Monday, 28 January 2019

दांभिक मीडिया - जनतेची हितशत्रुच...

दांभिक मीडिया - जनतेची हितशत्रुच...
- मनोज नागोराव काळे ठाणे.
दि.२७ जानेवारी २०१९ रोजी ठाणे जिल्ह्यातील कल्याण या ऐतिहासिक शहरात पुन्हा नवा इतिहास घडला, वंचित बहुजन आघाडी च्या "सत्ता बदलाची नांदी" या महासभेला कल्याण, भिवंडी व ठाणे परिसरातील सर्व बहुजन, आदिवासी, एस सी, एस टी, मुस्लिम, कोळी व इतर वंचित समाज घटकांनी अतिषय उत्साहाने व उमेदीने उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. सर्वांनी एकत्र येऊन आजवरच्या सर्व सभांच्या उपस्थितीचा उंच्चांक मोडीत काढला. आणि हे पेड व भांडवलदारांच्या मीडिया चैनल्स हा पहावलेले दिसत नाही, सर्व टिव्ही चैनल्स नी अतिषय खोट्या व बेजबाबदार बातम्यांचे प्रसारन सुरु केले व उपेक्षित, वंचित समाजाच्या विरोधात आपन कसे आहोत हेच जुनकाही त्यांनी सिद्ध केले.

वंचित बहुजन आघाडीच्या या क्रांतीकारी सभेत आद.असदुद्दीन ओवैसी साहेबांनी केलेल्या भाषनातील एक ओळ पकडुन त्याचे चुकीच्या पद्धतीने प्रसारन करुन समाजात असंतोष पसरावा व समाजात तेढ निर्माम व्हावी हा मीडीयाचा अजेंडा उघडपने जानवत आहे.
आद. ओवेसी साहेबांनी भारतीय संविधानाने या देशातील सर्व नागरिकांना एका समान पातळीवर आनले आहे, आता या देशात कुनी कुनापोक्षा मोठा नाही तर सर्व समान आहोत या आशयाने त्यांनी थोडे उलगडुन सांगितले की कोणी ब्राह्मन असेल तर तो प्रकाश आंबेडकरांपेक्षा मोठा नाही किंवा कुनी मराठा असेल तर तो मुस्लिमांपेक्षा मोठा नाही, ओवेसी साहेबांनी जनतेला फक्त आपन सर्व समान आहोत असे न सांगता थोडे खोलात जाऊन आपन जातवार धर्मवार भेदभाव करत असतो त्यामुळे त्या जाती धर्मांना आपन कुनीही एकमेकांपेक्षा मोठे नाही तर आपन सर्व समान आहोत असा संदेश दिला, पन मीडिया ला तर अगदी सोपे करुन सांगितलेला संदेशही कळत नसेल तर त्यांनी टिव्ही चैनल्स बंद करुन भंगार गोळा करायचे काम करावे.
टिव्ही मी़डिया ला पुर्ण जाणिव आहे की कल्याण भिवंडी हा विभाग किती संवेदनशील आहे तरी अशा एका राजकीय नेत्याच्या भाषनाला तोडुन मोडुन मुद्दाम समाजात तेढ निर्माण करुन कोणत्या राजकीय पक्षाला फायदा पोचवायचा आहे?
दंगली वर कोन कोनत्या पक्षाचे राजकारण चालते? मीडियाला दलालीच करायची आहे तर त्यांनी पत्रकारीता या लोकशाहीच्या चौथ्या खांबाला बदनाम न करता खुलेआम दलाली करावी त्यांना कुनी रोखले आहे?
दोशात कोनताच समाज लहान नाही किंवा मोठा नाही हे तर भारतीय संविधानानेच दिलेला समतेचा नियम आहे, आणि काल ज्या वंचित बहुजन आघाडी ची सभा होती त्या सभेचे ब्रिदवाक्यच आहे की " माझ्या वरती कुनी नाही, माझ्या खाली कुनी नाही, आम्ही सर्व समान आहोत"
त्यामुळे समतेच्या संदेशाचा द्वेश वाढविण्यासाठी उपोयग करुन घेण्याचे घानेरडे काम मीडियाने बंद करावे, मीडिया ने समाजहितासाठी, लोकशाही च्या संरक्षणासाठी, जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवावा, समाज रक्षकांना बदनाम करने मीडियाचे काम नाही याचे आत्मपरिक्षण करावे.
दुसरा मुद्धा आद ओवेसी साहेबांनी जनतेला एक प्रश्न केला की इतका अन्याय होतोय, इतका अत्याचार होतोय पन तुम्ही गप्प का रहाता, तुम्ही ज्या भीमा कोरेगावच्या शुर महारांचे वंशज आहात त्यांना तरी आठवा, की त्या महार सैनिकांनी पेशव्यांना हरवले नविहते का? असा तो प्रश्न त्यांनी जनतेला विचारला..तो प्रश्न हा गाफिल व झोपेत असलेल्या जनतेला हलवुन जागे करण्यासारखा प्रभावी होता, अस्मिता जागी करणारा होता, नव पेशव्या विरुद्ध लढायची प्रेरना देणारा तो प्रश्न होता पन भांडवलदारांच्या मीडियाने बिनधास्तपने अशी खोटी बातमी फिरवली की ओवेसी म्हणाले की महारांनी पेशव्यांना हरवले नव्हते.
त्यामुळे मीडिया हा प्रस्थापित धनदांडग्याच्या हातचे बाहुले आहे स्पष्ट झाले,
जनतेने मीडिया बातम्या देते हा भ्रम डोक्यातुन काढावा, आता पेड मीडिया सुद्धा अफवा पसरवण्याचे काम करते हे वरील दोन मुद्दयावरुन सिद्ध झालेले आहे, त्यामुळे ज्या समाजाच्या हितचिंतकांना कायद्याचे ज्ञान आहे त्यांनी या मीडियावर दंगलीला प्रोत्साहन देने, समाजात तेढ निर्माण करणे, अफवा पसरवने अशा प्रकारच्या केसेस या मीडिया चैनल्स विरुद्ध दाखल करायला हरकत नसावी.
वंचित बहुजन आघाडी ही नवपेशवाई, नवमोघलाई या दोंघाविरुद्घ नव शिवशाही सारखी उभी आहे याचे भान ठेवावे व वंचित बहुजन आघाडी च्या समाजहिताच्या भुमिकांचा सतत प्रचार करुन पेड मीडियाचा खोटा प्रचार हानुन पाडावा.
- मनोज काळे 8169291009

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...