Thursday, 3 January 2019

आंबेडकरी बांधवांनो मनुवादी पॅटर्न लक्षात घ्या...!

आंबेडकरी बांधवांनो मनुवादी पॅटर्न लक्षात घ्या...!

- भास्कर भोजने

     सत्तेसाठी साम,दाम,दंड,भेद नितीचा वापर करून सत्ता हस्तगत करणे हा मनुवादी पॅटर्न आहे...!
    साम ,दाम, दंड, भेद यापैकी भेद या अस्त्राचा वापर मनुवादी कसे करीत आलेले आहेत त्याची उजळणी करु या आणि आजच्या परिस्थितीत  मनुवादी मंडळीचा मनसुबा समजून घेऊ या....!
       प्रतिक्रांतीवाद्यांनी आधुनिक काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कांऊटर करण्यासाठी सर्वात पहिला अटॅक केला होता लंडन येथील गोलमेज परिषदेत,म. गांधी म्हणाले होते की, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे प्रतिनिधी नाहीत तर मीच खरा दलितांचा कैवारी आहे....!
    जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दलितांच्या हक्कांसाठी लढा द्यायला उभे राहिले तेव्हा ख-या प्रतिनिधीला बाजूला सारून बुजगावणे उभे करणे हा मनुवादी अजेंडा आहे,त्याचाच हा प्रकार.परंतु भोळ्या भाबड्या आणि अशिक्षित जनतेने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने लंडनला तारा पाठविल्या आणि आपला खरा नेता कोण हे इंग्रजांच्या लक्षात आणून दिले...!
     म्हणूनच दलित, समुहासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जातियनिवाडा मिळवू शकले....!
    तेव्हा पासून सच्चा आंबेडकरवादी नेता आंबेडकरी जनतेला मिळू नये म्हणून संभ्रम निर्माण करण्यासाठी मनुवादी,नेहमी नेतृत्व म्हणून बुजगावणे उभे करीत आले आहेत....!
   आता आपली म्हणजे, आंबेडकरवादी,संविधानवादी, मानवतावादी, समाजवादी विचारांच्या मंडळीची जबाबदारी आहे की,खरा आणि मनुवाद्यांनी लादलेला नेता यातील फरक समजून घेणे आणि खरा संविधानवादी नेता निवडणे....!
     डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना रिप्लेस करुन जगजीवनराम सारखे नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस पक्षाने केला आणि अनु.जातीला एकसंघ आलें नाहीं पाहिजे म्हणून भेद नितीचा अवलंब केला...!
      डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचें नंतर रिपब्लिकन पक्षाचे सत्तेकडे जाण्याचे वा प्रबळ विरोधी पक्षाचे उद्दिष्ट साध्य होऊ नये म्हणून, मनुवादी मंडळीने १९६७ मध्यें ऊत्तर प्रदेशात सत्तेत सहभागी असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते संघप्रिय गौतम आणि बी.पी.मौर्य यांच्या पैकी बी.पी.मौर्य यांना रिपब्लिकन पक्षातुन फोडले आणि मंत्रीपद दिले व रिपब्लिकन पक्ष गारद केला...!
महाराष्ट्रात कर्तबगार रिपब्लिकन नेतृत्व म्हणून दादासाहेब गायकवाड तयार झाले तेव्हा रा.सु. गवई सारख्या एका व्यक्तीला सर्वच काही देऊन कॉंग्रेस पक्षाने रिपब्लिकन पक्षाचे लाचार बुजगावणे तयार केले आणि रिपब्लिकन पक्ष नेस्तनाबूत केला...!
    तोच पायंडा पुढेही मनुवादी कॉंग्रेस पक्षाने सुरु ठेवला, जेव्हा १९८० च्या दशकात अॅड बाळासाहेब आंबेडकर यांचें नेतृत्व उभे राहिले तेव्हा शरद पवारांनी रामदास आठवले हे बुजगावणे तयार केले आणि रिपब्लिकन पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भेद नितीचा अवलंब केला आहे...!
    रिपब्लिकन चळवळीला मनुवादी मिडियाने लादलेले नेते म्हणून अनेक जण तयार केले आणि सत्तेची चटक लावली.ही सुरुवात कॉंग्रेस पक्षाने केली आहे ,सत्तेच्या मोहापायी, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे,चंद्रकात हंडोरे, नितिन राऊत, मुकुल वासनिक, दादासाहेब रुपवते,एन.एम.कांबळे, बाळकृष्ण वासनिक,नाशिकराव तिरपुडे आणि असेच काही जण...!
   हे नेते नव्ह्ते तर कॉंग्रेस किंवा मनुवादी मंडळीने तयार केलेले बुजगावणे होते...!
    एका बाजुने सत्तेची चटक लावली तर दुस-या बाजूने क्रांतीवादी विचारांच्या पक्षाला भेद नितीने सुरुंग लावला होता...!
    काल कॉंग्रेस पक्ष मनुवादी विचाराचे कार्य करीत होता आज पक्षाचे नांव बदलले आहे.कॉग्रेसची जागा भाजपाने घेतली आहे...!
   कॉंग्रेस असो की, राष्ट्रवादी काँग्रेस असो, भाजप असो की, शिवसेना एकाच ध्येयाने ते क्रांतीवादी विचारांच्या पक्षांना परास्त करण्यासाठी झटतात...!
    आता नवे भिडू बुजगावणे म्हणून तयार केले जातं आहेत...!
    मिडिया अगोदर असा बनाव तयार करते की,अमुक एक तरुण विचाराने सच्चा आंबेडकरवादी आहे आणि मग त्याला नेता म्हणून प्रपोज केले जाते...!
      चंद्रशेखर आझाद(रावण) हा तरुण ऊत्तर प्रदेशात त्याचे सामाजिक कार्य आहे...!
   तो नेमका महाराष्ट्रात काय करतो आहे आणि तेही निवडणूका जवळ आल्या असता...??
     आंबेडकरी तरुणाला आणि ऊत्तर प्रदेशातील तरुणाला महाराष्ट्रात मिडिया एवढी कव्हरेज का देतं आहे...??
   आता निवडणुका जवळ आल्या असता मनुवादी षंढयत्र रचुन आपलं इशिप्त साध्य करण्यासाठी सिद्ध झाले आहेत...!
   चंद्रशेखर आझाद (रावण) हा लादलेला नेता मनुवादी आपल्यावर लादतं असतील आणि नवं बुजगावणे तयार करीत असतील तर आमची जबाबदारी ही मोठी आहे...!
    मनुवादी भेद नितीचा पाडाव करण्यासाठी जुना अनुभव लक्षात घेऊन आमची तयारी अशी असली पाहिजे की,ज्याला मनुवादी मिडिया जास्त कव्हरेज देते आहे तो मनुवादी आहे,बूजगावणे आहे हे चटकन लक्षात घेतले पाहिजे...!
     आत्ता यापुढे नवे नवे भिडू तयार करुन बुजगावणे आमच्या समोर मांडल्या जातील...!
   बुजगावणे भिरकावून लावण्याची कुवतं निर्माण करु या...!
   आमच्या अल्पशिक्षित आणि भोळ्या महारांनी १९३२ साली लंडनला तारा पाठवून म.गांधी हा आमचा नेता नाही तर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आमचे खरे नेते आहेत असा खंबीरपणा आणि बौद्धिक हुशारी दाखविली व भविष्य सुरक्षित केले....!
   आत्ताही तशीच बौद्धिक हुशारी आणि क्रांतीदर्शी विचाराने मनुवादी भेदनितीचा पाडाव करायचा आहे....!
   भाजपने बूजगावणे तयार करुन निवडणुकीत संभ्रम निर्माण करणं सुरू केलं आहे... सावधान.
    या भाजपच्या भेदनितीचा पाडाव करु,तसेच याचं नितीचा वापर करून कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा काही मोहरे वापरुन आपल्यावर चालं करु शकते ढोंगी सेक्युलॅरिझमचे सोंगाडे काहीही करु शकतात म्हणून अखंड सावधान राहून निवडणूकीला सामोरे जाऊ या....जय वंचित बहूजन आघाडी.
  जयभीम.

-भास्कर भोजने.

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...