Thursday, 27 December 2018

राजकीय लबाड्या आणि समाज मनं...!

राजकीय लबाड्या आणि समाज मनं...!
- भास्कर भोजने

        आपणं सांसदीय लोकशाही स्विकारुन ऊणेपुरे सत्तर वर्षे होतं आहेत...!
    सांसदीय लोकशाही मध्यें कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली आहे...!
   सांसदीय लोकशाही ही शेवटच्या घटकांपर्यंत पोहचायला पाहिजे अशी अपेक्षा आहे...!
   सांसदीय लोकशाही मधील कल्याणकारी राज्याची संकल्पना सत्ताधारी वर्गाने संपूर्ण धुळीस मिळविली आहे...!
   कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचा प्रयत्न म्हणजे उपेक्षित वर्गाला आरक्षण देणे होय...!
    ज्यांना सामाजिक कारणाने संधी नाकारल्या जाते त्यांना संधी प्रदान करणे म्हणजे आरक्षण होय...!
   म्हणूनचं त्याला"प्रतिनिधित्व "म्हटले जाते...!
   आरक्षण या विषयाला सत्ताधारी वर्गाने संपूर्णरित्या चेष्टेचा विषय बनविले आहे...!
    राज्यघटनेत तरतूद असुनही ओबीसी वर्गाला आरक्षण मिळविण्यासाठी तब्बल ४० वर्षे संघर्ष करावा लागला...!
  आणि ओबीसी वर्गाला मिळालेल्या आरक्षणातं किर्रीमिलेअरची अट घालुन खोडा घातला गेला...!
    धनगर समाजाचे आरक्षणाच्या संदर्भात केवळ "धनगर "आणि"धनगड "एवढाचं शब्दबदल आहे,तो शब्दभेद गेली पन्नास वर्षे झाली आहेत मिटतं नाही...!
     धोबी समाज हा मध्यप्रदेशात एस.सी.प्रवर्गात आहे आणि महाराष्ट्रात ओबीसी वर्गात आहे...!
धोबी समाजाला एस.सी.चे आरक्षण पाहिजे,हा शहानिशा करण्याचा प्रकार आहे, परंतु ती शहानिशा गेली पन्नास वर्षे झाली आहेत होतं नाही...!
    आदिवासी बांधवांच्या आरक्षणाच्या संदर्भात खरे आदिवासी आणि बोगस आदिवासी असा वाद निर्माण केल्या गेला आहे...!
   या वादात ८२ हजार कर्मचारी वर्गाचा जीव टांगणीला लागला आहे परंतु निवड करण्यात येतं नाही.भिजतं घोंगड ठेवायचं आणि सत्तेची गणिते मांडायची असा खेळ चालला आहे....!
मुस्लिम समाजाला आरक्षण देतो अशी भुल देऊन भरीस पाडलं जातं आहे, तसेच मराठा समाजाला सुद्धा आरक्षणाचं गाजरं दाखवून,झुंजविलं जातं आहे.
   संपुर्ण समाज मनं अस्वस्थ ठेऊन सत्ताधारी आजपर्यंत राज्य करीत आले आहेत...!
  प्रत्येक उपेक्षित घटकाला सत्ताधारी आणि प्रस्थापित वर्गाने झुंजवतं ठेऊन आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे...!
   हा खेळ गेली सत्तर वर्षे जनता ऊघड्या डोळ्याने पाहते आहे...!
   सत्ताधारी वर्गाने कल्याणकारी राज्य तर राबविले नाहीचं परंतु लबाडी वर लबाडी करुन समाजाला ठगविले आहे...!
   सांसदीय लोकशाही ही शेवटच्या घटकांपर्यंत पोहचायला पाहिजे होती परंतु याच सत्ताधारी वर्गाने घराणेशाही निर्माण करुन सत्ता काही कुटुंबातंच बंदिस्त केली आहे...!
सत्तेचे विकेंद्रीकरण होऊ दिले नाही...!
महाराष्ट्रात केवळ १६९ घराणे गेली सत्तर वर्षे राज्य करीत आहेत..!
आलटुन पालटून सत्ता उपभोगण्याचा फंडा त्यांनी व्यवस्थित राबविला आहे...!
  कॉंग्रेस सत्तेबाहेर गेली की,सेना भाजप आणि सेना भाजप बाहेर गेली की, कॉंग्रेस सत्तेत कशी येईल याची तजविज सत्ताधारी करीत असतात...!
सत्तर वर्षाचा कालखंड हा काही कमी नाही म्हणून तुम्ही सर्वकाळ सर्वांना मुर्ख बनवू शकत नाही...!
   आता जनतेच्या ही लबाडी लक्षात आली आहे...!
  कॉंग्रेस असो की, भाजप हे एकाचं नाण्याच्या दोन बाजू आहेत हे जनतेला कळून चुकले आहे...!
     म्हणून आता समाजात मोठा बदल जाणवतो आहे...!
धनगर समाज आपल्या आरक्षणासाठी कुणावरही अवलंबून राहण्यापेक्षा स्वत: सत्ताधारी होऊ इश्चितो...!
   आदिवासी आपल्या आरक्षणाचा प्रश्न स्वत:च सत्तेत बसुन सोडवू इश्चितो...!
लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता सत्ताधारी झाल्याशिवाय मिळविता येणारं नाही हे कळून चुकले आहे म्हणून लिंगायत सत्ताधारी होण्यासाठी प्रयत्नशिल झाला आहे...!
मराठा समाजातील जो घटक सत्ताधारी आहे तो केवळ मोजक्या घराण्यातील आहे, सामान्य मराठा माणसाला जातीसोबत माती खाण्याची शपथं देऊन थापाड्या घराणेशाहीच्या पोशिंद्यांनी मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे, म्हणून संभाजी ब्रिगेड सारखे संघटन राजकारणात ऊतरुन प्रतिनिधित्व मागते आहे,सकल मराठा नांवाने मराठा समाज प्रतिनिधित्व मागते आहे...!
    महाराष्ट्रातील समाज मनं जे सत्ताधारी वर्गाने अस्वस्थ केले होते तेचं समाजमनं सत्तेसाठी कार्यरत झाले आहे ही मोठी उपलब्धी आहे...!
म्हणून आता महाराष्ट्रात मोठा बदल होणारं आहे...!
सत्ताधारी कॉंग्रेस असो की भाजप यांना आता संधी नाही...!
  घराणेशाही पोसणारे कुणीही असो त्यांनाही संधी नाही...!
    नवा पर्याय समाजाला हवा आहे आणि तोही वंचित असला पाहिजे हा निकष आहे....!
   जयभीम.
-भास्कर भोजने.

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...