Thursday, 10 January 2019

तुमची " दलाली "उघडी पडली...!

तुमची " दलाली "उघडी पडली...!
: भास्कर भोजने
       डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतील "आरक्षण "हा विषय लिहितांना अगदी स्पष्ट शब्दात त्याचा ऊद्देश सांगितला आहे...!
  "आरक्षण " हे सामाजिक न्यायासाठी दिले जाणार आहे...!
  म्हणून आरक्षणाचे तत्व लागू करतांना निकष हा "सामाजिक मागासलेपणा " असला पाहिजे...!
   ही भारतीय राज्यघटनेची चौकट आहे,ही चौकट मोडून कुणीही नवं धोरण आखु शकतं नाही असा निर्णय सुप्रिम कोर्टाचा आहे...!
   तरीही मनुवादी मोदी सरकारने सवर्णांना आरक्षण देतांना आरक्षणाचा निकष हा "आर्थिक " लावला आणि सवर्णांना १० टक्के आरक्षण लागू केले...!
   ही भारतीय राज्यघटनेची मोडतोड करण्याची सर्वात कुटिल अशी चालं आहे...!
    भारताच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत जेव्हा या १२४ व्या घटना दुरुस्ती बिलावर चर्चा होतं होती तेव्हा सच्चे " आंबेडकरवादी " या दुरुस्तीला कडाडून विरोध करतील अशी प्रत्येक सुज्ञ माणसाची अपेक्षा होती...!
   डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमाने जे राजकीय आरक्षण मिळाले त्यामुळे आम्ही संसदेत आहो ही भावना एस.सी.एस.टी.खासदारामध्ये असेलचं अशीही धारणा जनतेच्या मनात होती...!
    डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण करणा-या नेतृत्वाने तरी यावेळी आपलं प्रांजळ मतं मांडून ही घटना दुरुस्ती घटनाबाह्य आहे अशी  "जिभ " हालवून बोलावे अशी माफक अपेक्षा आंबेडकरी जनतेची होती...!
      परंतु जेव्हा या १२४ व्या घटना दुरुस्ती बिलावर चर्चा झाली तेव्हा राखीव जागेवर निवडून आलेले " दलाल " हे विचाराने आंबेडकरी नाहीत तर संधी साधून घेण्यासाठी मनुवादी पक्षांचे दलाल आहेत हे त्यांनी आपल्या कृतीने दाखवून दिले आहे...!
     जे जे राखीव जागेवरुन निवडून आले आहेत आणि तिथं खुर्च्या गरम करीत आहेत त्यांना राज्यघटनेशी आणि आंबेडकरी तत्वज्ञानाशी काही एक देणेघेणे नाही...!
    त्यांना दलाली करुन पोट भरायचे आहे,मालक नाराज होऊ नये म्हणून हे गुलाम वृत्तीचे लोकं साधी औपचारिकता  देखील दाखवू शकले नाहीत, यांनी जिभं सुद्धा हलविली नाही,यांनी साधा निषेध नोंदवला नाही,यांची वैचारिक बांधिलकी ही पोटाशी,पैशाशी आणि,लाचारीशी आहे हे यांनी दाखवून दिले आहे..!
  शेर कभी घास खाते नहीं.हेच खरे आहे..!
आणि नामर्द कभी लढाई लढते नहीं.
वैचारिक बांधिलकी असलेली माणसे कुठंही आणि केव्हाही आपल्या ध्येय्यापासुन तसुभरही मागे हटतं नाहीत...!
   जेव्हा संसदेत १२४ व्या घटना दुरुस्ती बिलावर चर्चा सुरू होती तेव्हा भाजपचे मनुवादी सरकार राज्यघटनेवरचं घाव घालीत आहे हे पटवून देण्यासाठी एम आय एम पक्षाचे असोदऊद्दीन ओवेशी, इंडियन युनियन मुस्लिम लिगचे ईटी बशीर मुहम्मद आणि पि.के. कुंजलकुटी हे या बिलाचा कडाडून विरोध करीत होते.,त्यांनी या बिलाच्या विरोधी मतं नोंदवून आपली वैचारिक बांधिलकी सिद्ध केली...!
  मात्र राखीव जागेवरुन निवडून आलेल्या दलालांची दलाली ऊघड झाली आहे...!
  मित्रहो हे घरभेदी आता यापुढे लक्षात ठेवा...!
राजकीय आरक्षणामुळे " दलालांची " नवी जातं निर्माण झाली आहे हेही या निमित्ताने सिद्ध झाले आहे...!
  जयभीम.
- भास्कर भोजने.

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...