Tuesday, 26 March 2019

वंचितांना विनातारण कर्ज - सुमित वासनिक

वंचितांना विनातारण कर्ज - सुमित वासनिक

केस कापणे हा नाभीकांचा व्यवसाय पण आज भारतात केस कापणाऱ्या ज्या सर्वात मोठ्या आणि महागड्या सलून आहेत त्यामध्ये एकही नाभिकाची सलून नाही.

चामड्याच्या आणि चपलांचा व्यवसाय करणाऱ्या चांभार समाजातील एकाही व्यक्तीचा मोठा चामड्याच्या व्यवसाय नाही, चप्पल आणि बूट बनविणाऱ्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये एकही कंपनी चांभाराची नाही.

आपल्या हाताच्या जोराने लोखंडाला आकार देऊन आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या लोहार समाजातील एकही व्यक्ती लोखंडाच्या व्यवसायात पुढे येऊ दिला गेलेला नाही.

वंचित बहुजन असलेल्या असंख्य अलुतेदार बलुतेदार जातींवर मनूच्या व्यवस्थेने जन्मजात काही कामे लादली ,त्यांना शिक्षणापासून दूर ठेवले. त्यासर्व जातींमधील लोक आपल्यावर लादण्यात आलेल्या  कामात निपुण झाली आहेत. आपल्या अंगी तयार झालेल्या या गुणांमुळे काही लोकांची कामे करून या जातींमधील लोक आपला उदरनिर्वाह चालवायचे. पण या जाती करीत असलेल्या कामांचे जेंव्हा व्यावसायिकरण झाले तेंव्हा या जातींना त्यांच्याच कामात पुढे जाण्यापासून थांबवण्यात आले. वर नाभिक, चांभार आणि लोहार जातींची उदाहरणे दिली आहेत त्यावरून आपण हे समजू शकतो. ज्यावेळी या जाती करीत असलेल्या कामांना व्यावसायिक रूप आले तेंव्हा सवर्ण जातींमधील लोकांनी या कामांची मोठमोठी उद्योगं सुरू केली आणि त्यातून भरमसाठ कमाई केलि. 

इथे अनेकांना हा प्रश्न पडला असेल की अलुतेदार, बलुतेदार करीत असलेले काम येत नसतांनाही सवर्ण या कामांचे मोठमोठे उद्योग कसे उभे करू शकले? आणि ज्यांची ही कामे होती त्या वंचित जाती मागे का पडल्या? या वंचित अलुतेदार-बलुतेदार जाती म्हणजे गरीब लोक, यांच्याकडे आपला व्यवसाय वाढवायला पैसा नाही, भांडवल उभे करायला पैसे नाही. बँकेकडे तारण ठेवायला मालमत्ता नाही , विनातारण बँक कर्ज देत नाही. या कारणामुळे हा वंचित समाज व्ययसायात पुढे येऊ शकलेला नाही. त्याचवेळी हजारो वर्षे सत्ता, संपत्ती आणि शिक्षणावर ठाण मांडुन बसलेल्या सवर्णांनी वंचितांचा वाटा बळकावून जमा केलेल्या मालमत्तेच्या जोरावर मोठमोठे व्ययसाय उभारले, यासाठी बँकांनी यांना हवे तेवढे कर्ज सुद्धा दिले.

या वंचित अलुतेदार-बलुतेदार जातींनाही जर व्यवसाय वाढविण्यासाठी कर्ज मिळाले असतेतर आज या जातींमधील व्यक्ती सुद्धा नावाजलेल्या उद्योगपती तयार करू शकल्या असत्या पण या देशातील प्रस्थापित काँग्रेस आणि भाजप सारख्या पक्षांनी हे कधीही होऊ दिले नाही, या प्रस्थापित पक्षांनी सवर्णांचे हित जोपासण्यासाठी वंचितांवर केलेला हा सर्वात मोठा अन्याय आहे. व्ययसायात पुढे जाण्यात येणारी ही अडचण ओळखून ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास सर्व वंचित जातीसमूहांना व्यवसायासाठी विनातारण कर्ज देण्यात येईल असे जाहीर केले आहे.

मित्रानो आपले प्रश्न ओळखा, ज्या गोष्टी आपला विकास होण्यापासून थांबवत आहेत त्यांच्या विरोधात लढणाऱ्या ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून लढा. लक्षात ठेवा संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही!

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...