"वंचित बहुजन आघाडीला आता रोखणे शक्य नाही.."
- संतोष आगबोटे, नांदेड
'वंचित बहुजन आघाडी' प्रचंड वेगाने सर्व पक्षांना ओव्हरटेक करत सत्तेच्या दिशेने निघालीय. आम्हास रोखण्याची कोणत्याही पक्षात धमक नाही. त्याच कारण 'वंचित बहुजन आघाडी' Intellectual honesty चं राजकारण इथल्या व्यवस्थेत उभं करू पाहात आहे. त्यासाठी त्या प्रकारचे जाणीवपूर्वक प्रयत्नही मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत.
आजपर्यंतच्या एकाही राजकीय पक्षाने लोकांच्या जीवनात अमुलाग्र परिवर्तन करण्याच्या उद्देशाने प्रामाणिक प्रयत्न केलेला दिसत नाही. मतदारांना साधन म्हणूनच वापरण्यावर या पक्षांचा भर होता.आहे.
इथल्या राजकीय पक्षांनी मानवी विकासाची संकल्पनाच पुरती बदलवून टाकली. संकुचित केली. उच्च मानवी मूल्यांच्या संवर्धन त्याच्या उत्थानासाठी नैतिक व्यवस्था निर्माण करण्याचा विचार कुणी मांडला नाही. नैतिक मूल्यांची जोपासना करणार्या परिवर्तनवादी चळवळी इथं वाढणार नाहीत. यासाठी बहुतांशी राजकीय पक्षांनी दक्षता घेतली. त्या वारंवार मोडीत काढण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला. इथं विशिष्ट विचारांभोवती राजकारण फिरवल्या जातं.
घराणेशाहीने सर्व राजकीय पक्षात आपले स्थान निश्चित केलेले आहे.
व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याकडून इथं प्रयत्न होताना दिसत नाहीत.
शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई, गरीबी, खाजगीकरण, यावर दुरगामी आणि परिणामकारक धोरण निश्चितीचा अभाव राहिलेला आहे मग ते सरकार कोणाचेही असो.
व्यापक दूरदृष्टीचा लोकहितदक्ष फ्युचर प्लान सरकार
कडे अथवा कोणत्याही राजकीय पक्षाकडे असेल अस मला वाटत नाही.
सत्ता तुमच्या ताब्यात का द्यायची याचं यथोचित उत्तर एकही राजकीय पक्ष व्यवस्थितरीत्या देऊ शकणार नाही..
परंतु या सर्वांना एक राजकीय पक्ष अपवाद आहे तो म्हणजे 'वंचित बहुजन आघाडी' होय.
एक नियोजनबद्ध प्लाॅन-आराखडा घेऊन
वेगवान गतीने 'वंचित बहुजन आघाडी' ची
सत्तेच्या दिशेने सुसाट घोडदौड चालु आहे.
व्यवस्थेने सर्वच बाबतीत वर्षानुवर्षे 'वंचित' ठेवलेल्या
सर्व घटकांना एकत्रित करणं, एका सूत्रात बांधणं हेच मुळी मोठं आव्हान होतं. ते जिकिरीचे आव्हान बाळासाहेब आंबेडकर यांनी यशस्वीपणे पेललंय.
आजघडीला मृतप्राय झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस वा काँग्रेसमध्ये लढण्याचे बळ राहिलेले नाही. सर्वार्थाने ते खचलेले आहेत. ते खेळाआधीच मैदान सोडण्याच्या तयारीला लागलेत. सेना- भाजपकडे गाय, राममंदिर, धर्म, पाकिस्तान, कलम 370, याच्या पलिकडे मुद्दे राहिलेले नाहीत.
दिलेल्या एकाही आश्वासनांची पूर्तता ते करू शकलेले नाहीत. याऊलट नोटबंदी, जिएसटी, यासारख्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार्या बाबी त्यांनी घडवून आणल्या.
परके असणार्या इंग्रजांना देशाचं जितकं वाटोळे करता आले नाही ते या सरकारने करून दाखवले.
वरून विविधतेतही एकतेने नांदणार्या देशातील वेगवेगळ्या समुहांत असुरक्षिततेचं-अविश्वास- भीती संशयाचे वातावरण निर्माण करण्याचं श्रेय या विद्यमान सरकारलाचं जातं. सार्वभौम देशाला विघटीत करायला निघालेले हे सरकार आहे.
विद्यार्थी, शेतकरी, मजूर, शेत मजूर, कामगार, नोकरदार वर्ग, व्यापारी यासह कोणता वर्ग यासरकारच्या धोरणामुळे त्रस्त नाही ते सांगा !
परंतु वंचित बहुजन आघाडीने सर्व वर्गांच्या कल्याणाचा बारकाईने अभ्यास करून अजेंडा बनवलेला आहे.
'संविधानाचे धोरण हेच वंचित बहुजन आघाडीचे तोरण असेल..'
EVM च्या भरवशावर भाजप विसंबून आहे. बॅलेट पेपर वर निवडणूक होऊद्या भाजप हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही.
'वंचित बहुजन आघाडी'ला आता कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. अगदी सत्ताधारी धर्मांध सेना-भाजपही नाही. पण अट एकच लढाई ही प्रामाणिकपणे व्हावी..
-संतोष आगबोटे, नांदेड.
संपर्क- 9527626968
- संतोष आगबोटे, नांदेड
'वंचित बहुजन आघाडी' प्रचंड वेगाने सर्व पक्षांना ओव्हरटेक करत सत्तेच्या दिशेने निघालीय. आम्हास रोखण्याची कोणत्याही पक्षात धमक नाही. त्याच कारण 'वंचित बहुजन आघाडी' Intellectual honesty चं राजकारण इथल्या व्यवस्थेत उभं करू पाहात आहे. त्यासाठी त्या प्रकारचे जाणीवपूर्वक प्रयत्नही मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत.
आजपर्यंतच्या एकाही राजकीय पक्षाने लोकांच्या जीवनात अमुलाग्र परिवर्तन करण्याच्या उद्देशाने प्रामाणिक प्रयत्न केलेला दिसत नाही. मतदारांना साधन म्हणूनच वापरण्यावर या पक्षांचा भर होता.आहे.
इथल्या राजकीय पक्षांनी मानवी विकासाची संकल्पनाच पुरती बदलवून टाकली. संकुचित केली. उच्च मानवी मूल्यांच्या संवर्धन त्याच्या उत्थानासाठी नैतिक व्यवस्था निर्माण करण्याचा विचार कुणी मांडला नाही. नैतिक मूल्यांची जोपासना करणार्या परिवर्तनवादी चळवळी इथं वाढणार नाहीत. यासाठी बहुतांशी राजकीय पक्षांनी दक्षता घेतली. त्या वारंवार मोडीत काढण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला. इथं विशिष्ट विचारांभोवती राजकारण फिरवल्या जातं.
घराणेशाहीने सर्व राजकीय पक्षात आपले स्थान निश्चित केलेले आहे.
व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याकडून इथं प्रयत्न होताना दिसत नाहीत.
शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई, गरीबी, खाजगीकरण, यावर दुरगामी आणि परिणामकारक धोरण निश्चितीचा अभाव राहिलेला आहे मग ते सरकार कोणाचेही असो.
व्यापक दूरदृष्टीचा लोकहितदक्ष फ्युचर प्लान सरकार
कडे अथवा कोणत्याही राजकीय पक्षाकडे असेल अस मला वाटत नाही.
सत्ता तुमच्या ताब्यात का द्यायची याचं यथोचित उत्तर एकही राजकीय पक्ष व्यवस्थितरीत्या देऊ शकणार नाही..
परंतु या सर्वांना एक राजकीय पक्ष अपवाद आहे तो म्हणजे 'वंचित बहुजन आघाडी' होय.
एक नियोजनबद्ध प्लाॅन-आराखडा घेऊन
वेगवान गतीने 'वंचित बहुजन आघाडी' ची
सत्तेच्या दिशेने सुसाट घोडदौड चालु आहे.
व्यवस्थेने सर्वच बाबतीत वर्षानुवर्षे 'वंचित' ठेवलेल्या
सर्व घटकांना एकत्रित करणं, एका सूत्रात बांधणं हेच मुळी मोठं आव्हान होतं. ते जिकिरीचे आव्हान बाळासाहेब आंबेडकर यांनी यशस्वीपणे पेललंय.
आजघडीला मृतप्राय झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस वा काँग्रेसमध्ये लढण्याचे बळ राहिलेले नाही. सर्वार्थाने ते खचलेले आहेत. ते खेळाआधीच मैदान सोडण्याच्या तयारीला लागलेत. सेना- भाजपकडे गाय, राममंदिर, धर्म, पाकिस्तान, कलम 370, याच्या पलिकडे मुद्दे राहिलेले नाहीत.
दिलेल्या एकाही आश्वासनांची पूर्तता ते करू शकलेले नाहीत. याऊलट नोटबंदी, जिएसटी, यासारख्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार्या बाबी त्यांनी घडवून आणल्या.
परके असणार्या इंग्रजांना देशाचं जितकं वाटोळे करता आले नाही ते या सरकारने करून दाखवले.
वरून विविधतेतही एकतेने नांदणार्या देशातील वेगवेगळ्या समुहांत असुरक्षिततेचं-अविश्वास- भीती संशयाचे वातावरण निर्माण करण्याचं श्रेय या विद्यमान सरकारलाचं जातं. सार्वभौम देशाला विघटीत करायला निघालेले हे सरकार आहे.
विद्यार्थी, शेतकरी, मजूर, शेत मजूर, कामगार, नोकरदार वर्ग, व्यापारी यासह कोणता वर्ग यासरकारच्या धोरणामुळे त्रस्त नाही ते सांगा !
परंतु वंचित बहुजन आघाडीने सर्व वर्गांच्या कल्याणाचा बारकाईने अभ्यास करून अजेंडा बनवलेला आहे.
'संविधानाचे धोरण हेच वंचित बहुजन आघाडीचे तोरण असेल..'
EVM च्या भरवशावर भाजप विसंबून आहे. बॅलेट पेपर वर निवडणूक होऊद्या भाजप हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही.
'वंचित बहुजन आघाडी'ला आता कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. अगदी सत्ताधारी धर्मांध सेना-भाजपही नाही. पण अट एकच लढाई ही प्रामाणिकपणे व्हावी..
-संतोष आगबोटे, नांदेड.
संपर्क- 9527626968
No comments:
Post a Comment