काल ऊत्तर प्रदेशातील हाथरस येथे कॉग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना ऊत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली असा कांगावा करीत कॉग्रेस पक्ष रस्त्यावर ऊतरला आहे...!!
दलितांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न कॉंग्रेस पक्ष करीत आहे...!!
खरं म्हणजे कॉग्रेस आणि भाजप मध्ये काहीच फरक नाही, हे आता देशातील दलित आणि मुस्लिम समुहाला कुणीही सांगायची गरजच राहिली नाही,एवढं मोठं अनुभवाच गाठोड जनतेच्या जवळ जमा झालं आहे...!!
१९७३ मध्ये गरीबी हटाव चा नारा देणारा कॉग्रेस पक्ष किती दगलबाज आहे हे आता पुन्हा पुन्हा सांगायची गरजच नाही...!!
,गरीब अधिक गरीब झाला तथा दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीची टक्केवारी वाढतचं गेली...!!
कॉंग्रेस पक्षाच्याच सरकारने भांडवली निर्णय घेऊन खाजगीकरण केले देशात भांडवलदारांसाठी नवं दालनं उघडलं आणि नवा भांडवलदार वर्ग निर्माण झाला...!!
गरीबांच्या नांवानें दलितांची मते घेतली आणि काम मात्र भांडवलदार भावंडासाठी केलं हे आज सिद्ध झालेले आहे.आता कॉग्रेस पक्षाने आणखी नौटंकी करु नये...!!
कॉंग्रेस का हाथ,गरीबोके साथ...!!
अशी भावनिक साद घालायची मात्र गरीबांना देशोधडीला लावायचं काम कॉग्रेस पक्षाने केले याचा अनुभव देशातील जनतेने घेतला आहे...!!
दलित, मुस्लिम समाजाची मते घेऊन कॉग्रेस पक्षाने संपूर्ण देशात जातदांडगे नेते निर्माण केले, घराणेशाही मजबुत केली आणि जातियवाद मजबूत केला,त्याचीच फळे आज दिसतं आहेत...!!
दलितांवर इथला मोठ्या जातीचा धनदांडगा हा जातीय अत्याचार आणि अन्याय करतो आहे...!!
ज्या हाथरस गॅंगरेप प्रकरणाचा निषेध नोंदवायला राहुल गांधी आणि प्रियंका गांधी चालल्या होत्या ते बलात्कारी कोण आहेत,..??
ऊत्तर प्रदेशातील जातदांडगे "ठाकुर" जातीचे नराधम आहेत...!!
ऊत्तर प्रदेशातील या जातदांडग्यांना आजपर्यंत कॉग्रेस पक्षानेच मोठे केले आहे हे पाप कॉग्रेस पक्षाचेच आहे...!!
महाराष्ट्रात कॉग्रेस पक्षाचे सरकार असतांनाच खैरलांजी हत्याकांड घडले ते हत्याकांड जगाच्या वेशीवर टांगल्या गेले तरीही त्या हत्याकांडातील आरोपींना शिक्षा झाली नाही कारण उघडं आहे, सत्ताधारी पक्षाने पोलिस प्रशासनाला वापरून पुरावे नष्ट केले,कच्चे दुवे ठेवले आणि वरुन अतिरेक करीत त्याच खैरलांजी गावाला तंटामुक्त पुरस्कार दिला...!!
महाराष्ट्रातील मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाच्या आडुन दलितांची प्रचंड नाकेबंदी कॉग्रेस पक्षाच्याच सरकारने केली होती हा अनुभव आहे...!!
एक नाही अनेक घटना आहेत की, देशात दलितांवर अन्याय,अत्याचार हे कॉग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केले आहेत आणि सत्तेच्या माजोरीवर ते दडपून टाकण्यात आले आहेत...!!
आजही बेशरम कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या धक्काबुक्की साठी रस्त्यावर उतरले मात्र ते मनिषा वाल्मीकी या तरुणीला न्याय मिळावा अशी मागणी करीत नाहीत...!!
त्यांना दलित मुलीवर बलात्कार झाला किंवा दलितांवर अन्याय होतो याच्याशी काही देणंघेणं नाही...!!
केवळ राहुल गांधी,राहूल गांधी असा टाहो फोडाणारा मिडिया आणि मनुवादी कॉग्रेशी एकाच मानसिकतेचे प्रतिक आहेत,त्यांना दलित मुलीला न्याय मिळाला पाहिजे याच्याशी काही देणंघेणं नाही...!!
*भाजप आणि काँग्रेस पक्षाचं आर्थिक धोरणं एकच आहे...!!
* भाजप आणि काँग्रेस पक्षाचं निर्गुंतवणीकीचं धोरण एकच आहे...!!
* भाजप आणि काँग्रेस पक्षाचं भांडवलदार धार्जीन धोरणही एकसमान आहे...!!
* भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी वेळोवेळी आरएसएस या वैदिक संघटनेला मदतचं केली आहे...!!
*बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याचा मनसुबा भाजपाने आखला मात्र त्याला मुर्त रुप कॉग्रेस पक्षाच्या नरसिंहराव सरकारने दिले....!!
* भाजप धर्माच्या नावाने तर कॉग्रेस जातीच्या नावावर राजकारण करतो...!!
* कॉंग्रेस पक्षाने लोकशाही संपवून आणिबाणीचा प्रयोग केला होता,तोच प्रयोग आजच्या भाजपच्या सरकारनेही सुरू केलेला आहे...!!
मग कॉग्रेस आणि भाजप मध्ये फरक कोणता आहे...??
दर पाच वर्षांनी जेव्हा जेव्हा निवडणूका येतात तेव्हा तेव्हा भारतीय जनतेला फसविण्यासाठी या दोन्ही पक्षांची नाकटे सुरू होतात...!!
तु मारल्या सारखे कर...!!
मी रडल्या सारखे करतो...!!
हा नाटकाचा प्रयोग सुरू झाला आहे...!!
म.गांधीच्या हत्येनंतर जर आरएसएस वर कायमची बंदी घातली गेली असती तर आजचा दिवस दिसला नसता, परंतु कॉग्रेस पक्षाने सत्तेसाठी म.गांधीच्या हत्येचाही वापर केला आणि गांधी तत्वज्ञान गुंडाळून ठेवले...!!
तीच कॉग्रेस दलितांना काय न्याय देऊ शकेल...??
कॉंग्रेस पक्ष आता सत्तेसाठी नरकाश्रू गाळते आहे हे जनतेला पटलेले आहे...!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने.
No comments:
Post a Comment