** संदर्भासह स्पष्टीकरण...!!
" #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत".
त्याचे स्पष्टीकरण असे...!!
लॉकडाऊनमध्ये देश ठप्प झाला होता,गरीब माणूस एका सांजेचं जेवन मिळविण्यात असहाय्य झाला होता तेव्हा आंबेडकरवादी म्हणवून घेणारे कुठे होते...??
देशातील मजुर हजारो किलोमीटर पायी चालत गेला तेव्हा आंबेडकरवादी म्हणवून घेणारे आणि सत्तेत असणारे कुठे होते...??
गरीब माणूस आपला व्यवसाय बसला म्हणून भिकेला लागला होता तेव्हा सत्तेतील ठेकेदार , कारखानदार, घराणेशाही वाले, हातावर २८ लाखाचं घड्याळं बांधणारे,बीएमडब्लू गाड्यात ऊंडारणारे आणि बेगडी आंबेडकरवादी कुठे होते...??
असे अनेक प्रश्न समाजासमोर कोरोनाच्या काळात ऊभे राहिले तेव्हा सगळे राजकीय पुढारी घरात बसून मजा बघत होते हे वास्तव आता कुणालाही सांगायची गरजच नाही...!!
महाराष्ट्रात एकमेव वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर हे दौरे करीत होते आणि आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आदेश देऊन,कोरोना काळात धान्य वाटप करणे, रस्त्यावरच्या पायी चालणाऱ्या मजुराला जेवण आणि पाणी पुरविणे तथा गरीब वस्तीत राशन वाटप करीत होते हा इतिहास काही जुना नाही...!!
बंद असलेला महाराष्ट्र सुरु करण्याचे श्रेय कुणाचे...??
बंद महाराष्ट्र सुरु करण्याचे श्रेय केवळ आणि केवळ एकट्या बाळासाहेब आंबेडकर यांना जाते...!!
त्याचे कारण असे की, सलून दुकाने उघडण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेतला आणि सलूनची दुकाने सुरू केली...!!
छोट्या व्यवसाईकांची रोजीरोटी सुरू करण्यासाठी वंचित बहूजन आघाडीने आंदोलन केले आणि छोटे छोटे व्यवसाय सुरू झाले...!!
अलूतेदार बलूतेदार वर्गाच्या रोजीरोटीचा प्रश्न बाळासाहेब आंबेडकर यांनी ऐरणीवर घेतला...!!
संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी आणि एकाच वेळी डफली बजाव आंदोलन केले, बाळासाहेब आंबेडकरांनी नागपुरात डफली वाजविली आणि महाराष्ट्रातील एस टी बसेस सुरू झाल्या...!!
मंदिर उघडण्यासाठी आंदोलन केले ते महाराष्ट्रात गाजले पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारक-यांना परवानगी मिळाली आणि एसओपी तयार करून मंदिरे ऊघडू ही भाषा मुख्यमंत्री बोलले...!!
एकंदरित भयग्रस्त समाजाला हिम्मत देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी कार्यकर्ते घराबाहेर काढले लोकांना आंदोलने दिसु लागली आणि जनमाणसं भयमुक्त होण्यास मदत झाली म्हणूनच तर पंढरपूरला लाखों जनता रस्त्यावर उतरली...!!
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री महाराष्ट्र सुरु करण्यासाठी अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आंदोलनाला प्रतिसाद देतो आहे हे पाहून जुने जाणते काडीबाज आणि सरकारचे शिल्पकार म्हणवून घेणारे बुजुर्ग नेते कमालीचे अस्वस्थ झाले...!!
आम्ही सत्तेत असुनही आमचे नाव कुणी घेतं नाही आणि संपूर्ण महाराष्ट्र आंबेडकर सुरू करीत आहेत, ही आंतरीक जळफळाट मनात खदखदत राहिली...!!
वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर हे कोरोनाच्या संकट काळात जात आणि धर्माच्या पलिकडे जाऊन मानवतावादी भुमिका घेऊन सामाजिक मशागत करीत राहिले,त्याचा परिणाम असा झाला की, जनतेच्या लक्षात आले आहे...!!
सत्तेत असणारे केवळ मतदानाच्या वेळी आपल्या दारात येतात मात्र आपल्यावर संकट आले तर ते कामी येतं नाही. या भावनेतून सत्ताधारी वर्गाबद्दल प्रचंड रोष आणि मानवतावादी भुमिका घेणा-या नेतृत्वाबद्दल कमालीचा आदर समाजमनात निर्माण झाला आहे...!!
समाजातील ही भावना कायम राहिली तर आपली सत्ता जाणार या भितीपोटी सत्तेतील ठेकेदार, घराणेशाही वाले अस्वस्थ झाले आहेत...!!
अॅड बाळासाहेब आंबेडकर हे नेहमी सडेतोड बोलतात आणि स्पष्ट आरोप करतात हा त्यांचा स्वभाव आहे...!!
नरेंद्र मोदी यांच्यावर बाळासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा निशाना साधला नाही, यापूर्वी सुद्धा असेच आरोप केले आहेत...!!
आरएसएस प्रमुख यांच्यावरही सडेतोड टिका बाळासाहेब आंबेडकरांनी केली आहे...!!
आरएसएसचे नागपूर येथील शस्त्रपुजन बाळासाहेब आंबेडकर यांच्या दबावामुळेच बंद झाले आहे...!!
आरएसएसने संघाच्या मुख्यालयावर तिरंगा ध्वज भारिप बहुजन महासंघाच्या आंदोलनामुळेच लावला आहे हाही इतिहास आहे...!!
त्यावेळी आंबेडकरवादी रामदास आठवले,तथा सुरेश माने यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या टिकेवर आक्षेप नोंदविला होता काय..??
तुम्ही आंबेडकरवादी म्हणवून घेता आणि भाषा प्रस्थापितांची बोलता हे कशासाठी...??
दलालांचे मालक वादग्रस्त विषयावर कधीच बोलतं नाहीत...!!
ते दलालांना बिदागी देतात आणि बोलायला सांगतात,त्या अनुषंगाने यांची जीभ उचलली जाते...!!
आंबेडकर महाराष्ट्रात सत्तेचे समीकरण बदलविणार म्हणून मालक सांगतील त्या प्रमाणे दलाल प्रवृत्तीचे लोक बोलतात हा संदर्भ लक्षात घ्यावा...!!
प्रस्थापित राजकारण्यांच्या पोटातील खदखद बेगडी आंबेडकरवादी म्हणवून घेणारांच्या तोंडातून बाहेर पडते आहे...!!
अॅड बाळासाहेब आंबेडकर हे चुकीचे बोलले असतील तर त्याचे उत्तर संबंधित राजकीय नेतृत्वाने द्यावे,त्या वक्तव्याचा समाचार दारुड्या नेच घ्यावा, आंबेडकरी म्हणवून घेणाऱ्या बुजगावण्याला कशाला पुढे करता...??
आपलं अपयश लपविण्यासाठी सत्तेचे ठेकेदार पैशांच्या जोरावर माणसं कामाला लावतात आणि ज्यांना पैसाच सर्व काही वाटतो अशी माणसं पैशासाठी कोणत्याही प्रकारे तोंडाची वाफ घालवितात असा हा प्रकार आहे...!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने.