Tuesday, 25 December 2018

अशोक चव्हाणांचा वैयक्तिक स्वार्थ व कॉंग्रेसची अडचन.

अशोक चव्हाणांचा वैयक्तिक स्वार्थ व कॉंग्रेसची अडचन.
- मनोज काळे, ठाणे.
मित्रांनों, भाजपा व आरएसएस विरुद्ध देशभरात मागील साडेचार वर्ष एकमेव बाळासाहेब आंबेडकरांनी रान उठवले आहे, बाकी कॉंग्रेससह सर्वच विरोधक शांतपने पहात बसले होते, बाळासाहेबांनी अखंडपने अविरत भाजप च्या सर्व हलचालींवर लक्ष ठेवुन त्यावर नियंत्रन मिळवण्यासाठी आवाज बुलंद केला आहे हे सर्वांनाच माहीत आहे, निवडणुका जवळ आल्यावरच जनतेचे प्रश्न रेटण्याचा भंपकपना आंबेडकरांमध्ये नाही हे सर्व भारत देशाने पाहीले. इव्हिएम बंदीसाठी मोर्चा, इव्हिएम चे प्रतिकात्मक दहन, नोटबंदी घोटाळा, राफेल घोटाळा, रोहीत वेमुला हत्या, झुंडशाही या सर्व प्रश्नांवर परखड मत मांडणारे एकमेव बाळासाहेबच होते, आर एस एस कडील अवैध शस्त्रसाठा जप्त करावा व होऊ घातलेल्या दंगली रोखाव्या यासाठी जनतेचा रेटा वाढवुन या देशावर उपकार करणारेही एकमेव बाळासाहेब आंबेडकरच आहेत, सत्तर वर्ष ज्या भारतीय नागरिकांना किंवा समाजांना राजकीय प्रतिनिधित्व मिळाले नाही त्यांना सत्तेत बसवण्याचे, लोकशाही तळागाळापर्यंत पोचऊन लोकशाहीला यशस्वी करण्यासाठी झटणारे एकमेव बाळासाहेबच...
हे सर्व पाहुन, बाळासाहेबांची स्वच्छ व निस्वार्थी भुमिका हेरुन सर्व आदिवासी, भटके विमुक्त, छोटे ओबीसी, आलुतेदार बलुतेदार, मातंग, मुस्लिम, धनगर व इतर वंचित घटकांनी समाजांचे नेतृत्व बाळासाहेबांवर सोपवले आहे, कॉंग्रेस पेक्षा जास्त ताकद आज वंचित बहुजन आघाडी कडे आहे. तरीही फक्त हिटलरवादी हुकुमशाही व संविधानाच्या शत्रुंना सत्तेपासुन रोखण्यासाठी बाळासाहॆबांनी कॉंग्रेस सोबत युती करुन राजकीय लढा द्यायचा निर्णय केला व कॉंग्रेस कडे त्या बारा जागा मागितल्या ज्या जागा कॉंग्रेस मागील तीन निवडणुकात सतत हरत आले आहेत, त्या जागा देऩे कॉंग्रेस ला का कठीन जात आहे?
कॉंग्रेस ज्या जागा निवडुण आणु शकत नाही त्या जागा वंचित बहुजन आघाडी निश्चितपने जिंकेल हे कॉंग्रेसलाही माहीत आहे पन त्यांना तिसरा पर्याय नको आहे, त्यांना आंबेडकरी नेतृत्वाची ताकद वाढलेले नको आहे, गांधी घराण्यापुढे लोटांगन घालणार्यांना आंबेडकर नावाचा नेता नको आहे हे यातुन अधोरेखित होते.
एमआयएम ला अशोक चव्हाणांकडुन इतका कट्टर विरोध म्हणजे स्वतःची नांदेड ची राजकीय हुकुमत जपण्याच्या स्वार्था पलिकडे काहीही नाही, एमआयएम व भारिप बहुजन महासंघ एकजिवाने एकत्र आले तर नांदेड मधुन अशोक चव्हाणांचे दुकान कायमचे बंद होइल व त्यांना महाराष्ट्रात दुसरे कुठुन निवडणुक लढुन जिंकुन येणे अशक्याहुन अशक्य आहे, फक्त या एका स्वार्थासाठी अशोक चव्हाण कॉंग्रेस पक्षालाच आज अडचनित आनत आहेत, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे असतानाही अशोक चव्हाणांची लुडबुड व एमआयएम ला भारिप ने सोडावे हा हट्ट त्यांच्या वैयक्तिक राजकिय अस्तित्व टिकवण्यासाठीचा केविलवाना प्रयत्न आहे हे स्पष्टपने दिसते.
अशोकराव कॉंग्रेसपेक्षा मोठे बनायचा तुमचा प्रयत्न भाजप चा पथ्यावर पडेल असे तुम्हाला वाटत नाही का?
आदर्श घोटाळ्यातुन सुटलात पन जनतेच्या रेट्यापुढे तुमचा हा रडीचा डाव चालनार नाही, आज तुमच्या कॉंग्रेस पेक्षा वंचित बहुजन आघाडी मोठी ताकद आहे हे सत्य मान्य करा व बाळासाहेबांना शरन जा.
काल एका चर्चेत कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे प्रवक्ते ( वाघमारे व गजभिये)  बाळासाहेबांना वारंवार "प्रकाश आंबेडकर आमचे दैवत आहेत“ असा उल्लेख करताना पाहीले, आता बाळासाहेबांना दैवत म्हणता तर त्यांना शरन यायची लाज बाळगु नका.
आजवर बाळासाहेबांशी किंवा इतर रिपाई नेत्यांशी जसे वागत आलात तसे आता वागायची घोडचुक करु नका, तोंडघुशी पडाल, आता तुम्ही पैशाने वंचितांचे मत विकत घेऊ शकनार नाहीत, आमचे मतदार तुमचे पैसे तर घेतील पन मतदान वंचित बहुजन आघाडीलाच करतील हे लक्षात ठेवा.
भाजपाला हरवायचे आहे, भाजप संविधान विरोधी आहे,  हे सर्व मुद्दे बाळासाहेबांचेच कॉपी मारताय तसे त्यांच्याशी सन्मानाने चर्चा करा व राजकीय अस्तित्व जपा. पुर्वीची परंपरागत मग्रुरी आता वंचित समाज कदापी सहन करणार नाही, वैयक्तिक स्वार्थ सोडा अन्यथा तेलंगना प्रमाणे कॉंग्रेस व भाजपा दोघांना लाथाडुन येथे वंचित सत्तेवर बसतील, आता हे वंचित समुहांचे पक्के ठरलेले आहे. तुम्ही स्वतःचा मतदार संघातील हुकुमत महत्वाची वाटत असेल पन आम्हाला या सर्व देशावर प्रेम आहे व आम्ही सर्व देशासाठी, देशातील वंचितांसाठी प्राण पनाला लावुन ही निवडणुक अस्तित्वाची लढाई म्हणुन लढणार आहोत हे लक्षात राहु द्या.
जय भिम जय संविधान
- मनोज काळे, ठाणे,  8169291009

----------------------------------------

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...