदित्यनाथानी लावला. एवढे निम्मीत्त पुरे होते की अचानक हनुमानाचे जात शोध व जात जाहीर करण्याची स्पर्धा ही त्यांचे शेपटा प्रमाणे इतकी वाढत गेली की खुद्द हनुमान गोंधळला असेल की आपण नक्की कोण आहोत ! 
आदित्यनाथ याचे नंतर तर हनुमान कुठल्या जातीचे ही सांगण्याची चढाओढ सुरु झाली. त्यात पहिली हनुमान उडी घेतली, ती राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे (एनसीएसटी) अध्यक्ष नंद कुमार साय आणि भाजप खासदार उदित राज यांनी.‘हनुमान हे आदिवासी असल्याचे’ त्यांनी जाहीर केले.पतंजलीचे प्रसिद्ध व्यापारी बाबा रामदेवसेठ यांनी हनुमान अष्ट सिद्धिचे ज्ञाता असून ते क्षत्रिय होते हा दिव्य शोध लावला.केंद्रीय मंत्री सत्यपाल सोंघ यांनी हनुमान हे दलित नव्हे आर्य असल्याचे विधान केले.शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी हनुमान हे ब्राम्हण असल्याचे जाहीर केले. भाजप नेता व राज्यसभा सदस्य गोपाल नारायण सिंह ह्यांनी तर कहरच केला "हनुमान हे वानर होते आणि वानर हा पशु असल्याने त्याचा दर्जा दलिता पेक्षा पेक्षा खालचा असून श्रीरामानी त्यांना दैवत्व बहाल केले आहे”.हे सांगून जातपुराणात अधिकच गोंधळ निर्माण केला.
सर्वात मोठा कहर केला तो भाजप आमदार बुक्कल नवाब ह्यांनी.हनुमान हा मुसलीम होता असे धक्कादायक विधानच आमदार बुक्कल नवाब ह्यांनी केले.हनुमान मुस्लिम होता हे सांगताना मुसलमानाची नावे रहमान, रमजान, फरहान, सुलेमान, सलमान, जिशान, कुर्बान अशी ठेवली जातात.सबब हनुमान हे नाव देखील मुसलीम आहे,असा दावाच त्यांनी केला.हनुमान दलित असल्याचे वादावर बोलताना आमदार बुक्कल नवाब ह्यांनी "हनुमानाची जात कंची" ह्या वर चर्चा करताना हनुमानाचा धर्म देखील चर्चीला पाहिजे असा आग्रह केला." माझ्या मते हनुमान मुसलीम असल्याने मुसलीम सधर्मिय नावांशी मिळते जुळते नाव हनुमान असल्याचे," त्यांनी निक्षून सांगितले.
प्रसिद्ध माजी क्रिकेटर चेतन चव्हाण ह्यांनी त्या पुढचा टप्पा गाठला.उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका क्रीडा कार्यक्रमात बोलताना त्यांनी, 'हनुमानजी कुश्ती लड़ते थे, वह खिलाड़ी भी थे' हे सांगून उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच दिला. उत्तर प्रदेश सरकार चे मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी ने विधान परिषद प्रश्नोत्तराच्या वेळी "हनुमान जाट असल्याचा शोध लावला".चौधरींनी ह्या साठी दिलेला तर्क अत्यंत चमत्कारी आहे. ‘दूसरों के फटे में जो टांग अड़ाता है, वही जाट हो सकता है। हनुमान मेरी जाति के थे।’  लक्ष्मी नारायण चौधरी हे स्वतः जाट समुदायाचे आहेत. त्यांचे ह्या वक्तव्यावर विरोधकांनी अख्ख सभागृह डोक्यावर घेतले नसते तर नवलच होते.
ह्या विवादात कुठलाही राजकीय पक्ष मागे राहायला तयार नव्हता.हिंदुस्तान टाइम्स सोबत बोलताना सपा राष्ट्रीय महासचिव राम शंकर विद्यार्थी यांनी आरोप केला कि ‘भाजपा नेता भगवान हनुमान को दलित या मुस्लिम बताकर उन्हें नीचा दिखाने की कोशिश कर रहे हैं "हे सांगताना सपा नेता राम शंकर विद्यार्थी यांनी हनुमान याच क्षेत्राचा राजा असल्याने ते 'गोंड' राजा होते, असा दावा केला.धार्मिक ग्रंथात देखील 'हनुमान गोंड राजा असल्याचा उल्लेख आलेला आहे, हे देखील आवर्जून नमूद केले.
आणखी एक माजी कसोटीपटू कीर्ति आजाद यांचा दावा तर अख्या विश्वाला दिवसा तारे दाखविणारा ठरला, 'हनुमानजी चीनी थे.हर जगह यह अफवाह उड़ रहा है कि चीनी लोग दावा कर रहे हैं कि हनुमान जी चीनी थे.' घ्या आता ! त्यांचे ह्या दाव्या नंतर चीन सरकार शॉक आहे की, हा दावा नेमका कोणत्या चिनी नेत्याने केला आहे? मंकी मास्टर नावाचे सिनेमे चीन मध्ये बनविले जात असतात.त्या मुळे की काय चीन सरकारने मंकी मास्टर्स पात्र असलेल्या सिनेमात हा शोध घेण्या कामी गुप्तहेर लावलेत अशी चर्चा सुरु आहे.
हुनुमानाच्या जात व धर्मावर सुरु झालेली जुमलेबाजी आता केवळ हनुमाना पुरती सीमित राहिली नाही, तर ती आता हनुमानासह रामायणातील इतर पात्रा पर्यंत पोहचली आहे. भाजपा नेता आणि उत्तर प्रदेश अंबेडकरनगरचे खासदार हरिओम पांडे ने दावा केलाय की," हनुमान ‘ब्राह्मण’ थे, वहीं वानर साम्राज्य के राजा सुग्रीव ‘कुर्मी’ जाति से थे। सुग्रीव के भाई बाली  ‘यादव’ थे। सीता को रावण से बचाने की कोशिश करने वाला पक्षी जटायु एक ‘मुस्लिम’ था। साथ ही भगवान राम को समुद्र में राम सेतु बनाने में मदद करने वाले नल और नील ‘विश्वकर्मा’ समुदाय के थे." हरिओम प्रसाद पांडे ह्यांनी 'चुलबुल पांडे' टाईप दबंग स्टाईल दंड ठोकत दावा केलाय की, ही सर्व त्यांची 'रिसर्च ' असून ते ह्या सर्व पात्रांच्या जात सिद्ध करू शकतात!
अश्या असंख्य जेम्स बॉण्ड टाइप शोधा नंतरही भाजपला तीन राज्यात सत्ता गमवावी लागली.जातीचे राजकिय तुष्टीकरण कुणाच्याही पचनी पडले नाही.कुणालाच ह्या गोष्टीत रस नव्हता की रामायणातील पात्र कोणत्या जातीचे होते ? तर मागील वर्षभरात मारले गेलेले अनेकजण गौरक्षेच्या नावावर मारण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती व मुसलीमच होते.शम्भूनाथ रैगर ह्याने धर्माच्या नावावर क्रूर पद्धतीने केलेला खून व पेटविलेला मृतदेह, असंख्य अत्याचाराच्या कहाण्या, रसातळी गेलेली अर्थव्यवस्था,वाढते बेरोजगारांचे जथ्थे, प्रचंड वाढलेली गुन्हेगारी, जनतेच्या आयुष्याचं झालेले वाळवंट."पधारो म्हारो राजस्थान" हे भीतीदायक आवाहन वाटावं इतका आमूलाग्र बदललेला  राजस्थान, व्यापम घोटाळा व त्यासाठी मारले गेलेले अनेक जण असे ज्वलंत मुद्दे असल्याने, भाजप राजवटीच्या काळ्या बाजूची चर्चा होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक हुनुमानची जात, राममंदिर विवाद सुरु करण्यात आले.भाजपवाल्यानी ठरवून जातीचे कार्ड खेळलं होतं.दुर्दैव म्हणजे ह्या देशातील पुरोगामी समजल्या जाणा-या विद्वानांना ह्यात काहीही वावगं वाटलं नाही.हा मोठा धोका देशापुढे आहे.भाजपवाले सत्तेच्या सारीपाटावर पराभूत झाले असले तरी आगामी काळात निवडणुकात ते किती खालची पातळी गाठू शकतात आणि काँग्रेस देखील कशी हिंदुत्व धार्जिणी झालीय हे आता लपून राहिले नाही.
@ राजेंद्र पातोडे,
अकोला
९४२२१६०१०१

आंबेडकरी बांधवांनो मनुवादी पॅटर्न लक्षात घ्या...!

आंबेडकरी बांधवांनो मनुवादी पॅटर्न लक्षात घ्या...!

- भास्कर भोजने

     सत्तेसाठी साम,दाम,दंड,भेद नितीचा वापर करून सत्ता हस्तगत करणे हा मनुवादी पॅटर्न आहे...!
    साम ,दाम, दंड, भेद यापैकी भेद या अस्त्राचा वापर मनुवादी कसे करीत आलेले आहेत त्याची उजळणी करु या आणि आजच्या परिस्थितीत  मनुवादी मंडळीचा मनसुबा समजून घेऊ या....!
       प्रतिक्रांतीवाद्यांनी आधुनिक काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कांऊटर करण्यासाठी सर्वात पहिला अटॅक केला होता लंडन येथील गोलमेज परिषदेत,म. गांधी म्हणाले होते की, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे प्रतिनिधी नाहीत तर मीच खरा दलितांचा कैवारी आहे....!
    जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दलितांच्या हक्कांसाठी लढा द्यायला उभे राहिले तेव्हा ख-या प्रतिनिधीला बाजूला सारून बुजगावणे उभे करणे हा मनुवादी अजेंडा आहे,त्याचाच हा प्रकार.परंतु भोळ्या भाबड्या आणि अशिक्षित जनतेने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने लंडनला तारा पाठविल्या आणि आपला खरा नेता कोण हे इंग्रजांच्या लक्षात आणून दिले...!
     म्हणूनच दलित, समुहासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जातियनिवाडा मिळवू शकले....!
    तेव्हा पासून सच्चा आंबेडकरवादी नेता आंबेडकरी जनतेला मिळू नये म्हणून संभ्रम निर्माण करण्यासाठी मनुवादी,नेहमी नेतृत्व म्हणून बुजगावणे उभे करीत आले आहेत....!
   आता आपली म्हणजे, आंबेडकरवादी,संविधानवादी, मानवतावादी, समाजवादी विचारांच्या मंडळीची जबाबदारी आहे की,खरा आणि मनुवाद्यांनी लादलेला नेता यातील फरक समजून घेणे आणि खरा संविधानवादी नेता निवडणे....!
     डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना रिप्लेस करुन जगजीवनराम सारखे नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस पक्षाने केला आणि अनु.जातीला एकसंघ आलें नाहीं पाहिजे म्हणून भेद नितीचा अवलंब केला...!
      डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचें नंतर रिपब्लिकन पक्षाचे सत्तेकडे जाण्याचे वा प्रबळ विरोधी पक्षाचे उद्दिष्ट साध्य होऊ नये म्हणून, मनुवादी मंडळीने १९६७ मध्यें ऊत्तर प्रदेशात सत्तेत सहभागी असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते संघप्रिय गौतम आणि बी.पी.मौर्य यांच्या पैकी बी.पी.मौर्य यांना रिपब्लिकन पक्षातुन फोडले आणि मंत्रीपद दिले व रिपब्लिकन पक्ष गारद केला...!
महाराष्ट्रात कर्तबगार रिपब्लिकन नेतृत्व म्हणून दादासाहेब गायकवाड तयार झाले तेव्हा रा.सु. गवई सारख्या एका व्यक्तीला सर्वच काही देऊन कॉंग्रेस पक्षाने रिपब्लिकन पक्षाचे लाचार बुजगावणे तयार केले आणि रिपब्लिकन पक्ष नेस्तनाबूत केला...!
    तोच पायंडा पुढेही मनुवादी कॉंग्रेस पक्षाने सुरु ठेवला, जेव्हा १९८० च्या दशकात अॅड बाळासाहेब आंबेडकर यांचें नेतृत्व उभे राहिले तेव्हा शरद पवारांनी रामदास आठवले हे बुजगावणे तयार केले आणि रिपब्लिकन पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भेद नितीचा अवलंब केला आहे...!
    रिपब्लिकन चळवळीला मनुवादी मिडियाने लादलेले नेते म्हणून अनेक जण तयार केले आणि सत्तेची चटक लावली.ही सुरुवात कॉंग्रेस पक्षाने केली आहे ,सत्तेच्या मोहापायी, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे,चंद्रकात हंडोरे, नितिन राऊत, मुकुल वासनिक, दादासाहेब रुपवते,एन.एम.कांबळे, बाळकृष्ण वासनिक,नाशिकराव तिरपुडे आणि असेच काही जण...!
   हे नेते नव्ह्ते तर कॉंग्रेस किंवा मनुवादी मंडळीने तयार केलेले बुजगावणे होते...!
    एका बाजुने सत्तेची चटक लावली तर दुस-या बाजूने क्रांतीवादी विचारांच्या पक्षाला भेद नितीने सुरुंग लावला होता...!
    काल कॉंग्रेस पक्ष मनुवादी विचाराचे कार्य करीत होता आज पक्षाचे नांव बदलले आहे.कॉग्रेसची जागा भाजपाने घेतली आहे...!
   कॉंग्रेस असो की, राष्ट्रवादी काँग्रेस असो, भाजप असो की, शिवसेना एकाच ध्येयाने ते क्रांतीवादी विचारांच्या पक्षांना परास्त करण्यासाठी झटतात...!
    आता नवे भिडू बुजगावणे म्हणून तयार केले जातं आहेत...!
    मिडिया अगोदर असा बनाव तयार करते की,अमुक एक तरुण विचाराने सच्चा आंबेडकरवादी आहे आणि मग त्याला नेता म्हणून प्रपोज केले जाते...!
      चंद्रशेखर आझाद(रावण) हा तरुण ऊत्तर प्रदेशात त्याचे सामाजिक कार्य आहे...!
   तो नेमका महाराष्ट्रात काय करतो आहे आणि तेही निवडणूका जवळ आल्या असता...??
     आंबेडकरी तरुणाला आणि ऊत्तर प्रदेशातील तरुणाला महाराष्ट्रात मिडिया एवढी कव्हरेज का देतं आहे...??
   आता निवडणुका जवळ आल्या असता मनुवादी षंढयत्र रचुन आपलं इशिप्त साध्य करण्यासाठी सिद्ध झाले आहेत...!
   चंद्रशेखर आझाद (रावण) हा लादलेला नेता मनुवादी आपल्यावर लादतं असतील आणि नवं बुजगावणे तयार करीत असतील तर आमची जबाबदारी ही मोठी आहे...!
    मनुवादी भेद नितीचा पाडाव करण्यासाठी जुना अनुभव लक्षात घेऊन आमची तयारी अशी असली पाहिजे की,ज्याला मनुवादी मिडिया जास्त कव्हरेज देते आहे तो मनुवादी आहे,बूजगावणे आहे हे चटकन लक्षात घेतले पाहिजे...!
     आत्ता यापुढे नवे नवे भिडू तयार करुन बुजगावणे आमच्या समोर मांडल्या जातील...!
   बुजगावणे भिरकावून लावण्याची कुवतं निर्माण करु या...!
   आमच्या अल्पशिक्षित आणि भोळ्या महारांनी १९३२ साली लंडनला तारा पाठवून म.गांधी हा आमचा नेता नाही तर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आमचे खरे नेते आहेत असा खंबीरपणा आणि बौद्धिक हुशारी दाखविली व भविष्य सुरक्षित केले....!
   आत्ताही तशीच बौद्धिक हुशारी आणि क्रांतीदर्शी विचाराने मनुवादी भेदनितीचा पाडाव करायचा आहे....!
   भाजपने बूजगावणे तयार करुन निवडणुकीत संभ्रम निर्माण करणं सुरू केलं आहे... सावधान.
    या भाजपच्या भेदनितीचा पाडाव करु,तसेच याचं नितीचा वापर करून कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा काही मोहरे वापरुन आपल्यावर चालं करु शकते ढोंगी सेक्युलॅरिझमचे सोंगाडे काहीही करु शकतात म्हणून अखंड सावधान राहून निवडणूकीला सामोरे जाऊ या....जय वंचित बहूजन आघाडी.
  जयभीम.

-भास्कर भोजने.

...अन पालवे ताईंना गहिवरून आले !

...अन पालवे ताईंना गहिवरून आले !
- जितरत्न पटाईत
नगर जिल्ह्यातील पाथर्डी रोडवर गुरुदेव नावाचे हॉटेल आहे. येथे जेवणासाठी आम्ही सर्वजण थांबलो. हॉटेलच्या काउंटरवर बसलेली महिला या गावाच्या माजी सरपंच व त्या हॉटेलच्या 'मालकीण' आहेत. हॉटेलच्या समोरच संत भगवान बाबा यांची मोठी फ्रेम लक्ष वेधून घेत होती.
आम्ही सर्व जेवायला थांबलो असताना त्या महिला जरा गोंधळल्या होत्या. कारण, समोर #ऍड. प्रकाश आंबेडकर होते. त्यांनी न राहवून बाळासाहेब आंबेडकर यांना विचारले की, तुम्ही प्रकाश आंबेडकर का ? बाळासाहेबांनी हो म्हटल्यावर त्या खूप खुश झाल्या आणि स्वतः किचनमध्ये जाऊन त्यांनी स्वयंपाक केला व आम्हा सर्वांना भरपेट खाऊ घातले. ( त्यांनी बनवलेली काजू करी लाजवाब होती..) त्या महिला सरपंचाचे नाव क्षेत्रे ताई आहे. क्षेत्रे ताईंनी गावातीलच सध्या सरपंच असलेल्या सानप ताई यांना बोलवून घेतले.
क्षेत्रे ताईंनी पाच वर्ष ग्रामपंचायत सदस्य व पुढील पाच वर्ष गावाच्या सरपंच म्हणून काम केले आहे.
क्षेत्रे आणि सानप ताईंनी आपण सरपंच झाल्यावर गावात काय विकास केला याबद्दल त्या भरभरून बोलत होत्या.
सरतेशेवटी त्या म्हणाल्या की, आम्ही ( क्षेत्रे आणि सानप ताई ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिश्रमामुळे 'सरपंच' झालो. आमच्या सारख्या 'वंजारी' समाजातील दोन-दोन महिला सरपंचपद भूषवताय ही बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याई आहे.
हा बदल आणि एवढी ऊर्जा ही मला प्रचंड आश्वासक वाटली. क्षेत्रे ताईंनी आपल्या मुलाचे नाव सिद्धार्थ ठेवले आहे.. त्या महिला सलगपणे भरभरून बोलत होत्या आणि #बाळासाहेब आंबेडकर हे सर्व शांतपणे ऐकत होते.
सानप ताई येतानाच फेटा आणि शाल घेऊन आल्या होत्या. जाता-जाता त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांचा आवर्जुन पुष्पगुच्छ आणि शाल देऊन निरोप घेतला...
आम्ही मात्र, स्तब्ध होऊन सानप ताईंकडे एकटक बघत होतो....
- जितरत्न पटाईत


संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...