#वैचारिक गोंधळ नको...भास्कर भोजने
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
#मनुवादी नेहमी प्रत्येक नेत्याला एका जातीत बांधून ठेऊन त्याचा राजकीय परिघ संकोचून त्याला एका मर्यादेत बंदिस्त करतात.मात्र त्याच वेळी वैदिकांचा नेता हा देशातील समस्त समाजाचा नेता ठरवितात.हा बामणी कावा आहे...!!
उदा:- शरद पवार...मराठा नेता.
वारीस पठाण..... मुस्लिम
नेता.
अनिल अण्णा गोटे.. धनगर नेता.
आनंदराव अडसूळ... चर्मकार
नेता.
लक्ष्मणराव ढोबळे.... मातंग नेता.
सुधाकरराव नाईक... बंजारा नेता.
बबनराव पाचपुते...वारक-यांचा
नेता.
रामदास आठवले... दलित नेता.
गोपिचंद पडळकर..... धनगर नेता.
छगन भुजबळ......माळी नेता.
गोपीनाथ मुंडे..... वंजारी नेता.
बहूजनांचा कुणीही राजकीय पुढारी असो,त्याला त्याच्या जातीच लेबल लावून त्याचा राजकीय परिघ संकोचून त्याची मर्यादा खुंटविली जाते...!!
महाराष्ट्रातील या वरील नेत्यांची ही ओळख कुणीही नाकारु शकतं नाही.,
मात्र
देवेंद्र फडणवीस, नितिन गडकरी तथा शरद जोशी,मनोहर जोशी यांची अशी कोणतीही ओळख निर्माण झाली नाही. असे का.??
या प्रश्नाचे उत्तर खूप सोपे आहे...!!
आपणं आपली भूमिका कशी तयार करतो,??किंवा आपला समज कसा समृद्ध होतं जातो...??
ज्ञात असलेल्या साधनांचा वापर करून समाजातील तरुण आपली वैचारिक भुमिका दृढ करीत असतो...!!
राजकीय पुढाऱ्यांच्या संदर्भात कुठलेही पुस्तक वा साहित्य उपलब्ध नसते मग वाचक वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया वरील माहितीच्या आधारे त्या त्या नेतृत्वाच्या पैलूंचा शोध घेत घेत त्याच्या बद्दलची समाजात भूमिका किंवा मतं तयार होतं जाते....!!
सगळ्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियात वैदिक धर्मीय कावळ्यांनी कब्जा मिळवला आहे,ते सरळ सरळ प्रत्येक नेत्यांच्या जातीचा उल्लेख करुन त्याची तशी ओळख निर्माण व्हावी म्हणून शब्दांचे खेळ करीत असतात दृष्टबुद्धीने खोट्या गोष्टी पण रेटून बोलतात आणि शब्दांचा भडिमार करीत करीत त्या नेत्यांचं आपणं जातीय वर्गीकरण करून बसतो आणि त्या नेत्याला आपणही त्याचं जातीचं लेबल लावून मोकळे होतो...!!
जर देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी सारख्यांना ब्राम्हणांचे नेते म्हणून मान्यता दिली तर ते बहुमताच्या राजकारणात अत्यल्प संख्याक असल्यामुळे यशस्वी झाले असते का.??
याची अजिबात शक्यता नाही परंतु आपणं त्यांना तशी ओळख दिली नाही कारण त्यांच्या जातीचा कोणत्याही वृत्तपत्राने वा टि.व्ही.चॅनलने आपणांस नेहमी नेहमी शब्दांचा खेळ करुन त्यांची ओळख करुन दिली नाही....!!
त्याच्या उलटं ते कसे मानवतावादी आहेत,ते कसे आक्रमक आहेत,ते कसे विद्वान आहेत,ते कसे कर्तृत्वान आहेत,त्यांनी किती आणि कशा पदव्या संपादन केल्या आहेत याचाच भडिमार केला जातो आणि त्यांचं नेतृत्व बहूजन समाजाच्या मेंदूत फिट बसविले जाते.हेच वास्तव आहे, हेच सत्य आहे...!!
मिडियातील जातियवादी किड्यांनी, अतिशय विकृत बुद्धीने, समाजाची मानसिकता तयार करुन सर्वच नेत्यांच्या मर्यादा आखून त्यांना एका छोट्या परिघात बंदिस्त करून आपलं राजकीय नेतृत्व पुढे दामटतात...!!
समाज मनं मात्र जातिय विखारात डुंबून राजकीय नेतृत्वाची मर्यादा आखून त्या नेत्याला त्याच्याच जातीचा नेता म्हणून संबोधतो किंवा तश्याच मानसिकतेने पाहतो वा विचार करतो.हा अनुभव आहे,हीच वास्तविकता आहे,हेच सत्य आहे...!!
वैदिकांची ही दृष्टबुद्धी परास्त करायची असेल तर जातीच्या पलिकडे जाऊन नेतृत्वाला काम करावे लागेल ही काळाची गरज ओळखून वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी गेल्या चाळीस वर्षांपासून आपलं राजकीय धोरण बहूजन समाजाच्या हितासाठी झटणारे नेते म्हणून आखलं आणि त्याच दिशेने कामही केले आहे...!!
त्या संदर्भात गेल्या चाळीस वर्षाचा अॅड बाळासाहेब आंबेडकरांच्या कामाचा आलेख बघा...!!
#मंडल आयोग लागु करा म्हणून महाराष्ट्रभर दौरे. आंदोलन केले,परिषदा घेतल्या...!!
#एनरॉन प्रकल्प रद्द करा म्हणून आंदोलन...!!
#गायरान जमीनी तथा अतिक्रमीत जमीनीसाठी लढा...!!
#ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून आंदोलन आणि लढा...!!
#धोबी समाजाचा एस.सी.प्रवर्गात समावेश व्हावा म्हणून मोर्चा...!!
#वारकरी संप्रदायाच्या मागणी साठी नागपूर विधानभवनावर मोर्चा...!!
#संत तुकाराम महाराजांची समाधी वाचविण्यासाठी डाऊ कंपणी विरोधात भामरागड डोंगर वाचविण्यासाठी आंदोलन...!!
#महिला मुक्ती परिषदांचे सलग दहा वर्षे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात आयोजन...!!
#वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन...!!
#शेतकयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून आंदोलन, रस्ता रोको आंदोलन...!!
#शेतक-यांचे कर्ज माफी साठी मोर्चा, आंदोलन...!!
#कापूस परिषदेचे आयोजन...!!
#१३महामंडळामधून देण्यात आलेले कर्ज माफ करावे म्हणून मुंबई आझाद मैदानावर विशाल मोर्चा...!!
#सच्चर समितीच्या शिफारशी लागू कराव्यात म्हणून आंदोलन...!!
#जाचक पोटा कायदा रद्द करावा म्हणून यवतमाळ, परभणी येथे परिषदांचे आयोजन...!!
वरील आंदोलने,लढे आणि परिषदांचे विश्लेषणात्मक विवरण केले तर अॅड बाळासाहेब आंबेडकरांनी समाजातील ओबीसी, मुस्लिम, दलित, महिला,विद्यार्थी, शेतकरी,कष्टकरी,भुमिहीन,अशा सर्वच घटकांसाठी काम केले आहे हा लेखाजोखा आहे. आधी केले मग सांगितले...!!
आता अॅड बाळासाहेब आंबेडकरांनी ३१अॉगस्ट ला पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासाठी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्यावर काही स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवून घेणाऱ्या मित्रांनी आक्षेप नोंदवला आहे...!!
मित्रांनो वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर हे सर्वधर्मसमभाव मानणारे राजकीय पुढारी आहेत...!!
समतेचा संदेश देणा-या वारकरी संप्रदायाचे मंदिर खुले व्हावे म्हणून आंदोलन करीत आहेत ही भुमिका समजून घ्या...!!
वैदिक धर्मीयांशी वारकरी संप्रदायाचे काहीही नातं नाही...!!
आंबेडकरी विचारधारेचा विरोध वैदिक धर्मीयांच्या विचारधारेशी आहे, समतावादी वारकरी संप्रदायाशी नाही...!!
तुम्ही आंबेडकरवादी असाल तर (?)
तुम्ही स्वत: मनुवादी मिडियाने तुमच्या डोक्यात निर्माण केलेला वैचारिक गोंधळ काढून टाका...!!
वैदिकांना अॅड बाळासाहेब आंबेडकर हे एका जातीचे नेते आहेत ही भुमिका मांडायची आहे,त्यांची तशीच मनिषा आहे, मात्र बाळासाहेब आंबेडकरांचे गेल्या चाळीस वर्षातील काम तर बहूजनांचे नेते म्हणून आहे,मग तुम्ही वैदिकांना अभिप्रेत असलेली भुमिका का मांडता...??
तुम्ही आंबेडकरवादी असुनही तुम्हाला समतावादी वारकरी संप्रदाय मान्य नाही का.??
तुम्ही आंबेडकरवादी असुनही तुम्हाला समतावादी वारकरी संप्रदायाचा ऐतिहासिक संदर्भ माहिती नाही का..??
तुम्ही आंबेडकरवादी आहात की पुरोगाम्या सारखे ,ढोंगी आहात...??
तुमच्या मनातील वैचारिक गोंधळ काढून टाका आणि स्वतंत्र बुद्धीने विचार करून वैचारिक विरोध करा.तुमचे स्वागत होईल,मात्र मनुवादी वैदिकांचीच री ओढली तर तुम्ही ढोंगी आहात हेचं सिद्ध होईल...!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने.