Thursday, 31 January 2019

कॉंग्रेस पक्षाने आपली ताकद जोखावी...!

कॉंग्रेस पक्षाने आपली ताकद जोखावी...!
- भास्कर भोजने.

        कॉंग्रेस पक्षाला आम्ही सत्ताधारी आहोत,प्रस्थापित आहोत या प्रतिमेच्या बाहेर अजून निघता आले नाही...!
    कॉंग्रेस पक्ष अजुनही स्वत:ला देशातील सर्वात मोठा आणि प्रस्थापित पक्ष समजतं आहे...!
    कॉंग्रेस पक्षाने या भ्रमातुन लवकर बाहेर पडावे,नाहीतर कॉंग्रेस पक्ष हा लवकरच संपेल यात तिळमात्र शंका नाही...!
       कॉंग्रेस पक्षाचा जो मुळ जनाधार होता,तो या देशातील दलित आणि मुस्लिम...!
   दलितांची १३ टक्के आणि मुस्लिम समाजाची १६ टक्के मिळून एकूण २९ टक्के बेस तयार असायचा त्या २९ टक्के मतांना प्रत्येक मोठ्या जातीच्या उमेदवारा सोबतं जोडून कॉंग्रेस पक्ष सत्तेत जायचा...!
    मोठ्या जातीतील काही घराणे तयार करुन कॉंग्रेस पक्षाने जातियवाद आणि घराणेशाही दोन्ही पोसले आणि आपल्या सत्तेची गणितं मांडली...!
    गेली ६८ वर्षे भारतीय जनतेने कॉंग्रेस पक्षाच्या या नितीचा अनुभव घेतला आणि दलित, मुस्लिम हा मुळ जनाधार कॉंग्रेस पक्षाकडुन निघून गेला हे वास्तव आहे...!
   गरीबी हटाव या ना-यावर दलितांना फसविले गेले हे दलित समुहाला कळुन चुकले आहे...!
    बाबरी मशीद प्रकरणात आणि सच्चर समितीचा अहवाल यांनी मुस्लिम समाजाचे डोळे उघडले आणि त्यांनीही कॉंग्रेस पक्षाकडे पाठ फिरविली हे वास्तव आहे...!
    कॉंग्रेस पक्षांकडील दलित, मुस्लिम हा मुळ जनाधार संपला...!
   ज्या मोठ्या जातीच्या आधारावर घराणेशाही पोसली होती,तोच प्रयोग इतर पक्षांनी सुरू केला आहे,उदा.. शिवसेना आणि भाजप मध्येही घराणेशाही निर्माण झाली आहे...!
     त्यामुळे राजकीय प्लॅटफाॅर्म वर नवी प्रस्थापित घराणी तयारी झाली आहेत, म्हणूनच कॉंग्रेस पक्षाचा जनाधार आता प्रस्थापित मोठ्या जातीतही राहिला नाही...!
     एकंदरीत त्याचाच परिणाम म्हणून देशात ५४५ पैकी कॉंग्रेस पक्ष केवळ ४४ या सर्वात निच्चांकी सदस्य संख्येवर पोहचला आहे...!
      कॉंग्रेस पक्ष देशात विरोधी पक्ष म्हणूनही आपली पतं कायम राखू शकला नाही हे वास्तव आहे...!
      महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाचे ४८ पैकी केवळ २खासदार आहेत...!
   म्हणजे कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील आपला जनाधार गमावलेला आहे,तरीही कॉंग्रेस पक्ष इतर सेक्युलर किंवा समविचारी पक्षांशी युती किंवा आघाडी करतांना इतरांना कमी लेखुन एक जागा देतो,दोन जागा देतो अशी मग्रुरीची भाषा वापरतो आहे हा कॉंग्रेसचा अहंकार कॉंग्रेस पक्षाला संपवणारं यात शंकाच नाही...!
      मित्र पक्षांना विश्वासात न घेता केवळ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपसात बसुन जागा वाटप करतात आणि ,राजू शेट्टी यांना एक जागा सोडली,शेकाप ला एक जागा दिली,अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सोडली अशी सरंजामी भाषा बोलतं आहेत,ही नशा,हा तोरा,हा अहंकार कॉंग्रेस पक्षाने त्यागला पाहिजे,नाहीतर जनता शिक्षित झाली आहे,तुमची घराणेशाही आता सामान्य माणसाला पसंत नाही...!
   तुमचे जातदांडगे उमेदवार छोटया छोटया जातीच्या ओबीसी बांधवांना मान्य नाहीत, तुमचं फसवं धोरण पुन्हा पुन्हा जनता स्विकारायला तयार नाही...!
    जो हौद से गयी ,वो बुंद से  आनेवाली नहीं....!
    कॉंग्रेस पक्षाने आपली सेक्युलर ही इमेज राखायची असेल तर इतर समविचारी पक्षांना सन्मानाने सोबतं घेऊन धर्मवादी, असहिष्णू आणि मनुवादी पक्षांना रोखण्यासाठी आता समंजस भुमिका घेऊन आघाडी करावी,भ्रमातुन बाहेर यावे.नाहीतर तुमचा जनाधार संपलेला आहेचं,२०१९ मध्ये कॉंग्रेस मुक्त भारत होईल आणि त्यासाठी कॉंग्रेस पक्षाचं धोरणचं कारणीभूत असेल...!
      कॉंग्रेस पक्षाला पर्याय म्हणून भाजप आणि भाजप पक्षाला पर्याय म्हणून कॉंग्रेस ही द्विपक्षीय देवाणघेवाण सुरु राहिलं या भ्रमातुन कॉंग्रेस पक्षाने बाहेर पडले पाहिजे...!
    कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाचं धोरण एकचं किंवा सारखेचं आहे अशी धारणा असलेली नवी पिढी तयार झाली आहे, त्यामुळे भाजपला घालवण्यासाठी म्हणून जनता आता आम्हालाचं निवडून देईल या भ्रमातून कॉंग्रेस पक्षाने बाहेर पडावे,नाहीतर जनता कॉंग्रेस पक्षाला आता पुर्णविराम देण्याच्या मनस्थितीत आली आहे हेही लक्षात घेतले पाहिजे...!
      जयभीम.
@.. भास्कर भोजने.

Monday, 28 January 2019

दांभिक मीडिया - जनतेची हितशत्रुच...

दांभिक मीडिया - जनतेची हितशत्रुच...
- मनोज नागोराव काळे ठाणे.
दि.२७ जानेवारी २०१९ रोजी ठाणे जिल्ह्यातील कल्याण या ऐतिहासिक शहरात पुन्हा नवा इतिहास घडला, वंचित बहुजन आघाडी च्या "सत्ता बदलाची नांदी" या महासभेला कल्याण, भिवंडी व ठाणे परिसरातील सर्व बहुजन, आदिवासी, एस सी, एस टी, मुस्लिम, कोळी व इतर वंचित समाज घटकांनी अतिषय उत्साहाने व उमेदीने उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. सर्वांनी एकत्र येऊन आजवरच्या सर्व सभांच्या उपस्थितीचा उंच्चांक मोडीत काढला. आणि हे पेड व भांडवलदारांच्या मीडिया चैनल्स हा पहावलेले दिसत नाही, सर्व टिव्ही चैनल्स नी अतिषय खोट्या व बेजबाबदार बातम्यांचे प्रसारन सुरु केले व उपेक्षित, वंचित समाजाच्या विरोधात आपन कसे आहोत हेच जुनकाही त्यांनी सिद्ध केले.

वंचित बहुजन आघाडीच्या या क्रांतीकारी सभेत आद.असदुद्दीन ओवैसी साहेबांनी केलेल्या भाषनातील एक ओळ पकडुन त्याचे चुकीच्या पद्धतीने प्रसारन करुन समाजात असंतोष पसरावा व समाजात तेढ निर्माम व्हावी हा मीडीयाचा अजेंडा उघडपने जानवत आहे.
आद. ओवेसी साहेबांनी भारतीय संविधानाने या देशातील सर्व नागरिकांना एका समान पातळीवर आनले आहे, आता या देशात कुनी कुनापोक्षा मोठा नाही तर सर्व समान आहोत या आशयाने त्यांनी थोडे उलगडुन सांगितले की कोणी ब्राह्मन असेल तर तो प्रकाश आंबेडकरांपेक्षा मोठा नाही किंवा कुनी मराठा असेल तर तो मुस्लिमांपेक्षा मोठा नाही, ओवेसी साहेबांनी जनतेला फक्त आपन सर्व समान आहोत असे न सांगता थोडे खोलात जाऊन आपन जातवार धर्मवार भेदभाव करत असतो त्यामुळे त्या जाती धर्मांना आपन कुनीही एकमेकांपेक्षा मोठे नाही तर आपन सर्व समान आहोत असा संदेश दिला, पन मीडिया ला तर अगदी सोपे करुन सांगितलेला संदेशही कळत नसेल तर त्यांनी टिव्ही चैनल्स बंद करुन भंगार गोळा करायचे काम करावे.
टिव्ही मी़डिया ला पुर्ण जाणिव आहे की कल्याण भिवंडी हा विभाग किती संवेदनशील आहे तरी अशा एका राजकीय नेत्याच्या भाषनाला तोडुन मोडुन मुद्दाम समाजात तेढ निर्माण करुन कोणत्या राजकीय पक्षाला फायदा पोचवायचा आहे?
दंगली वर कोन कोनत्या पक्षाचे राजकारण चालते? मीडियाला दलालीच करायची आहे तर त्यांनी पत्रकारीता या लोकशाहीच्या चौथ्या खांबाला बदनाम न करता खुलेआम दलाली करावी त्यांना कुनी रोखले आहे?
दोशात कोनताच समाज लहान नाही किंवा मोठा नाही हे तर भारतीय संविधानानेच दिलेला समतेचा नियम आहे, आणि काल ज्या वंचित बहुजन आघाडी ची सभा होती त्या सभेचे ब्रिदवाक्यच आहे की " माझ्या वरती कुनी नाही, माझ्या खाली कुनी नाही, आम्ही सर्व समान आहोत"
त्यामुळे समतेच्या संदेशाचा द्वेश वाढविण्यासाठी उपोयग करुन घेण्याचे घानेरडे काम मीडियाने बंद करावे, मीडिया ने समाजहितासाठी, लोकशाही च्या संरक्षणासाठी, जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवावा, समाज रक्षकांना बदनाम करने मीडियाचे काम नाही याचे आत्मपरिक्षण करावे.
दुसरा मुद्धा आद ओवेसी साहेबांनी जनतेला एक प्रश्न केला की इतका अन्याय होतोय, इतका अत्याचार होतोय पन तुम्ही गप्प का रहाता, तुम्ही ज्या भीमा कोरेगावच्या शुर महारांचे वंशज आहात त्यांना तरी आठवा, की त्या महार सैनिकांनी पेशव्यांना हरवले नविहते का? असा तो प्रश्न त्यांनी जनतेला विचारला..तो प्रश्न हा गाफिल व झोपेत असलेल्या जनतेला हलवुन जागे करण्यासारखा प्रभावी होता, अस्मिता जागी करणारा होता, नव पेशव्या विरुद्ध लढायची प्रेरना देणारा तो प्रश्न होता पन भांडवलदारांच्या मीडियाने बिनधास्तपने अशी खोटी बातमी फिरवली की ओवेसी म्हणाले की महारांनी पेशव्यांना हरवले नव्हते.
त्यामुळे मीडिया हा प्रस्थापित धनदांडग्याच्या हातचे बाहुले आहे स्पष्ट झाले,
जनतेने मीडिया बातम्या देते हा भ्रम डोक्यातुन काढावा, आता पेड मीडिया सुद्धा अफवा पसरवण्याचे काम करते हे वरील दोन मुद्दयावरुन सिद्ध झालेले आहे, त्यामुळे ज्या समाजाच्या हितचिंतकांना कायद्याचे ज्ञान आहे त्यांनी या मीडियावर दंगलीला प्रोत्साहन देने, समाजात तेढ निर्माण करणे, अफवा पसरवने अशा प्रकारच्या केसेस या मीडिया चैनल्स विरुद्ध दाखल करायला हरकत नसावी.
वंचित बहुजन आघाडी ही नवपेशवाई, नवमोघलाई या दोंघाविरुद्घ नव शिवशाही सारखी उभी आहे याचे भान ठेवावे व वंचित बहुजन आघाडी च्या समाजहिताच्या भुमिकांचा सतत प्रचार करुन पेड मीडियाचा खोटा प्रचार हानुन पाडावा.
- मनोज काळे 8169291009

Wednesday, 23 January 2019

वंचितांनो कॉर्नर मिटिंग हीच आपली शक्ती - सुमित वासनिक

वंचितांनो कॉर्नर मिटिंग हीच आपली शक्ती
- सुमित वासनिक

आंबेडकरी चळवळ ही संसाधन विहिन चळवळ आहे, त्याचप्रमाणे ज्या वंचित समूहाच्या कल्याणाची लढाई ही चळवळ  लढते आहे तो वंचित समूह सुद्धा संसाधन विहिन समूह आहे. निवडणुका जवळ आलेल्या आहेत एकीकडे वंचितांना डावलणारे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेने सारखे पैसा आणि प्रसिद्धी माध्यमांनी अतिशय बळकट असलेले प्रस्थापित पक्ष आहेत. तर दुसरीकडे पैसा नसलेले आणि प्रसिद्धी माध्यमं विरोधात असलेले आपण वंचित समूह आहोत.
संसाधनांनी परीपूर्ण असलेल्या या प्रस्थापितांना पराजित करून आपल्याला आपल्यासाठी संसदेची दारे उघडायची आहेत. मार्ग कठीण आहे पण अशक्य नाही. ऍड.बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात आपण विना पैसा आणि प्रसिद्धी माध्यमांचा विरोध असूनही  लाखोंच्या सभा प्रत्येक जिल्ह्यात घेऊन दाखवत आहोत, हीच आपली शक्ती आहे. ही आपल्या एकीची शक्तीच या धनदांडग्यांना भुईसपाट करण्यासाठी पुरेशी आहे. आपल्या या अफाट जनशक्तीला आपण मतपेटित पोहचविण्यात यशस्वी झालो तर आपल्याला संसदेत जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही हे आपण ओळखले पाहिजे.
जे आपले समर्थक आहेत, आपल्या समविचारी आहेत , वंचित आहेत त्यांना मतदानासाठी तयार करायच्या कामाला आपण सर्वांनी आता लागले पाहिजे. मतदार बनविणे, मतदानासाठी लोकांना तयार करणे यासाठी अनेक मार्गांचा उपयोग आपल्याला करावा लागेल. या अनेक मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे प्रत्येक वाडी, वस्ती, आणि गावखेड्यात काँर्नर मिटिंग, छोट्या सभा घेणे हे होय.
कॉर्नर मिटिंग, छोट्या सभा आयोजित करा या सभांच्या माध्यमातून जनतेला सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबद्दल अवगत करत रहा. जनतेला मतदानाचे महत्व समजावून सांगा, मतदार तयार करा. निवडणूक काळात प्रस्थापित पक्ष पैश्याच्या आणि प्रसिद्धी माध्यमांच्या जोरावर ऍड.बाळासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आणि आपल्या  उमेदवाराबद्दल अफवा पसरवीतात अश्या अफवांपासून सावध राहण्यासाठी जनतेला या सभांच्या माध्यमातून तयार करा. भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडिबद्दल होत असलेला अपप्रचार खोडुन काढा. निवडणुकीच्या दिवशी लोकं स्वयंस्फूर्तीने आपले मत वंचित बहुजन आघाडिला देतील असे वातावरण या कॉर्नर मिटिंग आणि छोट्या सभांच्या माध्यमातून तयार करा. प्रत्येक 10-15 दिवसांच्या नंतर अश्या मिटिंग ,सभा आयोजित करा. या कॉर्नर मिटिंग, छोट्या सभा म्हणजे मतदारांपर्यंत पोहचण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय होय हे लक्षात ठेवा.
मित्रांनो आपल्या कडे कुठलेच संसाधन नाही पण आपल्या जवळ जनशक्ती आहे. या जनशक्तीच्या जोरावरच आपल्याला बदल घडवायचा आहे त्यामुळे आपणच जबाबदारी उचलली पाहिजे आणि आहेत त्या मार्गांचा उपयोग करून मतदार जागृती केली पाहिजे, वंचित बहुजन आघाडिचा मतदार तयार केला पाहिजे. आपण हे करण्यात यशस्वी झालोतर येणारा काळ आपला असेल , समतेचा असेल याची जाणीव असू द्या.

Monday, 21 January 2019

राजकारणातील नैतिकता आणि लाचारी....!

राजकारणातील नैतिकता आणि लाचारी....!
: भास्कर भोजने.
       डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांसदीय लोकशाही ही कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली आहे...!
   कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेत जे जे उपेक्षित आहेत,संधीवंचित आहेत,त्यांना संधी निर्माण करुन देऊन समग्र समाजाचा " समतेने " विकास साधणे ही भुमिका घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि आपली सांसदीय लोकशाही ऊभी केली...!
    आपल्या देशातील वर्णवर्चस्ववादी मंडळीने या समतेच्या तत्वाला छेद देण्यासाठी ज्यांना संधी द्यायची आहे,ज्यांना आरक्षण द्यायचे आहे असे उपेक्षित घटकामध्ये लाचार व्यक्ती शोधून त्यांना उपेक्षित घटकांचे नेते म्हणून प्रपोज केले आणि उपेक्षितांच्या हक्क आणि अधिकाराला शह दिला ...!
    उपेक्षित समाज हा उपेक्षितचं राहिलं,त्याचा प्रतिनिधी हा आपला " गुलाम " किंवा सांगकाम्या किंवा पदाचा लालची किंवा " दलाल "प्रवृत्तीचा असेल अशी भुमिका घेऊन मनुवादी पक्षांनी गेली सत्तर वर्षे आपले राजकारण आणि पक्षीय धोरण राबविले आहे...!
    भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सत्ताधारी पक्षाच्या तिकिटावर निवडून येणारे राखीव जागेवरील खासदार बघा त्यांचे काम आणि विचार बघा चटकण लक्षात येते त्यांनी एस.सी.,एस.टी, ओबीसी बांधवांसाठी काय केले त्याचा आराखडा बघा...!
    त्यांची लायकी बघा,पुर्वी बुलढाणा मतदारसंघ राखीव होता तेव्हा भाजप, शिवसेना आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जे होते तेच उमेदवार आज बुलढाणा मतदारसंघ खुला झाला तेव्हा नाहीत,तर त्या राखीव जागेवरुन निवडून येणारे, आनंदराव अडसूळ, मुकुल वासनिक, किंवा शिवसेनेचे काळे आता कुठे आहेत...??
   त्यांची लायकी केवळ राखीव जागेवर उभे राहण्याऐवढी आणि गुलामी करण्याऐवढीचं आहे.ते नेते होऊ शकत नाहीत...!
   अंगी कुठलीही लायकी नसतांना इथल्या प्रस्थापित पक्षांनी काही बुजगावण्यांना आंबेडकरी नेते म्हणून प्रपोज केले आहे त्यांची लाचारी आणि दलाली आता उघडं होऊ लागली आहे...!
    आजचा काळ हा अतिशय टोकदार आणि कठीण काळ म्हणून इथला विचारवंत मांडतं आला आहे...!
आजचा काळ हा आणिबाणीचा काळ आहे अशी जनभावना तयार झाली आहे,त्याचे कारण देशात घडणाऱ्या घडामोडी जनता ऊघड्या डोळ्याने बघते आहे...!
   अशा आणिबाणीच्या काळात लोकशाही आणि राज्यघटना धोक्यात आली असतांना,कोणताही नेता हा राजकारण करतांना अतिशय दक्षतेने आणि नैतिक मुल्यांवर आधारीत राजकारण करेल,तरच तो नेता काळाच्या कसोटीवर तगेल अन्यथा जनता आता लबाडांना हद्दपार करील यात शंकाच नाही...!
    अशा टोकदार वळणावर ए आय एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जनाब असोद्ऊद्दीन ओवेशी साहेब यांनी युतीच्या संदर्भात एक निवेदन नांदेड येथील जाहीर सभेत केले की,जर एम आय एम पक्षाची कॉंग्रेस पक्षाला अडचड वाटतं असेल तर, कॉंग्रेस पक्षाने अॅड बाळासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या मानसन्मानातील जागा द्याव्यात मला एकाही जागेची गरज नाही,मी कोणतीही जागा लढविणार नाही मात्र, दलित बहुजन समाजाला सत्तेतील वाटा मिळावा म्हणून तुमच्या सोबतं राहिलं...!
    ही भाषा,हा त्याग,हा दिलेरपणा आणि ही राजकीय नैतिकता एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी वापरली आहे...!
  ए आय एम आय एम पक्षाचे तेलंगणा मध्ये खासदार, सात आमदार आणि महाराष्ट्रात दोन आमदार आहेत, त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष ही नैतिकता दाखवितो आहे त्याचे कारण आहे आजची देशातील परिस्थिती...!
    परंतु ज्यांना मनुवादी पक्षाच्या मंडळीने नेते म्हणून प्रपोज केले आहे आणि जे स्वत:ला रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणवून घेतात, परंतु त्यांचा कोणता मतदारसंघ आहे हे त्यांनाही माहित नाही त्या नेत्यांना नैतिकता म्हणजे काय हे माहितच नाही...!
त्यांना त्याग कशासोबतं खातात तेही माहित नाही...!
   आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवाने राजकीय दुकानदारी चालविणारे आंबेडकरी जनतेला फसवू पाहतं आहेत, परंतु आता ही लबाडी किंवा दलाली तुमची तुम्हाला लखलाभ ,जनता तुम्हाला भिकं घालणार नाही...!
  तुमची लाचारी जनतेच्या लक्षात आली आहे...!
     आता जनता कॉंग्रेस पक्षाला सेक्युलर पक्ष म्हणून जाब विचारल्याशिवाय मतं देणारं नाही, कॉंग्रेस पक्षाने आपलं सेक्युलॅरिझम सिद्ध केले पाहिजे...!
   वंचितांसाठी काय देता ते कॉंग्रेस पक्षाने सांगितले पाहिजे,तुमची घराणेशाही आता कुणीही डोक्यावर घेऊन नाचणारं नाही...!
   बुरखाधारी आंबेडकरी नेते, किंवा लाचार,दलाल नेते जनता सहन करणार नाही हेही बुजगावण्यांनी लक्षात घ्यावे,नाहिपेक्षा या वंचितांच्या लाटेत तुम्ही कालबाह्य होऊन, संपणार हे लक्षात घ्या...!
जयभीम.
@.भास्कर भोजने.

Thursday, 17 January 2019

आंबेडकरी समाज बांधवानो सावधान.
: भास्कर भोजने
   स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात मनुवादी कधीचं चाचपडला नाही.
      त्याचे कारण असे की, सत्ताधारी काँग्रेस ही मनुवाद्यांची .काँग्रेसची सरकारे बघा. प्रत्येक सरकार मध्ये ब्राह्मणांचे वर्चस्व...!
    जेव्हा जेव्हा बिगर काँग्रेसचे सरकार आले तेव्हा तेव्हा काँग्रेसने स्थैर्याचा मुद्दा ऊपस्थित करुन सरकार पाडले किंवा पाठिंबा काढला आणि बहुजनांचे शासन कुचकामी ठरविले...!
      मंडल आयोगाच्या अमंलबजावणी पासून भाजप आणि संघाने आक्रमक पवित्रा घेतला आणि सरकार ताब्यात घेतले.
     धार्मिक धृवीकरणाचा फायदा घेत भाजपने देशात धार्मिक ऊन्माद ऊभा केला...!
    नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डाँ.कलबुर्गी, गौरी लंकेश सारख्या हत्यामुळे देशात भयाचे अधिपत्य निर्माण झाले...!
    प्रबोधन आणि प्रयोग थांबवून धार्मिक ऊन्माद राबवायची खेळी सुरु राहिली...!
    याचं धार्मिक ऊन्मादाची पुढची कळी म्हणून भिमाकोरेगांव ची दंगल घडविण्यात आली...!
     भिमाकोरेगांव दंगलीचा जाब विचारणारे नेतृत्व प्रगल्भ, विवेकी आणि निडर निघाले..!
  अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी भिमाकोरेगांव दंगलीचा  मास्टर मांईन्ड शोधून सरळ वार केला. पुरावे दाखल केले आणि अतिरेकी हिंदुत्ववादी संघटनांचे धाबे दणाणले...!
   मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या वर अदखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना अटक करण्याची जबाबदारी ही विद्यमान सरकारची आहे.
    सरकारने कारदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे ती सरकारची जबाबदारी आहे.
   मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे ला जर अटक झाली नाही तर सरकार कायद्याच्या पलिकडे जाऊन शासन व्यवस्था राबविते असा संकेत जाईल...!
    म्हणजे स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात कधीच मनुवादी कोंडींत सापडला नव्हता, मात्र यावेळी मनुवाद्यांची गोची झाली आहे...!
     या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी मनुवादी मंडळीने भाड्याने काही माणसे कामाला लावली आहेत...! ही भाडोत्री माणसे आता आंबेडकरी नेतृत्व कसं खुजं आहे. आंबेडकरी चळवळीतील काही लोकांचे कसे नक्षलवादी मंडळीशी संबंध आहेत, अशाप्रकारे टिका टिप्पणी करीत आहेत.
       आंबेडकरी समुहातील बांधवानो ही वेळ अतिशय संयमाने वागण्याची आहे. आंबेडकरी नेतृत्व देशातील भयग्रस्त वातावरणात एक कणखर बाणा धारण करुन, मनुवाद्यांची गोची करीत आहे.
       देशातील जे जे समुह भयग्रस्त आहेत, ते आंबेडकरी नेतृत्वाखाली आश्रय शोधतं आहेत.
   देशात कायदा आणि सुव्यवस्था निकामी झाली आहे असे चित्र ऊभे केल्या गेले आहे.
    म्हणून आंबेडकरी समुहाने एकमुखी कणखर नेतृत्व स्विकारुन देशाचे पुढारपणं करावे.
  ही वेळ आक्रमक होऊन भयग्रस्त समाजाला दिलासा देण्याची आहे..!
    राजकीय पुढा-यांची बोलती बंद झालेली आहे. भ्रष्टाचारी बोलू शकतं नाहीत. एकप्रकारे दहशतीचे राज्य आहे...!
    अशावेळी आंबेडकरी बांधवानो, जे कोणी आंबेडकरी नेतृत्वावर टिका टिप्पणी करीत आहेत, ते मनुवाद्यांचे हस्तक आहेत याची जाणीव ठेऊन वागावे ही विनंती...!

Tuesday, 15 January 2019

लोकशाही रस्त्यावर सांडत आहे..- विकास साळवे.

लोकशाही रस्त्यावर सांडत आहे..
- विकास साळवे.
जात्यांधाच्या भयान काळोखाला टार टार फाडुन अंधारात खितपत पडलेल्या मुर्दाड देहाला एक नवा उजेड दिलास तु,
उजेडाचा स्पर्श होताच हत्तीचं बळ एकवटून ताडकन उठलेली मुर्दाड देह आज सुर्यावर स्वार व्हायला निघालीत बघ..
पण खंत एकाच गोष्टीची आहे,
एकमेकांच्या उरावर बसुन कुरघोडीचा खेळ खेळणारी ही तुझीच लेकरे आपआपसांत भांडत आहे,
आणि पदरात पडलेली लोकशाहीची शिदोरी मात्र रस्त्यावर सांडत आहे..
तुझ्या लेकरांच्या भांडणात इथे वैरीच फायदा उचलत लोकशाही पायदळी तुडवत आहे,
आम्ही मात्र आमच्याच आईची अब्रु वेशीवर टांगुन स्वत:चाच ऊर बडवत आहे..
अाम्ही अामच्याच भावंडांना स्वत:चे वैरी समजुन भर चौका चौकात जेव्हा लाथाडु लागलो,
तेव्हा तोच तु टराटरा फाडलेला भयान काळोख पुन्हा नजरेसमोर फडफडू लागतोय बघ..
म्हणुन अस्वस्थ होतो कधी कधी,
कारण अविचारी भुसभुशीत बुरूजं आता ढासळु लागली आहेत,
अज्ञानी लेकरं काही,
नको तिथे उगीचच अक्कल पाजळु लागली आहेत..
बा भिमा,
तु आम्हाला बुध्दांचा धम्म दिला,
वै-याविरूध्द विचारांनी लढुन जिंकण्याचं बळ दिलं,
जग अंधारात बुडेल कदाचित पण आम्ही उजेडातच असु अशा प्रकाशित विचारांच्या शिखरावर बसवलं,
म्हणुन आज आम्ही निर्धास्त व सज्ज आहोत येणा-या संकटावर मात कराया..
तुझ्या लेखणीला पेलवण्याचं बळ नाही माझ्या मनगटात,
तरीही प्रयत्न करतोय मी ती  उचलण्याची,
कारण,
तुझ्या दिलेल्या संविधानाचं रक्षण करायचंय मला,
वाचवायचंय या देशाला जात्यांधाच्या विषारी विषापासुन,
अन् सुरक्षित ठेवायचंय तुझ्या ध्येयातला भारताला..
विकास साळवे,पुणे
+919822559924..

Sunday, 13 January 2019

झुटनीती, कपटनीती म्हणजेच पवारनीती- सुमित वासनिक.

झुटनीती, कपटनीती म्हणजेच पवारनीती
- सुमित वासनिक.
अहमदनगर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी भाजपला मतदान करून भाजपचा महापौर बनविला. एकीकडे राष्ट्रवादी धर्मनिरपेक्षतेच्या गोष्टी करून भाजपला विरोध करत असल्याचे दर्शविते आणि दुसरीकडे स्वतःच्या नगरसेवकांना भाजपला समर्थन द्यायलाही लावते. राष्ट्रवादीच्या या दुटप्पी भूमिकेचा पूर्ण महाराष्ट्रातिल जनतेकडून कडाडून विरोध करण्यात आला तेंव्हा लगेच महापौर निवडीच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादि काँग्रेस कडुन सर्वाच्या सर्व 18 नगरसेवकांना पक्षातून काढण्यात आल्याच्या बातम्या राष्ट्रवादी कडुन पसरविण्यात आल्या होत्या सोबतच भाजपला समर्थन देऊ नका असा पक्षाचा आदेश झुगारून स्थानिक नेत्यांनी भाजपला समर्थन करण्याचा निर्णय घेतला असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले होते. पण राष्ट्रवादी काँग्रेस कडुन करण्यात आलेले हे दोन्ही दावे लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी केल्या गेले होते, हे आता समोर आले आहे.
अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक 28 डिसेंम्बर या तारखेला झाली होती. राष्ट्रवादीने भाजपला मतदान करणाऱ्या सर्वच्या सर्व 18 नगरसेवकांना निष्कासित केल्याच्या बातम्या 29 डिसेंम्बरला पसरविण्यात आल्या होत्या. पण सत्यपरिस्थितीत या 18 नगरसेवकांना आणि यांच्या सोबत शहर जिल्हाध्यक्ष असलेल्या विधाते यांना काल म्हणजे 12 जानेवारीला पक्षातून अधिकारीक पणे काढण्यात आले आहे. निवडणुकीच्या नंतर लोकांकडुन होत असलेल्या विरोधाला थांबवण्यासाठी राष्ट्रवादीने या बातम्या पसरविल्या होत्या पण लोकं काही केल्यास आपली ही दुटप्पी आणि धर्मनिरपेक्षते विरोधी भूमिका विसरायला तयार नसल्याचे पाहून 12 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसने या नगरसेवकांना नाईलाजाने पक्षातून बडतर्फ केले आहे. जनता विसरली असतीतर कोणावरही कार्यवाही झाली नसती.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते की पक्षाने भाजप सोबत जाऊ नका असे आदेश दिल्यावरही स्थानिक नेत्यांनी भाजपला समर्थन दिले आहे. ही सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेस कडुन मारण्यात आलेली एक शुद्ध थाप आहे.  'भाजपला पाठिंबा देऊ नका, असा निरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलाच नाही' असे जाहीरपणे सांगून अहमदनगर महानगरपालिकेतील भाजप-राष्ट्रवादी युतीचे शिल्पकार आ.विक्रम जगताप यांनीच स्वतः जयंत पाटलांचा खोटारडेपणा उघड केला आहे. अहमदनगर महानगरपालिकेत आपल्या चुकीच्या भूमिकेवर पांघरूण घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पसरविण्यात आलेली ही दुसरी खोटी बातमी होय.
राष्ट्रवादी काँग्रेसचा हा दुटप्पीपणा अश्या खोट्या बातम्या पसरविण्यावरच थांबलेला नाही. 12 जानेवारीला भाजपला मतदान करणाऱ्या 18 नगरसेवकांना आणि शहर जिल्हाध्यक्ष असलेल्या विधाते यांना पक्षातून बडतर्फ केले पण त्याच वेळी ही युति ज्यांनी घडविली त्या आ.संग्राम जगताप यांच्यावर कोणतीच कार्यवाही राष्ट्रवादीने केलेली नाही. ज्या व्यक्तीने ही अभद्र युति घडविली आहे त्या व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीशी घातले आहे, म्हणजे राष्ट्रवादीची या युतिला संमती आहेच हे स्पष्ट आहे. जनतेकडुन पक्षाला होत असलेल्या विरोधाला पाहून जगताप यांच्या शब्दाबाहेर नसलेल्या नगरसेवकांना राष्ट्रवादीने बडतर्फ केले पण जगताप यांना पक्षात ठेवले. 'साप भी मारो और लाठी भि ना टुटे' या म्हणी प्रमाणे राष्ट्रवादीचा हा निर्णय आहे.
अहमदनगर मध्ये भाजपला पाठिंबा देऊन राष्ट्रवादिने आपला खरा चेहरा सर्वांना दाखविला आहे. पण लोकांचा होत असलेला विरोध पाहता आपला हा सत्तापिपासू चेहरा लपविण्यासाठी राष्ट्रवादी कडुन सतत खोट्या गोष्टी पसरविण्यात येत आहेत. ज्याने युति घडविली त्याला पाठीशी घातले जात आहे. मित्रांनो सत्तेसाठी कोणत्याही पातळीवर जाणे हीच राष्ट्रवादी काँग्रेसची खरी विचारधारा आहे. राष्ट्रवादीची ही झुठनीती, कपटनिती म्हणजेच पवारनीती आहे हे महाराष्ट्रातील जनतेने अहमदनगर प्रकरणी चांगल्या प्रकारे ओळखले आहे.
सुमीत वासनिक


!!! नामांतर आणि बाळासाहेब आंबेडकर !!!

!!! नामांतर आणि बाळासाहेब आंबेडकर !!!

बाळासाहेब आंबेडकर यांनी नामांतर प्रश्नाला प्राधान्य दिले नाही असा गैरसमज काही लोकांनी करून दिला होता परंतु त्यांच्या या पायी मोर्चाने कळेल कि त्यांनी नामांतराला प्राधान्य दिले होते .दि .२७ नोव्हेंबर १९८३ ला मुंबईतील सिद्धार्थ विहार वडाळा येथे समविचारी लोकांची एक बैठक घेतली व रिपब्लिकन पक्षाबद्दल सविस्तर चर्चा केली .या चर्चेच्या आधारेच पुणे येथे ५ व ६ मे १९८४ ला अधिवेशन घेतले .”अहिल्याश्रम “ येथे घेतलेल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष्या होत्या गीताबाई गायकवाड .या अधिवेशनाला रा .सु .गवई वा तत्सम नेत्यांना बोलावले नाही .
    कारण हे सगळे नेते पराभूत मानसिकतेत होते आणि ही पराभूत मानसिकता १९७८ साली समंत झालेल्या नामांतर ठरावाची अंमलबजावणी होत नाही यात अंतर्भूत होती .या अधिवेशनातील बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुढील राजकारणाची दिशा ठरविणारे भाषण देण्याचा मोह आवरता येत नाही .ते आपल्या भाषणात म्हणाले होते की ,”डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला खराखुरा रिपब्लिकन पक्ष उभारण्याचा आपण निर्धार करत आहोत .या देशातील राजकारणावर संरजामदार श्रीमंताची घट्ट पकड आहे .येथे दलित श्रमिकांना कोणतेही राजकीय अस्तित्व नाही .या बहुसंख्यान्काची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आपण रिपब्लिकन पक्षाची पुनर्बांधणी करीत आहोत .सध्याचे एकजातीचे राजकारण ठोकरून आपण सर्वसमावेशक वृत्तीने सर्व तळागळातील समाज व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सोबत घेऊन केवळ मी पणाची वल्गना न करता पोलादी वृत्तीने सत्ताच ताब्यात घेण्यासाठी लढून या देशातील सर्व राष्ट्रीय प्रश्नाकडे देश हिताच्या दृष्टीने पाहून देशाचे नेतृत्व निर्माण करणारा पक्ष निर्माण करत आहोत .(अर्जुन डांगळे ,सा .प्रबुद्ध भारत २८ ऑक्टोंबर १९८८ पु १३ ).

सर्व तळागळातील समाज आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सोबत घेतल्याशिवाय नामांतराचा प्रश्न सुटणार नाही हे त्यांनी जाणले होते .याच काळात मंडल आयोग स्वीकृत करण्याचे काम तत्कालीन पंतप्रधान व्ही .पी .सिंग यांनी केले होते .मंडल आयोगातील अनेक जातींना राजकीय भान देण्याचे काम बाळासाहेब आंबेडकर यांनी केले .हा ओबीसी समूह बहुसंख्याक असूनही तो राजकीय सत्तेपासून दूर असल्याचे व त्याचा उपयोग कॉंग्रेस चे मराठा राज्यकर्ते कसा करून घेत आहेत हे समजावून सांगितले .त्यासाठी बहुजनांमध्ये विश्वसर्ह्यता निर्माण केली .काही ठिकाणी माधव ना (मा- माळी , ध – धनगर , व – वंजारी )जवळ करीत त्यांच्यातील राजकीय इर्षा जागृत केली .इतकेच नव्हे तर ओबीसी मधील छोट्या जात समूहांना एकत्र करून सत्ता दिली .पंचायत समिती ,जिल्हा परिषद ही सत्ताकेंद्रे ओबीसी ना मिळवून दिली .अल्पसंख्याकत्वामुळे जे पंचायत समितीतही पोहचू शकत नव्हते त्यांना मंत्री केले .महाराष्ट्रातील राजकारण कूस बदलू लागले केवळ राजकारण नाही तर समाजकारण ही कूस बदलू लागले .मंडल आयोगाच्या निमित्ताने का होईना ओबीसी वर्ग बाळासाहेबांकडे आकृष्ट झाल्यावर बाळासाहेबांनी नामांतराचा प्रश्न हाती घेतला .मला येथे बाळासाहेबांच्या राजकारणाचा आढावा घ्यायचा नाही तर नामांतरासाठी केलेले प्रयत्न अधोरेखित करताना एक बदल नोंदविणे महत्वाचे वाटते आणि ते म्हणजे १९७८ साली जे हात दलितांवर दगड फेकीत होते वा ते हात बाबासाहेबांचे फोटो फाडीत होते तेच हात आता जयभीम बोलू लागले होते .त्यांच्यातील जातीय पीळ नष्ट झाली होती .क्रांती म्हणतात ती हीच ! सामाजिक बदलाला महत्व देणारे बाळासाहेब निवडणुकींचेही राजकारणही करीत होते .१९८६ च्या विधानसभा निवडणुकीत भारीप ने जो जाहीरनामा काढला होता त्यात मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला अग्रक्रम दिला होता .(भारिप बहुजन महासंघाची भूमिका पु १११ ).

बाळसाहेब केवळ जाहिरनाम्यापुरते मर्यादित राहिले नाहीत तर जाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणे कृती कार्यक्रमासही लागले .त्यांनी ११ जानेवारी १९८६ रोजी राज्यविधिमंडळ हिवाळी अधिवेशन नागपूर येथे प्रचंड मोर्चा नेण्यात आला .
दि .२ मे १९८६ या एकाच दिवशी भारिप च्या सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा नेऊन नामांतराची अंमलबजावणी करावी म्हणून निवेदन देण्यात आले . दि .१५ व १६ मे १९८६ रोजी औरंगाबाद येथील नेहरू भवन येथे दुष्काळ परिषद घेतली होती .या परिषदेत नामांतराच्या अंमलबजावणीवर दीर्घ चर्चा झाली व सरकारला निवेदन देण्यात आले . २७ जुलै १९७७ रोजी औरंगाबादेत adv बि .एच .गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोर्चाने वातावरण निर्मिती केली .दि .२७ जुलै १९८८ ला नामांतर ठरावाला एक दशक झाले तेंव्हा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर प्रचंड मोर्चा नेण्यात आला .या मोर्चात सुमारे २५ हजार लोक सहभागी झाले होते .काहीसा मागे पडलेला प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला .दि  १० ऑगष्ट १९८८ रोजी मुंबई येथील आंबेडकर भवन येथे बाळासाहेबांचे नामांतर या विषयावर व्याख्यान झाले त्यात ते म्हणाले होते कि ,मराठवाडा नामांतराच्या चळवळीमागील सामाजिक आशय बाजूला सारून निवडणुकीतील मतांवर डोळा ठेवून हा विषय हाताळला जात आहे .मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामांतर करून टाकावे ,कारण ते स्वतःला  नामांतरवादी समजतात .शिवसेनेसारख्या संघटनेच्या भीतीने नामांतर प्रश्न चिघळत गेल्यामुळे हा प्रश्न सावधानतेने हाताळला जावा.(प्रबुद्ध भारत २७ .८ .१९८८ पृ २ )

१९७८ नंतर झालेला उद्रेक १९७९ चा सत्याग्रह ,लॉंग मार्च याचा परिणाम झालाच पण त्याच काळात माझी पोष्टर कविता मुळे तरुणाची मुठी वळवल्या होत्या ती कविता अशी होती

             ..............रक्ताची माणस
चला तर म्यानातील तलवारी आता बाहेर काढा
भिंतीभिंतीवरील बंदुकांचे चाप पुन्हा एकदा चाचपून पहा
कशाला ऐकता बक्कास त्यांची :
“टाइम इज नॉट राईट फॉर रिव्हाल्युशन
बुडाखाली शेव्हरलेट अन आकाशाला कवेत घेणार छप्पर
यांचा उपभोग घेत घेत ते उद्याच्या क्रांतीचा जयजयकार करणार
शस्त्र हातात घेण्याची वेळ येताच
खोट लावून दूर पळणार
पहा माझ्या डोळ्यातून :तो जनसमुदाय तुमच्याच रोखाणे झेपावतोय
.............................................................................. ज.वि .पवार

अशाप्रकारची कविता भीत्तीचीतावर लावलेली होती त्याला काढून टाकण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते .परंतु तरुणांच्या मनात पेटलेली कवित विझणार नव्हती .

मास मोव्हमेंट ,भारतिय रिपब्लिकन पक्ष ,दलित मुक्ती सेना इ .संघटना नामांतरासाठी आग्रह धरीत होत्याच भारतीय दलित पंथर चे नेते रामदास आठवले सत्तेत गेल्यामुळे त्यांनी लढा खंडित केला होता .दलित पंथर चे काही गट आपापले अस्तित्व पटवून देण्याचा प्रयत्न करीत होते .अशा वेळी गंगाधर गाडे यांचा एक गट एकाएकी चर्चेत आला कारण मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी गौतम वाघमारे यांनी २५ /११/१९९३ रोजी नांदेड येथे आत्मदहन केले .या दहनामुळे आंबेडकरी समाजात जसा उद्रेक झाला तसा शासनालाही धक्का बसला .आपण नामांतरासाठी बलिदान करीत आहोत असे वाघमारे यांनी लिहून ठेवले होते व त्याचवेळी माझे नेते गंगाधर गाडे आल्याशिवाय माझा अंत्यविधी करू नये अशी अपेक्षा केली होती .गाडे यांना तातडीने नांदेड ला जावे लागले.पुन्हा एकदा वातावरण तप्त झाले . त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह राजा ढाले ,अविनाश महातेकर इ मध्ये बैठक झाली .शरद पवार बाळासाहेब आंबेडकर यांना म्हणाले कि मी नामांतराबाबत मी निर्णय घेईल पण याचे श्रेयही मीच घेईल .त्यांनतर १४ जानेवारी १९९४ रोजी नामांतर झाले असे जाहीर केले परंतु ते नामांतर नव्हते ,नामविस्तार ही नव्हता आणि तरीही मुख्यमंत्री शरद पवार यांनी बंदुकीचा धाक नामांतरवाद्यांना दाखविला होता तसा सौम्य नामांतरविरोधकांनाही दाखविला होता .

नामांतर गपचूप मान्य करा हा दलितेतर संदेश देण्यात आला तर ही तडजोड मान्य करा अन्यथा सरकार शस्त्र हाती घेईल १४ जानेवारी १९९४ रोजी झाले ते नामांतर होते असे समजून हा दिवस औरंगाबादेत आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो .पण हे लोक विसरतात कि आभाळभर उंची असलेले डॉ .बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महापुरुषाला एका प्रदेशापुरते बंधिस्त करण्यात आले ...........

           संदर्भ – आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ खंड ५ मधील उतारा
           लेखक – ज .वि पवार

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...