Tuesday, 26 February 2019

निखिल वागळेंचे चाललेय काय?



निखिल वागळेंचे चाललेय काय?
नमस्कार निखिल वागळे सर
कालचं आपलं विश्लेषण आवडले पण पटले मात्र नाही. याला कारण म्हणजे ते एकतर्फी झालं. धर्मांध शक्तींना रोखणे हा पेच  नियमितपणे आंबेडकरी पक्षांपुढे टाकण्यात येत असतो.   कॉंग्रेसला धर्मांध पक्षांना रोखायचे आहे म्हणजे नेमके काय ?
उत्तर प्रदेशात सपा बसपा हे मजबूत गठबंधन  भाजपला रोखण्यासाठी समर्थ असताना कॉंग्रेस तिकडे प्रियंका गांधींना उत्तर प्रदेश राज्यापुरते उतरवून आणि राज्यात सर्वत्र उमेदवार  उभे करण्याची तयारी ठेवून कुणाचा फायदा करून देत आहे हा सवाल आज पुरोगामी व धर्मांधताविरोधी शक्तींच्या विचारवंत, तार्किक विश्लेषक आणि पत्रकारांकडून कधीही विचारलेला पहायला मिळत नाही. गेली अनेक वर्षे कॉंग्रेस उत्तर प्रदेशात सपा बसपाच्या विरोधात उमेदवार देऊन भाजपला निसटत्या फरकाने जिंकण्यासाठी हातभार लावत असताना कॉंग्रेस भाजपाला रोखण्याचे काम करते की मदतीचे हा प्रश्न कुणालाच कसा आणि का पडत नाही ?
विधानसभा निवडणुकी आधी मायावतींनी पाचही राज्यात युतीसाठी हात पुढे केला होता. पण अत्यंत अपमानास्पद जागावाटणीचा फॉर्म्युला देऊन बसपाला झुलवत ठेवले. मात्र त्या मायावती आहेत, रामदास आठवले नव्हेत याचा त्यांना विसर पडला. त्यामुळेच बसपाने कॉंग्रेसला धडा शिकवत सर्व  जागेवर उमेदवार उभे केले. भले त्यांना यश अत्यंत मर्यादित मिळाले. मात्र बसपचा मताधार वाढला आणि कॉंग्रेसला त्यांच्या टेकूची गरज पडली. कॉंग्रेसला फक्त हीच भाषा समजते.
रामदास आठवले सारख्यांना ते  याचकाप्रमाणे दरवाजात उभे करत असत. गेल्या सहा निवडणुकांमधे कॉंग्रेसला महाराष्ट्रात लोकसभेला २४  जागा अगदी रडतखडत मिळालेल्या आहेत. अपवाद १९९८ सालचा. त्या वेळी ३८ जागा मिळाल्या. पण त्या वेळी एकत्रित रिपब्लिकन पक्ष कॉंग्रेस सोबत होता.  कॉंग्रेस राष्ट्रवादी युती असो किंवा आख्खे शरद पवार कॉंग्रेसमधे असोत, त्यांना १५, १९, २२, २४ आणि आता निव्वळ पाच जागा मिळालेल्या आहेत.  कॉंग्रेसची ताकद तरी काय आहे ?
कॉंग्रेस म्हणजे मराठा  समाजाने आपल्या स्वार्थासाठी आणि अनिर्बंध सत्तेसाठी महाराष्ट्रात वापरण्याची गोष्ट आहे. राज्यात धनगर १२ टक्के आहेत. बौद्ध १२ टक्के आहेत. मुस्लीम १२ टक्के आहेत. यांची मोट बांधली तर ती ३६% होते. हे  जिंकण्याचे सूत्र आहे. बौद्धांपैकी ६% बौद्ध म्हणून रजिस्टर्ड आहेत तर ६% हिंदू महार म्हणून. रामदास आठवलेंकडे सुरूवातीला ६% मतं होती.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या एकत्रित मतांच्या बेरजेत आणि सेना भाजप युतीच्या एकत्र मतांमधे केवळ ३% इतकाच फरक असे. आठवलेंमुळे तो फरक निर्णायक ठरत असे. मात्र आठवले एका जागेच्या किंवा विधानपरिषदेच्या बदल्यात सर्व राज्यात कॉंग्रेसच्या पारड्यात ही मतं टाकत असत. आदर्श परिस्थितीत कॉंग्रेसने आठवलेंना सत्तेचा ६% वाटा दिला पाहीजे. मराठा संख्या अनिश्चित आहे. कुणी म्हणतं ३३% आहे. कुणी १६% म्हणतं. अगदी ३३% धरले तरी यातले निम्मे सेना भाजपकडे आहेत. म्हणजेच कॉंग्रेसचा मताधार हा धनगर, मुस्लीम आणि बौद्ध असा राहीलेला आहे.
तर मग कॉंग्रेसने जनसंख्येच्या प्रमाणात कुणब्यांना १२% सत्ता द्यावी, मराठ्यांना १६% द्यावी, बौद्धांना ६ ते १२% द्यावी, इतर अनुसूचित जातींना २%, धनगरांना १२% द्यावी आणि मुस्लिमांना देखील १२%  द्यावी.
या पद्धतीने कधी जागावाटप झाले आहे का ?
पश्चिम महाराष्ट्रात जमीन ९०% मराठा समाजाकडे आहे. सहकारी संस्थांमधे ९९% मराठा आहेत. कारखान्यांमधे ९९% मराठा आहेत. शिक्षण संस्था ९०% मराठा समाजाच्या आहेत. ग्रामपंचायतींमधे कुणबी आणि मराठा हे ओबीसींचं आरक्षण मारून टाकतात. तेच विधानसभेला. इतर समाजाला प्रतिनिधित्व देण्याची दानत कॉंग्रेसमधे नाही.
याचा परिणाम म्हणून पश्चिम महाराष्ट्रात सत्तेच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात पैसा मराठा समाजाकडे आलेला आहे.  राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा साधा कार्यकर्ता देखील ऑडी कार मधे  फिरतो. आवई उठवून जागांचे व्यवहार पार पाडणे त्यासाठी सत्तेचा वापर करणे हे यांचे तंत्र राहीले आहे. त्यामुळे जमिनीचे भाव २००३ पासून  पुणे जिल्ह्यात १० लाख रूपये एकर पासून ते आज ३० लाख रूपये गुंठ्यापर्यंत गेले आहेत. यामुळे सामान्य माणसाला घर घेता येत नाही.  दुकानांची भाडी न-हे, धायरी, आंबेगाव सारख्या ग्रामीण उपनगरात महिना किमान ५०००० रूपये आहेत. यामुळे मराठा, मारवाडी आणि उच्चवर्णिय पैसेवाले वगळता धंदा करणे कुणाच्या बापालाही शक्य नाही. त्यामुळे बॅंकेकडे जाता येत नाही. बॅंक पहिल्यांदा जागामालकाचा करार मागते.
पोलीस दल जातीयवादी आहे.  कुणी गरीबाने अंडाभुर्जीचा  स्टॉल टाकला की त्याच्यावर कारवाई होते. पण तो कॉंग्रेस राष्ट्रवादीचा असेल तर बेकायदेशीर धंदा चालू राहतो.  त्यांची बांधकामे पडत नाहीत. थोडक्यात सत्तेचा होईल तेव्हढा दुरूपयोग हा एका समाजासाठी केला जातो. ते फक्त गुजराथी मारवाड्यांना मान देतात कारण ते पैसा पुरवतात.
निवडणुकीत मात्र मतं लागतात. ती बौद्ध समाजाकडून येतात. मुस्लिमांकडून येतात. धनगरांकडून येतात. धनगरांना जागृत करण्य़ाचे काम महादेव जानकर गेली ३० वर्षे करत आहेत. त्यांना काय दमदाटी झाली हे बारामती तालुक्यात कुणालाही विचारा. काळूराम चौधरीला बसपाचा बोर्ड बारामतीच्या आमराईत लावला म्हणून काय संदेश गेला हे सुद्धा विचारा.  गेली कित्येक वर्षे धनगर समाज अस्वस्थ आहे. त्यांना भाजपने हेरले आणि जवळ केले.  कॉंग्रेसने मग धनगरांना उमेदवारी देण्य़ाचे नाटक केले आणि अपक्ष मराठा उमेदवार उभा करून त्याला निवडून आणले. हे धनगर समाजाच्या लक्षात आहे.  खडकवासला मतदारसंघात राजेंद्र हगवणे याने बंड केले  म्हणून त्याला उमेदवारी दिली. कुमार गोसावी यांना बंडखोर ठरवले गेले. प्रत्यक्षात विमानाला मत द्या असे मेसेजेस घरोघरी गेले.
आठवलेंना शिर्डीत पाडताना मेणबत्तीपेक्षा उदबत्ती बरी असा प्रचार अजितदादा आणि राधाकृष्ण विखे यांनी केला. परिणामी शिवसेनेचे वाकचौरे निवडून आले. २००९ साली आठवलेंची फसवणूक केल्यावर त्यांनी वेगळा  रस्ता धरला पण मनसेला सेना भाजपची मतं खाण्यासाठी उभे करून त्यांनी मोठा पराभव तेव्हां टाळला.
यालाच धर्मनिरपेक्ष शक्तींना पाठिंबा देणे म्हणतात का ?
या गोष्टी एक पत्रकार म्हणून तुम्हाला नक्की माहीत असतील. प्रश्न  हा ही नाही.
जनता दलाच्या प्रयोगानंतर माझ्या पिढीने भाजप ८८ पर्यंत पोहोचली म्हणून कॉंग्रेसला मतदान केले. कॉंग्रेसने त्याचे पांग खाजगीकरण,  उदारीकरण आणि जागतिकीकरणाद्वारे अनुसूचित जातीचे सरकारी नोकरीतले प्रतिनिधित्व घटवून फेडले.  सरकारी कॉलेजेस वाढली नाहीत. सरकारी शाळांची दुरवस्था केली. शेती उद्ध्वस्त केली.  याचा परिणाम आपण मराठा मोर्चा आणि शेतकरी संपामधे पाहिला. मात्र या दुरावस्थेचे कारण ध्यानात  येऊ नये यासाठी मराठा आरक्षणाचा डाव टाकून एकाच वेळी आपले अपयश झाकणे, बौद्धांच्या विरोधात ध्रुवीकरण करणे आणि भाजपला अडचणीत आणणे असे घाणेरडे राजकारण खेळले गेले.  मराठा मोर्च्याच्या काळात बौद्धांना गावकुसाबाहेर राहू देणार नाही असा प्रचार महाराष्ट्रभर करणारे देव गायकवाड हे फेक प्रोफाईल पुढे मुख्यमंत्र्यांच्या महिला अधिका-याची बदनामी करताना पकडले गेले. पण ते आजही मुक्त आहे. या व्यक्तीने व्हॉट्सअ‍ॅप वरून नाशकात दंगली घडवताना बौद्ध गांवांवर हल्ले चढवले. 
९० च्या काळात देखील  ओबीसींचे लक्ष भरकटवण्यासाठू भाजप संघ परिवाराच्या मंदीर लढ्याला प्रतिक्रिया देऊन त्यांनी अजेण्डे सेट केले. कॉंग्रेस अशा पद्धतीने भाजप सोबत परस्परपूरक राजकारण खेळली.
माझी पिढी बावळट होती. माझ्या आधीची तर भावनिक मूर्ख होती.
त्यानंतर  नाराज घटकांनी वाजपेयींमधे आश्वासक चेहरा पाहिला. त्यांनी खाऊजा धोरणाला गती देऊन त्रेधा तिरपीट केली. त्यानंतर कॉंग्रेसने भाजप आली तर घटना बदलेल असा नारा दिला. या दबावाखाली मायावतींसारख्या मुत्सद्दी राजकारण्यांना कॉंग्रेसला पाठिंबा द्यावा लागला. या काळात अनेक दलितविरोधी निर्णय न्यायसंस्थेद्वारा राबवले गेले. अनेक खटल्यात सरकारने वकीलच दिला नसल्याचे उघडकीला आले. यात न्यायसंस्था अजिबात दोषी नाहीत. सरकारपक्षाने हरण्याचे मनावर  घेतले असेल तर कुणी काही करू शकत नाही.
मात्र ९० नंतर जन्मलेली पिढी हुषार आहे. अभ्यासू आहे. ती या घटनांचे विश्लेषण करते. मी असे म्हणत नाही की ती अजून पुरेशी प्रगल्भ आहे. मात्र ती भावनांवर राजकीय निर्णय घेत नाही. भाजपला रोखायचे म्हणून हे दावे किती फोल आहेत हे या पिढीने स्वत:च्या अभ्यासाने मांडले आहे. कॉंग्रेसशी आघाडी म्हणजे तो पक्ष संपणे यावर ही पिढी अभ्यासपूर्ण बोलते. या पिढीला फसवणे अवघड आहे. या पिढीने रिपब्लिकन पक्षाच्या तमाम गटांपुढे युती करा असा पेच टाकला होता.
आता  युवक जाणतात की थोड्याश्या जागेसाठी समझौता म्हणजे आपले अस्तित्त्व गमावणे. सात आठ जागा निवडून आणल्या तर लोकसभेत कॉंग्रेस किंमत देत नाही  हा इतिहास आहे. कॉंग्रेस का बदलेल याला कोणतेही ठोस कारण  नाही. आठ जागांना पर्याय असणारच आहे. पण आठ जागा कॉंग्रेस देत नाही.
त्यांनी बाळासाहेबांना दोन जागेचा प्रस्ताव दिला होता. १२ जागा देणे मान्य नसणे याचा अर्थ ४८ उणे १२ बरोबर ३६ पेक्षा जास्त जागा  कॉंग्रेस निवडून येण्य़ाच्या स्थितीत असणे. अशी परिस्थिती आहे का ? बाळासाहेबांचा प्रस्ताव अव्यवहार्य होता का ? लक्षात घेतले पाहीजे की तेव्हां बाळासाहेबांसोबत अनेक समाजघटक येऊन जुळत होते म्हणून १२ जागा मागितल्या होत्या. औरंगाबाद आणि सोलापूरच्या  धडकी भरवणा-या सभा झाल्या होत्या.
पण कॉंग्रेसने नाटकं केली. ओवेसी नकोत. कारण काय तर ते धर्मांध आहेत. हेच ओवेसी २०१२ पर्यंत कॉंग्रेससोबत असताना धर्मनिरपेक्ष होते का ?  हे म्हणजे भाजपमधे गुन्हेगार आले की ते पवित्र होतात तसेच झाले की.
ओवेसींनी माझ्यामुळे आघाडी होत नसेल तर मी बाजूला होतो, माझे उमेदवार उभे करत नाही पण  आघाडी होऊ द्या अशी भूमिका घेतली. त्यामुळे कॉंग्रेसची पंचाईत झाली. त्यांचे आपसात जागावाटप चालू होते. उरलेली भीक प्रकाश आंबेडकरांना असे ठोकताळे होते. मात्र प्रकाश आम्बेडकरांनी एव्हाना १२उमेदवार उभे करून दबाव ठेवल्याने  दाती तृण धरून ते राजगृहावर शरण आले. १२ जागा घोषित केल्यानंतर या बैठकीत ३ जागांचा प्रस्ताव देऊन राहुल कुलकर्णींना  टीव्हीवर ८ जागांचा प्रस्ताव दिल्याची बातमी ब्रेक करायला लावली. हे डावपेचाचे राजकारण असल्य़ाने बाळासाहेब त्याला पुरून उरत आहेत.
आता आग्री, कोळी, ईस्ट इंडीयन,  कोल्हाटी, पारधी, रामोशी अशा अठरापगड समाजांनी आणाभाका घेऊन पाठिंबा दिल्यावर कॉंग्रेसची खरंच गरज उरलेली  नाही.  आता एव्हढ्या मोठ्या सभा झाल्यानंतर ८ जागा मागणे म्हणजे पाठिंबा देणा-यांचा विश्वासघात करणे होय.
वंचित आघाडीला पाठिंबा देणारा तरूण वर्ग काही भारीपचा भक्तवर्ग नाही. तो एक सेक्शन आहे. तर आंबेडकरी  राजकारण स्वतंत्र असावे , त्याचा श्रीगणेशा व्हावा अशी इच्छा असणारा सुशिक्षित आणि अभ्यासू युवक आहे. बाळासाहेबांनी या नुकत्याच  जुळलेल्या तरूण वर्गाला सामावून घेत पदं दिली आहेत. त्यांनी हा सूर ओळखला आहे. त्यांच्याशी सुजात आंबेडकर, सौ अंजली आंबेडकर यांनी संपर्क ठेवला. त्यांचे म्हणणे जाणून घेतले आणि त्याप्रमाणे यावेळी सर्व  घडते आहे.  घडणार आहे. नाही घडले तर हा वर्ग अस्वस्थ होईल.
कारण कॉंग्रेसला तीनदा सत्ता दिली. त्यांनी खैरलांजी साठी आम्हाला मोर्चे काढण्याची पाळी आणली.  सोलापुरात घराघरात पोलिसांनी शिरून भीषण लाठीचार्ज   केला. महिलांना केसाला धरून बाहेर ओढले. लहान लेकरांना मारहाण झाली. आम्हाला नक्षलवादी ठरवले गेले आणी उच्च न्यायालयात ज्याची भीती होती तेच झाले. अनेक आरोपी सुटले व फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. हा खटला अपवाद नाही असा निर्णय आम्ही ऐकला त्याच कॉंग्रेसने निर्भया केस मधे किती तत्परता दाखवली ? आम्ही बघतोय. आम्हाला डोळे आहेत. कान आहेत. एक मेंदू आहे.
खर्ड्याला आगे ला मारले ती  शाळा पवारांची ! मारणारे राष्ट्रवादीचे. सगळे निर्दोष सुटले. २००४ ते २०१३  या काळात ४५०० ऎट्रोसिटीची प्रकरणे दाबली गेली. अनुसूचित जाती आयोगाने २०१३ साली सरकारचे  कान उपटले. मात्र मराठा मोर्च्यात याच नेत्यांनी फक्त ४% प्रकरणे खरी असतात असा उफराटा प्रचार करून आमच्या भळभळत्या जखमांवर डागण्या दिलेल्या आहेत. आमच्या लोकांवर खंडणीचे  गुन्हे आहेत.
माझ्या ओळखीतल्या एका बौद्ध डॉक्टर तरूणीने मराठा तरूणाशी  लग्न  केले. त्याला पाच लाख रूपये क्लिनिक टाकण्य़ासाठी  दिले, जेणेकरून तो सेटल व्हावा. पण त्याचे घरचे येऊन  त्याला घेऊन गेले. त्याचे गावाकडे दुसरे लग्न लावून दिले. त्याचा जाब  विचारायला मेव्हणी एकटी गावाला गेली असता  तिला विहीरीत ढकलून जीव घेण्याचा प्रयत्न आसपासच्या लोकांमुळे हाणून पडला. ती जीव वाचवून पळून आली. या प्रकरणाची फिर्याद नोंदवताना पोलिसांमधला जातीयवाद अनुभवला. या मुलाचे नातेवाईक या भागात राहत असल्याने त्यांनी पोलीस स्टेशन्स मॆनेज केली होती. भाजपचे एक नगरसेवक पोलिसांना सूचना देत होते . आज हे नगरसेवक भाजपचे आंमदार आहेत तर नातेवाईक राष्ट्रवादीचे.
भीमा कोरेगाव मधे भाजप सेने सोबत राष्ट्रवादीचे लोक होते हा माझा स्पष्ट आरोप आहे. गेली १४ महीने आम्ही आरटीआयचे अर्ज घेऊन  फिरत  आहोत. हल्लेखोर सेना भाजपचे होते तरी  ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. त्यांनी बंद चे ठराव कसे काय केले ?  ज्या घरावरून दगडफेक झाली ती घरं राष्ट्रवादी समर्थक आहेत.
मिरज सांगली दंगलीत जर भिडे सापडले तर आर आर आबांनी  सोडून  देण्याचे कारण काय होते ? प्रतापगडला एकबोटे अफजलखान समाधी तोडायला  गेले तेव्हां तक्रारी करूनही कॉंग्रेस राष्ट्रवादी चे मंत्री ढिम्म  का बसत होते ?
आणि आता तर भिडे हे जयंत पाटलांच्या घरी असतात. कोरेगाव भीमा प्रकरणी वॉरंट  निघाले तेव्हांहॊ होते असे समोर येत आहे.
तर नेमक्या कोणत्या कारणासाठी आम्ही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला मतदान करायचे आहे ?
युती केली तर आमची मतं प्रामाणिकपणे पडतात. त्यांची पडत नाहीत. इतक्या वर्षात त्यांना आपल्या मतदाराच्या मानसिकतेत बदल करटा आलेला नाही हे कसले धर्मनिरपेक्षतेच्या आणि पुरोगामित्वाच्या गप्पा मारतात ?
निवडून आल्यावर आम्हाला गुमान खाऊ द्या म्हणून तुम्ही आम्हाला मत द्या हा कुठला खाक्या आहे ? आणि त्यासाठी भाजपचे भय ? ज्याला न मागता पाठिंबा दिला. ज्या पक्षात निम्मे  आमदार कॊंग्रेस आघाडीचे आहेत  त्य़ा पक्षाचे  भय आम्हालाच का ?
मेलेलं कोंबडं ज्याप्रमाणे आगीला भीत नाही त्याचप्रमाणे दलित आणि मुस्लीम आता भाजपच्या भीतीला भीत नाहीत. मुसलमानांना अतिरेकी ठरवणा-या पोलिसी कारवाया कुणी केल्या ? एक निरपराधांची पिढी जेलमधे कुणी सडवली ? श्रीकृष्ण आयोगाला कुणी केराची टोपली दाखवली ? मुंबई दंगली कुणी घडवल्या ? मराठवाडा दंगलीत सेनेला कुणी  फ्री हॅण्ड दिला ?
या प्रश्नांची उत्तरे आम्हाला मिळतील  काय ?
नसतील तर आघाडीचं एकतर्फी प्रेशर प्रकाश आंबेडकरांवर नकोय.
खरा प्रश्न असा हवा होता.
भारतातल्या सर्वात मोठ्या राज्यात कॉंग्रेसचे नेमके काय चाललेय ?
सर्वांचीच धर्मनिरपेक्षता  बाहेर  येईल या प्रश्नाच्या उत्तरात. 
(चाळिशीत असलेल्या पिढीचा प्रतिनिधी असल्याने भावनिकतेचे दोष आहेत. ते मान्य आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून मुद्दे दखलपात्र वाटले तर कॉंग्रेसची  कान उघाडणी फक्त तुम्हीच करू शकता म्हणून हा प्रपंच. इतरांकडून काडीची अपेक्षा नाही).
- लेखकांचे नाव माहीत नाही, सोशल मीडिया वरुन साभार. ज्यांचा कुनाचा हा लेख असेल त्यांचे आभार, त्यांनी ब्लॉग एडीटर शी संपर्क केला तर त्यांचे नाव लेखाखाली देता येईल.

Monday, 18 February 2019

ये भीड कहासे आती है ? - राजेंद्र पातोडे

ये भीड कहासे आती है ? - राजेंद्र पातोडे

आज उभ्या महाराष्ट्राला एकाच गहन प्रश्नाचे कोडे उकलत नाहीय आणि ते म्हणजे वंचीत बहुजन आघाडीच्या प्रत्येक सभेला रेकॉर्डब्रेक लाखोंची गर्दी कशी जमते?  जिथे सत्ताधारी आणि विरोधकांना पंचवीस-पन्नास हजार माणसे गोळा करायला घाम फुटतोय, तिथे बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेला सलग जमणारा लाखोंचा जनसागर येतोच कसा हा यक्ष प्रश्न सध्या देशातील मनुवाद्यांची झोप उडवीत आहे.बरं ह्या 'मास चा एकच क्लास आहे' असेही नाही.अगदी उच्च शिक्षित, गर्भ श्रीमंत, उद्योजक व्यापारी, वकील, प्राध्यापक, इंजिनीयर,आयटीयन्स पासून ते थेट कलावन्त,विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी - शेतमजूर ते अगदी सामान्य माणूस अगदी तृतीयपंथी देखील ह्या सभेला आवर्जून हजर असतात.प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस आणि गुप्तचर खातं देखील हैरान असतं. नेमका आकडा किती द्यायचा हा अंदाजच बांधता येत नाही.
कारण त्या त्या जिल्ह्यात आर्थिक परिस्थिती बेताचीच असलेले भारिप बहुजन महासंघ, वंचीत बहुजन आघाडीच्या घटक असलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते आहेत.त्यात कुणीही गडगंज संपत्तीचे मालक नाहीत.म्हणावी तशी कार्यकर्त्यांची कुमकही नाही. इतर राजकीय पक्षा प्रमाणे पुरविली जाणारी रसद नाही, कुणीही स्पॉन्सर नाही.कुठेही पावती पुस्तकं नाही, वर्गणी नाही.नियोजन आणि सभेची तयारी म्हणून विशेष काही दिसत नाही.राबणारे हात देखील लिमिटेड दिसतात.तरीदेखील सभेचे भले मोठे मैदानच बुक केले जाते.लोकवर्गणीतून उभा केलेला भव्य स्टेज आणि क्वालिटी साउंड सिस्टीम तसेच सभा लाईव्ह दिसावी म्हणून लावलेले स्क्रीन्स ह्या पलीकडे कोणताही तामझाम दिसत नाही.
वर्तमानपत्रात किंवा मीडियात जाहिराती नसतात.माणसं आणायला वाहनं व्यवस्था नसते, जेवणाची पाकीटं, बिसलेरी आणि मजुरी दिली जात नाही, मैदानात बसायला खुर्च्या नाहीत की रखरखत्या उन्हात डोक्यावर मंडप नाही.तरीही तौबा गर्दी होते.शहर पूर्णवेळ जाम झालेलं असते.महिला पुरुष  आणि युवक युवतींनी मैदानं ओव्हरफ्लो होतात.दुपारी २ पासून मैदान भरायला सुरुवात होते ते थेट रात्री सभा संपेपर्यंत कायम असते.प्रत्येक सभेला हा आकडा वाढतच आहे.त्या मुळे संघ भाजपासहीत काँग्रेस-राष्ट्रवादीला धडकी भरली आहे.पूर्वी दखल न घेणा-या मिडीयाला आता ह्या सभा लाईव्ह करावं लागताहेत, कव्हर करावं लागते.सम्पूर्ण महाराष्ट्रात हाच पॅटर्न कायम झाला आहे.राज्यात सलग होत असलेल्या वंचीत बहुजन आघाडीच्या सभांना जनप्रतिसादाचा आलेख वाढत गेलेला दिसतो.नव्या इतिहासाची नांदी ठरणा-या सभांच्या यशाचे गमक काय असावे? हा प्रश्न एकदाच उलगडून दाखवावा म्हणून केलेला लेखन प्रपंच.
इतिहासात प्रथमच 'वंचित' ह्या शब्दाची व्याख्या वंचीत समूहाच्या लक्षात आली आहे.आणि ह्या आत्मभानातूनच अनेक लहान लहान जाती समूहांनी आपला आवाज बुलंद करण्यासाठी वंचीत बहुजन आघाडीत ऍड बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची कास धरली आहे.त्यामुळे आजवर सत्ताधारी म्हणून वावरलेल्या सर्व पक्षांनी आपला ‘वोटींग मशीन’ म्हणून कायम कसा वापरच केला आहे हे मांडलं जाऊ लागले आहे. ७० वर्षात आम्ही सत्ता आणि संपत्ती, संधी वंचित कसे राहिलो हे अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, भटके विमूक्त, अल्पसंख्यांक समूहाला ह्या सभेच्या माध्यमातून पटायला लागले आहे.त्यातून दररोज अगदी लहान लहान समूहाच्या संघटना, नेते, कार्यकर्ते ह्या लोकजागरात सहभागी व्हायला लागलेत.कुठलंही आर्थिकच पाठबळ नसलं तरी आपण हा लोकलढा उभा करू शकतो.यशस्वी करू शकतो, हे सभेगणिक सिद्ध व्हायला लागल्याने.कार्यकर्ते आणि पदाधिका-यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.त्या मुळे ह्या सभा वंचीतांचा संवाद,वंचीतांचा हुंकार,वंचीत एल्गार, आणि वंचितांचा सत्ता संपादन निर्धार ह्या वेगवेगळ्या टायटलखाली गाजायला लागल्यात.
सभेच्या सुरुवातीला ऍड बाळासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर अससोद्दीन ओवेसी ह्यांचेसह नेते मंडळींची एंट्री हा ग्रँड इव्हेंट ठरतो.पांढ-या एसयूव्ही मध्ये असलेले बाळासाहेब,त्यांचे पाठोपाठ आलेला गाड्यांचा काफिला, त्याला एस्कॉर्ट करणारे काळ्या कपड्यातील सोशल कमांडो, गाड्यापाठी उस्फुर्तपणे ध्वज घेऊन धावणारे तरुण आणि स्टेजवरून दिल्या जाणा-या घोषणांना तेवढाच बुलंद प्रतिसाद देणारा लाखोंचा समूह यामुळे सभेत जोश भरतो.अगदी रणमैदानावरील रणभेरी आणि युद्धाची सुरुवात वाटावी असा तो क्षण असतो.स्टेजवर बसलेल्या नेत्यांना बांधलेले विविध रंगांचे फेटे हे तमाम वंचितांचे सामाजिक प्रतिनिधीत्व करीत एक विशिष्ठ रंग आणि धर्माची मक्तेदारी आम्ही मोडून काढलीय हे दिमाखाने सांगत असतो. त्या स्टेजकडे पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील आणि संकल्पनेतील धर्मनिरपेक्ष भारत आणि रिपब्लीकन पक्ष प्रत्यक्षात उतरल्याचे दिसते.           
त्या नंतर सभेला साज चढतो तो सभेतील वक्त्यांच्या पोटतिडकीने मांडलेल्या अभ्यासू व जोशपूर्ण भाषणांनी.त्यात देश, संविधान आणि सर्वहारा समूहाचा उत्थानाची भलावण केली जाते.सत्ता हस्तगत करण्याचा निर्धार असतो.येथल्या व्यवस्थेला आपला वाटा मागण्याचा इशारा असतो.वंचीताच्या विविध घटकातील वक्ते त्यांच्या समूहाच्या वेदना मांडताना उपस्थितांच्या काळजाचा वेध घेत असतात.आमदार इम्तियाज जलील आणि खासदार ओवेसी ह्यांची उर्दू हिंदीतील फटकेबाजीने सभेचा नूर बदलून जातो.
सरतेशेवटी एड बाळासाहेब आंबेडकर आपली भूमिका मांडतात.अत्यंत संयमितपणे,अभ्यासपूर्ण भाषणातून आपण हा वंचितांचा लढा का उभा केलाय, तो कसा यशस्वी होणार, त्यासाठी काय पथ्य पाळली पाहिजे, सत्ताधारी होणे म्हणजे काय आणि सत्ता कशी मिळवायची हा मूलमंत्र ते सांगतात.सोबतच भाजप आणि संघ हा कसा विषमतावादी आहे, सनातनी आहे, देशातील मनुवादी व्यवस्थेने देशातील संविधान आणि संवैधानिक व्यवस्था कशी धोक्यात आली आहे.२०१९ लढा जिंकल्याशिवाय देशातील मनुवाद पराभूत होऊ शकत नाही.ही अभ्यासपूर्ण मांडणी करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे खरा चेहरा देखील जनतेसमोर आणतात.
बाळासाहेब बोलायला उभे राहिले की प्रचंड घोषणा व आतिषबाजी होऊन पिनड्रॉप सायलेन्स होतो.जसजसं भाषण पुढे जाते तसे टाळ्यांचा व घॊषणाचा आवाज व प्रतिसाद अधिक वाढतो.ते जेव्हा मोदी आणि संघाला आव्हान देतात तेंव्हा जनतेने अख्ख मैदान डोक्यावर घेतलेलं असते."स्वतःचा मिडीया स्वतः उभा करा.माझा कार्यकर्ताच माझा मिडीया आहे".ह्या त्यांचे आवाहनाला अनुसरून लाखोचा समूह स्वतः तल्लीन होऊन  ऐकत असताना बाळासाहेबांचा मिडीया म्हणून आपल्या मोबाईलवर हे भाषण लाईव्ह करीत असतात.सोबत प्रबुद्ध भारत ची टीम देखील हे सर्व जनतेपर्यंत पोहचवीत असते.त्यातून इतर जिल्ह्यातील वंचीत समूह ऊर्जावंत होत जातो.
आपल्या जिल्ह्यात वंचीत बहुजन आघाडीची सभा कधी आहे, ह्याची माहिती होताच त्या त्या जिल्ह्यातील सामाजिक संघटना भारिप बमसं,एमआयएम, वंचीतचे पदाधिकारी कार्यकर्ते आम्हीही सत्ताधारी होणार ह्या निर्धाराने कामाला लागतात.त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळतो तो महाराष्ट्रातील जनतेचा.हजारो वर्षे माणूसपण नाकारलेल्या आणि व्यस्थेने गुलाम केलेल्या व्यवस्थेच्या मुळावर घाव घालण्याचा निर्धार घेऊन वंचीत समूह सहभागी होत चाललेत.त्यांनी आता ऐक्य, युती, आघाडी ह्या शब्दांना कायमची मूठमाती दिली आहे.'बहुजन सारे एक होऊ, सत्ता आपल्या हाती घेऊ' या निर्धाराने पेटून उठलेल्या समूहांनी ही आरपारची लढाई लढण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात आपली ताकद वंचीत बहुजन आघाडीच्या पाठीशी उभी केल्याने ह्या विक्रमी सभा सलगपणे यशस्वी होत आहेत.लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनीज बुक मध्ये ह्या सलग सुरु असलेल्या लाखोंच्या सभांची नोंद व्हावी असा प्रयत्न तर होणारच आहे.सोबतच देशाची सत्ता वंचितांची असावी हाच अंतिम लढा यशस्वी करण्याची लोकभावना बाळासाहेबांनी वंचीत समूहात पेरली.त्याच भावनेचे मूर्त रूप म्हणजे लाखोंच्या सभा आहेत.शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार, एड. बाळासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व,वंचीत समूहाची साथ, सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य जनतेचे पाठबळ हेच सर्व ऐतिहासिक सभाच्या विक्रमी उपस्थितीच्या यशाचे गमक आहे.
ह्याचे रूपांतर वंचीत बहुजनांच्या सत्तेत झाल्या शिवाय राहणार नाही हे मात्र निर्विवाद सत्य आहे.
@ राजेंद्र पातोडे
  अकोला
९४२२१६०१०१
(लेखक भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते आहेत)

Friday, 15 February 2019

लोकशाहीचे सामाजिकरण होतं आहे....!

लोकशाहीचे सामाजिकरण होतं आहे....!
: भास्कर भोजने
    गेल्या सत्तर वर्षात इथल्या प्रस्थापित, सत्ताधारी पक्षांनी छोट्या छोट्या जातींची मते घेतलीत मात्र या समाजातील सामान्य आणि गुणवंत माणसाला संसदेत पोहचू दिले नाही...!
    इथल्या कॉंग्रेस पक्षाने घराणेशाही पोसली आणि मोठ्या जातीतील जातदांडगे उमेदवार बनवून राजकारणात जातीयवाद मजबूत केला...!
    ज्यांना ज्यांना सत्ता हवी होती त्यांनी तोच पायंडा कायम ठेवतं जातीयवाद आणि घराणेशाही अधिक मजबूत केली...!
   त्याचा परिणाम असा झाला की, छोट्या छोट्या जातींची माणसे कितीही लायक असली तरीही सत्तर वर्षात अद्याप संसदेत पोहचले नाहीत...!
   ही लोकशाहीची थट्टा नव्हे काय..??
   आता लोकशाहीचे सामाजिकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे...!
    लहानातील लहान जातीचा प्रतिनिधी हा, संसदेत आणि विधानभवनात पोहचला पाहिजे ही भुमिका वंचित बहूजन आघाडीचे संयोजक अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली आहे...!
लोकसभा  २०१९ साठी वंचित बहूजन आघाडीचे आता पर्यंत १५ उमेदवार जाहीर केले आहेत,त्यांची वर्गवारी बघा...!
आजपर्यंत अशा छोट्या छोट्या जातींचे आणि सामान्य कुटुंबातील व्यक्तींना कोणत्याच पक्षाने उमेदवारी दिली नाही...!
१) बुलढाणा:-श्री.बळीराम सिरस्कार ......  (माळी.)
२) अमरावती:- श्री.गुणवंत देवपारे.
                          (बौद्ध.)
३) नांदेड:-डाॅ.यशपाल भिंगे.
                   ( धनगर.)
४) यवतमाळ वाशीम:-डाॅ.प्रविण पवार .....          ( बंजारा.)
५) लातूर:- श्री.रामभाऊ गारकर.
                      (मातंग.)
६) माढा:-अॅड.विजयराव मोरे.
                (धनगर)
७) सातारा:-श्री.सहदेव अप्पा अहिवळे...    (होलार.)
८) सांगली:-जयसिंग ऊर्फ तात्या शेंडगे.            (धनगर.)
९) पुणे:- श्री.विठ्ठल लक्ष्मण सातव.
                      (माळी.)
१०) बारामती:-श्री.नवनाथ पडवळकर.         (धनगर.)
११) हातकणंगले:-श्री.ओलेमा.
                          (मुस्लिम.)
१२) रावेर:- श्री.नितीन कांडेलकर.
                         (कोळी.)
१३) धुळे, मालेगाव:-इंजि.काश्मी मो.हाशमी.              (मुस्लिम.)
१४) चिमुर:- डॉ रमेश गजबे.
                       (माना,गोवारी,)
१५) वर्धा:- अॅड धनराज वंजारी.
                     (तेली.)
असे उमेदवार सामान्य कुटुंबातील परंतु ऊच्चविद्या विभुषीत आणि कुठलीही घराणेशाहीची पार्श्र्वभूमी नसलेले,इतर पक्ष देणार नाहीत...!
  ही लोकशाहीच्या सामाजिकरणाची सुरुवात आहे...!
  जयभीम.

Wednesday, 13 February 2019

कॉंग्रेस पक्ष संविधानवादी आहे का..??

कॉंग्रेस पक्ष संविधानवादी आहे का..??
: भास्कर भोजने
       कॉंग्रेस हा पक्ष ब्राम्हण्यवादी आहे अशी धारणा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची होती.,म्हणूनचं बाबासाहेब आंबेडकर कॉंग्रेस पक्षाला "जळतं घर म्हणायचे " ही धारणा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुभवातून निर्माण झाली होती...!
       कॉंग्रेस पक्षाने गेल्या सत्तर वर्षात अधिकाधिक काळ,देशाची आणि प्रांताची सत्ता आपल्या अंकित ठेवली आहे...!
      ज्या संविधानावर देशाचा कार्यभार चालतो त्या संविधानातील पहिली घटना दुरुस्ती पं.जवाहरलाल नेहरू यांनी १९५७ साली केली, आणि पहिली घटना दुरुस्ती ही आरक्षणाच्या विषयावर करण्यात आली, तेव्हा पासून तर आजपर्यंत राज्यघटनेत १२४ वेळा घटना दुरुस्ती केल्या गेली...!
      संविधानाचा सन्मान करण्याऐवजी स्वहितासाठी, संविधान राबविण्यात कॉंग्रेस पक्षाने धन्यता मानली आहे...!
   कॉंग्रेस पक्षाच्या व्यतिरिक्त इतर पक्षांचे राज्यसरकार घालवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने ३५६कलमाचा कित्येकदा गैरवापर केला आहे, आणि संविधानाचा पायदळी तुडवीले आहे...!
     १९७५ साली देशात आणीबाणी लादून कॉंग्रेस पक्षाने संविधानाचे महत्व झुगारुन अतिरेक केला आहे...!
       कॉंग्रेस पक्षाच्या राजवटीत " राष्ट्रपती " हे पद रबरी स्टॅम्प आहे अशी छबी तयार करण्यात आली...!
      कॉंग्रेस पक्षाच्या कारकिर्दीतच "निवडणूक आयुक्त " यांचे अधिकार कुणालाही माहित नव्हते हे वास्तव आहे,१९९० च्या अगोदर निवडणुकीतील प्रचार हा रात्रीचे बारा वाजेपर्यंत चाले, निवडणूक काळात सरकार अर्थात कॉंग्रेस पक्ष कोणतीही घोषणा करुन जनतेला आमिष देतं असतं आणि निवडणूका जिंकतं असतं.ही सर्रास संविधानाची पायमल्ली होती...!
   १९८९ ला टि.एन शेषण निवडणूक आयुक्त झाले आणि निवडणूक आयोगाचे अधिकार जनतेला कळू लागले.यापुर्वी कॉंग्रेस पक्षाने संविधानाची पायमल्ली केली आहे...!
       १९७३साली कॉंग्रेस पक्षाने गरीबी हटाव चा नारा दिला मात्र अद्याप गरीबी हटवू शकले नाही ,त्या ऊलटं भांडवली व्यवस्था ऊभी करण्यात कुठलीही कसर सोडली नाही, हा एक प्रकारे संविधान द्रोह नाही का..??
     संविधानाचा  उघडं ऊघडं विरोध करणारे आरएसएस आणि भाजपाचे मंत्री संविधान बदलण्याची भाषा करीत असतांना कॉंग्रेस पक्षाने कुठलीही भुमिका घेतली नाही,असे का.??
     संविधानाच्या प्रति दिल्ली येथील जतंरमंतरवर जाळण्यात आल्या तेव्हा कॉंग्रेस पक्षाची भूमिका काय...??
     केवळ निवडणुका आल्या की, संविधान बचाव भुमिका घ्यायची म्हणजे आपणं संविधानवादी आहोत अशी प्रतिमा तयार होईल या भ्रमात आता कॉंग्रेस पक्षाने राहू नये...!
    कॉंग्रेस पक्ष खरेच संविधानवादी असेल तर आता कॉंग्रेस पक्षाला ठोस भूमिका घ्यावी लागेल...!
    बोलायचं एक आणि वागायचे भलतेचं ही लबाडी आत्ता जनतेच्या लक्षात आली आहे, म्हणून लेखी स्वरूपात कॉंग्रेस पक्षाने भुमिका घेतली पाहिजे की, आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी आम्ही काय करु हा आराखडा कॉंग्रेस पक्षाने दिला पाहिजे...!
    जर अशाप्रकारचा आराखडा कॉंग्रेस पक्षाने दिला नाही तर कॉंग्रेस हा पक्ष संविधानवादी नाही हेही सिद्ध होईल...!
    आता भारतीय संविधान धोक्यात आहे, अशावेळी संविधानवादी आणि संविधान विरोधक यांच्यामधील भेदरेषा स्पष्ट असली पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे...!
    अशा आणिबाणीच्या काळात जर ढोंगी पक्षाच्या,तकलादू आणि फसव्या भुमिकेवर विश्र्वास ठेवला तर संविधान बचाव करताचं येणार नाही म्हणूनच कॉंग्रेस पक्षाने आपणं सच्चे संविधानवादी आहोत हे प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केले पाहिजे ही काळाची गरज आहे...!
  जयभीम.

Friday, 8 February 2019

वंचित वडार समजला प्रकाश आंबेडकरच न्याय देऊ शकतात!
- प्रा.प्रमोद भुंबे.
वडार समाज हा स्वातंत्र्याचा 70वर्षा नंतरही समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही. भटक्या विमुक्त जमाती पैकी असणारा हा समाज अत्यंत मागासलले जीवन जगताना दिसून येतो. प्राचीन कळात निर्माण केलेले गड किल्ले , हिन्दु,जैन ,बौद्ध यांच्या लेण्याचे कमे याच वडार समजणे केल्याचे काही इतिहासकार संगतात. कायद्याने गुन्हेगरना खाडी फोडण्याची सजा मिळते असे सांगितले  जाते पण कसलाही गुन्हा न करता या समजला जन्मजात खडी फोडण्याची सजा भोगावी लगते.
       कॉंग्रेस , भाजप, राष्ट्रवादी किवा अन्य कोणताही पक्ष या समजला न्याय देऊ शकला नाही. राज्य पातळीवर लिडरशिप उभी करु शकला नाही. समाजाची महाराष्ट्रातील संख्या कमी असल्याने मतदार म्हणुनही त्यना ग्राह्य धरले जात नाही. 1991च्या रिपोर्ट  नुसार त्यांची संख्या 4.35लाख एवढी आहे . ती अता किमान तिप्पट वाढली असेल. पण चांगली लिडरशिप उभी न राहिल्याने अजुनही सामजिक , आर्थिक आणि शैक्षणिक बाबतीत इतरां पेक्षा कोसो मैल मागे आहे. राजकारणात या समाजाची बाजू मांडणारा कोणीच नसल्याने आजपर्यंत साधी दखलही कोनी घेतली नाही. या समाजातील व्यसनाधिनता ,बेरोजगारी , पराकोटीचे दारिद्र्य ही मुळ समस्या आहे. शिक्षणाची परस्थीती ही तशीच आहे. बोटावर मोजण्या एवढे लोक उच्चशिक्षण घेतलेले अढळतील.
         इतिहासात मोठे राजवाड्यांचे, लेण्याचे उत्कृष्ठ काम करणार्या वडार समजला अता केवळ दगडच्या खानित, रस्त्यावर खडी फोडणे , बिगारी काम करावे लगते. ज्यांच्या पिढ्यांनी एतिहसिक वारसे उभे केले त्यांच्या त्याना आज आपली कला जोपसतना मोठी कसरत करावी लगते. आजही आनेक वडार अतिशय सुबक मुर्त्या घडवतात . पण आधुनीक प्रशिक्षण नसल्याने ती कला फक्त रस्त्याच्या कडेला उघड्या जागेवर आपले भविष्य (मुले )धुळीत माखताना दिसतात.
      या समजला गरज आहे ती चांगल्या नेतृत्वाची जी त्यांच्या वेदना समजून घेईल आणि संधीची दारे खुली करेल. अशा समाजाच्या भावना समजून घेण्याची आणि न्याय देण्याची भुमिका फक्त प्रकाश आंबेडकर च घेऊ शकतात. अकोला जिल्ह्यात लोकशाहीच्या    समजिकरणचा जो प्रयोग प्रकाश आंबेडकर यांनी राबवला त्यात कविताताई ढाळे या पथर्वट वडार समाजाच्या स्त्री ला पंचायत समिती मतदार संघात केवल 100मते असताना निवडून आणले आणि पंचायत समितीचे उपसभापती केले. हाच विचार घेऊन वंचित समूहाला लोकसभा आणि विधानसभेत पाठवण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यानी केली आहे.
         आजच्या परस्थितीत वडार समाजातील अनेक तरुणाकडे शिल्पकलेसारखी कला आहे पण ती चांगल्या प्रशिक्षणा अभावी व आधुनीक तंत्रज्ञान अभावी ती दबून गेली आहे. जर ते प्रशिक्षण दिले गेले तर अनेकाना चांगला रोजगार मिळू शकतो. त्याच बरोबर मोफत शिक्षण, वेळचे वेळी शिष्यवृत्ती, उद्योग धंद्यासाठी कर्ज मिळायला सुरुवात झाल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढून ते समाजाच्या मुख्यप्रवहत येतील.
       गेल्या 70वर्षाचा विचार केल्यास हे केवळ  प्रकाश आंबेडकरच करु शकतात.

'वंचित बहुजनांच्या विकासासाठी,वंचित बहुजन आघाडी'

'विकासा ची नवी दिशा,प्रकाश आंबेडकर एकच आशा'

प्रा. प्रमोद भुंबे
फुले आंबेडकर विद्वत सभा,धुळे.

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...