देश पातळीवर आंबेडकरवादी विचाराचा पक्ष ऊरला नाही, जी अपेक्षा बसपा कडुन जनतेला होती त्या अपेक्षेला छेदून बसपाने राजकीय डावपेच खेळले...!!
बसपा भाजपच्या मांडीवर जाऊन बसली सत्तेची फळे चाखली आणि जनतेच्या मनातून बसपा हद्दपार झाली...!!
त्याचाच परिणाम म्हणजे उत्तरेकडील राज्यांत पंजाब हरियाणा बिहार आणि दिल्ली मधील बसपाचा जनाधार संपला , आणि बसपा केवळ ऊत्तरप्रदेशा पुरती सीमित झाली...!!
एवढेंच नाही तर बसपाचा उत्तर प्रदेशातील जनाधार सुद्धा घसरला आहे, हे २०१४ आणि २०१९ च्या निवडणूकीत सिद्ध झाले आहे...!!
म्हणून देश पातळीवर आंबेडकरवादी विचाराचा पक्षाची नितांत गरज लक्षात घेऊन वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी, वंचित बहूजन आघाडीचा परिघ विस्तारायला सुरुवात केली आहे...!!
मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीच्या २७ जागा वंचित बहूजन आघाडी लढवित असुन,आता बिहार विधानसभेत सुद्धा बहूजन आघाडी ऊतरली आहे...!!
यापुर्वीही वंचित बहूजन आघाडीने कर्नाटक विधानसभेच्या आठ जागांवर उमेदवार ऊभे करुन जनतेचा कौल घेतला होता...!!
आज रोजी देशात फॅसिस्ट शक्ती विरोधात लढण्यासाठी आंबेडकरवादी विचारधारेची नितांत गरज निर्माण झाली आहे...!!
वंचित बहूजन आघाडीचा विस्तारलेला परिघ देशातील वंचित समुहाला निश्र्चितच न्याय देऊ शकेल याची शाश्वती वाटते...!!
कारण गेल्या ४० वर्षाच्या राजकीय जीवनात वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी कधीही विचारांशी तडजोड केली नाही हेचं त्यांच साफसुथर चारित्र्य उद्याच्या जनसामान्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणू शकते हा विश्वास वाटतोय...!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने.
No comments:
Post a Comment