...अन पालवे ताईंना गहिवरून आले !
- जितरत्न पटाईत
नगर जिल्ह्यातील पाथर्डी रोडवर गुरुदेव नावाचे हॉटेल आहे. येथे जेवणासाठी आम्ही सर्वजण थांबलो. हॉटेलच्या काउंटरवर बसलेली महिला या गावाच्या माजी सरपंच व त्या हॉटेलच्या 'मालकीण' आहेत. हॉटेलच्या समोरच संत भगवान बाबा यांची मोठी फ्रेम लक्ष वेधून घेत होती.
आम्ही सर्व जेवायला थांबलो असताना त्या महिला जरा गोंधळल्या होत्या. कारण, समोर #ऍड. प्रकाश आंबेडकर होते. त्यांनी न राहवून बाळासाहेब आंबेडकर यांना विचारले की, तुम्ही प्रकाश आंबेडकर का ? बाळासाहेबांनी हो म्हटल्यावर त्या खूप खुश झाल्या आणि स्वतः किचनमध्ये जाऊन त्यांनी स्वयंपाक केला व आम्हा सर्वांना भरपेट खाऊ घातले. ( त्यांनी बनवलेली काजू करी लाजवाब होती..) त्या महिला सरपंचाचे नाव क्षेत्रे ताई आहे. क्षेत्रे ताईंनी गावातीलच सध्या सरपंच असलेल्या सानप ताई यांना बोलवून घेतले.
क्षेत्रे ताईंनी पाच वर्ष ग्रामपंचायत सदस्य व पुढील पाच वर्ष गावाच्या सरपंच म्हणून काम केले आहे.
क्षेत्रे ताईंनी पाच वर्ष ग्रामपंचायत सदस्य व पुढील पाच वर्ष गावाच्या सरपंच म्हणून काम केले आहे.
क्षेत्रे आणि सानप ताईंनी आपण सरपंच झाल्यावर गावात काय विकास केला याबद्दल त्या भरभरून बोलत होत्या.
सरतेशेवटी त्या म्हणाल्या की, आम्ही ( क्षेत्रे आणि सानप ताई ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिश्रमामुळे 'सरपंच' झालो. आमच्या सारख्या 'वंजारी' समाजातील दोन-दोन महिला सरपंचपद भूषवताय ही बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याई आहे.
हा बदल आणि एवढी ऊर्जा ही मला प्रचंड आश्वासक वाटली. क्षेत्रे ताईंनी आपल्या मुलाचे नाव सिद्धार्थ ठेवले आहे.. त्या महिला सलगपणे भरभरून बोलत होत्या आणि #बाळासाहेब आंबेडकर हे सर्व शांतपणे ऐकत होते.
सानप ताई येतानाच फेटा आणि शाल घेऊन आल्या होत्या. जाता-जाता त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांचा आवर्जुन पुष्पगुच्छ आणि शाल देऊन निरोप घेतला...
आम्ही मात्र, स्तब्ध होऊन सानप ताईंकडे एकटक बघत होतो....
- जितरत्न पटाईत
No comments:
Post a Comment