Friday, 2 August 2019

मनसे राष्ट्रवादीचा मोर्चा म्हणजे "सोन्याचा खंजीर"
- मनोज नागोराव काळे







काल दि.२ ऑगस्ट २०१९,रोजी मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी एका मोर्चाची घोषना केली आहे, तो मोर्चा इविएम मशीन विरुद्ध असल्याचे त्यांचे म्हणने आहे. पण हा मोर्चा म्हणजे सोन्याचा खंजीर आहे व तो ज्यांना फक्त सोन्याचा आहे म्हणुन छातीत खुपसुन घ्यावा वाटतोय त्यांनी खुशाल खुपसुन घ्यावे, राजकीय आकलनशक्तीचा अभाव व वैचारिक दारिद्र ज्यांच्या डोक्यात भरलेले आहे तेच काही लोक या मोर्चाच्या ढोंगाला बळी पडुन त्या मोर्चात सामिल होतील असा मला ठाम विश्वास आहे.

या मोर्चाला सोन्याचा खंजीर बोलन्यामागे त्या मोर्चाचे म्होरके कोन आहेत व त्यांची आजवरच्या राजकारणातील भुमिका काय होत्या हे पाहिले की प्रत्येकाला या मोर्चामागील ढोंग कळायला वेळ लागनार नाही.

EVM मशीन चा मुद्दा राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसे सारख्या जातीवादी पक्षांना अचानक महत्वाचा वाटु लागला याचे कारणे उघड उघड आहेत

१) वंचित बहुजन आघाडी ने इविएम मशीन विरुद्ध पुकारलेला निर्धारपुर्वक न्यायालयीन लढा.
२) वंचित बहुजन आघाडी ची वाढती लोकप्रियता
३) मनसेच्या नेत्यांचे सेनेत व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भाजप प्रवेश
४) अॅड. प्रकाश आंबेडकरांभोवती एकवटलेला बहुजन समाज
५) धनगर, मुस्लिम, ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी, मातंग समाजाची लोकसंख्या व वंचित बहुजन आघाडी मधुन या सर्व समाजांना मिळत असलेले प्रतिनिधित्व.
६) पुरोगामी विचारांनी प्रस्थापितांना चारलेली राजकीय धुळ
७) बैलेट पेपर वर निवडणुका झाल्यास त्याचे या लढाच्या मुळ नायक असलेल्या आंबेडकरांना श्रेय मिळु न देण्याची कपटी भावना
८) मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे लोकशाहीवादी आहेत असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न.
९)  वंचित बहुजन आघाडी काबीज करत असलेली राजकीय स्पेस ब्रेक करण्याचे षडयंत्र
१०) मोदी विरोधकांना वंचित बहुजन आघाडी शिवाय इतरही उच्चवर्णिय पक्षाचे पर्याय आहेत हे निम जातीयवादी लोकांवर ठसवण्याचे प्रयत्न.

माझ्या जागृत बहुजन मतदारांनो,
       वरील काही प्रमुख कारणांमुळे मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेसने इविएम विरुद्ध मोर्चा काढत असल्याचे ढोंग करताना आपल्याला दिसत आहेत, थोडा विचार करुन पहा कि आजवर सतत उघड जातीयवादी भुमिका घेणारे राज ठाकरे, जे  कायम हुकुमशाही च्या समर्थक व लोकशाहीचे विरोधक असलेल्या बाळ ठाकरेंना गुरु किंवा सर्वस्व मानतात, त्यांना अचानक लोकशाहीचा पुळका कसा काय आला? ,राज ठाकरे लोकशाही मानतात तर मग स्वतः निवडणुका का लढत नाहीत? तेही सोडा, जो माणुस चैत्यभुमीपासुन हाकेच्या अंतरावर रहात असुन जन्मात कधी  चैत्यभुमीवर दर्शनाला गेला नाही, कारण त्यांच्यात ठासुन भरलेला लोकशाही व बाबासाहेबाप्रतीचा त्यांचा द्वेश ते करु देत नाही, हेच लोकशाही समर्थक बनलेले राज ठाकरे ऐट्रोसिटी ऐक्ट रद्द करावा असे बिनधास्त बोलतात व तशी मागणी करतात, हेच राज ठाकरे आरक्षण रद्द करावे अशी मागणी करतात व ते आज तुम्हाला लोकशाहीवादी वाटु लागले, हे तुम्हाला पटले तरी कसे? इतकी आपली बुद्धी बालिश बनलिय का? आपन आपलीच नव्याने निर्माण झालेली राजकीय ताकद अशा भामट्यांच्या ढोंगापुढे झुकवणार आहोत का?

आंबेडकरी विचारातुन कोणापुढे लोटांगन न घालता, स्वाभिमानाने सत्ता मिळवता येते हे जेव्हा बाळासाहेब आंबेडकर सिद्ध करुन दाखवत आहेत तेव्हा अनेक जातीवाद्यांना पुतना मावशीचा पान्हा फुटला आहे व त्यांना आता लोकशाही वर जिव जडल्याचा दिखावा करने भाग पडले आहे.

याच मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजव व सेनेला सक्षम व अनुभवी उमेदवार सप्लाय केले आहेत, गेल्या महिनाभरात पन्नास एक लोक तिकडे गेलेत व  काही बोटावर मोजन्या इतके लोक यांच्याकडे शिल्लक राहीलेत, आजनर बहुजनांना, आंबेडकरी समाजाला ज्या पक्षांनी वंचित ठेवले त्यांना वंचित बहुजन आघाडीने लाचार स्थितीत आणुन उभे केले असताना या राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसे ला भक्कम करण्यासाठी कोण कोण पुढे सरसावले आहेत त्यांची नावे पहा एकदा सुषमा आंधारे, जोगेंद्र कवाडे, सुरेश माने, वामन मेश्राम ( मुलनिवासींचा म्होरक्या). आजवर हे लोक आंबेडकरी राजकारण अपयशी का होते यावरुन प्रकाश आंबेडकरांवर टिका करत होते पन आज प्रकाश आंबेडकरांनी सर्व प्रतिगामींनी गुडघ्यावर आणले असताना हेच बांडगुळ नेते प्रस्थिपित पक्षांची डागडुजी करुन त्यांना पुन्हा सक्षम करण्यासाठी झटताना आपन पहात आहोत व ती गद्दारी करत असताना बहुजनांच्या एकमेव लोकनेते बाळासाहेब आंबेडकरांवर खोटे आरोप करुन त्यांची बदनाम  करण्याचे प्रयत्नही करत आहेत, जनता त्यांच्या खोट्या प्रचारांना आता बळी पडताना दिसत नाही याचे खुप समाधान वाटत आहे.
  काल एका अर्धवटरावाने सोशल मिडीयावर पोस्ट लिहीली की "प्रकाश आंबेडकरींनी या मोर्चाला पाठींबा द्यायला पाहीजे",
 यांना हे माहीत नाही की प्रकाश आंबेडकरांनी इविएम विरुद्ध घंटानाद आंदोलन करुन सर्व महाराष्ट्राच्या प्रशासनाला जागे केले, इविएम काऊंटींग मधील फरक हा विषय न्यायालयिन प्रक्रियेत आणले, दिल्लीत जाऊन निवडणुक आयोगावर दबाव आनला तेव्हा कुठे निवडणुक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आम्ही काही सांगीतले तर आमच्या जिवाला धोका आहे असे जाहीरपने जगासमोर सांगीतले आहे, त्यामुळे आम्ही वाजवलेल्या घंटानादाने जागे झालेल्यांनी आम्हाला धडे शिकवु नयेत, ज्यांना तो सोन्याचा खंजीर खुपसुन घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा पन प्रकाश आंबेडकरांना राजकीय सल्ले देण्याआधी जरा अभ्यास करावा. बहुजन समाजाची राजकीय गुलामगीरी संपवणार्या आंबेडकरांसोबत प्रत्येक लोकशाहीवादी समाजघटक जुडतो आहे, प्रत्येक राजकीय पक्षातुन लोकशाहीवादी लोक वंचित बहुजन आघाडीत येत आहेत व हुकुमशाही व घरानेशाहीवाले नेते भाजपात जात आहेत, हकुकुमशाही व लोकशाही या दोन्ही ठिकानी ध्रुवीकरन होत आहे, आता लढाई सरळ व थेट आहे त्यामुळे कोणत्याही अपप्रचाराला बळी पडु नये, ढोंगी व जातीवादी लोकांच्या गोंडस शब्दांना बळी पडुन स्वताचा राजकीय घात करुन घेऊ नये असे मला वाटते.

जय वंचित,  जय संविधान

- मनोज नागोराव काळे  8169291009
____________________________


No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...