काँग्रेसच्या नेत्यांनो दलित/बौद्ध/ वंचित बहुजनांना इमोशनल ब्लॅकमेलिंग करणे सोडा।
-
विश्वजीत गजभिये।
नुकत्याच आलेल्या बातमीनुसार अशोक चव्हाणांनी जाहीर केले की वंचित बहूजन आघाडीशी जर युती झाली नाही तरी अकोला लोकसभेची जागा प्रकाश आंबेडकर यांना सोडू।
मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या तमाम जनतेस लक्षात आणून देऊ इच्छितो की महाराष्ट्र राज्याचे लोकसभा प्रभारी मा.मल्लिकार्जुन खरगे असल्यामुळे, जागा वाटापासंदर्भात सर्व निर्णय मा.खरगेजी व दिल्लीतील हाय कमांड घेत असते त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही काँग्रेस नेत्याला हा अधिकार नाही.सबब मेन स्ट्रीम मिडियामध्ये अशोक चव्हाण वा इतर कुणी नेते वंचित बहुजन आघाडीच्या युतीसंबंधी बोलत असतील तर तो शुद्ध कावेबाजपणा आहे,
ज्याअर्थी निर्णय घेणारे खरगेजी व दिल्लीतील हाय कमांड असल्यामुळे राज्यातील नेत्यांना युतीवर बोलण्याचा नैतिक अधिकार राहत नाही।
तर,
आपण मूळ विषयाकडे वळूयात, अशोक चव्हाणांनी वक्तव्य केलं की वंचित बहुजन आघाडीशी युती झाली नाही तरी अकोला लोकसभा सिट प्रकाश आंबेडकरांसाठी सोडू।
वरील वक्तव्यावरून अशोक चव्हाणांचा भंपकपणा उघडकीस येतो।
माझा चव्हाणांना थेट सवाल हा आहे की आत्ताच म्हणजे 2019 लाच बाळासाहेब आंबेडकरांवर एवढे प्रेम उतू का येतंय.???
तर याला दोन कारणे असावीत एक म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा झंझावात बघून तमाम काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे।
आणि दुसरे म्हणजे बाळासाहेबांबद्दल इमोशनल करून इथल्या दलित/वंचित समूहाच्या संपूर्ण मतांवर डल्ला मारायचा आहे।
असेच प्रेम 2004, 2009, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत का उतू गेले नाही.???
वर नमूद केलेल्या वर्षी भाजपा वर्सेस बाळासाहेब आंबेडकर अशी सरळ लढत असतांना तिनही वेळेस काँग्रेसने माती खाल्ली आहे।
सण 2004 ची आकडेवारी अभ्यासली असता असे दिसून येते की भाजपाचे संजय धोत्रे 313324 मते मिळवून विजयी झाले होते त्यावेळी बाळासाहेबांना 170000 च्या आसपास मते होती, केवळ बाळासाहेबांना पाडण्यासाठी काँग्रेसकडून लक्ष्मणराव तायडे यांना उमेदवारी देण्यात आली होती व त्यांनी 206912 मते मिळवली होती,
जर काँग्रेस पक्षाने तायडेंच्या रुपात बौद्धांची मते खाण्यासाठी डमी उमेदवार दिला नसता तर बाळासाहेब सहज निवडून आले असते।
सण 2009 ची आकडेवारी अभ्यासली असता असे दिसून येते की भाजपाचे विजयी उमेदवार धोत्रे यांना 2,87,526 मते पडली तर बाळासाहेब आंबेडकर यांना 2,22,678 मते पडली म्हणजे बाळासाहेबांचा केवळ 64,858 इतक्या कमी मतांनी पराभव झाला होता।
यावेळी सुद्धा काँग्रेसने बाबासाहेब धाबेकर यांना उमेदवारी देऊन दलित/ बहुजनांची 1,82,787 मते फोडली होती।
यावेळी काँग्रेसचे बाळासाहेब आंबेडकरांवर प्रेम का नव्हते.???
सांगा ना चव्हाण साहेब, ....सांगा।
सण 2014 ची आकडेवारी अभ्यासली असता असे दिसून येते की भाजपाचे विजयी उमेदवार धोत्रे यांना 456472 मते मिळाली होती तर बाळासाहेब आंबेडकर यांना 238776 मते मिळाली होती।
यावेळी काँग्रेसने केवळ बाळासाहेबांचा पराभव करण्यासाठी बौद्ध वर्सेस मुस्लिम अशी कावेबाज व धूर्त खेळी खेळून हिदायतउल्ला पटेल या मुस्लिम उमेदवाराला मुस्लिमांची मते खाण्यासाठी उमेदवारी दिली होती। यात त्यांनी 2,53,356 मते मिळवली।
बाळासाहेबांच्या मतांची व पटेलांच्या मतांची बेरीज केली असता बाळासाहेब सहज निवडून आले असते मग त्यावेळी काँग्रेसचे त्यांच्यावर प्रेम का नव्हते.???
केवळ बाळासाहेब आंबेडकरांना पाडायचे म्हणून मुस्लिम उमेदवार देण्यात आला होता काय.??
सांगा ना चव्हाण साहेब,,,.......सांगा।
आता 2019लाच बाळासाहेबांवर इतके प्रेम का.????
केवळ एक जागा सोडून संपूर्ण दलित/मुस्लिम/वंचित बहुजनांच्या मतांवर डल्ला मारायचा आहे काय.???
तुम्ही आम्हाला मूर्ख समजता काय.???
आकडेवारीचा खेळ/ सामाजिक ध्रुवीकरनाचा खेळ आम्हाला कळत नाही काय.????
सांगा ना चव्हाण साहेब,,,.... सांगा।
मला व माझ्यासारख्या कित्येक तरुणांना आज काँग्रेस जे दलितांसोबत 80/90 च्या दशकातील राजकारण करीत आहे त्यावर प्रचंड हसू येत आहे, अरे बाबांनो 2 खासदारकी, 3/4 आमदार, 2/3 महामंडळे, 3/4शासकीय समित्याच्या बदल्यात संपूर्ण राज्यातील तमाम दलित/बौद्ध/मुस्लिम/वंचित बहुजनांचे मतांवर डल्ला मारण्याचे दिवस गेलेत।
इतके वर्ष आम्हाला मूर्ख बनवलात, आमची फसवणूक केलीत ते आम्ही विसरतो मात्र आता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणतील तेच होणार। आमचा राजकीय वाटा आम्हाला द्या,
चव्हाण साहेब तुमच्या कुठलेही इमोशनल ब्लॅकमेलिंगला आता आम्ही बळी पडणार नाही म्हणून तुमच्या अधिकारात नसलेले व बालिशपणाचे वक्तव्य करू नका। आता या वंचित बहुजन समाजाला मूर्ख बनवणे तुम्हास जमणार नाही।
विश्वजीत गजभिये।
25/12/2018
No comments:
Post a Comment