Wednesday, 19 December 2018

RSS ला "वेसण "घालणारा एकमेव नेता...!

RSS ला "वेसण "घालणारा एकमेव नेता...!

- भास्कर भोजने

   आरएसएस ही ब्राम्हण्यग्रस्त मानसिकतेच्या टोळक्यांची विकृत टोळी आहे...!
  रा.स्व.संघाच्या वरीष्ठ नेतृत्वात केवळ ब्राम्हणचं असतात हा काही योगायोग नाही...!
    ब्राम्हण समुहाने आपला छुपा अजेंडा राबविण्यासाठी निर्माण केलेले हे संघटन आहे...!
    ब्राम्हण हे संख्येने अल्प असल्यामुळे हिंदू धर्मातील अल्पज्ञानी,धर्मभोळ्या समुहाला धर्माच्या आडुन भरीस पाडतं धर्माचं ढोंग उभं करुन ब्राम्हण्यग्रस्त समुह ऊभा करतात आणि आपले इशिप्त साध्य करतात....!
   संघ नेहमी विद्वेषाचे कार्य करीत आला आहे...!
  संघ भारतीय लोकशाही, संविधान आणि राष्ट्र ध्वज तिरंगा तथा राष्ट्रीय सण म्हणून स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासत्ताक दिवस मानतं नाही...!
   स्वातंत्र्य लढ्याचे प्रतिक असलेल्या म.गांधीचा खुन याचं मानसिकतेतून केल्या गेला आहे...!
म. गांधी हे ओबीसी हिंदू नेतृत्व होते म्हणून ते संघाला मान्य नव्हते...!
    म.गांधीच्या खुनामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघावर बंदी घातली होती...!
  त्यावेळी संघाला राष्ट्र विरोधी (Anti National)  ठरवून संघांवर बंदी घालण्यात आली होती...!
   १९४९ मध्ये सरकारच्या उदात्त हेतूने जेव्हा आरएसएसवरील बंदी उठविण्यात आली तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल आणि संघामध्ये जो करार झाला त्या करारामध्ये एक अट अशी होती की,संघाने आपल्या कार्यालयावर १५आॅगस्ट आणि २६जानेवारीला तिरंगा ध्वज फडकवला पाहिजे...!
  २६जानेवारी १९५० ला संघाने आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकवला परंतु नंतर सतत ५०वर्षे देशाशी आणि त्या कराराशी द्रोह केला, आपल्या कार्यालयावर तिरंगा ध्वज फडकवला नाही आणि स्वातंत्र दिवस साजरा केला नाही...!
सन २००० ला अॅड बाळासाहेब आंबेडकरांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला की, संघाच्या कार्यालयावर तिरंगा ध्वज का फडकविला जातं नाही..?
तेव्हा देशात अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार होते,संघ आपल्या कार्यालयावर तिरंगा ध्वज फडकावित नाही म्हणून भारिप बहुजन महासंघाने आंदोलन केले...!मुंबई येथील संघाच्या कार्यालयावर मा.राजा ढाले यांच्या नेतृत्वाखाली १५आॅगस्ट २०००ला तिरंगा ध्वज फडकावित स्वातंत्र दिवस साजरा केला.तर नागपूर येथील संघाच्या मुख्यालयावर मा.रणजित मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली १५आॅगस्ट २०००ला संघाच्या मुख्यालयावर तिरंगा ध्वज फडकावित स्वातंत्र दिवस साजरा केला...!
  पन्नास वर्षांपासून सत्ताधारी काँग्रेस किंवा प्रशासनाला न जुमानणा-या संघाला अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रिय ध्वज तिरंगा आणि स्वातंत्र दिवस मान्य करायला भाग पाडले...!
    काल नागपूर येथे वंचित बहूजन आघाडीचे चौथे अधिवेशन पार पडले त्या अधिवेशनात अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी संघाच्या मोहन भागवत यांना जेलात डांबण्यात येईल अशी भुमिका मांडली तेव्हा जनतेने लक्षात घ्यावे की,ही पहिलीच वेळ नाही यापुर्वीही अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी संघाला नमविले आहे...!
   नरेंद्र मोदी यांचे केंद्रात सरकार आले तेव्हा पासून संघाला जास्त चेव चढला आहे...!
  अल्पसंख्याक मुस्लिम, दलित यांना सतत भयग्रस्त ठेवण्याची निती अवलंबून आरएसएस आपले डावपेच आखतं आहे...!
    एकीकडे हिंदू अशी बतावणी करीत आहे मात्र नेमकेपणाने ओबीसी चे आरक्षण संपवित आहे.
   शेतकरी विरोधी धोरणे राबवून देशाच्या पोशिंद्यालाचं उध्दवस्त करीत आहेत...!
    या संघाचे छुपे अस्त्र बोथट करण्याची हिम्मत आणि नैतिक ताकद केवळ अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या ठायी आहे...!
    संघाच्या दारात जाऊन त्यांना अंगावर घेण्याची कुणाचीही हिम्मत नाही, हे आजवरच्या वाटचालीत सिद्ध झाले आहे...!
  संघाला आणि संघाच्या अधिपत्याखालील सरकारला धडा शिकविण्यासाठी सक्षम नेतृत्व म्हणून एकटे अॅड बाळासाहेब आंबेडकर हेच खमकेपणाने लढतं आहेत...!
     या देशातील अल्पसंख्याक मुस्लिम, पिडित दलित आणि, पिडित महिला वर्गाने तसेच ओबीसी बांधवांनी आता येणाऱ्या काळात संघाच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी सक्षम नेतृत्व स्विकारले पाहिजे...!
   सेक्युलर असल्याचे ढोंग करणारे पक्ष आणि नेतृत्व जर आम्ही ओळखु शकलो नाही तर पुन्हा आमची फसवणूक होणार आहे हेही लक्षात घेतले पाहिजे...!
  कॉंग्रेस पक्षाला पर्याय म्हणून भाजप आणि भाजप ला पर्याय म्हणून कॉंग्रेस पक्ष अशी आपली वाटचाल असेल तर आपली फसवणूक होणार आहे हेही लक्षात घेतले पाहिजे...!
  नव्या पर्यायाशिवाय आम्ही ब्राम्हण्याच्या कचाट्यातून सुटणार नाही हे वास्तव आपणं सर्वांनी लक्षात घ्यावे हीच अपेक्षा करतो...!
  जयभीम.

-भास्कर भोजने.

अपप्रचारापासुन सावध रहा - सुमित वासनिक

अपप्रचारापासुन सावध रहा - सुमित वासनिक
मित्रांनो कृपया लक्षपूर्वक वाचा आणि इतरांना कॉपी पेस्ट करून , जस होईल तस पाठवा.. शेअर करा
येणाऱ्या काळात काँग्रेसच्या अपप्रचारा पासुन सावध रहा*
अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांना रोखण्यासाठी काँग्रेसने नेहमि प्रमाणे अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न सुरु केला आहे. यासाठि काँग्रेस तर्फे बाळासाहेबांच्या विरोधात टप्प्या टप्प्याने अपप्रचाराचि मोहीम राबविलि जाईल.  अपप्रचाराच्या या कारस्थानातिल एक एक टप्पा आपण समजुन घेतला पाहिजे.
पहिला टप्पा
काँग्रेस कडून भारिप, वंचित बहुजन आघाडि आणि एमआयएमचि युति भाजपचि बि टिम असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या युतिच्या माध्यमातून अॅड.बाळासाहेब आंबेडकर   भाजपला मदत करण्याचे राजकारण करित आहेत असा अपप्रचार काँग्रेस काहि नेते, कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या मार्फत करित आहे.
दुसरा टप्पा
अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसला अडचणीत आणल्याचे किस्से सांगुन या घटनांमधुन बाळासाहेबांनी भाजपला मदत केलि होति असा अपप्रचार करण्यात येईल.
उदा.
1. अॅड.बाळासाहेब आंबेडकर काँग्रेसच्या विरोधात उमेदवार उभे करतात.
2. 12 जागांचि मागणि खुप मोठि आहे हि मागणि काँग्रेसला अडचणीत आणणारि आहे.
3. अॅड.बाळासाहेब आंबेडकर काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करून भाजपला मदत करतात.
तिसरा टप्पा
देशातील जातिवादा विरोधात काँग्रेसच अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या पेक्षा  चांगल्याप्रकारे लढत आहे असे सांगण्याचा प्रयत्न काँग्रेस कडुन होईल. यासाठी काँग्रेस कडे असलेल्या राखीव कोट्यातिल उत्तम खोब्रागडे, नितिन राऊत, चंद्रकांत हंडोरे सारख्यांचा उपयोग करण्यात येईल.
चौथा टप्पा
अपप्रचाराच्या चौथ्या टप्प्यात काँग्रेस डाव्या आणि ईतर पुरोगामी संघटनांना एकत्र करुन त्याच्याकरवि अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या भुमिका कश्या अविश्वसनिय आहेत, अॅड.बाळासाहेब आंबेडकर कसे बेभरवशि आहेत हे पसरविण्याचा प्रयत्न केल्या जाईल.
उदा.
1. अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी डाव्यासोबतचि युति तोडलि.
2. काँग्रेस तयार असुनहि अॅड.बाळासाहेब आंबेडकर युतिसाठि तयार नाहीत.
3. एमआयएम सोबत युति करुन अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी धर्मनिरपेक्षते विरोधि भुमिका घेतलि आहे.
पाचवा टप्पा
सर्वात शेवटि अॅड.बाळासाहेब आंबेडकर आता पुर्णपणे भाजप समर्थनाचे राजकारण करत आहेत असे काँग्रेसच्या गोटातुन जाहीर केले जाईल. त्यामुळे आता भाजप प्रमाणेच अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांना सुद्धा निवडणुकीत पराभूत करणे बौध्दांच्या हिताचे आहे, धर्मनिरपेक्षता वाचविण्यासाठि गरजेचे आहे असे जनतेवर बिंबविण्याचा प्रयत्न होईल. काँग्रेसच्या या प्रचाराला बळ देण्यासाठी गवई, कवाडे व ईतर रिपब्लिकन गट धर्मनिरपेक्षतेच्या संरक्षणासाठि ज्याप्रमाणे काँग्रेसला साथ देत आहेत त्याप्रमाणे समस्त बौध्दांनि सुध्दा काँग्रेसला साथ दिलि पाहिजे असा अपप्रचार काँग्रेस कडुन केल्या जाईल. सोबतच काही काँग्रेस समर्थक पुरोगामी, बौद्ध नेते यांच्या कडून ५ वर्ष लाचारपणे भाजप सोबत मंत्रिपद भोगलेले आठवले आणि पासवान हे दोघेहि धर्मनिरपेक्ष आहेत, खरे आंबेडकरवादी आहेत असा प्रचार करून त्यांनी मोदींना पराभूत करण्यासाठी महाआघाडीत आले पाहिजे असे आवाहन केले जाईल. सद्यपरिस्थितीत आंबेडकरवादा  पेक्षाही भाजपला रोखणे देशासाठी किती महत्वाचे आहे याचे पाढे वाचले जातील. यातून ऍड.बाबासाहेब आंबेडकर यांनी आतापर्यंत आरएसएस सोबत केलेल्या लढाईस, त्यांनी उभ्या केलेल्या आंदोलनास,  त्यांनी बौद्ध,ओबीसी आणि मुस्लिमांना प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी घेतलेल्या मेहनतीस बौद्धांच्या डोक्यातून काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. अपप्रचाराच्या या शेवटच्या टप्प्यात काँग्रेस सर्वच माध्यमांचा उपयोग करून अपप्रचाराचे रान उठवेल, या अपप्रचारात बौद्धांना घेरून त्यांची राजकीय शिकार करण्याचे कारस्थान अमलात आणले जाईल.           
काँग्रेसच्या अपप्रचाराचे हे टप्पे येणाऱ्या काळात एका पाठोपाठ राबविले जातिल. अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातिल अपप्रचाराच्या या कारस्थानास ओळखुन सर्वांनि बाळासाहेबांच्या नेतृत्वात आपले प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी शेवट पर्यंत भारिप बहुजन महासंघाच्या मागे ठाम पणे उभे राहिले पाहिजे. आपल्याकडे हीच शेवटची संधी आहे, यावेळी जर आपण चुकलोतर आपले भविष्य अंधकारमय होईल याचे भान ठेवुन २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये फक्त वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनाच मतदान केले पाहिजे.
- सुमित वासनिक

काव्य बाण - आता आलय मतदान...

आरे आईक देऊन कान रे
जागा ठेव स्वाभिमान रे
मीठ मिर्ची इतकं नाही रे मत आपलं स्वस्त...
आता आलय रे मतदान चल...
ये आता आलय रे मतदान चल
निवडू भारीपचा उमेदवार फक्त !!धृ !!
संघटीत होण्याची आली ही संधी
संघटीत होऊ खरं मत पेटी मधी
हम आय थे तब लाखोंसे
देखा था सबने आखोंसे
हम एक है दिखा ने का आया है वक्त!!१!!
राजकारण लई झालं आपल्या मताचं
उचल पाऊल भावा आता आपल्या हिताचं
घे संगती ताई माई अक्काला
दादा,भाऊ ,मामा न काकाला
मत देऊनी आपलच माप ठेव झुकतं!!२!!
हात बळकट करू चला बाळासाहेबांचे
न स्वप्न पूर्ण करू चला बाबासाहेबांचे
भीक नको आम्हा सत्तेची
सत्ता हवी ती हक्काची
शे पाचश्या साठी होऊ नको संदीप नकटं!!३!!
चाल:- मला आमदार झाल्या सारखं वाटतय
गीतकार:- संदीप साळवे, जालना.
मो.नं.8691955202

२०१९ च्या निवडणुकाआंबेडकरी चळवळ आणि वंचित समूहासाठी शेवटची संधी

०१९ च्या निवडणुका आंबेडकरी चळवळ आणि वंचित समूहासाठी शेवटची संधी
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
कुठल्याही चळवळीला शेवट किंवा अंत नसतो. चळवळ निरंतर असते. किंवा दुसऱ्या शब्दात ज्या आंदोलनांना निरंतरता असते त्यालाच चळवळ असेही म्हणतात. परंतु हीच चळवळ सदासर्वकाळ गतिमान असतेच असेही नाही. चळवळीच्या गतिमानतेत परिस्थिती सापेक्ष बदल होत असतो. चळवळ कधी स्थिरस्थावर असते तर कधी ती अस्ताव्यस्त असते. कधी ती उद्देशापासून भरकटलेली असते तर कधी उद्देशाच्या पूर्ततेसाठी आग्रही होऊन उद्देशपुर्तीच्या मार्गावर असते. चळवळीच्या या बदलणाऱ्या स्वरूपाला तत्कालीन परिस्थिती कारणीभूत ठरत असते. या परिस्थितीत चळवळीने घेतलेले निर्णय, त्या निर्णयाला समूहाने दिलेली मान्यता, समूहाची भूमिका, नेतृत्वाची नेतृत्व क्षमता व चळवळीतील कार्यकर्त्यांची कार्यप्रवणता हे सर्व तत्कालीन व वर्तमान परिस्थितीतील चळवळीचे स्वरूप निर्धारित करीत असते. वर्तमान परिस्थितीला चळवळीच्या उद्देशाच्या प्रति अनुकूल करून निर्णय घावे लागत असतात. समजा वर्तमान परिस्थितीला चळवळीच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण केले परंतु या वातावरणात निर्णय चुकलेत किंवा निर्णय घेण्यात समूह कमकुवत ठरला तर हाती आलेली संधी गमावून बसण्याची शक्यता बळावते. व परत ती संधी उपलब्ध होईल किंवा चळवळीसाठी तसेच अनुकूल वातावरण निर्माण होईल याची शक्यता नसते. शेवटी वाट पाहत अन्याय-अत्याचार सहन करीत समूहाला जीवन जगावे लागते. निराश होऊन, हताश होऊन जगतांनाही मृत्यू डोळ्यासमोर ठेवून जगावे लागते. व पश्च्यातापाशिवाय दुसरे काहीही हाती लागत नाही.
ही चर्चा का करावी लागत आहे ? याचे एकमेव कारण आहे आजचे सामाजिक व राजकीय वातावरण. आंबेडकरी चळवळीकडे आलेली वंचितांच्या नेतृत्वाची संधी. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात उभी झालेली वंचित बहुजन आघाडी. व या आघाडीने अल्पावधीत प्रस्थापित सत्ताधाऱ्यांची केलेली कोंडी. स्वतंत्र भारतातील वंचित समूहाचे एकत्रिकरण. न्यायाच्या अपेक्षेत असलेल्या समूहाने आता स्वतःच न्याय करण्याचा घेतलेला निर्णय. व त्यासाठी स्वतःच सत्ता हस्तगत करण्यासाठी घेतलेला प्रण. या सर्व बाबी लक्षात घेता वंचित समूहाला न्याय मिळवून देण्याची सुवर्ण संधी आंबेडकरी चळवळीला आलेली आहे. आज आलेली संधी उद्या परत येईल का ? हे सांगता येत नाही. पण मागच्या ४ वर्षाच्या भाजप-आरएसएस च्या काळात समाजावर झालेला अन्याय भविष्यात आणखी वाढेल हे नक्कीच सांगता येईल.
भूतकाळातील आंबेडकरी चळवळीची आंदोलने हे आंबेडकरी चळवळीचे तुष्टीकरण करून इतरांचे ध्रुवीकरण करणारे होते. त्यामुळे आंबेडकरी चळवळीला पाहिजे तशी संधी मिळू शकली नाही. परंतु आज प्रकाश आंबेडकर यांनी सुरु केलेल्या आंदोलनाने वंचितांचे संघटन घट्ट होत आहे. वंचित समूह जो कायम प्रस्थापित पक्षांचा मतदार राहिला व प्रस्थापित पक्षांनी व त्यांच्या सत्ता शासनाने जे दिले किंवा हिरावून घेतले तरीही त्यातच समाधानी राहिला असा समूह आज त्या प्रस्थापित पक्षांच्या विरोधात बंद करून उभा झालेला आहे. कुणी कुणी त्याचे हक्क व अधिकार हिरावून घेतलेले आहे याची जाणीव आता या समूहाला झालेली आहे. त्यामुळे तो येणाऱ्या निवडणुकीत त्या आक्रोशाने उतरायला तयार झालेला आहे. या समूहाचे समुच्चयीकरण प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात होत आहे. कधी नव्हे तो आत्मविश्वास आज वंचित समूह आंबेडकरी नेतृत्वावर दाखवायला लागलेला आहे. हा आत्मविश्वासच उद्याच्या यशाचे गमक ठरणारा आहे. या बळावलेल्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण न करता त्याला दुगणित करणे हेच आंबेडकरी चळवळीचे व वंचित समूहाचे कर्तव्य आहे.
२०१९ ची निवडणूक अनेक अर्थाने महत्वपूर्ण आहे. बलाढ्य शत्रूशी लढतांना जेवढी भक्कम तयारी करावी लागते तेवढीच स्वतःच्या सैनिकांमध्ये बेदिली माजणार नाही याचीही दक्षता घ्यावी लागते. कुठल्याही परिस्थितीत भाजप-आरएसएस २०१९ ची निवडणूक हातून जाणार नाही या तयारीला लागले आहेत. साम-दाम-दंड-भेद या नीती सोबतच सर्वात सोपा मार्ग त्यांनी अनुसरलेला आहे. तो म्हणजे विरोधकांच्या सैन्यामध्ये घुसखोरी करून त्यांच्यात बेदिली माजविणे. विरोधकांच्या कळपात चेंगराचेंगरी करणे आणि लढाईत उतरण्याआधीच सैन्यतळ उध्वस्त करणे. हा सोपा मार्ग भाजप-आरएसएस ने अनुसरला आहे. या नितीला वेळीच ओळखून २०१९ ची रणनीती आखावी लागणार आहे.
वंचित बहूजन आघाडीच्या सोलापूरच्या सभेनंतर कॉग्रेसने काही प्रतिनिधींना प्रकाश आंबेडकर यांना भेटण्यास पाठविले. आघाडीच्या संदर्भात चर्चा झाली. त्यावर कॉग्रेसने अद्याप कुठलेही निर्णय घेतले नाही. व आता औरंगाबाद च्या भव्य सभेनंतर लगेच कॉग्रेस आपल्या पक्षप्रवक्त्यांकडून वंचित बहूजन आघाडीवर टिका करायला लागले आहेत. एवढेच नाही तर आपल्या काही विश्वासू पत्रकारांना हाताशी घेऊन चुकीच्या बातम्या प्रसारित करू लागले आहेत. याचे एकमेव कारण असे आहे की, महाराष्ट्रात भाजप च्या सत्तेला कंटाळून कॉग्रेस महाआघाडीकडे अपेक्षेने पाहणारा वंचित समुह व धर्मनिरपेक्ष मतदार आता कॉग्रेस महाआघाडीला सोडून वंचित बहुजन आघाडीकडे पर्याय म्हणून पहात आहे. सोबतच कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्तेवर येऊ शकत नाही हे पाहून विजयी आघाडीसोबत आपली मते वळविण्याची मानसिकता बाळगणारा मतदार भाजप विरोधात कॉग्रेस आघाडीकडे न जाता वंचित बहूजन आघाडीच्या पारड्यात आपली मते टाकावी या मानसिकतेपर्यंत येऊन पोहचला आहे. ज्यामुळे कॉग्रेस पुन्हा २०१९ ला राज्याच्या सत्तेपासून दूर जातांना पाहून व वंचित बहूजन आघाडी २०१९ च्या महाराष्ट्राच्या सत्तेची प्रमुख दावेदार बनतांना पाहून कॉग्रेसच्या प्रवक्त्यांकडून वंचित बहूजन आघाडीवर टिकास्त्र सोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात आहे.
भाजप ची बी टीम, धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन,वंचित बहूजन आघाडीचा भाजप ला फायदा, भाजपकडून वंचित बहूजन आघाडीला सहकार्य अशाप्रकारच्या टिकात्मक बातम्या जाणिवपुर्वक पसरविल्या जात आहेत.या बातम्या कॉग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या वतीने महाराष्ट्रातल्या मतदारांना भ्रमित करण्यासाठी जाणिवपुर्वक पसरविल्या जात आहेत. असा आमचाआरोप आहे. कारण वंचित बहूजन आघाडी येणाऱ्या निवडणुकांमध्ये राज्यात पर्याय म्हणून पुढे येत आहे. वंचित बहूजन आघाडीचा धोका जसा कॉग्रेसला आहे तसाच भाजपच्या सत्तेला देखील आहे. कारण ज्या वंचितांनी२०१४ ला भाजप ला मतदान करून सत्तेवर बसविले तेच वंचित आता भाजप मधून बाहेर पडून वंचित बहूजन आघाडीत समाविष्ठ झाले आहेत. त्यामुळे भाजपच्या सत्तेला पर्याय म्हणून आज महाराष्ट्रात वंचित बहूजन आघाडी आघाडीवर आहे. कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यात पिछाडीवर पडलेली आहे.
दुसरीकडे बसपा ने वंचित बहूजन आघाडीत समाविष्ठ व्हावे यावर विचारमंथन सुरू झाले आहे. बसपा चा मतदार या चर्चेत आघाडीवर आहे. त्यामुळे कॉग्रेसने बसपा च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांना हाताशी घेऊन काल प्रेस कॉन्फरंन्स घेऊन महाराष्ट्रात बसपा कॉग्रेस सोबत जाईल असे सुतोवाच केले. तर मायावती यांनी कॉग्रेस सोबत जाणार नाही अशी भूमिका घेतली. या दुहेरी भूमिकेमुळे बसपा मतदार संभ्रमात येऊन वंचित बहूजन आघाडीकडेच आपले मतदान वळविण्याच्या मानसिकतेत पोहचला आहे. त्यामुळे बसपा पुढे आपला मतदार वाचविण्यासाठी वंचित बहूजन आघाडीत सहभागी होणे किंवा हक्काचा मतदार गमावून बसणे या दुहेरी पेचात बसपा सापडलेली आहे. त्यामुळे बसपा ला महाराष्ट्रात वंचित बहूजन आघाडीत सहभागी होण्याशिवाय दूसरा पर्याय नाही.
महत्वाचे म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी कॉग्रेसपुढे १२ जागांची मागणी करून आज ६ महीने लोटलेत.कॉग्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. आज परिस्थिति बदलली आहे. वंचित बहूजन आघाडी फार पुढे निघून गेली. आज वंचित बहूजन आघाडीत AIMIMसहभागी झालेला आहे. उद्या राजू शेट्टींचा स्वाभिमानी शेतकरी संघटना वंचित बहूजन आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे. उद्या परवा बसपा सुद्धा वंचित बहूजन आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे.अश्या परिस्थितित वंचित बहूजन आघाडीचा दावा महाराष्ट्रात २/३ दोन तृतियांश जागांवर जातो. व सोबतच महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेवरही वंचित बहूजन आघाडीचा दावा जातो. तेव्हा कॉग्रेस ने भारिप किंवा वंचित बहूजन आघाडीला गृहीत धरू नये.
महाराष्ट्रात वंचित बहूजन आघाडी सत्तेची दावेदार बनू पाहत असतांनाही प्रकाश आंबेडकर कॉग्रेस सोबत आघाडीस इच्छुक आहेत यांचे कारण फक्त महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राची सत्ता नसून दिल्लीच्या तख्तावरून/सत्तेवरून भाजप/आरएसएस ला खाली खेचने हा उद्देश आहे.त्यामुळे आम्ही राष्ट्रीय पातळीवर कॉग्रेस सोबत जाण्यास इच्छुक आहोत. आता निर्णय कॉग्रेसला घ्यायचा आहे.महाराष्ट्रासोबत दिल्लीही गमवायची नसेल तर कॉग्रेस ने वंचित बहूजन आघाडीत सहभागी व्हावे. अन्यथा वंचित बहूजन आघाडी महाराष्ट्र जिंकेलच परंतु सोबतच देशातील तमाम आदिवासी, दलित, मुस्लिम व वंचित समुहाला सोबत घेऊन दिल्लीच्या सत्तेवरून देशाला भाजप-कॉग्रेसमुक्त करेल. कॉग्रेसला खरंच या देशाची लोकशाही व संविधान टिकवायचे असेल, धर्मनिरपेक्षता टिकवायची असेल व भाजप-आरएसएस पासून भयमुक्त देश बनवायचा असेल तर कॉग्रेस ने वंचित बहूजन आघाडीला व प्रकाश आंबेडकर यांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा.गृहीत धरू नये. अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. यावर काय भविष्यात काय निर्णय होतो हे पाहावे लागेल. कारण प्रत्यक्ष निवडणुकांना अजून ६ महिन्यांचा अवधी बाकी आहे.
या सर्व प्रक्रियेत स्वतःला आंबेडकरी चळवळीचा भाग समजणारा जो समूह आहे त्याने या भ्रमातून किंवा विरोधकांनी टाकलेल्या जाळ्यातून बाहेर पडावे कि, भाजपा ला सत्तेवरून बेदखल करायचे आहे म्हणून कॉंग्रेस सोबतच आपण गेले पाहिजे. अन्यथा भाजपा परत सत्तेवर येईल. अश्या प्रकारचा प्रचार प्रसार करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे कि आज इतक्या दशकानंतर स्वबळावर वंचित समूह सत्तेत येऊ शकतो व कुठल्याही काँग्रेसी किंवा अन्य पक्षांच्या कुबड्या न घेता सत्ता स्थापन करू शकतो. अश्या परीस्थितीत सत्तेवर येण्याची संधी सोडून परत कॉंग्रेस ला सत्तेवर बसविण्याची मानसिकता ठेवणारा समूह सामाजिक व राजकीय दृष्ट्या मूर्खच म्हणावा लागेल. वंचितांना व आंबेडकरवाद्यांना संघटीत होऊन आम्ही स्वबळावर इथल्या मनुवाद्यांना पराभूत करू शकतो. वंचित बहुजन आघाडीने ती संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. भाजप-आरएसएस च्या मनुवादी राजकीय व्यवस्थेला पराभूत करण्यासाठी आम्ही लाचार होऊन अन्य पक्षाचा पर्याय शोधण्यापेक्षा स्वबळावर आज वंचित बहुजन आघाडीचा पर्याय उपलब्ध झालेला आहे याचा विचार करूनच इथल्या आंबेडकरी चळवळीने व वंचित समूहाने २०१९ च्या निवडणुकीला सामोरे जावे. आज आलेली संधी परत भविष्यात येईलच असे नाही त्यामुळे आलेल्या संधीला आजच आपण सर्व मिळून पूर्णत्वास नेण्याचा प्रण करूया. व इथल्या सत्तेवर असलेली प्रस्थापित पक्षांची मक्तेदारी मोडीत काढून, वंचित बहुजन आघाडीचे मतदार बनून प्रकाश आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या वंचित बहुजन आघाडीला सत्तेपर्यंत पोहचवूया. आंबेडकरवाद्यांनो व वंचितांनो चला सत्ताधारी होऊया.
( हा लेख प्रबुद्ध भारत मध्ये प्रसिद्ध झाला आहे)
adv.sandeepnandeshwar@gmail.com
डॉ.संदीप नंदेश्वर, नागपूर.

पेशवाई सरकार कडून  महार रेजिमेंटच्या शौर्याची विटंबना !

पेशवाई सरकार कडून  महार रेजिमेंटच्या शौर्याची विटंबना !
- राजेंद्र पातोडे
सामाजिक न्याय विभागाने १५ डिसेंबर २०१८ रोजी महार रेजिमेंट च्या ७५ व्या अमृत महोत्सवी गौरव समारंभाचे आयोजन केले आहे. त्या मध्ये शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिकांचा गौरव केला जाणार आहे.इंडिया गेट येथे आयोजित ह्या कार्यक्रमात राज्याचे थोरले  पेशवे प्रमुख आहेत.अर्थात पेशव्यानां महार रेजिमेंटच्या शौर्याची  उपरती झाली की भीमा कोरेगांव प्रकरणी दंगेखोर भिडे एकबोटेला पाठीशी घालणाच्या पापावर पांघरून घालण्याचा हास्ययास्पद प्रयत्न आहे हा प्रश्न विचारला जाणे स्वाभाविक आहे.दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो २०१८ साल हे महार रेजिमेंटचे ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष कसे आहे ? मुळात महार रेजिमेंट ची स्थापना १ ऑक्टोबर १९४१ साली झाली आहे. त्या मुळे २०१६ साल हे महार रेजिमेंट चे अमृत महोत्सवी वर्ष येते.परंतु खोटा इतिहास पसरविण्यात माहीर असलेला संघ व त्यांचे गुलाम झालेलं सामाजिक न्याय खातं आणि बाहुले बनलेले सामाजिक न्याय मंत्री ह्या मुळे चक्क ७७ व्या वर्षी देखील अमृत महोत्सवी वर्षे साजरा करण्याचा घाट घातला गेला आहे. चीड आणणारा हा प्रकार मुद्दाम सरकारने भीमा कोरेगांव १ जानेवारी आधी  केला आहे. 
भीमा कोरेगांव येथील दंगल घडविण्याचा डाव उलटल्याने आता मनुवादी सरकार हा नवा बनाव करीत आहे.त्या करीता लढवय्या महार सैनिकांची शौर्याची प्रतीके बाटविण्याचे काम बार्टी व सामाजिक न्याय विभागातील गुलामांनी सुरु केले आहे. ह्याचा जाहीर निषेध.१ जानेवारीला अभिवादन करणा-या अनुयायांवर हल्ले करून दंगली पेटविन्यायाचा कट रचना-या भिडेला गुन्हा दाखल होऊनही पेशवाई सरकारने अटक तर केलीच नाही.उलट ३ जानेवारीला आंदोलन करना-या ५३००० आंबेडकरी तरुणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अनेक महिने तुरुंगात ठेवण्यात आले. पोलिसा मार्फत दहशत व दडपशाही करण्यात आली.आंबेडकरी समूह कोणत्याही दबावाला भीक घालत नाही हे पाहून एल्गार परिषदेला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी ह्या कटाचे सूत्रधार हे भिडे व एकबोटे आहेत.हे जाहीर केले व त्यांना सरकारचा पाठिंबा आहे हे देखील सांगितल्याने महाराष्ट्रात आंबेडकरी समूह व बहुजन समाजात होऊ घातलेला संघर्ष टळला. अन्यथा भीमा कोरेगांव येथील घटनेने अख्खा महाराष्ट्र पेटल असता. हा डाव उलटला आहे हे लक्षात आल्यानेच पेशवाई सरकारने आपल्या गुलाम मंत्र्यांना कामाला लावलं.आणि महार रेजिमेंटचा अमृत महोत्सव साजरा करण्याचं कारस्थान रचले आहे.मुळात शौर्य गाजविणा-या सैनिकांचा सन्मान केलाच पाहिजे. ते करण्या ऐवजी सरकार राजकारण करीत आहे. राज्य आणि देशात भाजपचे सरकार आहे.अनेकदा शाहीदांच्या कुटूंबाला नौकरी व इतर लाभ देण्याचे जाहीर करून ते आश्वसन पुर्ण केले नाही." वन रेंक, वन पेंशन " ह्या साठी अनेक वर्षे आंदोलन करणा-या सैनिकांची अधिका-याची बोळवण करण्यात आली.अधिकारी सैनिकाच्या विधवा व त्यांचे कुटूंबीय याचे पुनर्वसन झाले नाही.त्यांच्या पेंशन, घरकुल व नौका-यांचे  प्रस्ताव धूळ  आहेत.ते प्रश्न सोडविण्यात आले नाही.त्या ऐवजी ह्याचे भाजपचे मंत्री विचारतात की वर्षेभर ड्युटीवर असलेल्या सैनिकांच्या बायकांना मुलं कशी होतात ? अश्या नालायक सरकारने महार सैनिकाच्या रेजिमेंटच्या नावावर सुरु केलेला हा प्रकार संतापजनक आहे.
म्हणून शूर सैनिकांनी ह्या गौरव समारंभावर बहिष्कार घातला पाहिजे.सरकार आपल्या शूर परंपरेचा जाहीर अपमान  करीत आहे. त्याला उत्तर दिलच पाहिजे.  
राजेंद्र पातोडे
अकोला
९४२२१६०१०१

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...