Monday, 24 December 2018

क्रांती विचार

बोधिसत्व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात...

“लोक अध्यक्ष कोणी व्हावे, सेक्रेटरी कोणी व्हावे, खजिनदार कोणी व्हावे याबद्दलच एकमेकांचा द्वेष करु लागले आहेत.
हिच परिस्थीती जर कायम राहीली तर आपन जो ही एवढा मोठा खटाटोप करुन अधिकार मिळविले ते सर्व फुकट जातील.
शहाणा कोण व वेडा कोण याचा विचार करा, पण मानाला हापापलेल्या मुर्खाच्या नादी लागु नका, कोणाच्याही हातुन दिवा लागो पन आपापसातील दुही मोडा, आणि तुमच्या अडचनणी नाहीशा करण्याचे ज्ञान प्राप्त करुन घ्या“

संदर्भ - दि.४ नोव्हेंबर, १९३२, वालपाखडी येथे दिलेल्या भाषनातुन.....जनता २५ फेब्रुवारी १९३३.

टिप - आज २०१८ मध्ये सुद्धा आपनास असे फक्त मानापानासाठी हपापलेले लोकच संघटनेत दुही माजवुन संघटना कमकुवत करत असल्याचे सगळीकडेच पहायला मिळत आहे. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी अशांना मुर्ख संबोधले आहे.व अशांच्या नादी लागु नका असा आदेशही दिला आहे.

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर दिवस रात्र एक करुन प्रतिगामी शक्तींना रोखण्यासाठी देशभर फिरत आहेत,जनजागृती करत आहेत त्यांच्या या झंझावाताने पुरोगामी जनतेत नवचैतन्य निर्माण झाले आहे,  प्रत्येकाला क्रांती होणार असा विश्वास वाटतो आहे, पण त्यासाठी कार्यकर्त्यांनीही दिवस रात्र एक करुन, पद, मानपान याचा विचार न करता आपल्या जिल्हा, तालुका, वार्डात फक्त बाळासाहेबांचे विचार घराघरात पोचवण्यासाठी जास्तीत जास्त वेळ दिला पाहीजे.

संकलन व पुणर्लेखन,संपादन
विचार वाहक- मनोजकाळे-ठाणे.

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...