Friday, 19 April 2019

साध्वी प्रज्ञा सिंग म्हणजेच भाजपाचा खरा चेहरा

मालेगाव बॉंबस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रद्न्यासिंग ठाकुर  ला खासदारकीचं तिकिट देऊन RSS आणि भाजपाने हे सिद्ध केलय कि भाजपा हा पक्ष आपल्या देशा साठी किती घातक आहे . ही सामान्य बाब अजिबात नाही . हा शहिद हेमंत करकरे आणि त्यांच्या संपुर्ण टीमचा अपमान आहे असे म्हणायला हरकत नाही . 


         विचार करण्यासारखी गोष्ट आहे कि , मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणी तब्बेतीच कारण दाखऊन  जामिनावर बाहेर असलेली आणि आतंकवादी कृत्यात प्रत्यक्ष सहभाग असलेली व्यक्ती खासदारकीच्या निवडणुकीला उभी राहते . ही बाबच मुळी भयंकर आहे . इतक्या मोठ्या हत्याकांडाची आरोपी आणि इतके वर्षे जेलमध्ये राहिलेल्या व्यक्तिच समर्थन करणारा भाजप पक्षाची काय विचारधारा असु शकते हे वेगळ सांगायला नकोय . नथुराम ज्यांचे वंशज आहेत , त्यांच्याकडुन वेगळ्या काय अपेक्षा करणार . उद्या आसाराम बापु सारखे लिंगपिसाट आणि दळभद्री लोक तुरुंगातुन जामिनावार बाहेर आल्यावर निवडणुकीला उभे राहिले व अश्यांच्या समर्थनार्थ जनता रस्त्यावर उतरली तर आश्चर्य वाटण्याचं अजिबात कारण नाही . 


       मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणाचा सत्य खुलासा असलेले " हु किल्ड करकरे ? " आणि शहीद करकरेंच्या सुविद्य पत्नी स्मृतीशेष करकरे मॅड्म ह्यांनी लिहिलेले " द लास्ट बुलेट " हे पुस्तक वाचल्यावर डोक ठिकाणावर राहात नाही. किती अमानवीय पद्धतीने कट करुन हा हमला केला गेला .. आणि नियोजनबद्ध रित्या करकरे, कामठे आणी साळसकर ह्याना मारण्यात आले . ह्याचे हसन मुश्रीफ ह्या तत्कालिन पोलीस अधिकार्याने केलेल भाष्य अगदी जबरदस्त आहे . कॉ. गोविंद पानसरे ह्यान्नी कोल्हापुरमध्ये ह्याच विषयावर जेव्हा मुश्रीफांचा कार्यक्रम आयोजीत केला .. त्यांच्या नंतर त्याना खुनाच्या धमक्या RSS वाल्यांकडुन आल्या आणि नंतर त्यांची नियोजनबद्ध हत्या झाली . 


       हार्दिक पटेल सारख्या ओबीसी कुणबी पाटीलला कोर्ट निवडणुकीत अर्ज भरु देत नाही .. ज्याच्यावर कोणताही मनुष्यवधाचा गुन्हा नाही आणि ज्यांच्यावर गुन्हा आहे .. त्यांना परवानगी दिली जाते . हे अगदी अकल्पित आहे . आम्ही नेमके कुठ जात आहोत ह्याच भान सुद्धा आम्हाला नाहीये . जनता जनार्दन १००-५०० रुपयाच्या आहारी जाऊन, खोट्या राष्ट्रप्रेमवर विश्वास ठेउन तोंडाला कुलुप लावुन बसली आहे . 


        करकरे हे संपुर्ण टिमसह मालेगाव बॉंबस्फोटातील ह्या हिंदुआतंकवाद्यांना लॅपटॉपसहित अटक करुन त्यांच्यावर आरोप सिद्ध करणार होते व शिक्षा होणार होती . मात्र ह्या अगोदरच त्यांचा गेम केला गेला . नासिकच्या तुरुंगात असताना RSS चा भागवत करकरेंना भेटायला गेला . मात्र करकरे खरा देशभक्त होता . जिवाशी गेला . 


      साध्वी बोलत आहे की करकरेला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली . साध्वी जे बोलतेय .. ती तीची विचारधारा आहे . करकरे हे बहुजन होते . साध्वी ही RSS ची कट्टर कार्यकर्ता अर्थात मनुवादाची आणि हिंदुराष्ट्र संकल्पनेची सक्रिय समर्थक ! ह्यांना देश्यात हिंदुराष्ट्राच्या नावाखाली ब्राह्मणांची संपुर्ण सत्ता व्यवस्था आणायची आहे . त्यात ते जवळ जवळ ९५% यशस्वी झालेले आहेत. संविधान संपऊन मनुस्मृतीवर आधारीत ब्राह्मणराष्ट्र अर्थात हिंदुराष्ट्र ! ह्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे कालपरवाला कोणतीही परिक्षा न देता केंद्रात सचिव पदावर  झालेल्या नऊ ब्राह्मणवाद्यांची  एकजात निवड होय . 


        ब्राह्मणादी सवर्णान्ना शिक्षा देण्याचा अधिकार ओबीसी , एससी ,  एसटी ला नाही .. म्हणुन सुप्रिम कोर्टात आजही सगळेच एकजात ब्राह्मण आहे . हे आहे हिंदुराष्ट्र ! ब्राह्मणराष्ट्र म्हटल्यास ह्यांना कुत्र पण विचाराणार नाही , म्हणुन हिंदुच्या आड आम्हाला अधिकारवंचित ठेवण्याच ब्राह्मणांच खुप मोठ षडयंत्र यशस्वी होताना दिसत आहे .


        जो ब्राह्मणाला शिक्षा देईल .. त्याला मृत्युदंडाची शिक्षा मनुस्मृतीत आहे. हाच प्रकार छत्रपती संभाजी महाराजांबरोबर ब्राह्मणांनी घडवला होता .. कारण त्यांनी मोरोपंत पिंगळे .. आण्णाजी दत्तो आणि राहुजी सोमनाथ ह्या तिघा ब्राह्मणान्ना शिवरायांच्या हत्येच्या गुन्ह्यात रायगडावर हत्तीच्या पायी देऊन देहदंडाची शिक्षा दिली होती . संभाजी महाराज शुद्र होते आणि मनुस्मृतीत शुद्राला ब्राह्मणाला शिक्षा देण्याचा अधिकार सपशेल नाकारते . हा इतिहास आहे . 


       ब्राह्मण फक्त आमच्यावर अन्याय करण्याची फक्त पद्धत बदलतो .. मुळ विचारधारा कधीच बदलत नाही . त्यांना मनुस्मृतीवर आधारीत व्यवस्था आजही निर्माण करायची आहे . म्हणुन हा सर्व EVM चा घोटाळा सुरु आहे . साध्वी तीची मुळ ब्राह्मणी विचारधारा बोलत आहे आणि आमचे उपटसुंभ अंधभक्त त्याचे समर्थन करत आहे . ह्याचा अर्थ आम्हीच आमच्या हातानी आमच्या पायावर कुऱ्हाड मारुन घेत आहोत. 


     प्रतिक्रांतीसाठी तयार रहा ! 

Sunday, 14 April 2019

रोग, रोगी आणि डॉक्टर - मनोज काळे,ठाणे.

रोग, रोगी आणि डॉक्टर - मनोज काळे,ठाणे.


एखाद्याच्या रोगाचे जोवर निदान होत नाही तोवर त्यावर इलाज करणे कोणत्याही डॉक्टराला शक्य नसते, त्यामुळे सर्वात पहिला टप्पा असतो रोग काय आहे हे शोधण्याचा, त्यानंतर त्या रोगाची कारणे तपासुन त्यानुसार त्यावर औषध दिले की तो रोग निश्चितपने बरा होतो, हे झाले आजच्या व्यवहारातील सत्य.


1) या सत्याचा शोध अडीच हजार वर्षांपुर्वी तथागत सम्यक संबुद्धांनी घेतला होता, मानव प्राणी दुःखी आहे हे तथागतांनी जानले, दुखाचे अस्तित्व मान्य केले व त्याची कारणे शोधली ( चार आर्य सत्य)  त्यातुन कायमची मुक्ती मिळवण्याचा मार्गही सांगीतला ( आर्य आष्टांगिक मार्ग) . व त्या मार्गाने जाऊन आजपर्यंत हजारो वर्षापासुन लोक दुखमुक्त होत आहेत.


2) त्यानंतर छ.शिवाजी महाराजांनी तोच फॉर्मुला वापरला, आपन बहुसंख्य असुन मोगलांचे गुलाम का आहोत याचा महाराजांनी शोध घेतला, त्यांच्या लक्षात आले की चातुर्वर्णामुळे या देशाचे करे रक्षक असलेल्या सर्व लढाऊ जातीच्या लोकांच्या हातातुन धार्मिक बंधने घालुन शस्र काढुन घेतली गेली आहेत व त्यांना जाती पातीत विभागुन त्यांच्यात फुट पाडुन त्यांच्यावर राज्य केले जात आहे, या मनुवादी काव्याला ओळखुन महाराजांनी यावर उपाय केला की सर्व बारा बलुतेदार व अठरा अलुतेदारांना एकत्र करुन, त्यांच्यावर ब्राह्मनी व्यवस्थेने लादलेली गुलामी हटवु  सर्वांना स्वराज्याचे सैनिक बनवले व मुठभर सैन्याने मोघलांना जेरीस आनत स्वराज्य मिळवले. पुढे शिवशाही ला घातपाताने संपवणार्या पेशव्यांनाही भिमा कोरेगावात यात स्वाभिमानी लढाऊ अलुतेदार बलुतेदारांनी संपवले हा जाज्वल्य इतिहास आहे.


3) डॉ बाबासाहेब आंबेडकरांनीही अलुतेदार बलुतेदार समाज हा येथील व्यवस्थेने बहिष्कृत ठरवला आहे हे मान्य केले व त्या बहिष्कृत रोगापासुन मुक्ती मिळवण्यासाठी बहिष्कृत भारत नावाचे पाक्षिक सुरु केले, नंतर सामाजिक संघटना स्थापन केली त्याचे नावही 'बहिष्कृत हितकारीनी सभा' ठेवल्याचे आपनास माहीत असेल. त्याअंतर्गत लढा दिला गेला.


4) आता 2019 ला आपन स्वतंत्र आहोत, आपन लोकशाही असलेल्या देशात जगतोय पन 70 वर्ष लोकशाही येऊनही या देशातील तळागाळापर्यंत ती पोचु दिली गेली नाही, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क, अधिकार दिले पन त्यापासुन आज 85% लोक वंचित ठेवले गेले, त्यामुळे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या काळातील रोगाचे निदान अगदी अचुक केले व वंचित हा शब्द अधोरेखित करत त्याची कारणे शोधली, आज प्रजासत्ताक भारतात लोकशाहीचे सामाजिकीकरन न होऊ देण्यात 169 घराणे जबाबदार आहेत हे त्यांच्या निदर्शनास आले, व या घराण्यांनी कैद करुन ठेवलेल्या लोकशाही ला मुक्त करण्यासाठी अठरा अलुतेदार व बारा बलुतेदारांना एकत्र करुन "पुन्हा स्वराज्य" म्हणत वंचित बहुजन आघाडी या लोकचळवळीला जन्म दिला. 


आज आपन पहात आहोत की वंचित बहुजन आघाडी ला जनतेने स्विकारले, लहान मुलांनी खाऊच्या पैशापासुन काही बापांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी ठेवलेला पैसा दान दिला, काहीं बायांनी गळ्यातील मंगळसुत्र दान केले. सर्व जनतेने या आघाडी च्या प्रामाणिक भुमिकेला डोक्यावर घेतले व आज सारा महाराष्ट्र संविधानाच्या रक्षणासाठी एकवटला आहे, सर्व 169 घराण्यांचा देशाला लागलेला रोग संपलाच पाहीजे यासाठी जो तो आपापल्या परीने कष्ट घेत आहे, कुनी लेख लिहीत आहे, कुनी पोस्टर बनवत आहे, कुनी दारोदार फिरुन लोकांना समजावत आहे तर कोन गाडी घर दारावर स्टिकर्स लावुन हे औषध समाजाला वाटत आहे.


"गुलामाला त्याच्या गुलामीची जानीव करुन द्या तो आपोआप बंड करुन उठेल" असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, त्यांनी ते औषध देऊन एका मोठ्या समाजा बहिष्कृतातुन स्विकृत करुन घेतले, तेच महान कार्य आज आद. बाळासाहेब आंबेडकर करत आहेत, त्यांनीही धनगर, ओबीसी,भटके विमुक्त, मुस्लिम, होलार, चांभार, मातंग व इतर सर्वच्या सर्व जातींना गुलामीची जानीव करुन देण्यात यश मिळवले आहे, प्रत्येकजन आता या लोकचळवळीच्या ऐतिहासिक कार्यात आपापले योगदान देताना दिसत आहे. कुनीही आता बघ्याची भुमिका घेत नाही, प्रत्येक जन काही ना काही योगदान द्यायचा प्रयत्न करत आहे हे अतिषय क्रांतीकारी काम आहे. आपल्या समाजाचे एकमेव डॉक्टर  बाळासाहेब पुर्ण प्रयत्न करत आहेत चला आपनही त्यांना समाजाचा इलाज करुन लोकशाही ला घराणेशाहीच्या रोगातुन मुक्त करुन एक सशक्त लोकशाही निर्माण करण्यात मदत करुयात.


भिक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची.

माझ्या खाली कुनी नाही, माझ्या वरती कुनी नाही, आम्ही सर्व समान आहोत.


- मनोज नागोराव काळे, 8169291009

Thursday, 11 April 2019

भाजपने केला अकोल्यातील कुणब्यांचा घात- सुमित वासनिक

भाजपने केला अकोल्यातील कुणब्यांचा घात- सुमित वासनिक

अकोला लोकसभा मतदारसंघात कुणबी नेते भाजपचे भाऊसाहेब फुंडकर सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. पण 1998 सालि निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर भाजपने अकोल्यात कुणबी समाजाला हळू हळू राजकारणातुन हद्दपार करण्याचा डाव खेळायला सुरुवात केली. लोकसभेला पराभव झाल्यानंतर 2004 मध्ये पुन्हा भाजप कडुन निवडून यायची संधी होती तेंव्हा भाजपने भाऊसाहेबांचं तिकीट कापलं आणि संजय धोत्रे यांना उभं केलं. भाऊसाहेबांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्यानंतरही भाजपने जाणीवपूर्वक भाऊसाहेबांना उमेदवारी नाकारून संजय धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळेस भाऊसाहेब संसदेत गेले असतेतर केंद्रीय मंत्री झाले असते हे ओळखूनच अकोल्यातील सहकार लॉबीने आपले वजन वापरून भाऊसाहेबांचं तिकीट कापायला लावले होते असे आजही जिल्ह्यातील जुने जाणकार सांगतात. भाऊसाहेब फुंडकरांच्या जागी संजय धोत्रे खासदार झाल्यावर धोत्रेंनि अकोल्यातील कुणबी नेते संपविण्याचा सपाटाच सुरू केला. भाऊसाहेब फुंडकरांच्या नंतर 2004 मध्ये भाजप कडुन आमदार असलेले नारायण गव्हाणकर यांना राजकारणातुन संपविण्याचा नवीन डाव भाजपने आणि खासदार संजय धोत्रेंनि आखला होता.


2004 ते 2009 मध्ये बाळापूर मतदारसंघातून आमदार असलेले भाजपचे नारायणराव गव्हाणकर यांना पाडण्यासाठी 2009 मध्ये त्यांच्या विरोधात मराठा समाजातील अपक्ष उमेदवार उभे करण्यात आले होते. हे अपक्ष उमेदवार संजय धोत्रे यांनीच उभे केले होते हे कोणापासूनही लपलेले नाही. मराठा अपक्ष उमेदवारांचा परीणाम असा झाला की गव्हाणकरांना अपेक्षीत असलेले मतदान मिळालं नाही आणि यामुळे गव्हाणकारांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 2009 मधील निवडणुकि पासूनच नारायण गव्हाणकारांना राजकारणातुन संपवायची कसरत सुरू झाली होती. ज्या पक्षाला कुणबी समाजाने वाढविले त्याच पक्षाने जिल्ह्यातून कुणबी नेतृत्व संपविण्याचे काम केले. भाजप मध्ये खासदार संजय धोत्रें कडुन होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून गव्हाणकारांना भाजप सोडावी लागली होती. भाजप सोडून काँग्रेस मध्ये गेलेल्या गव्हाणकरांना आश्वासन देऊनही 2014 मध्ये लोकसभेचि उमेदवारी नाकारण्यात आली होती. गव्हाणकारांना उमेदवारी नाकारून काँग्रेसनेही कुणब्यांची अवहेलनाच केली होती. गव्हाणकर आता पुन्हा भाजप मध्ये आले आहेत पण खासदार धोत्रें कडुन त्यांना त्रास देणे अजूनही थांबलेले नाही. जिल्ह्यात भाजपमध्ये कोणताही कुणबी नेता मोठा होऊ नये असे संजय धोत्रेंना वाटते म्हणून ते जिल्ह्यात कुणबी नेत्यांचे पंख छाटण्याचे काम विना थांबता करत असतात असे ठाम मत अकोल्यातील कुणबी समाजाचे झाले आहे.


ज्या भाजप पक्षाला जिल्ह्यात आपण उभे केले त्याच पक्षातून आपल्यावरच अन्याय करण्यात येत असल्याची भावना अकोल्यातील कुणबी समाज बांधवांमध्ये वाढीस लागली आहे. ज्याने जिल्ह्यातून आपले नेतृत्व संपविले त्याला यावेळी निवडणुकीत पाडून आपण धडा शिकवला पाहिजे असे कुणबी युवक उघडपणे बोलत आहेत.

एकंदरीत म्हणायचे तर संजय धोत्रे यांनी भाजपमध्ये पूर्ण जिल्ह्यात इतर कोणासही मोठं न होऊ देण्याचा जो कार्यक्रम चालविला त्याचे परिणाम त्यांना या निवडणुकीत भोगावे लागतील असे दिसते आहे.

Sunday, 7 April 2019

प्रस्थापितांना वंचित बहुजन आघाडीची एवढी धास्ती का वाटते? - सुमित वासनिक

प्रस्थापितांना वंचित बहुजन आघाडीची एवढी धास्ती का वाटते? -  सुमित वासनिक

ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ओबीसी, भटक्या आणि इतर अनेक जाती सोबत आल्या आहेत. हजारो वर्षे आपले शोषण झाल्यावर स्वातंत्र्योत्तर काळातही प्रस्थापित पक्षांनी आपले शोषण संपविले नाही, उलट आपल्या मतांवर निवडून येऊन प्रस्थापित पक्षांनीही आपले शोषणच केले आहे अशी भावना आता या सर्व वंचित जातींमध्ये वाढीस लागलेली आहे. सत्तेतील आपला वाटा मिळावा, आपल्यालाही प्रतिनिधित्व मिळावं या हेतूने हे सर्व जातीसमूह एक झालेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 48 च्या 48 जागांवर प्रस्थापितांसमोर दंड थोपटून उभे झालेत.

वंचित बहुजन आघाडीच्या या झंझावाताला पूर्ण महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे. आघाडीला मिळत असलेला हा प्रतिसाद पाहून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शीवसेना या पक्षांनी आणि स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या काही पत्रकारांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात गरळ ओकणे सुरू केलेले आहे. यासर्वांचा एककलमी कार्यक्रम झालेला आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या एकाही उमेदवारास विजयी न होऊ देणे. या लोकांनि वंचित बहुजन आघाडीचा एवढा धसका का घेतला आहे? ज्यांना हजारो वर्षे वंचित ठेवण्यात आले आहे त्यांच्यापैकी एकही जण संसदेत पोहचावा असे यांना का वाटत नाही? हे वंचितांचा विरोध का करतायत?

 वरील प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या जागा निवडून आल्यावर राजकारणात  काय फरक पडेल हे समजून घेतले पाहिजे. आघाडीच्या जागा निवडून आल्यास महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील वंचित जातींमध्ये एक विश्वास निर्माण होईल तो म्हणजे आपल्या सारख्या वंचित जातींनी मिळून प्रस्थापितांना आव्हान दिल्यास आपण या प्रस्थापितांना हरवू शकतो. आपल्या जवळ कोणतेही  संसाधन नसलेतरि, पैसे नसलेतरी आपण या जातीयवादी धनदांडग्यांना हरवून सत्ता मिळवू शकतो. हा विश्वास , ही भावना एकदा का वंचितांच्या डोक्यात घट्ट बसली की देशातील सर्व वंचित आपआपल्या राज्यात एक होतील आणि महाराष्ट्रा प्रमाणे प्रस्थापितांच्या समोर आव्हान उभे करतील. वंचितांच्या एकत्र शक्तीने प्रत्येक राज्यात प्रस्थापितांची सत्ता , प्रस्थापितांचे वर्चस्व संपुष्टात येईल. यासोबतच फक्त लोकसहभागाने कमी पैश्यात निवडणुका जिंकता येतात हे सुद्धा समाजमनावर आपोआप बिंबविले जाईल, यामुळे भारतातील निवडणुकांना धनदांडग्यांच्या कचाट्यातून मुक्तता मिळेल. पैश्या अभावी निवडणुकांपासून दूर राहणारे वंचित आत्मविश्वासाने निवडणुका लढवायला लागतील. एकदा का हा बदल झाला की भारतातील राजकारणावर असलेली सवर्णांची एकाधिकारशाही संपुष्टात येईल आणि पूर्ण देशात वंचितांच्या राजकारणाचे नवे पर्व सुरू होईल. प्रस्थापित पक्षांना नेमके हेच नको आहे. 

महाराष्ट्रात येत्या सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. लोकसभेत वंचित बहुजन आघाडीच्या काही जागा निवडून आल्यास  महाराष्ट्रातील वंचित जातींमध्ये जो आत्मविश्वास आणि सत्तेची ओढ निर्माण होईल त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेला आघाडीच्या कमीतकमी 60-70 जागा स्वबळावर निवडून येतील. वंचित बहुजन आघाडीच्या 50च्या वर जागा निवडून आल्यातर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा वंचित समूहातून असेल. प्रस्थापित पक्षांना याच बदलाची धास्ती लागलेली आहे. याच कारणातून काँग्रेसने वंचितांसोबत युति केली नाही, याच कारणाने वंचित बहुजन आघाडिला बदनाम करायचा प्रयत्न केल्या जात आहे. 

वंचित बहुजन आघाडिला मिळत असलेला अतिप्रचंड पाठिंबा पाहून देशातील अनेक राज्यांमधून ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांना वंचितांचा हा पॅटर्न त्यांच्या राज्यातही राबविण्यासाठी बोलविणे सुरू झाले आहे , यावरूनच लक्षात घ्या वंचित बहुजन आघाडी देशातील राजकारणात वंचितांचे स्थान निर्माण करणार आहे याची चाहूल प्रस्थापितांना लागलेली आहे. त्यामुळेच प्रस्थापित आणि त्यांचे दलाल असलेले पुरोगामी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते बिथरले आहेत. मित्रांनो वंचित बहुजन आघाडीच्या जागा निवडून आणा आणि या बिथरलेल्या प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून द्या. तुम्ही दिलेलं मत हे वंचित समूहांच्या येणाऱ्या पिढ्यांचे वंचितपण दूर करेल हे लक्षात ठेवा.

Wednesday, 3 April 2019

......सेम बाबासाहेबच - मनोज काळे, ठाणे

......सेम बाबासाहेबच

- मनोज काळे, ठाणे


फुरोगामी पनाचा बुरखा पांघरलेले नकली लोकशाहीवादी लोक गोपिचंद पडळकरांच्या वंचित बहुजन आघाडीतील  सहभागाबद्दल जराही तारतम्य न बाळगता, जराही विचार न करता द्वेश, राग व तिरस्कार व्यक्त करताना दिसले, तेव्हा याचा मी विचार केला व मला काय जानवले ते वाचा,

काही काळ भाजपा पक्षात काम केलेल्या गोपीचंद पडळकर या धनगर समाजाच्या एक अतिषय लोकप्रिय, हुशार नेत्याने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला, वंचित बहुजन आघाडी चा कणा बनलेल्या धनगर समाजाचे ते एक अतिषय भक्कम नेते आहेत, धनगर आरक्षणावरुन त्यांचा भाजपाशी वाद झाला व त्यांनी वैचारिक मतभेदातुन भाजपा सोडली व इतर धनगर नेत्यांप्रमाणे बाळासाहेबांचे नेतृत्व स्विकारले. आता असे भरकटलेले तरुन जर मनुवादी संस्कृती व घरानेशाहीची मुजोरी लक्षात आल्यास त्यापासुन दुर जाऊन आंबेडकरी चळवळीत येऊन  मनुवादी संस्कृतीशी लढुन त्यांच्या भुतकाळातील चुकांचे प्रायश्चित करणार असतील तर आपण त्यांना का स्विकारु नये? त्यासाठी आपन बाबासाहेबांच्या जीवनातील एक प्रसंग आठवुन पाहु.


बाळासाहेबांंना पाहुन ग भीम परतुन आल्यासारख वाटतय...हे गीत आपन रोज ऐकतोय पन बाळासाहेब खरोखरच बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकुन हा चळवळीचा रथ पुढे चालवत आहेत हे आपनास पटेल.

ज्यावेळी बाबासाहेबांना भारतातील अस्पृश्यांना ब्राह्मणी धर्माच्या जाचातुन मुक्त करण्याचे पहीले चवदार तळ्याचे आंदोलन छेडले होते त्यावेळी काही ब्राह्मणांच्या विरोधात काम करणारे लोकही त्यांचे काम करत होते, त्यांच्या संघटना कार्यरत होत्या त्यापैकि एक होते प्रसिद्ध *जेधे जवळकर ,या दोघांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहुन सुचना केली होती की "आंबेडकर साहेब, तुम्ही जे अस्पृश्यता निवारनाचे काम करत आहात ते अतिषय मोलाचे आहे, आम्ही पन तुमच्या कार्यात सहभाग घेऊ इच्छितो पन अट आहे की आपल्या संघटनेत एकाही ब्राह्मणाला घेऊ नये"*


डॉ बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड लोकशाहीवादी होते, *बाबासाहेबांनी जेधे जवळकरांची ती कट्टरवादी मागणी फेटाळुन लावली  इतकेच नव्हे तर चवदार तळे मुक्तीच्या त्या आंदोलनात चित्रे, टिपनीस, सहस्त्रबुद्धे यांना बाबासाहेबांनी पुढाकार दिला, त्यांच्याच हातुन मनुस्मृतीचे दहन करुन घेतले*


आता आपन बाळासाहेबांनी सुरु केलेल्या वंचित बहुजन आघाडी या लोकचळवळीकडे पाहुयात, आज संविधान विरोधी विरुद्ध संविधान समर्थक अशी राजकीय लढाई होत आहे, त्या चळवळीचे नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर करत आहेत, त्यामुळे संविधानाच्या रक्षणाचा मुद्दा आजवर ज्या ज्या लोकांना महत्वाचा, जिव्हाळ्याचा वाटतो त्यांनी बाळासाहेबांचे नेतृत्व माणुन काम करण्याची तयारी दाखवली आहे, ही मोठी क्रांतीकारी घटना आहे, आपनही अशा *भरकटलेल्या पण आता आंबेडकरी वादळ पाहुन जागृत झालेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्यात सामावुन घेऊन आपली संविधान रक्षणाची लढाई लढले पाहीजे.*


राजगृहाकडे चला चा नारा देत असताना जे लोक राजगृहाकडे येत आहेत त्यांचे खुल्या दिलाने स्वागत केले पाहीजे, बाबासाहेबांनी जी लोकशाही आपनास दिली ती तशीच आपन ती जपायची आहे व ती वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातुन तळागाळापर्यंत पोचवायची आहे, 

बाबासाहेबांच्या चवदार तळ्याच्या आंदोलनातुन आपल्या अस्पृश्यतेला वाचा फुटली व त्या अस्पृश्यतेला संविधानाने कायद्याने समाप्तच केले. 


संविधानाने आपल्याला उन्नतीसाठी लोकशाही दिली, पन लोकशाही घरानेशाहीने कैद केली, त्या कैदेतुन लोकशाहीला मुक्त करण्यासाठी मोठ्या व्यापक भावनेतुन वंचित बहुजन आघाडी निर्माण झाली आहे, चवदार तळ्याच्या आंदोलना प्रमाणेच 2019 ची वंचित बहुजन आघाडीची ही लोकचळवळ महत्वपुर्ण आहे, आपन त्या वेळी नव्हतो पन आज आपन या आंदोलनात सहभाग घ्यावा, बाबासाहेबांना आपन साथ द्यायला नव्हतो, आपन बाळासाहेबांना साथ देऊयात, बाळासाहेब हे प्रति बाबासाहेबच आहेत, त्यांची प्रत्येक कृती ही लोकशाही व आंबेडकरी चळवळ यासाठी मैलाचा दगड आहे.


ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी चवदार तळ्याच्या हजारो वर्षांचा बामनवादाशी लढा देताना काही परिवर्तनवादी ब्राह्मणांना सोबत घ्यायला संकोच केला नाही, सेम तसेच आज बाळासाहेब आंबेडकरांनीही सत्तर वर्षांची घरानेशाही मोडण्याच्या या लढ्यात गोपीचंद पडळकर सारखा विरोधी गोटात राहुन, तिकडची कार्यप्रणाली,तिकडचे मनुवादी वातावरन, जातीवादी धोरने पाहुन त्यांना लाथाडुन आज जागृत होऊन वंचित आघाडीला साथ द्यायला तयार झाले त्यांचे कौतुक करीवे ते कमीच आहे, पण त्यांना स्विकारुन श्रद्धेय बाळासाहेबांनी जो लोकशाहीवादी निर्णय घेतला ते पाहिल्यास मनात आपसुकच शब्द आले.... 

सेम बाबासाहेबच


- मनोज नागोराव काळे, 8169291009

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...