Sunday, 30 December 2018

१ जानेवारी च्या निमित्ताने समाजबांधवांसाठी..भिमा कोरेगाव म्हणजे शौर्याचा तथा स्वाभिमानाचा इतिहास..

१ जानेवारी च्या निमित्ताने समाजबांधवांसाठी..
भिमा कोरेगाव म्हणजे शौर्याचा तथा स्वाभिमानाचा इतिहास..
----------------------------------------
भिमा कोरेगांव येथील उभा असलेला  *विजयस्तंभ* हा पेरणे ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असुन मोठया दिमाखानं भिमानदीच्या काठावर उभा असुन आपल्या महार समजल्या जाणा-या पुर्वजांच्या शौर्याचं तथा स्वाभिमानाचं प्रतिक आहे,जेव्हा हुकूमशहा पेशव्यांनी आक्रमण केलं तेव्हा पिढ्यान् पिढ्या गुलामीच्या बंधनात अडकलेल्या गुलामांचा स्वाभिमान जागा झाला,आम्हाला माणुस म्हणुन जगण्याचा हक्क नाकारणा-या पेशवाईचा खात्मा झाला पाहीजे अशी खुणगाठच जणु या पुर्वजांनी बांधली होती असे या इतिहासातून दिसते,असे असले तरी ही आपल्या पुर्वजांकडून द्वेषातून तथा गनीमी काव्यातून झालेली नाही तर ती समजुन उमजुन आणि ठरवुन झालेली ही लढाई होती,आपले हक्क जर मागुन मिळत नसतील तर ते हिसकावुन घ्यावे लागतील,माणुस म्हणुन जगता येत नसेल तर जगण्यात काय अर्थ,याची जाणिव आपल्या पुर्वजांना झाली असावी,पेशवाईने जरी अचानक व द्वेषातुन हे आक्रमण केले असले तरी आपल्या पुर्वजांकडून द्वेषातून झाली नाही हेही तितकेच सत्य आहे, *उद्देश स्पष्ट ठेवुन हक्कासाठी लढणारांचा विजय नक्की होतो,* आणि तसेच आपल्या पुर्वजांनी पेशवाई विरूध्द आपल्या हक्काची लढाई लढुन नेत्रदिपक असं यश मिळवलं,आणि आपल्या शौर्याचा तथा स्वाभिमानाचा विजयी इतिहास रचला,हे यश आपल्याला असे मिळाले की पिढ्यान् पिढ्या त्याची नोंद इतिहास घेतच राहील,त्यामुळे
*येतील किती अन् जातील किती त्याची न आम्हाला भिती*
आता भिती आहे ती आपल्याच्यांचीच आपल्याला,कारण गाडलेली पेशवाई आता नवपेशवाईत पुन्हा जन्माला आलेली आहे,आणि ही नवपेशवाई आपल्याशी कुठल्याही प्रकारे लढत नाही तर ती आपल्या आपल्यात लढत ठेवुन आपल्या पुर्वजांच्या शौर्याचा बदला घ्यायला निघाली आहे,हे जर आपल्याला वेळीच कळलं नाही तर मोठा अनर्थ होऊ शकतो,म्हणुन आता पुर्वजांच्या शौर्याचा अभिमान असणा-या वारसदारांनी आता वेळीच सावध झालं पाहीजे,आपल्याला शौर्याच्या इतिहासाबरोबर विचारांचा वारसासुध्दा आहे,म्हणुन आपली कृती ही विचारांच्या आधारावर असली पाहीजे असे मला वाटते.ज्या अहंकारामुळे पेशवाई संपली तीच अहंकाराची बाधा जर आपल्याला होत असेल तर आपणच आपल्याला संपवायला निघालेलो आहोत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.त्यामुळे माझ्या तमाम समाज बांधवानो तथा बाबासाहेबांची विचारधारा मान्य असलेल्या बहुजन बांधवांनो आपण आता आपल्याला वेळीच सावरायला हवं, *युध्दाला नव्हे तर बुध्दालाच स्विकारायला हवं* हीच खरी समाज व देशाच्या सुरक्षिततेची हमी असेल,आणि यामुळेच भिमा कोरेगाव येथे झालेल्या घनघोर लढाईची आपल्या पुर्वजांची शौर्य गाथा येणा-या पिढ्यान् पिढ्यांच्या काळजावर कोरली भिमा कोरेगावचा हाच शौर्याचा तथा स्वाभिमानाचा इतिहास अजरामर राहील..
मी तमाम समाज बांधवांना या निमित्ताने विनंती करेन आपण बुध्द व बाबासाहेब यांच्या विचारधारेवर चालणारे अनुयायी आहोत,आपल्या हातुन कोणताही अनुचित कृत्य घडणार नाही याची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे,त्यामुळे कोणतीही अफवा पसरवु नका व अफवांना बळी पडु नका,भिमा कोरेगाव येथे येणा-या प्रत्येक व्यक्तींनी या पवित्र भुमिला व पराक्रमी पुर्वजांना सन्मानाची सलाम द्या व विजयत्सोव साजरा करा,कुणालाही व कुठेही वाईट बोलुन चिडवु नका किंवा घोषणाबाजी करू नका..
येणा-या प्रत्येकाचा प्रवास सुखाचा होवो व येणारे नवीन वर्ष सुखासमाधानाचे जावे ही मनोकामना..
भिमाकोरेगाव विजय दिनाच्या सर्वांना सदिच्छा.
आपला,
विकास साळवे,पुणे
+919822559924...✍

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...