Saturday, 18 April 2020

बामसेफ - संविधानाला समाज पातळीवर उध्वस्त करण्यासाठी कार्यरत असलेली संघटना. - मनोज नागोराव काळे.


बामसेफ - संविधानाला समाज पातळीवर उध्वस्त करण्यासाठी कार्यरत असलेली संघटना.
- मनोज नागोराव काळे.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील लोकशाही कशामुळे उध्वस्त होऊ शकते हे ठामपणे मांडले आहे, बंधुत्व किती महत्वाचे आहे हे मांडले आहे, सामाजिक लोकशाही निर्माण झाली नाही तर संविधानातुन मिळालेली राजकीय लोकशाही संपुष्टात येइल असा इशारा बाबासाहेबांनी दिला आहे. आणि लोकशाही टिकवण्यासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यावर आधारित सामाजिक लोकशाही निर्माण करणे हे सर्वात मोठी देशसेवा आहे असे स्वतः बाबासाहेबांनी सांगीतले आहे.

आता आपन मुुख्य विषयाकडे वळुया, गेली जवळपास ४० वर्षांपासुन भारतात एक संघटना काम करते ती कामगारांची संघटना म्हणुन सुरु झाली, जी संघटना स्वताला सामाजिक, अराजकिय संघटन आहे असा दावा करते व बहुतेक काही अपवाद सोडला तर सर्व सरकारी कर्मचारी या संघटनेसाठी काम करत होते कालांतराने या संघटनांमधे नेतृत्व, पद प्रतिष्ठेच्या लालसेपोटी फुट पडल्या व आज अनेक शकले झालेले आपन पहात आहोत ती संघटना आहे बामसेफ.

बामसेफ ही संघटना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाला मुळातुनच उपटुन टाकण्यासाठी कार्यरत आहे असे माझे निरिक्षण आहे व ते मी आपणासमोर मांडतो आहे, आपन बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा सरनामा व बाबासाहेबांचे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आगोदर भारतातील लोकशाहीच्या भवितव्या बद्दल दिलेले २५ नोव्हेंबर १९५० चे संविधान सभेतले शेवटचे भाषण वाचले असेलच, आता आपन संविधानाचा सरनामा, बाबासाहेबांनी लोकशाही संपण्यासाठी कारणीभुत ठरण्यासाठी वर्तवलेले धोके यांच्या अनुशंगाने बामसेफची थोडी उलटतपासनी करुयात. व त्यानंतर तुम्ही स्वतःच तुमच्या निष्कर्षाला पोचाल असा मला तुमच्या बुद्धीमत्तेवर विश्वास आहे.

1) आम्ही भारताचे लोक - म्हणुन बाबासाहेबांनी संविधानाची सुरवात केली आहे, त्यात सर्व 100% भारतीय लोकांना गृहित धरलेले आहे त्यात जात, धर्म, पंथ, लिंग असा कोणताही अपवाद ठेवला गेलेला नाही, त्यातुन कुणालाही कोणत्याही द्वेशापोटी वगळले गेले नाही.
पण गेली जवळपास चाळीस वर्षांपासुन बामसेफ ही संघटना काही जातींना या देशाचे नागरिक नसल्याचा प्रचार करत आहे, ज्या समाजांना खुद्द डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे नागरिकत्व बहाल केले त्यांचे भारतीय नागरिकत्व जातीय द्वेशातुन नाकारनी हि एकमेव संघटना असावी. त्यासाठी त्यांना संविधाना पेक्षा DNA रिपोर्ट महत्वाचा वाटतो.

2) धर्मनिरपेक्षता - बाबासाहेबांनी या राष्ट्राला कोणत्याही एक विशिष्ट धर्माचे राष्ट्र ठरवण्यास विरोध होता कारण त्यामुळे देशात धार्मिक तेढ कायम राहीली असती, सर्व धर्मांना या देशाने स्विकारले आहे, पण बामसेफ हि संघटना धर्मद्वेश शिकवणारी शिबीरे, कैडर कैम्प आयोजित करते व त्यात उपस्थितांचे ब्रेनवॉशिंग करुन, हजारो वर्षा पुर्वी तुमच्यावर या समाजाने अन्याय केला आहे तुम्ही त्यांना या देशाबाहेर घालवले पाहीजे असा प्रचार करते, त्यासाठी ते स्वताला या देशाचे मुलनिवासी म्हणुन घेतात, हा मुलनिवासी शब्द संविधानात कुठेही सापडत नाही, या देशातील मुळ नागरिकांना आदिवासी म्हणुन ओळखले जाते पन बामसेफ या संघटनेने स्वताला या देशाचे आपण मुलनिवासी आहोत व ब्राह्मन विदेशी आहेत असा प्रचार करुन संविधानातील आम्ही भारताचे लोक या पहिल्या ओळीलाच निकालात काढले आहे.

3) बाबासाहेबांनी सांगीतले आहे की बंधुत्वाशिवाय स्वांतंत्र्य किंवा समता अस्तित्वात रहाणार नाही - बामसेफ या संघटनेचा बंधुत्वाशी दुरदुर पर्यंत काही संबंध दिसत नाही, हि संघटना देशात लोकशाही अासतानाही टोकाचा जातीवाद करते व जे कुनी परिवर्तनवादी यांच्या विचारांशी सहमत नसते त्यांना हे दलाल, गद्दार म्हणुन हिणवतात त्यामुळे काही लोक मजबुरी ने यांच्या जातीवादी भुमिकेला बळी पडलेले दिसतात.

4) श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य - हा अधिकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानातुन दिलेला अधिकार आहे पन बामसेफ संघटनेचे सर्व कार्यकर्ते हे प्रचंड कर्मठपने त्यांची विचारधारा मानण्यासाठी समाजाला जबरदस्ती करताना दिसते, एससी एसटी एन टी, ओबीसी या समाजातील हिंदु व्यक्तींनी त्यांच्या घरात हिंदु देव देवतांची उपासना केलेली यांना पटत नाही, हे लोक त्या लोकांना आंबेडकरद्रोही समजतात, ज्या आंबेडकरांनी श्रद्धा व उपासनेचा घटनेतुन अधिकार दिला त्याच आंबेडकरांचे नाव वापरुन सदर दलित बहुजनांवर विचार थोपवण्याचा प्रयत्न केला जातो. अन्यथा त्यांच्यावर बहिष्कार टाका असा उपाय सुचवतात, बहिष्कार हा मनुवादी संस्कृतीचा भाग आहे हे नोट केले जावे.

5) एकात्मता - भारतीय समाजात एकात्मता रहाणार नाही यासाठी हे संघटन त्यांच्या कार्यकर्त्यांकडुन जे लोक हिंदुंच्या सार्वजनिक सण उत्सवात सामिल होतात त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचे फतवे काढतात, त्यांना गद्दार म्हणुन हिनवतात, बाबासाहेबांनी सांगीतले होते की धर्म ही प्रत्येकाची आवश्यक व खाजगी बाब आहे तरीही त्यात हि संघटना हस्तक्षेप करताना दिसते.
धर्म हा वैयक्तिक आहे, आपल्या घरात आपन आपल्या धर्माचे हवे तसे पालन केले पाहीजे पन दरवाज्याची चौकट ओलांडुन जेव्हा आपन समाजात जातो तेव्हा आपले धर्म नियम न मानता आपन भारताचे नागरिक म्हणुन आपन संविधाााच्या सरनाम्यानुसार समानता व बंधुभावाने वागले पाहीजे या गोष्टीचा या संघटनेला काहीच गंध नाही.

6) विभुतीपुजा - व्यक्तीपुजा हा लोकशाहीतील सर्वात मोठा अडसर आहे असे बाबासाहेबांनी सांगुनही बामसेफने बाबासाहेबांच्या नावानेच हा सर्व खेळ मांडला आहे, बाबासाहेबांच्या नावाने हि संघटना बाबासाहेबांचेच विचारांची मोडतोड करताना दिसते.

7) डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या सर्व संघटनांची बदनामी करणे, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियांची बदनामी करने हा एककलमी कार्यक्रम गेली चाळीस वर्ष हि संघटना करत आली आहे.

8) डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा उद्देश्य होता, या देशातील जातीव्यवस्था संपवने व जातीविहीन, वर्गविहीन समाजाची निर्मिती करणे. संविधानातुन बर्याच प्रमाणात ते झालेही पन बामसेफने बाबासाहेबांच्या जाती तोडो आंदोलनाला जाती जोडो आंदोलनाने रिप्लेस केले, जाती संपवण्याचे सोडुन प्रत्येक जातीची अस्मिता जागी करुन त्यांना त्यांच्या जातीचा अभिमान बाळगायला या संघटनेने शिकवले त्यासाठी यांनी प्रत्येक जातीतील एक महापुरुष शोधुन दिला व सर्व जातींमध्ये चढाओढीची स्पर्धा लावण्यात या संघटनेला यश आले.
आज मातंग फक्त जय लहुजी बोलतो, जय आण्णा बोलतो, माळी फक्त जय सावता, जय ज्योती बोलतो, चांभार जय रविदास बोलतो, वाल्मिकी समाज जय वाल्मिकी बोलतो...अन्यायाच्या प्रतिकारासाठी तयार झालेला जय भीम शब्द फक्त बौद्धांपुरता राहीला, त्याला तेथेही जय मुलनिवासीने बदलण्याचा डाव यांनी आखला होता पन तो फारसा यशस्वी झाला नाही.
उदा. मातंगाला बौद्धाने जय भीम केला तर तो उत्तरात थोड्या चढ्या आवाजात जय आण्णा किंवा जय लहुजी बोलतो,यामुळे समाजात दुरावा होत गेलाय हे आपन पहात आहोत. समाजाची एकात्मता तोडण्यासाठी असे अनेक हातखंडे बामसेफने तयार केलेत.

9) या संघटनेत सामिल होण्याची एकच अट असते तुम्ही ब्राह्मनाचा टोकाचा द्वेश केला पाहीजे, तुम्ही शीलवान नसाल, तुम्ही चारित्र्यवान नसाल तरी चालते पन तुम्ही बामनाला चोविस तास शिव्या देऊ शकत असाल तरच या संघटनेत तुम्हाला प्रवेश आहे. यामुळे 3% वाल्यांना नको तेवढे महत्व प्राप्त झाले आहे, चाळीस वर्ष हि संघटना बामनांना शिव्या देत राहीली व बामन हळुहळु गल्ली ते दिल्ली पर्यंतची सत्ता काबीज करुन बसला, बामसेफच्या चाळीस वर्षांच्या संघटनात्मक कार्याचे हे फळ आहे. निगेटिव पब्लिसीटीचा सिद्धांत बामनांनी योग्य रित्या वापरुन घेतला.
बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या संघटनेत ब्राह्मनांना येण्यास कधीच विरोध केला नाही, त्यांचा विरोध प्रवृत्तीला होता मानसाला नव्हता ( जेधे जवळकरांची ब्राह्मनांना चळवळीत सामिल करुन घेऊ नये हि सुचना बाबासाहेबांना धुडकावुन लावली होती)

बाबासाहेब आयुष्यभर सांगत राहीले की जन्माने कुणी ब्राह्मन होत नाही कुनी दलित होत नाही तर कर्माने दलित किंवा ब्राह्मन होतो.
पन बाबासाहेबांच्या या विचारांना पायदळी तुडवत बामसेफ सर्वच्या सर्व ब्राह्मनांचा सारखा द्वेश करते व तसा प्रचारही करते यामुळे आगरकर, दाभोळकर सारखा परत कुनी एखादा ब्राह्मन समाजसुधारक देशात तयारच होणार नाही याची पुर्ण खबरदारी बामसेफ घेते.

10) धर्मांतर चळवळ - डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी Anhilation of caste जातीसंस्थेचे उच्चाटन या ग्रंथात जाती च्या निर्मुलनाचे दोन मार्ग सुचवलेत धर्मांतर व अंतरजातीय विवाह. बाबासाहेबांनी या दोन्ही मार्गांचा स्वतः अवलंब केला आहे. बाबासाहेबांनी धर्मांतर केले व हिंदु धर्म सोडुन तथागतांचा धम्म स्विकारला व बाबासाहेबांनंतर आद भैयासाहेब आंबेडकरांनीही देशभरात धर्मांतर सोहळे घेतले पन या धर्मांतर चळवळीला रोखण्यासाठी बामसेफने मुलनिवासीची संकल्पना निर्माण केली, आपन आहोत त्या जातीत राहुन फक्त ब्राह्मनांना शिव्या देऊन क्रांती करु शकतो असा भ्रम तयार केला. बामसेफ ने तथागत बुद्ध सोडुन इतर सर्व महापुरुषांना त्यांच्या बैनर व हैंडबिलावर स्थान दिले, धर्मांतर चळवळीसाठी बामसेफने कधीही कसलेही कार्य केले नाही.

11) अंतरजातिय विवाह - जातीसंस्था मोडण्याचा दुसरा जालिम उपाय हा अंतरजातीय विवाह करने हाच आहे असा विश्वास बाबासाहेबांना होता, वंशशुद्धी राहीलेली नाही व ती नसेल तर जातीनिर्मुलन सोपे जाईल असा विश्वास बाबासाहेबांना होता म्हणुन त्यांनी स्वता दुसरा विवाह ब्राह्मन मुलीशी केला व समाजाला तसे करण्यासाठी मार्ग शोधुन दिला.
बामसेफने आरएसएसच्या विवाह न करताच कार्यकरण्याचे तत्व स्विकारले व बाबासाहेबांच्या अंतरजातीय विवाहाचा फॉर्म्युला कसा फेल करता येयील यासाठी सतत प्रयत्न केले.
ब्राह्मणांच्या मुली विषकण्या असतात असा प्रचार बामसेफने केला. यांच्या सर्व प्रमुख नेत्यांनी आरएसएस चे ब्रम्हचर्य स्विकारले व बाबासाहेबांसह सर्वच आंतरजातीय विवाह करणारांची बामसेफने अत्यंत खालच्या पातळीवर बदनामी केली.

12) महिलांशी गैरवर्तणुक - ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांकडे सर्व जग सर्वश्रेष्ठ शीलवान, चारित्र्यवान, प्रज्ञावान म्हणुन पहाते त्यांच्या नावाने चालणारी ही संघटना स्वतःच्या महिला कार्यकर्त्यांशी अतिषय नीचपनाने वागते, याबद्दल त्या संघटनेत काम केलेल्या महिलांनी तसे जाहीरने सांगीतले आहे, यु ट्युबर बर वामन मेश्राम एक्सपोज टाकले तरी सर्व विडीयो दिसतात ते आपन पाहु शकता, महिलांना,मुलींनी पुर्णवेळ कार्यकर्त्या व्हा असे सांगुन त्यांना परिषदेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी सात सात दिवसासाठी यायला सांगीतले जाते, स्वतः वामन मेश्राम वर तसे अनेक आरोप आहेत. विलास खरात चा तर कल्याण स्टेशनवर महिलांनी चपलांनी सत्कार केल्याचे मी ऐकले आहे.

13) आंबेडकर कुटुंबाची बदनामी - हा बामसेफ च्या कार्यकर्त्यांचा सर्वात आवडता छंद म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. बामसेफ आंबेडकर कुटुंबाची बदनामी कसे करते त्याचे काही ठळक मुद्दे

- बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर नेहरु साठी घरात दारुच्या बाटल्या ठेवायचे असे वामन मेश्राम जाहिर सभेत सांगतात.
- भैयासाहेब आंबेडकर सभेला आल्यास दारु मागायचे
- प्रकाश आंबेडकरांच्या घरात गणपती बसवतात
- सुजात आंबेडकरांची मुंज केली आहे.

पहा बाबासाहेब ते सुजात साहेब, बाबासाहेबांसह सर्व कुटुंबातील प्रत्येकावर वामन मेश्राम ने खोटे आरोप केलेले आहेत,
- भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व आता वंचित बहुजन आघाडी यांची बदनामी करने, यांच्याबद्दल अफवा पसरवने, हा वामन मेश्राम व गैंग चा धंदा आहे.
भिडे विरुद्ध प्रकाश आंबेडकर असा राज्यभर संघर्ष पेटला होता तेव्हा सुद्धा मेश्राम व गैंग प्रकाश आंबेडकरांची बदनामी करत होते,
तेलतुंबडे विरुद्ध आरएसएस असा संघर्ष पेटलाय यावेळी ही बामसेफने तेलतुबंडेची बदनामी सुरु केली.
आंबेडकर भवन पाडले तेव्हा प्रकाश आंबेडकर विरुद्ध रत्नाकर गायकवाड व फडनविस असा संघर्ष होता त्यावेळोही बामसेफ ने प्रकाश आंबेडकरांचीच बदनामी केली होती.

14) राजकीय भुमिका - बामसेफ हे सामाजिक संघटन आहे असे ते बोलतात पन निवडणुकात यांचा पाठींबा नेहमी जातीवादी पक्षांनाच दिला आहे. मागील वर्षी घरानेशाही तुन लोकशाही ला मुक्त करण्यासाठी महाराष्ट्रात एक लोकक्रांती झाली, वंचित बहुजन आघाडीने मोठा तांडव केला, पन वामन मेश्राम नी यावेळी त्यांची राजकीय भुमिका मांडताना वंचित बहुजन आघाडी जो पक्ष बहुजनांची राजकीय गुलामी संपवणारे पर्व घडवत होते तेव्हा वामन मेश्राम ने वंचित आघाडीची बदनामी करत राष्ट्रवादी कॉंग्रेस ला जाहीर पाठींबा जाहीर केला. ज्या राष्ट्रवादी ला महाराष्ट्रातील जातीवादी पक्ष म्हणुन आंबेडकरी समाज त्यापासुन दुर रहातो.
तरीही बामसेफ त्यांनी राजकीय पाठींबा देतो हे विशेष.
15) आर्थिक गैरव्यवहार - बामसेफ या संघटनेकडे देशातील सर्वात जास्त पैसा जमा होतो, या हि संघटना कामगारांची असली तरी यांचा प्रमुख हा कामगार नाही, हि संघटना आजवर करोडो अरबो रुपये जमा करुन ती खाऊन बसली, कोणाला कोणताही हिशोब दिला गेलेला नाही, दिला जातही नाही.
बाबासाहेबांनी लोकवर्गनीतुन त्याकाळी एकट्याच्या जीवावर कॉलेज, होस्टेल, संस्था उभ्या केल्या पन बामसेफने अनगिनत पैसा गोळा करुन त्यातुन काहीही निर्माण केले नाही, सर्व पैसा खाऊन डकार सुद्धा दिला नाही.
यांच्या बद्दल त्याच संघटनेच्या काही पदाधिकार्यांनी 2015 ला बंड करुन वामन मेश्राम ची बदमाशी जनतेसमोर आनली होती पन बामन मेश्राम चे ब्रेनवॉश कार्यकर्ते मेश्राम समोर बाबासाहेबांचा अपमान सहन करतात तर बाकींचे काय?

16) सक्रिय आंबेडकरी कार्यकर्त्यांना डायवर्ट करने -
हा या संघटनेचा ठरलेला कार्यक्रम आहे, काही दिवस लक्ष ठेवले तरी कुनालाही याची प्रचिती येऊ शकते, ज्या ज्या वेळी आंबेडकरी कार्यकर्ते संघ भाजपाला एखाद्या मुद्दायवरुन घेरतात त्या त्या वेळी बामसेफ कडुन एखादा नविन मुद्दा चर्चेला आणुन सर्व कार्यकर्त्यांना संघ भाजपा च्या विरोधापासुन स्वताकडे डायवर्ट केले जाते, सक्रीय कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या बिनकामाच्या चर्चांमधे गुंतवुन ठेवुन संघ भाजपाचा रस्ता मोकळे करणे हाच एकमेव उद्देश्य असतो.

17) भारतीय लोकप्रतिनिधींसाठी बाबासाहेबांनी २२ प्रतिज्ञा दिलेल्या नाहीत, त्या प्रतिज्ञा धर्मांतरीत बौद्धांसाठी 1956 ला बाबासाहेबांनी दिल्या होत्या, त्या बौद्धांसाठी वैयक्तिक संविधानच आहेत पन प्रजासत्ताक भारताचा लोकप्रतिनिधी म्हणुन समाजात काम करत असताना संविधान हे त्यांच्यासाठी अनिवार्य असते, लोकप्रतिनिधी हा सर्व धर्म, पंथांचा सन्मान करणारा असावा असे बाबासाहेबांनी म्हटले आहे पण जर एखादा बहुजन लोकप्रतिनिधी सार्वजनिक धार्मिक सोहळ्यात, मंदिरात, एखाद्या सार्वजनिक समारंभात गेला तर बामसेफ चे कार्यकर्ते त्या नेत्याला गद्दार, आंबेडकर द्रोही ठरवतात, खरे पाहीले तर लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक जिवनात धार्मिक कट्टरवाद जोपासने हा आंबेडकरद्रोह आहे पण बामसेफ संविधानाच्या मोडमोडीची एकही संधी सोडत नाही. वरुन स्वताला बुद्धीजीवी असे बिरुद यांनी स्वता लावुन घेतलेले आहे.

मित्रांनो, भारतीय संविधान राजकिय पातळीवर भाजपा व आरएसएस संपवत आहे तर सामाजिक पातळीवर ते संपवायचे कठीन कार्य करण्यासाठी त्यांनी बामसेफ सारखी उपशाखा तयार करुन सोडलेली आहे हेच यातुन सिद्ध होते.
बाबासाहेबांचा धम्म, बाबासाहेबांचे संविधान, बाबासाहेबांची जाती अंताची चळवळ अपयशी करण्याचे सर्व प्रयत्न आंबेडकरी चळवळीचा बुरखा पांघरुन केले जात आहे,
हिरव्या गवतात हा हिरवा साप सोडला आहे, त्याला ओळखा व यांच्यापासुन सावध रहा.

बामसेफ नेहमी डॉ बाबासाहेबांचे रक्ताचे नाही तर आम्ही विचाराचे वारस आहोत असा प्रचार करत असते पन त्यांचे सर्व कार्य आंबेडकरांचे विचार गाडण्यासाठीच आहे हे सुर्यस्त्य आपणास दिसत नसले तर याच्यासारखे दुसरे दुर्दैव नाही.

- मनोज काळे,ठाणे 8169291009
____________________________
** मनुवादाचे बळी डॉ आनंद तेलतुंबडे...!
           आणि
एक भारतीय म्हणून आपली जबाबदारी...!
--------------------------------------------
 डॉ आनंद तेलतुंबडे यांना ज्या UAPA कायद्याखाली अटक झाली,तो कायदाच मुळात संवैधानिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारा कायदा आहे...!
  असे कायदे सांसदीय लोकशाहीत का बनविले जातात...??
    या प्रश्नाच्या मुळाशी गेल्यास खरे सत्य ऊलगळते...!
   ज्या सत्ताधारी वर्गाला सांसदिय लोकशाही मान्य नाही मात्र ती एक शासन पद्धती म्हणून स्विकारली आहे असे मुठभर विषमतावादी सत्ताधारी आपला फॅसिष्ट अजेंडा राबविण्यासाठी ,अघोरी बहुमताच्या आधारावर असंवैधानिक कायदे जसे की, मिसा,पोटा,मकोका,UAPA असे कठोर आणि लोकशाहीचा गळा घोटणारे कायदे तयार करतात आणि आपला फॅसिष्ट अजेंडा राबवितात...!
    सत्तर वर्षांचा सांसदीय लोकशाहीचा अनुभव सांगतोय की,मिसा कायद्याखाली ज्यांना ज्यांना अटक झाली होती त्यांचेवर सुड ऊगवण्यात आला होता, त्यांच्या अटके आडून सांसदीय लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला, तीच गत पोटा कायद्यांची होती, अनेक मुस्लिम तरुणांना कुठलीही संधी न देता जेलात डांबण्यात आले होते. त्यांच्यावर खोटे आड घेण्यात आले होते आणि त्यांच्या जीवनातील १०-१५  वर्षे फुकटं जेलात गेली नंतर त्यांच्यावर केस ऊभी राहु शकली नाही, आजच्याUAPA कायद्यांच सुद्धा तेच धोरण आहे...!
   हा कायदा विवेकाचा आवाज दाबतो आहे...!
   जगभर विचारांची पुजा केली जाते मात्र भारतात विचारवंतास तुरुंगात डांबण्यात येतं आहे हे कशाचे लक्षण आहे...??
     संविधान खुंटीला टांगून मनुस्मृती रुजू झाली आहे...!
 डॉ आनंद तेलतुंबडे यांची ही पहिलीच केस नाही, यापुर्वीही कन्हैया कुमार यांच्या वर देशद्रोहाचा आळ घेण्यात आला होता परंतु केस ऊभी राहु शकली नाही...!
 डॉ आनंद तेलतुंबडे यांना ज्या केसमध्ये अटक झाली ती एल्गार परिषदेची केस फॉड आहे...!
   असा अभिप्राय अनेक विद्वानांनी दिला आहे...!
   जगातील दोनशे पेक्षा अधिक विचारवंतांनी डॉ आनंद तेलतुंबडे यांच्या अटके विरोधात सरकारला निवेदन देऊन मानवतावादी दृष्टिकोन बाळगण्याची अपिल केली होती...!
          ३१ डिसेंबर २०१७ ला पुण्यात जी एल्गार परिषद आयोजित केली होती त्या परिषदेचे आयोजक माजी न्यायमूर्ती बी जी.कोळसे पाटील यांनी खुलासा केला आहे की, एल्गार परिषदेचा आणि डॉ आनंद तेलतुंबडे यांचा दुरान्वयानेही कुठलाच संबंध नाही...!
      ज्या पुण्याच्या पोलिसांनी डॉ आनंद तेलतुंबडे यांच्या वर आरोप लावले आहेत त्यांनी ठोस असा एकही पुरावा कोर्टा समोर सादर केला नाही सबब धनंजय चंद्रचूड या  न्यायमूर्तींनी त्यावर ताशेरे ओढले आहेत...!
    ज्या एल्गार परिषदेच्या दुसऱ्या दिवशी भिमा कोरेगाव दंगल घडली त्या दंगलीतील FIR दाखल झालेले दंगलखोर मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे मात्र मोकाट फिरत आहेत आणि ज्यांचा कुठलाच संबंध नाही परंतु जागतिक किर्तीचे विचारवंत आहेत त्यांच्या वर जरUAPA सारखा कायदा लाऊन त्यांना तुरुंगात डांबण्यात येतं असेल तर याचा सरळ अर्थ असा आहे की, संविधान खुंटीला टांगून मनुस्मृती चा अमलं सुरू झाला आहे...!
 डॉ आनंद तेलतुंबडे यांनी संवैधानिक रितीने हायकोर्टाचा आणि सुप्रिम कोर्टाचा दरवाजा खटखटावून संवैधानिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होऊ नये म्हणून आर्जव केले मात्र निकाल लागला नाही, याचा अर्थ संवैधानिक मार्ग अवरुद्ध करण्यात आला आहे...!
   जिथं संवैधानिक मार्ग अवरुद्ध होतो आणि हम करे सो कायदा सुरु होतो मित्रांनो,तिथं ख-या अर्थाने  विचार करुन कृती करण्याची वेळ आलेली असते...!
      मनुस्मृती चा अमलं सुरू झाला आहे ही मनुस्मृती केवळ मुठभर लोकांच्या हितासाठी राबविली जाते हा हजारो वर्षाचा अनुभव आपल्या देशाच्या गाठीशी आहेच...!
     आज डॉ आनंद तेलतुंबडे यांना अटक झाली आहे,ऊद्या हीच मनुस्मृती स्त्रीला दुय्यम स्थानी ढकलण्यासाठी प्रयत्न करणार आहे...!
   ऊद्या हीच मनुस्मृती शुद्राला अर्थात ओबीसी बांधवांना निःशुल्क आणि ब्राम्हणाची सेवा चाकरी करण्यासाठी गुलाम बनविण्यासाठी  प्रयत्न करणार आहे...!
   अतिशुद्र वर्गाला अर्थातच एस.सी.एस.टी ला पुन्हा अस्पृश्य बनवुन जनावरापेक्षाही हीन जगणं जगायला भाग पाडेल...!
    हा टप्याटप्याने राबवायचा आराखडा आहे...!
   आता आपणा सर्वांची काय जबाबदारी आहे...?
  स्त्रीयांना संविधानाने समतेचे हक्क व अधिकार प्रदान केले आहेत आता मनुस्मृती  नुसार पुरुषांची दासी बनुन दूय्यम नागरिकत्व मान्य करायचे का.?
    ओबीसी असतांना आणि संविधानाने समतेचा हक्क व अधिकार प्रदान केला असतांनाही मनुस्मृतीची गुलामी स्विकारायची का.?? 
    एस सी,एस टी बांधवांनो यापूर्वी अस्पृश्य बनवुन तुमच्या पुर्वजांना जनावराहून ही हीन जगणं जगायला भाग पाडले होते त्याची पुनरावृत्ती होऊ द्यायची का.??
      मुठभर विषमतावादी आपल्या देशातील मोठ्या वर्गाला गुलाम बनविण्यासाठी प्रयत्न करतो आहे,त्यासाठी सर्वच संवैधानिक मार्ग अवरुद्ध करीत आहे, अशावेळी आपणं स्वस्थ बसणार आहोत का.??
    एक भारतीय नागरिक म्हणून माझी काय जबाबदारी आहे..? याचे आत्मपरीक्षण माझा ओबीसी,एस.सी.एस.टी,स्त्रिया आणि आदिवासी तथा अल्पसंख्याक मुस्लिम बांधव करणार आहे की नाही...??
   आपल्या देशावर अनेकदा अशाप्रकारचे अन्यायी कायदे करुन गुलाम करण्याची प्रक्रिया झालेली आहे आपले पुर्वज फेन्च,डच,इंग्रज अशा परकियांचे गुलाम होतेच इंग्रजांच्या गुलामीत १५० वर्षें होते...!
    कायदा विरोधात असुनही म. गांधी यांनी जनरेटा, जनआंदोलन उभे केले आणि शासनाला विचार करायला भाग पाडले होते...!
   स्वतंत्र भारतात आणि सांसदीय लोकशाहीत निवडणूक,कोर्ट, पोलिस, आणि मिडिया यांनी संवैधानिक मार्ग अवरुद्ध केला असेल तर जनआंदोलन हा मार्गच प्रभावशाली हत्यार होऊ शकतो बघा मित्रांनो पटतेय का.??
        जयभीम.
@.. भास्कर भोजने.

Friday, 10 April 2020

भिमजयंतीेचे स्वरुप ( आत्मचिंतन)


भीमजयंतीचे स्वरुप - महामानवाचा सन्मान की ..........?
( आत्मचिंतन)
- मनोज नागोराव काळे. 

मित्रांनो, सदर लेखाचे शीर्षक कदाचित तुम्हाला खटकण्याची शक्यता आहे, पन वास्तवाचे भान व डॉ बाबासाहेब यांच्या विचारांप्रती तुम्ही प्रामाणिक राहुन थोडासा विचार केलात तर तुम्ही या शीर्षकास व या पारंपारिक चालत आलेल्या जयंती स्वरुपावरील लेखास दुजोरा द्याल यात मला शंका वाटत नाही.
वरवर पाहिले तर भारतभरात किंवा आपल्या महाराष्ट्रात भीमजयंती म्हणजे मोठा उत्सव, भीमजयंती म्हणजे आमचा एकमेव सण, भीमजयंती म्हणजे आमचा बाप येतोय, भीम जयंंती म्हणजे फक्त जल्लोष अशा प्रकारचे एक स्वरुप दिसते, प्रत्येकजन या दिवसाची वर्षभर वाट पहाताना दिसतो.
आणि सर्वांच्या प्रतिक्षा संपवत १४ एप्रिल चा दिवस येतो व सर्वांचा जल्लोष एकदाचा घडुन येतो, महाराष्ट्रात तर भीम जयंती पासुन बुद्ध जयंती या दरम्यान साधारन एक महिनाभर हा कार्यक्रम वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो, मी मराठवाड्याचा असल्यामुळे मी या सर्व जयंत्या स्वतः पाहिल्या आहेत व ते उघड्या डोळ्यांनी पाहुन, बाबासाहेबांचे लिखान वाचल्यानंतर मला एक गोष्ट ध्यानात आली आहे की भीम जयंती दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा गौरव होत नसुन त्या दिवशीच या महामानवाची त्यांच्याच भक्तांकडुन जाहिररित्या वाजत गाजत विटंबना केली जाते. हे सत्य मला नाईलाजाने मांडावे लागत आहे.
भिमजयंती ला आता आलेले स्वरुप म्हणजे एखाद्या संत माणसाने आयुष्यभर दारुबंदी साठी झटावे व नंतर त्यांच्याच भक्तांनी त्या संताच्या नावाने मोठे दारुचे दुकान लावण्यासारखेच आहे किंवा एखाद्या महापुरुषाने जीवनभर अहिंसा तत्वासाठी खर्ची घातले असतील त्याच महापुरुषाच्या नावाने कत्तलखाना सुरु करुन आम्ही त्या महापुरुषाचे अनुयायी आहोत व आम्ही त्या महापुरुषाचा हे दारु दुकान किंवा कत्तलखाना त्यांच्या नावाने सुरु करुन त्यांचा गौरव करत आहोत असे बोलण्यासारखेच आहे.
विषय खुप गंभीर आहे, विषय अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे त्यावर प्रत्येकाने वैयक्तिक आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
हे सत्य मांडुन आपल्यातीलच काही अज्ञानी किंवा अति बुद्धीजीवींच्या रोषाला मला सामोरे जावे लागेल याची कल्पना असुनही मी हे सत्य मांडायचे ठरवले आहे याला कारणही तसेच आहे, क्रांतीबा ज्योतीबा फुलेंनी लिहीलेला शेतकर्यांचा आसुड वाचत असताना जानवत होते की ब्राह्मनांनी हिंदु समाजाला लुबाडण्यासाठी अनेक सण, कर्मकांड व व्रत वैकल्यांना जन्म दिला आहे, त्यांना संस्कृतीचे नाव देऊन ब्राह्मन लोक बहुजनांनी स्वकष्टाने कमावलेला घामाचा पैसा अलगदपने त्यांच्यापासुन काढुन घेत असतो, हि संस्कृतीच्या नावाने बहुजनांची होणारी आर्थिक लुट आपन हिंदु धर्म सोडुन बौद्ध धम्म स्विकारल्या नंतर कमी होत गेली, तेव्हा भटांनी त्यांचा रोजगार हमी योजनेचा कार्यक्रम असलेला सत्यनारायण घरा घरात पोचवुन त्याच्या आडुन पैसे लाटायचा धंदा वाढवला पन तरीही काही बौद्ध व आंबेडकरी समाज सत्यनारायणाला स्विकारयला तयार नव्हता. त्यानंतर हळुहळु भीमजयंतीलाच वाढती लोकप्रियता पाहुन भांडवलदारांनी या दिवसाला मार्केट बनवले.
काही लोक भीमजयंतीचे आजचे आलेले विकृत स्वरुप पाहुन त्या कार्यक्रमाला "निळ्या कोटातला गणपती" म्हणतात, त्यात मलाही थोडा विचार केल्यास तथ्य आढळले. मागच्या विस वर्षात भिमजयंती व सार्वजनिक गणेशोत्सव यात फक्त मुर्तीचाच फरक उरला आहे, ते लोक गुलाल उधळतात तर आपन निळ उधळतो, ते लोक धांगडधिंगाना करुन विचित्र नाचतात तेच आपन डिजे भिमगितांवर करताना दिसत आहे, ते लोक गल्ली गल्लीतुन मिरवणुका काढुन चढाओढ करतात तसीच चढाओढ व मिरवणुकात स्पर्धा आपल्यातही असते. ते लोक जशी दादागीरी करुन वर्गनी गोळा करतात तसेच काही अपवादात्मक का असेना घडताना दिसतेच, ते लोक ऑर्केष्ट्रा ठेवतात, पत्ते खेळतात तर आपलेही लोक ऑर्केष्ट्रा ठेवतात, व त्याच भिम विचारांची विटंबना करणारे गाणे लावुन बिनधास्त नाचतात, भिम के लक्ते जीगर आधे इधर आधे उधर या गाण्याचे डिजे स्वरुपात लावुन नाचताना मी पाहीले आहे, जे गीत समाजाच कशी दुफळ्या पडल्यात हे सांगते त्याची लाज वाटायची सोडुन बुद्धीजीवी नाचताना दिसतात,
एक नविनच गीत आहे उडतो धुरुळा, ज्याचे प्रत्येक कडवे बाबासाहेबांच्या उच्च विचारांची विटंबना करणारे आहे ते गाणे लावुन बिनधास्त नाच केला जातो,
भिमगीत कशाला म्हणावे हे सुद्धा आजकालच्या गायक मंडळींना भान राहीले नाही, व ते लावुन नाचणारांना शुद्ध नाही.
निळा झेंडा हा बहुजन अस्मिता व विशालतेचे प्रतिक होता तो आता  फक्त धुरुळा उडवायच्या कामाचा राहीलाय का?
या गीतामध्ये मांडले आहे की आमच्या नादी लागनारांचे डोळे काढु, हात लुळा करु अशी भाषा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संपुर्ण जीवनात कधीतरी केली होती का?
बाबासाहेबांच्या नावावर बाबासाहेबांच्या विचारांची मोडतोड करणार्या गीतांना आपन भीमगीत का बोलतो? हे आणि असे अनेक गीते आता बाजारात आलेत जी बाबासाहेबांच्या पुर्ण जीवन संघर्षाचा अपमान करणारी आहेत. मी एक उदाहरना पुरते दिले आहे बाकी आपन सुज्ञ आहात, यापुढे गीतांचा अर्थ समजुन घ्याल अशी अपेक्षा करतो.
हिंदु लोक गणेश मुर्तीचे विसर्जन करतात पन आपन मात्र बाबासाहेबांच्या विचारांची विटंबना करतो हाच तो काय या दोन उत्सवात फरक दिसतो.
बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला त्याच्या फोटो किंवा मुर्तीसमोर दारु पिऊन बिभत्स नाचनारेही कमी नसतात, ही बाबासाहेबांची विटंबना नव्हे का?
ज्या महामानवाने एकीचे महत्व सांगताना जीवन खर्चले त्यांच्या जन्मदिनी आपापल्या गल्ली मोहल्ल्याच्या वेगवेगळ्या मिरवणुका काढुन, त्याची स्पर्धा करणे ही महामानवाच्या विचारांची विटंबना नव्हे का?
बाबासाहेब सुद्धा तथागत बुद्ध, क्रांतीबा फुले व कबीरांना आपल्या गुरुस्थानी मानत होते, पन त्यांनी या तीन महामानवांची जयंती अशा रितीने कधी साजरी केली असे आपनास दिसले का? कि आपन बाबासाहेबांना मानतो त्यापेक्षा बाबासाहेब त्या गुरुंना कमी प्रमानात मानत होते का?
बाबासाहेबांचे जीवन हाच आपल्यासाठी संदेश आहे असे आपन बोलतो मग आपन बाबासाहेबांच्या जन्मदिवशीच त्यांच्या विचारांना सर्वाधिक पायदळी का तुडवतो?
बाबासाहेबांनी त्यांचे आदर्श असलेल्या महामानवांना कशा स्वरुपात स्विकारले हे आपन का समजु शकत नाही?
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कबीरांच्या, फुलेंच्या, तथागत बुद्धांच्या विचांराना स्थापित करने महत्वाचे वाटले की त्यांच्या मुर्ती बसवने , स्मारके बांधने  व जयंत्या करने जास्त मोलाचे वाटले?
बाबासाहेब पुतळावादी असते पुस्तकवादी नसते तर आपला उद्धार झाला असता का? मग आपन का पुतळा, स्मारक यात अडकुन पुस्तकांपासुन, विचारांपासुन दुर झालोय?
आपन मार्ग भटकलोय, आपन ध्येयापासुन विरुद्ध दिशेने जातोय, आपन चळवळीच्या नावावर चळवळीचाच घात करतोय हे आपल्या लक्षात आलेले नाही पन हे चळवळीच्या शत्रुंना मात्र स्पष्टपने समजले आहे त्यामुळे तुम्हाला भाजपा, कॉंग्रेस, सेना, राष्ट्रवादी किंवा इतर मनुवादी राजकीय पक्षांचे पुढारी जयंती च्या वेळी भरघोस मदत करतात, हवी ती मदत पुरवतात कारण आपन जितके गाफिल राहु, आपन जितके ध्येया च्या विरुद्ध दिशेने चालु तितके त्यांच्या हिताचे रहाणार आहे, हे आपल्या लक्षातही येत नाही,
एखाद्या जयंती मंडळाने जर पुस्तकवादी, विचारांची देवानघेवान करणारी, चळवळीला योग्य मार्गावर नेणारी जयंती करायचे ठरवले तर पहा किती बौद्धेतर लोक त्याला मदत करतील.
जागृतीचा विस्तव तेवत ठेवा असे बाबासाहेबांनी सांगीतले होते पन असा जागृती करणारांना हे चाणाक्ष जातीवादि एकटे पाडतात व चंगळवादी चळवळ्या वळवळ्यांना भरघोस मदत करुन चळवळीला दिशाहीन कसे ठेवता येईल याचा प्रयत्न करतात.त्यामुळे भीमजयंती ला आलेले जत्रेचे स्वरुपच चळवळीला कमकुवत करण्यासाठी भीमद्रोही लोकांना सोयिस्कर व सोपा मार्ग सापडलेला दिसतो आहे.
भीमजयंती हे एक खुप मोठे मार्केट झाले आहे, झेंडे, निळ, पताका, फटाके व आतिषबाजी, इलेक्ट्रिक रोषनाई, डिजे, बैन्जो किंवा बैंड, आकाश कंदिले या गोष्टींची कोट्यावधींची उलाढाल होते व हा सर्व धंदा करणारे भांडवलदार हे उच्चवर्णिय, मारवाडी गुजरातीच प्रामुख्याने आढळतील.
ज्या आर्थिक लुटी पासुन आपले रक्षण व्हावे या हेतुने आपले कर्मकांड, जत्रा, देव देव , हिंदु धर्म यापासुन बाबासाहेबांनी आपणास सोडवले आपन बाबासाहेबांच्याच नावाने तो धांगडधिंगा पुन्हा आनला आहे व त्याला समाजमान्यताही मिळत आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांसमोर वेडेवाकडे नाचताना आपणास शरमही कशी वाटत नाही? त्यांनी एकट्याच्या बुद्धीच्या, नितीमत्ता व शीलाच्या जोरावर हजारो वर्षाचा इतिहास फक्त ३६ वर्षात बदलला आहे पन आपन लाखो लोख शिकुनही चळवळीला तसुभरही पुढे नेऊ शकलेलो नाहीत मग आपनास बाबासाहेबा समोर त्यांच्या जन्मदिनीच नाचने शोभते का?
बाबासाहेबांच्या जयंतीत लाखो रुपयांचा चुराडा करुन आपन बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान करतोय याचे भान कधी येणार आहे की नाही?
एक दिवस नाचनार बाकी दिवस वाचनार असे बोलणा-यांनी मागील ३६४ दिवसात काय वाचले आहे व त्या वाचनाचा समाजाच्या प्रगतीसाठी कसा उपयोग करणार?
बाबासाहेबांनी जर त्यांच्या आदर्शांची जयंती साजरी करताना फक्त त्या महापुरुषांच्या विचारांना आचरणात आणणारी पिढी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले होते मग आपन बाबासाहेबांना गणपती सारखे स्वरुप देऊन काय साध्य करत आहोत याचे चिंतन व्हायला हवे.
बाबासाहेबांच्या जयंतीला आपन आजवर काय केले व येत्या वर्षभरात काय करायला हवे यावर विचारमंथन होण्याची प्रथा आपल्याकडे असती तर गेल्या साठ वर्षात आपन साठ वेळा आपन आपले स्वताचे मुल्यमापन केले असते व साठ वेळा एक एक वर्षाचे ध्येय धोरने आखुन बराच मार्गक्रमन केले असते, पण माझा जन्म १९८४ ला झाला तेव्हा पासुन आतापर्यंत भीमजयंती म्हणजे काय असते हे दरवर्षी पाहुन आज मला खरच स्वतःची शरम वाटते, 
कि आपल्याला ज्ञानसुर्याने जन्म दिला पन आपन त्या सुर्यालाच बैटरी लावुन चमकण्याचा प्रयत्न करत राहीलो जो स्वतःच तेजोमय व स्वयंप्रकाशीत आहे, त्या सुर्यप्रकाशाने आपन आपले काही चांगले करुन घेण्यास असमर्थ ठरलोय.
सत्तर वर्ष झाले स्मारक, पुतळा, चोकाला नाव, समाज मंदिर याच विवंचनेत आपन दिसतोय, मनुवादी विचारांचे, घरानेशाहीचे राजकारन करणारे असाच एक मुद्दा आपल्या तोंडावर मारुन आपल्यावर बिनदिक्कतपने राज्य करत आलेत,
आपन महामानवाला आपला बाप मानतो तर मग आपन महामनवाच्या विचारांशीच इमान राखले पाहीजे, महामानवा समोर नाचने कुणालाही अशोभनियच आहे, गल्ली ते दिल्ली पर्यंत आरएसएस ने सत्ता हस्तगत केली आहे, जम्मु कश्मिर व आसाम हे दोन राज्य या हिटलरवाद्यांनी गिळंकृत केली आहेत, आता दिल्ली ला आर्धे गिळले आहे, एकदाच पुर्ण भारत गिळने यांना परवडनारे नाही म्हणुन एक एक राज्य ते हस्तगत करत आहेत, संविधान कुठेही लागु नाही, फक्त ते जिवंत असल्याचा भास जागा ठेवला गेलाय, लोकशाहीचे चारही खांब त्यांची बटिक बनले आहे अशा परिस्थितीत कोणत्या तोंडाने बाबासाहेबांच्या फोटोसमोर नाचणार आहात?
आपन लाखो रुपयांची उधळन करुन त्या महामानवाच्या त्याग बलिदानाची थट्टा करतोय, कारण आपन आजही राजकीय वाटा, बेरोजगारी, दारिद्र्य, गरीबी, जातीभेद या समस्यांना सोडवु शकलेलो नाही,दररोज एका बहिनीवर बलात्कार होतोय, रोज एकाची धिंड निघते, आपन कोणत्या गोष्टिचा जल्लोष करतोय? आपली संवेदनशीलता आपल्या जोश व जल्लोषा समोर थिटी पडतेय का?
कि डॉ बाबासाहेब आंबेडतर यांची व्यापक अर्थाची चळवळ काय आहे हे आपणास समजलेले नाही?
मी कोणावर वैयक्तिक टिका करत नाही, मी जे वास्तव स्वतः पाहिले आहे ते शब्दशः मांडतोय, तुम्ही सुद्धा यापेक्षा वेगळा काही अनुभव घेतला असेल असे मला वाटत नाही,
आता आपन गाफिल रहायची वेळ नक्कीच नाही उरली, आता हुकुमशहाने त्याची मुठ घट्ट आवळली आहे, मागील सहा वर्षात विद्यार्थी, महाविद्यालये यावर होणारे हल्ले आपन पहातोच आहोत त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांना वाढवने हे मोलाचे आहे, आपन श्रीमंत आहोत अशा अविर्भावात आपन बाबासाहेबांच्या गरीबी व त्यागाचा अपमान होईल असे वागने टाळायला हवे, बाबासाहेबांची जाती अंताची चळवळ लोकशाही मार्गाने चालवावी लागेल, त्यासाठी लोकशाही टिकवावी लागेेल. तुम्ही तुमच्या जन्मभरात कोणत्या वर्षी वैचारिक जयंती साजरी केली आहे का? याचा स्वतःच विचार केलेला बरा राहिल.
आपला उद्धार हा बाबासाहेबांच्या पुतळा स्मारकाने केलेला नसुन बाबासाहेबांच्या उच्च व सच्च्या विचारांनी केला आहे त्यामुळे विचार जपने आपले कर्तव्य आहे, या भारतात मनुचा फक्त एकच पुतळा आहे पन केंद्रात बहुमताने सत्तेवर बसलेले कट्टर मनुवादी संघ भाजपवाले मनु, गोळवळकर, हेगडेवार यांचे कुठेच पुतळे उभारताना आपनास दिसनार नाहीत तर ते लोक गोळवळकर व  मनुचा विचार मानसा मानसात रुजवण्यासाठी दिवसाात्र एक करुन झटताना दिसतील व ते त्यामुळे यशस्वी होतात. एकही ऑक्रेष्ट्रा, कव्वाली, सामना न करता मनुवाद पेरण्यात त्यांना यश कसे काय मिळाले याचे चिंतन होमे आवश्यक आहे.
आपन बाबासाहेबांचे फक्त गुनगान करतो, बाबासाहेबांच्या कार्य, त्यागाची आठवन करतो व जयंती चा दिवस आमच्या मुक्तीदात्याने आम्हाला गुलामीतुन सोडवले असे म्हणुन साजरा करतो पन आपली आताची कृती ही पुन्हा गुलामीकडे नेनारी आहे, आपल्या कृतीतुन महामानवाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणुन करत असलो तरी तिचे स्वरुप महामानवाच्या पुर्ण जीवनाचा घोर अपमान करणारी आहे याचे भान मात्र आपनास नसते,
खुप लिहीले, क्षमा करावी, पन मनु आपल्या छाताडावर बसुन थयथयाट करत असताना जर आपन बाबासाहेबांना शुद्ध वैचारिक स्वरुपात स्विकारले नाही तर मात्र आपल्यासारखे करंटे आपनच.....
भीमजयंती ला निळ्या कोटातला गणपती करायचा कि "बोधिसत्व बाबासाहेब" करायचे सर्वस्वी तुम्हा बुद्धीजिवींवर सोपवतो.
( आपन किती अंतर चाललो यापेक्षा आपन कोणत्या दिशेने चाललो याला महत्व असते)

टिप - हा लेख देशात लॉकडाऊन लागण्यापुर्वी परंपरागत होत असलेल्या जयंती सोहळ्याच्या स्वरुपाबद्दल आत्मचिंतन म्हणुन लिहीला होता.
जगभरात कोरोना व्हायरस ने दहशतीचे वातावरन तयार केले आहे, भारतात फिजीकल डिस्टंसिंग लागु केले आहे त्यामुळे यावर्षी जयंती तसेही आपनास सार्वजनिक रित्या साजरी करायची नाही, असे अवाहन देशातील एकमेव जागृत नेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे, त्यांचे मी मनःपुर्वक आभार, मानतो, बाळासाहेबांनी आवाहन केल्यामुळे या वर्षी भिमजयंती सर्वांनी आपापल्या घरातच साजरी करायची आहे व ते कसे केले याचे फोटो व विडीयो सोशल मिडीयावरुन प्रसारित करायचे आहेत, लॉकडाऊन परिस्थितीमुळे "प्रबुद्ध भारत" चैनलच्या माध्यमातुन बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जगातली पहिली ऑनलाईन डिजीटल जयंती करण्याचा उपक्रम सुद्धा केला आहे, आपल्यापर्यंत आपल्या आवडीचे वक्ते, गायक, कवी, कार्यकर्ते यांचे विचार घरपोच मिळतील हा सुद्धा एक नवा विक्रम आपन करत आहोतच.
१३ तारखेला रात्री कदाचित लॉकडाऊन उठवले गेले तरी कुनीही १४ तारखेला एकत्र जमायचे नाही कारन या व्हायरसला तुमची निष्ठा, तुमची चळवळ, तुमचा जोश हे काहीही कळत नाही हा व्हायरस जिवघेना आहे त्यामुळे हा व्हायरस संपला आहे असे  WHO जोपर्यंत जाहिर करत नाही तोवर आपन आपल्या लोकांची,  आपल्या परिवाराची काळजी घ्यायची आहे. आपल्यातील जे लोक बाबासाहेबांचे अनुयायी नसतील ,ज्यांना समाजाला धोक्यात घालावे वाटत असेल तेच निर्बुद्ध लोक बाहेर पडतील व पोलिस कारवाईला बळी पडतील, सुज्ञानी लोकांनी हि जयंती आपल्या परिवारा सोबत साजरी करायची आहे अशी हात जोडुन विनंती करतो.

- मनोज नागोराव काळे, 8169291009



____________________________________

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...