असुयेतून ऊत्पन्न होणारा विरोध.
- भास्कर भोजने.
अँड बाळासाहेब आंबेडकर हे गेली ३७ वर्षे सार्वजनिक जिवनात, राजकारण समाजकारण करीत आहेत...!
अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी अनेक लढे ऊभे केले आणि यशस्वी केले...!
त्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली परंतु श्रेयवादात अडकले नाही...!
ते जागतिक किर्तीच्या घराण्याचे वारस असल्यामुळे त्यांना प्रसिद्धीच्या मागे फिरायची कधीही गरज पडली नाही...!
एक जानेवारी २०१८ ला मनुवादी लोकांनी निशस्त्र जनतेवर हल्ला केला आणि आधुनिक पेशवाईची जाणिव करुन दिली..!
म्हणून काळाजी गरज लक्षात घेऊन अँड बाळासाहेब आंबेडकरांनी ३ जानेवारी ला महाराष्ट्र बंद ची हाक दिली...!
गेल्या सत्तर वर्षातील ऐतिहासिक बंद ३ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील जनतेने अनुभवला...!
केवळ मुंबई बंद करणारे ऐट मिरवायचे परंतु कडकडीत महाराष्ट्र बंद सत्तर वर्षात एकदाच झाला तो म्हणजे ३ जानेवारी २०१८ ला...!
महाराष्ट्र बंद ची हाक अँड बाळासाहेब आंबेडकरांनी दोन जानेवारी ला दिली म्हणजे बंद साठी कुठलीही तयारी न करता...!
न भुतो असा महाराष्ट्र बंद घडून आला ,याचे श्रेय भारतीय मिडियाने अँड बाळासाहेब आंबेडकर यांना दिले...!
त्यामुळे अँड बाळासाहेब आंबेडकर यांचे राजकीय वजन वाढले...!
त्यामुळे अँड बाळासाहेब आंबेडकर यांची राजकीय ऊंची वाढली...!
असा समज काही लोकांचा झाला.वास्तविक नेता हा नेता असतो. ज्याला जनतेची नाडी ओळखता येते तो काळावर आपली छाप सोडतं असतो...!
अँड बाळासाहेब आंबेडकर हे वैचारिक प्रग्लभ नेतृत्व आहे, ते त्यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे...!
नामांतर लढ्यात, रिडल्स प्रकरणात, आंबेडकर भवनच्या लढ्यात ,दलित अत्याचार ऊना प्रकरणात, रोहित वेमुला प्रकरणात, मंडल आयोगाच्या संदर्भात, आणि आता भिमाकोरेगांव प्रकरणात....!
आंबेडकरी समाज समुह एकत्र येतांना पाहून काही लोकांना मळमळ व्हायला लागली आहे...!
म्हणून असुयेपोटी काही लोकांनी अँड बाळासाहेब आंबेडकर यांचा विरोध करणे सुरु केले आहे...!
मित्रहो, तुमच्या विरोधाने बाळासाहेब आंबेडकर लहान होणार नाहीत, किंवा बदनामही होणार नाहीत...!
रामानंद तिर्थ यांच्या चरित्रात एक ऊदाहरण आहे.
शिक्षक फळ्यावर एक रेषा ओढतात आणि वर्गातील विद्यार्थ्यांना सांगतात की, या रेषेला स्पर्श न करता ती रेषा लहान करुन दाखवा...!
प्रत्येक जण आपापल्या परिने डोकं चालवतो परंतु रामानंद तिर्थ खडू घेऊन त्या रेषे शेजारी दुसरी तिच्या पेक्षा मोठी रेषा काढतात आणि सिद्ध करतात की, ही रेषा लहान आहे...!
मित्रहो, हा जगण्यातील सिद्धांत आहे. हे मानवतावादी तत्वज्ञान आहे. जो ज्या ऊंचीवर असेल तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठे व्हायचे असेल तर अधिक ऊंच भरारी घ्या आणि सिद्ध करा आपले मोठेपणं ...!
परंतु येथे तर पाय ओढण्याचा प्रयत्न केला जातो आहे...!
असुयेतून अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टिका करणा-यांनो तुम्ही ज्यांचे कार्यकर्ते आहात, त्या नेत्याला म्हणा तुम्ही अधिक चांगले आणि धाडसाचे कार्य करा .परंतु अँड बाळासाहेब आंबेडकर यांची बदनामी करायला नका शिकवू....!
ज्यांना अँड बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व सहन होतं नाही त्यांनी वेगळी भुमिका घ्यायला कुणी अडविले नाही, मात्र बदनामी कशासाठी...??
No comments:
Post a Comment