ऐतिहासिक बदलाच्या दिशेने...!
:भास्कर भोजने
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते लोकशाहीमध्ये "सत्ता " ही सर्व समस्यांवरची "मास्टर की" आहे...!
विषमतावादी, मनुवादी, मंडळीने अतिशय धुर्तपणे ही मास्टर की, संपादन करण्यासाठी सोंग, ढोंग रचून सत्ता आपल्या अंकित केली...!
लोकशाहीमध्ये सत्ता संपादन करण्यासाठी लोकांची मर्जी संपादन करावी लागते म्हणून मनुवादी,कुणी "सेक्युलर"झाले...!
कुणी, समाजवादी झाले, कुणी धर्मवादी झाले, कुणी कम्युनिस्ट झाले, सगळे सोंग घेवून वेगवेगळ्या झुंडीत सामिल झाले, आणि सत्तेची चावी आपल्या अंकित केली...!
सत्ता बहूजन वर्गाकडे जाऊ नये म्हणून ती आपसात, कुटुंबात , किंवा मग नातेवाईकांत विभागुन घेतली आणि बहूजन वर्ग "उपेक्षित"कसा राहिल याची तजवीज करून ठेवली....!
आम्ही लोकशाही स्विकारुन ऊणेपुरे सत्तर वर्षे झाली आहेत, अनुभव अतिशय वेदनादायी आहे इथे जे उपेक्षित आहेत, त्यांच्या समस्या सूटण्याऐवजी अधिक जटील बनवल्या गेल्या आहेत...!
जे बहूजन आहेत परंतु छोट्या छोट्या जातींत विखुरलेले आहेत त्यांना सत्तर वर्षे झाली मात्र विधानभवनात किंवा संसदेत साधा पायही ठेवता आला नाही...!
हा वेदनादायी अनुभव सहन करता करता सत्तर वर्षे निघून गेली, मनुवादी,मंडळीची सोंग ढोंग पाहुन पाहुन सत्तर वर्षे संपली...!
यांचे दर पंचवार्षिक निवडणुकीला नवे सोंग समोर येते,मात्र उपेक्षित वर्गासाठी यांच्याकडे कुठलेही धोरण नाही की, योजना नाही,..!
जे काही आहे ते केवळ नाटकं आणि बतावणी....!
असे म्हणतात की, " गरज ही शोधाची जननी आहे " उपेक्षित वर्गाला आरक्षण नाही,समस्याग्रस्त समाजाला ठगविले जाते आहे मग आपले हक्क आणि अधिकार मिळवायचे कसे...??
या सोंगाड्या राजकीय पुढाऱ्यांवर विश्र्वास ठेवायचा किती वर्षे...??
या गरजेतुन मग सत्तेचा शोध घ्यायची प्रक्रीया सुरू झाली आहे...!
धनगर समाजाला आरक्षण पाहिजे त्यासाठी ६० वर्षे लढा दिला आहे परंतु पदरी निराशाच पडली आहे...!
माळी समाजाची संख्या मोठी आहे तरीही संसदेत प्रतिनिधित्व कुणी देतं नाही, त्यांना सत्ता हवी आहे...!
भटका विमुक्त समाज सत्तर वर्षे निघून गेली आजही कुण्या गावांत भिक मागायला गेला तर त्याला ठेचून मारले जाते,त्याची साधी ओळख या देशाने आणि इथल्या राज्यकर्त्यांनी निर्माण केली नाही...!
साळी,कोष्टी,सुतार,लोहार,मांगगारुडी, कुंभार,बेलदार अशी महाराष्ट्रातील अनेक जातीची माणसें आहेत की,त्यांनी केवळ मते द्यावीत आणि मनुवादी माणसांना सत्तेत बसवावे व आपले जीवन अतिशय कष्टमय अवस्थेत जगावे...?
ज्या लोकशाहीने प्रत्येक माणसाला समतेचे हक्क आणि अधिकार दिलेत ती लोकशाही आणि त्या लोकशाहीला नियंत्रीत करणारी " राज्यघटनाचं " बदलण्याची तयारी जेव्हा या मनुवादी मंडळीने केली आहे असे समजले तेव्हा हा उपेक्षित समाज समुह पेटून उठला आणि आणि बदल करण्यासाठी सज्ज झाला आहे...!
माझी समस्या मीच सोडवणारं...!
आता मीच सत्ताधारी होणारं....!
मी कुणाकडेही याचना करणार नाही,मीच आता दाता होणारं....!
मी घराणेशाही संपवणारं आणि लोकशाहीचे सामाजिकरण करणारं...!
मी मनुवादी मंडळीला सत्तेबाहेर फेकून माझ्या माणसाला बहुजन बांधवांला प्रतिनिधी बनविणारं...!
अशी भुमिका घेऊन महाराष्ट्रात बहूजन समाज " वंचित बहूजन आघाडीचा" अजेंडा घेऊन पुढे निघाला आहे ही ऐतिहासिक बदलाची नांदी आहे...!
हा उपेक्षित समाज गेली दहा महिने झाली आहेत, लाखा लाखाने एकत्र जमतो आहे आणि सत्ता संपादन मेळावे घेतो आहे...!
धनगर समाज सत्ता संपादन मेळावा २० मे २०१८ ला झाला होता...!
हा समस्याग्रस्त समाज कोणतीही सुविधा उपलब्ध नसतांना थंडीच्या दिवसात शेकडो मैलाचा प्रवास करुन लाखा लाखाची अधिवेशने यशस्वी करतो आहे...!
हा उपेक्षित माणूस स्वत:च सत्तेचा वाटेकरी होण्यासाठी सिद्ध झाला आहे ही त्याची पावती आहे आणि म्हणून मित्रहो आता ऐतिहासिक बदल घडणारं आहे...!
इथला धनगर,माळी, मुस्लिम, बौद्ध , मातंग,भटका विमुक्त, आदिवासी आणि ओबीसी तसेच सकल मराठा माणूस ओरडून ओरडून सांगतो आहे की, मला आता सत्ता संपादन करायची आहे,...!
या देशात एक टक्का माणसांनी ८३ टक्के संपत्ती आपल्या ताब्यात घेऊन इथल्या बहूजन समाजाला भुकेकंगाल बनविले आहे...!
हे संपत्तीचे धृवीकरण करण्यासाठी इथल्या सत्ताधारी,सत्तेतीला लोकांची धोरण कारणीभूत आहेत हेही जनतेने लक्षात घेतले आहे,...!
आता बदल होणारच आहे तो बदल सत्तेतून समतेकडे या मार्गाने होणारं आहे म्हणून हा बदल ऐतिहासिक बदल आहे...!
जयभीम.
- भास्कर भोजने.
:भास्कर भोजने
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते लोकशाहीमध्ये "सत्ता " ही सर्व समस्यांवरची "मास्टर की" आहे...!
विषमतावादी, मनुवादी, मंडळीने अतिशय धुर्तपणे ही मास्टर की, संपादन करण्यासाठी सोंग, ढोंग रचून सत्ता आपल्या अंकित केली...!
लोकशाहीमध्ये सत्ता संपादन करण्यासाठी लोकांची मर्जी संपादन करावी लागते म्हणून मनुवादी,कुणी "सेक्युलर"झाले...!
कुणी, समाजवादी झाले, कुणी धर्मवादी झाले, कुणी कम्युनिस्ट झाले, सगळे सोंग घेवून वेगवेगळ्या झुंडीत सामिल झाले, आणि सत्तेची चावी आपल्या अंकित केली...!
सत्ता बहूजन वर्गाकडे जाऊ नये म्हणून ती आपसात, कुटुंबात , किंवा मग नातेवाईकांत विभागुन घेतली आणि बहूजन वर्ग "उपेक्षित"कसा राहिल याची तजवीज करून ठेवली....!
आम्ही लोकशाही स्विकारुन ऊणेपुरे सत्तर वर्षे झाली आहेत, अनुभव अतिशय वेदनादायी आहे इथे जे उपेक्षित आहेत, त्यांच्या समस्या सूटण्याऐवजी अधिक जटील बनवल्या गेल्या आहेत...!
जे बहूजन आहेत परंतु छोट्या छोट्या जातींत विखुरलेले आहेत त्यांना सत्तर वर्षे झाली मात्र विधानभवनात किंवा संसदेत साधा पायही ठेवता आला नाही...!
हा वेदनादायी अनुभव सहन करता करता सत्तर वर्षे निघून गेली, मनुवादी,मंडळीची सोंग ढोंग पाहुन पाहुन सत्तर वर्षे संपली...!
यांचे दर पंचवार्षिक निवडणुकीला नवे सोंग समोर येते,मात्र उपेक्षित वर्गासाठी यांच्याकडे कुठलेही धोरण नाही की, योजना नाही,..!
जे काही आहे ते केवळ नाटकं आणि बतावणी....!
असे म्हणतात की, " गरज ही शोधाची जननी आहे " उपेक्षित वर्गाला आरक्षण नाही,समस्याग्रस्त समाजाला ठगविले जाते आहे मग आपले हक्क आणि अधिकार मिळवायचे कसे...??
या सोंगाड्या राजकीय पुढाऱ्यांवर विश्र्वास ठेवायचा किती वर्षे...??
या गरजेतुन मग सत्तेचा शोध घ्यायची प्रक्रीया सुरू झाली आहे...!
धनगर समाजाला आरक्षण पाहिजे त्यासाठी ६० वर्षे लढा दिला आहे परंतु पदरी निराशाच पडली आहे...!
माळी समाजाची संख्या मोठी आहे तरीही संसदेत प्रतिनिधित्व कुणी देतं नाही, त्यांना सत्ता हवी आहे...!
भटका विमुक्त समाज सत्तर वर्षे निघून गेली आजही कुण्या गावांत भिक मागायला गेला तर त्याला ठेचून मारले जाते,त्याची साधी ओळख या देशाने आणि इथल्या राज्यकर्त्यांनी निर्माण केली नाही...!
साळी,कोष्टी,सुतार,लोहार,मांगगारुडी, कुंभार,बेलदार अशी महाराष्ट्रातील अनेक जातीची माणसें आहेत की,त्यांनी केवळ मते द्यावीत आणि मनुवादी माणसांना सत्तेत बसवावे व आपले जीवन अतिशय कष्टमय अवस्थेत जगावे...?
ज्या लोकशाहीने प्रत्येक माणसाला समतेचे हक्क आणि अधिकार दिलेत ती लोकशाही आणि त्या लोकशाहीला नियंत्रीत करणारी " राज्यघटनाचं " बदलण्याची तयारी जेव्हा या मनुवादी मंडळीने केली आहे असे समजले तेव्हा हा उपेक्षित समाज समुह पेटून उठला आणि आणि बदल करण्यासाठी सज्ज झाला आहे...!
माझी समस्या मीच सोडवणारं...!
आता मीच सत्ताधारी होणारं....!
मी कुणाकडेही याचना करणार नाही,मीच आता दाता होणारं....!
मी घराणेशाही संपवणारं आणि लोकशाहीचे सामाजिकरण करणारं...!
मी मनुवादी मंडळीला सत्तेबाहेर फेकून माझ्या माणसाला बहुजन बांधवांला प्रतिनिधी बनविणारं...!
अशी भुमिका घेऊन महाराष्ट्रात बहूजन समाज " वंचित बहूजन आघाडीचा" अजेंडा घेऊन पुढे निघाला आहे ही ऐतिहासिक बदलाची नांदी आहे...!
हा उपेक्षित समाज गेली दहा महिने झाली आहेत, लाखा लाखाने एकत्र जमतो आहे आणि सत्ता संपादन मेळावे घेतो आहे...!
धनगर समाज सत्ता संपादन मेळावा २० मे २०१८ ला झाला होता...!
हा समस्याग्रस्त समाज कोणतीही सुविधा उपलब्ध नसतांना थंडीच्या दिवसात शेकडो मैलाचा प्रवास करुन लाखा लाखाची अधिवेशने यशस्वी करतो आहे...!
हा उपेक्षित माणूस स्वत:च सत्तेचा वाटेकरी होण्यासाठी सिद्ध झाला आहे ही त्याची पावती आहे आणि म्हणून मित्रहो आता ऐतिहासिक बदल घडणारं आहे...!
इथला धनगर,माळी, मुस्लिम, बौद्ध , मातंग,भटका विमुक्त, आदिवासी आणि ओबीसी तसेच सकल मराठा माणूस ओरडून ओरडून सांगतो आहे की, मला आता सत्ता संपादन करायची आहे,...!
या देशात एक टक्का माणसांनी ८३ टक्के संपत्ती आपल्या ताब्यात घेऊन इथल्या बहूजन समाजाला भुकेकंगाल बनविले आहे...!
हे संपत्तीचे धृवीकरण करण्यासाठी इथल्या सत्ताधारी,सत्तेतीला लोकांची धोरण कारणीभूत आहेत हेही जनतेने लक्षात घेतले आहे,...!
आता बदल होणारच आहे तो बदल सत्तेतून समतेकडे या मार्गाने होणारं आहे म्हणून हा बदल ऐतिहासिक बदल आहे...!
जयभीम.
- भास्कर भोजने.
No comments:
Post a Comment