..पन का ? हा विचार करुन पहा.
प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जगात ओळख आहे ती पुस्तकप्रेमी_बाबासाहेब म्हणुनच....
पुस्तकांसाठी घर बांधणारा सृष्टीच्या इतिहासातील एकमेव महामानव, घरात राशन नसले तरी चालेल पन घरात नविन पुस्तके आणली पाहीजेत असेच त्यांचे पुर्ण जिवन गेले, पुस्तके गोळा करणे, वाचणे, नविन विषयांवर पुस्तके लिहीणे यातच जीवन गेले..
पन याच पुस्तकप्रेमी बाबासाहेबांनी एक पुस्तक अक्षरशः जाळुन खाक केले...ते पुस्तक म्हणजेच #मनुस्मृती.
आज आपन ज्या ज्या गोष्टींना वाईट, नालायकपनाचे, अन्यायकारक समजतो त्या सर्व गोष्टींना मनुस्मृतीत कायद्याचे रुप दिले होते व सारा देशाने त्यानुसार जगायची सवय लावुन घेतली होती.
त्या जुलमी कायद्यापासुन भारतीयांची सुटका करायला व ते पुस्तक जाळायला बाबासाहेबांसारखा पुस्तकप्रेमीलाही ते पुस्तक जाळावे लागले.
- मनोज काळे
No comments:
Post a Comment