Friday, 23 October 2020

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!!

" #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत".

त्याचे स्पष्टीकरण असे...!!


     लॉकडाऊनमध्ये देश ठप्प झाला होता,गरीब माणूस एका सांजेचं जेवन मिळविण्यात असहाय्य झाला होता तेव्हा आंबेडकरवादी म्हणवून घेणारे कुठे होते...??

   देशातील मजुर हजारो किलोमीटर पायी चालत गेला तेव्हा आंबेडकरवादी म्हणवून घेणारे आणि सत्तेत असणारे कुठे होते...??

       गरीब माणूस आपला व्यवसाय बसला म्हणून भिकेला लागला होता तेव्हा सत्तेतील ठेकेदार , कारखानदार, घराणेशाही वाले, हातावर २८ लाखाचं घड्याळं बांधणारे,बीएमडब्लू गाड्यात ऊंडारणारे आणि बेगडी आंबेडकरवादी कुठे होते...??


   असे अनेक प्रश्न समाजासमोर कोरोनाच्या काळात ऊभे राहिले तेव्हा सगळे राजकीय पुढारी घरात बसून मजा बघत होते हे वास्तव आता कुणालाही सांगायची गरजच नाही...!!

       महाराष्ट्रात एकमेव वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर हे दौरे करीत होते आणि आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आदेश देऊन,कोरोना काळात धान्य वाटप करणे, रस्त्यावरच्या पायी चालणाऱ्या मजुराला जेवण आणि पाणी पुरविणे तथा गरीब वस्तीत राशन वाटप करीत होते हा इतिहास काही जुना नाही...!!


    बंद असलेला महाराष्ट्र सुरु करण्याचे श्रेय कुणाचे...??


  बंद महाराष्ट्र सुरु करण्याचे श्रेय केवळ आणि केवळ एकट्या बाळासाहेब आंबेडकर यांना जाते...!!

  त्याचे कारण असे की, सलून दुकाने उघडण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेतला आणि सलूनची दुकाने सुरू केली...!!

    छोट्या व्यवसाईकांची रोजीरोटी सुरू करण्यासाठी वंचित बहूजन आघाडीने आंदोलन केले आणि छोटे छोटे व्यवसाय सुरू झाले...!!

 अलूतेदार बलूतेदार वर्गाच्या रोजीरोटीचा प्रश्न बाळासाहेब आंबेडकर यांनी ऐरणीवर घेतला...!!

   संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी आणि एकाच वेळी डफली बजाव आंदोलन केले, बाळासाहेब आंबेडकरांनी नागपुरात डफली वाजविली आणि महाराष्ट्रातील एस टी बसेस सुरू झाल्या...!!

   मंदिर उघडण्यासाठी आंदोलन केले ते महाराष्ट्रात गाजले पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारक-यांना परवानगी मिळाली आणि एसओपी तयार करून मंदिरे ऊघडू ही भाषा मुख्यमंत्री बोलले...!!


   एकंदरित भयग्रस्त समाजाला हिम्मत देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी कार्यकर्ते घराबाहेर काढले लोकांना आंदोलने दिसु लागली आणि जनमाणसं भयमुक्त होण्यास मदत झाली म्हणूनच तर पंढरपूरला लाखों जनता रस्त्यावर उतरली...!!

   महाराष्ट्रातील मुख्यमंत्री महाराष्ट्र सुरु करण्यासाठी अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आंदोलनाला प्रतिसाद देतो आहे हे पाहून जुने जाणते काडीबाज आणि सरकारचे शिल्पकार म्हणवून घेणारे बुजुर्ग नेते कमालीचे अस्वस्थ झाले...!!

  आम्ही सत्तेत असुनही आमचे नाव कुणी घेतं नाही आणि संपूर्ण महाराष्ट्र आंबेडकर सुरू करीत आहेत, ही आंतरीक जळफळाट मनात खदखदत राहिली...!!


   वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर हे कोरोनाच्या संकट काळात जात आणि धर्माच्या पलिकडे जाऊन मानवतावादी भुमिका घेऊन सामाजिक मशागत करीत राहिले,त्याचा परिणाम असा झाला की, जनतेच्या लक्षात आले आहे...!!

 सत्तेत असणारे केवळ मतदानाच्या वेळी आपल्या दारात येतात मात्र आपल्यावर संकट आले तर ते कामी येतं नाही. या भावनेतून सत्ताधारी वर्गाबद्दल प्रचंड रोष आणि मानवतावादी भुमिका घेणा-या नेतृत्वाबद्दल कमालीचा आदर समाजमनात निर्माण झाला आहे...!!

  समाजातील ही भावना कायम राहिली तर आपली सत्ता जाणार या भितीपोटी सत्तेतील ठेकेदार, घराणेशाही वाले अस्वस्थ झाले आहेत...!!

    अॅड बाळासाहेब आंबेडकर हे नेहमी सडेतोड बोलतात आणि स्पष्ट आरोप करतात हा त्यांचा स्वभाव आहे...!!

    नरेंद्र मोदी यांच्यावर बाळासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा निशाना साधला नाही, यापूर्वी सुद्धा असेच आरोप केले आहेत...!!

   आरएसएस प्रमुख यांच्यावरही सडेतोड टिका बाळासाहेब आंबेडकरांनी केली आहे...!!

आरएसएसचे नागपूर येथील शस्त्रपुजन बाळासाहेब आंबेडकर यांच्या दबावामुळेच बंद झाले आहे...!!

 आरएसएसने संघाच्या मुख्यालयावर तिरंगा ध्वज भारिप बहुजन महासंघाच्या आंदोलनामुळेच लावला आहे हाही इतिहास आहे...!!


   त्यावेळी आंबेडकरवादी रामदास आठवले,तथा सुरेश माने यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या टिकेवर आक्षेप नोंदविला होता काय..??

     तुम्ही आंबेडकरवादी म्हणवून घेता आणि भाषा प्रस्थापितांची बोलता हे कशासाठी...??


   दलालांचे मालक वादग्रस्त विषयावर कधीच बोलतं नाहीत...!!

  ते दलालांना बिदागी देतात आणि बोलायला सांगतात,त्या अनुषंगाने यांची जीभ उचलली जाते...!!

  आंबेडकर महाराष्ट्रात सत्तेचे समीकरण बदलविणार म्हणून मालक सांगतील त्या प्रमाणे दलाल प्रवृत्तीचे लोक बोलतात हा संदर्भ लक्षात घ्यावा...!!

   प्रस्थापित राजकारण्यांच्या पोटातील खदखद बेगडी आंबेडकरवादी म्हणवून घेणारांच्या तोंडातून बाहेर पडते आहे...!!

   अॅड बाळासाहेब आंबेडकर हे चुकीचे बोलले असतील तर त्याचे उत्तर संबंधित राजकीय नेतृत्वाने द्यावे,त्या वक्तव्याचा समाचार दारुड्या नेच घ्यावा, आंबेडकरी म्हणवून घेणाऱ्या बुजगावण्याला कशाला पुढे करता...??

     आपलं अपयश लपविण्यासाठी सत्तेचे ठेकेदार पैशांच्या जोरावर माणसं कामाला लावतात आणि ज्यांना पैसाच सर्व काही वाटतो अशी माणसं पैशासाठी कोणत्याही प्रकारे तोंडाची वाफ घालवितात असा हा प्रकार आहे...!!

       जयभीम.

@.. भास्कर भोजने.

Saturday, 3 October 2020

*कॉंग्रेस कठपुतली बनले आहे*

लॉकडाऊन लाऊन पुर्ण देशाचा संघ व मोदीने सत्यानाश केला, पण आता चर्चा फक्त उत्तर प्रदेश व योगी यांच्यावर आणुन ठेवली, तिकडे कितीही नंगानाच केला तरी पचवता येतो, राम राज्य है ना वहा पे. 
 
आपन एबीपी माझा चे पत्रकार सुधारलोय म्हणुन हुरळुन जातोय पन संघ सर्व गोष्टी थंड डोक्याने व विचारपुर्वक करतो हे आपन विसरतो,
  तिसरी आघाडी स्थान निर्माण करत आहे हे लक्षात येताच राहुल व प्रियांका सारख्या फेल झालेल्या विरोधकांनाच पुन्हा स्थिर करायचा भाजपचा हा डाव आपल्या लक्षात कसा येत नाही?

भाजपकडची नाराज जनता तिसर्या आघाडी कडे न वळता पुन्हा कॉंग्रेस कडे वळावी हा साधा खेळ आहे.

पाच वर्षात किती दलित अत्याचारा बद्दल गांधी कुटुंब आक्रमक झाले व मनुवादी मीडियाने त्यांना सपोर्ट केला? या वेळीच का सर्व अद्भुत परिवर्तन दिसतय? 

भाजपाला राहुल गांधी सारखा विपक्ष नेता पाहीजे.

*बिहार निवडणुका प्रत्येकवेळी तिव्र विषमता व उघड जातीवादाच्या बेसवरच लढवली जाते, बिहार ला लैब सारखे वापरले जाते, मागच्या निवडणुकात आरक्षण संपवले पाहीजे अशा उघड भुमिका घेऊन भाजप निवडणुकात उतरले होते, यावेळी हाथरस व बाबरी चा जुलुम करुन निवडणुकाला सामोरे जात आहेत.

बिहार हे बुद्धभुमी आहे, तिकडे विकास होवो की न होवो, संघाला देनेघेने नसते, तिकडे ते तिव्र जातीवादाच्या बेसवर निवडणुका लढुन जनमत तपासत असतात.
बहुजनांनी कॉंग्रेस व भाजपा या दोन्ही पासुम सावध रहायला पाहीजे, गेली 65 वर्ष कॉंग्रेसने तेच केले जे आता 7 वर्ष भाजपा करत आहे, हे दोन्ही पक्ष वैदिक जानवेधारी विचारधारेचेच आहे, राहुल गांधी ने लोकसभा निवडणुकात जानवे जाहिर पने दाखवले होते. 

- मनोज काळे.

Thursday, 1 October 2020

कॉंग्रेसचे नरकाश्रू...!!




     काल ऊत्तर प्रदेशातील हाथरस येथे कॉग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना ऊत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली असा कांगावा करीत कॉग्रेस पक्ष रस्त्यावर ऊतरला आहे...!!
    दलितांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न कॉंग्रेस पक्ष करीत आहे...!!
  खरं म्हणजे कॉग्रेस आणि भाजप मध्ये काहीच फरक नाही, हे आता देशातील दलित आणि मुस्लिम समुहाला कुणीही सांगायची गरजच राहिली नाही,एवढं मोठं अनुभवाच गाठोड जनतेच्या जवळ जमा झालं आहे...!!
  १९७३ मध्ये गरीबी हटाव चा नारा देणारा कॉग्रेस पक्ष किती दगलबाज आहे हे आता पुन्हा पुन्हा सांगायची गरजच नाही...!!
,गरीब अधिक गरीब झाला तथा दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीची टक्केवारी वाढतचं गेली...!!
  कॉंग्रेस पक्षाच्याच सरकारने भांडवली निर्णय घेऊन खाजगीकरण केले देशात भांडवलदारांसाठी नवं दालनं उघडलं आणि नवा भांडवलदार वर्ग निर्माण झाला...!!

 गरीबांच्या नांवानें दलितांची मते घेतली आणि काम मात्र भांडवलदार भावंडासाठी केलं हे आज सिद्ध झालेले आहे.आता कॉग्रेस पक्षाने आणखी नौटंकी करु नये...!!

   कॉंग्रेस का हाथ,गरीबोके साथ...!!
अशी भावनिक साद घालायची मात्र गरीबांना देशोधडीला लावायचं काम कॉग्रेस पक्षाने केले याचा अनुभव देशातील जनतेने घेतला आहे...!!
      दलित, मुस्लिम समाजाची मते घेऊन कॉग्रेस पक्षाने संपूर्ण देशात जातदांडगे नेते निर्माण केले, घराणेशाही मजबुत केली आणि जातियवाद  मजबूत केला,त्याचीच फळे आज दिसतं आहेत...!! 
 दलितांवर इथला मोठ्या जातीचा धनदांडगा हा जातीय अत्याचार आणि अन्याय करतो आहे...!!
   ज्या हाथरस गॅंगरेप प्रकरणाचा निषेध नोंदवायला राहुल गांधी आणि प्रियंका गांधी चालल्या होत्या ते बलात्कारी कोण आहेत,..??
 ऊत्तर प्रदेशातील जातदांडगे "ठाकुर" जातीचे नराधम आहेत...!!
ऊत्तर प्रदेशातील या जातदांडग्यांना आजपर्यंत कॉग्रेस पक्षानेच मोठे केले आहे हे पाप कॉग्रेस पक्षाचेच आहे...!!
      महाराष्ट्रात कॉग्रेस पक्षाचे सरकार असतांनाच खैरलांजी हत्याकांड घडले ते हत्याकांड जगाच्या वेशीवर टांगल्या गेले तरीही त्या हत्याकांडातील आरोपींना शिक्षा झाली नाही कारण उघडं आहे, सत्ताधारी पक्षाने पोलिस प्रशासनाला वापरून पुरावे नष्ट केले,कच्चे दुवे ठेवले आणि वरुन अतिरेक करीत त्याच खैरलांजी गावाला तंटामुक्त पुरस्कार दिला...!!
   महाराष्ट्रातील मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाच्या आडुन दलितांची प्रचंड नाकेबंदी कॉग्रेस पक्षाच्याच सरकारने केली होती हा अनुभव आहे...!!
    एक नाही अनेक घटना आहेत की, देशात दलितांवर अन्याय,अत्याचार हे कॉग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केले आहेत आणि सत्तेच्या माजोरीवर ते दडपून टाकण्यात आले आहेत...!!
     आजही बेशरम कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या धक्काबुक्की साठी रस्त्यावर उतरले मात्र ते मनिषा वाल्मीकी या तरुणीला न्याय मिळावा अशी मागणी करीत नाहीत...!!
 त्यांना दलित मुलीवर बलात्कार झाला किंवा दलितांवर अन्याय होतो याच्याशी काही देणंघेणं नाही...!!
   केवळ राहुल गांधी,राहूल गांधी असा टाहो फोडाणारा मिडिया आणि मनुवादी कॉग्रेशी एकाच मानसिकतेचे प्रतिक आहेत,त्यांना दलित मुलीला न्याय मिळाला पाहिजे याच्याशी काही देणंघेणं नाही...!!
  *भाजप आणि काँग्रेस पक्षाचं आर्थिक धोरणं एकच आहे...!!
* भाजप आणि काँग्रेस पक्षाचं निर्गुंतवणीकीचं धोरण एकच आहे...!!
* भाजप आणि काँग्रेस पक्षाचं भांडवलदार धार्जीन धोरणही एकसमान आहे...!!
* भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी वेळोवेळी आरएसएस या वैदिक संघटनेला मदतचं केली आहे...!!
*बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याचा मनसुबा भाजपाने आखला मात्र त्याला मुर्त रुप कॉग्रेस पक्षाच्या नरसिंहराव सरकारने दिले....!!
* भाजप धर्माच्या नावाने तर कॉग्रेस जातीच्या नावावर राजकारण करतो...!!
 * कॉंग्रेस पक्षाने लोकशाही संपवून आणिबाणीचा प्रयोग केला होता,तोच प्रयोग आजच्या भाजपच्या सरकारनेही सुरू केलेला आहे...!!

मग कॉग्रेस आणि भाजप मध्ये फरक कोणता आहे...??

  दर पाच वर्षांनी जेव्हा जेव्हा निवडणूका येतात तेव्हा तेव्हा भारतीय जनतेला फसविण्यासाठी या दोन्ही पक्षांची नाकटे सुरू होतात...!!
  तु मारल्या सारखे कर...!!
  मी रडल्या सारखे करतो...!!
 हा नाटकाचा प्रयोग सुरू झाला आहे...!!

  म.गांधीच्या हत्येनंतर जर आरएसएस वर कायमची बंदी घातली गेली असती तर आजचा दिवस दिसला नसता, परंतु कॉग्रेस पक्षाने सत्तेसाठी म.गांधीच्या हत्येचाही वापर केला आणि गांधी तत्वज्ञान गुंडाळून ठेवले...!!
 तीच कॉग्रेस दलितांना काय न्याय देऊ शकेल...??
  कॉंग्रेस पक्ष आता सत्तेसाठी नरकाश्रू गाळते आहे हे जनतेला पटलेले आहे...!!
   जयभीम.
@.. भास्कर भोजने.

Saturday, 26 September 2020

गरीब मराठ्यांनो...!!

गरीब मराठ्यांनो...!!

      गरीब मराठा बांधवांनो, एकेकाळी संपन्न असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मागायची वेळ का आली.?? या प्रश्नाचे उत्तर मिळवावे लागेल...!!
      झालेल्या चुका टाळल्या शिवाय,प्रगती साधता येणार नाही, आरक्षण हा एकच पर्याय डोळ्यासमोर ठेवून पुढिल वाटचाल केली तर पुन्हा फसगत होण्याची दाट शक्यता आहे...!!
 आरक्षणामुळे विकास साधता येतो हा समज निर्माण झाला आहे...!!
   आरक्षणामुळेच आंबेडकरी समुहाचा विकास झाला असाही समज निर्माण झाला आहे...!!
  आणि म्हणूनच मग
   आरक्षण संपवण्यासाठी मनुवादी गिधाडे संपूर्ण सरकारी खात्यांच खाजगीकरण करीत आहेत...!!
   खाजगीकरणातून आरक्षण संपले तर मग आरक्षण मिळूनही समस्त समाजाचा विकास साधता येईल का...??
   आरक्षणामुळे नोकरी मिळेल मात्र नोकरीचे क्षेत्र किती टक्के आहे.२% नोकरीत संपुर्ण समाजाला न्याय देता येईल का...??
    सारासार विचार करता आरक्षणा सोबतंच काही मुलभूत बाबींचा विचार सुद्धा करावा लागेल...!!
  ज्या महाराष्ट्रात मराठा जात ही प्रबळ असतांनाच आणि गेल्या साठ वर्षात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मराठा नेतृत्व असतांना मराठा समाजचं कसा रसातळाला गेला याचाही विचार व्हायला हवा की, नको...??
   ज्यांनी जातीच्या नावावर मते मागितली आणि सत्तेत बसले त्यांनी जातीचा विकास केला का..??
ऊत्तर नकारार्थी आहे...!!
  ज्यांनी जातीच्या नावावर मते मागितली त्यांनीच जातीच्या ऐवजी आपली घराणेशाही मजबुत केली, हेही समजून घ्यावे लागेल...!!
   केवळ सत्ताच उपभोगली नाही तर प्रचंड आर्थिक सुबत्ता हस्तगत केली हेही समजून घ्यावे लागेल...!!
    काही मोजक्या लोकांचे वारसदार परंपरागत पद्धतीने सत्तेचे ठेकेदार झाले आहेत आणि सत्तेतून संपत्ती वान बनले आहेत...!!
   पहिल्या पिढीतील शरद पवार साहेब...!
 दुसऱ्या पिढीतील अजित पवार साहेब आणि सुप्रिया ताई सुळे...!!
 तिसऱ्या पिढीतील पार्थ पवार आणि रोहित पवार ही घराणेशाही कुणाच्या वाट्याची सत्ता ऊपभोगतं आहेत,? याचाही विचार करावा लागेल...!!

 जसे पवार घराणे तसेच नांदेडचे चव्हाण घराणे,तसेच विखे पाटलांचे घराणे एक नाही अनेक घराणे प्रस्थापित झाले,सतत सत्तेत राहिले मात्र आपलेच भाऊबंद आर्थिकदृष्ट्या मागे पडतं आहेत याचा कधीच विचार केला नाही आणि सत्तेचा त्यासाठी वापरही केला नाही...!!
 ज्यांच्या मतांवर सत्तेत बसलो त्यांच्यासाठी सत्तेचा योग्य वापर केला असता तर कदाचित आज मराठा समाजाला आरक्षण मागायची वेळ आली नसती.हा विचार कधीतरी सत्ताधारी मराठा नेत्यांनी केला आहे का..?? किंवा तशा प्रकारची खंत कधीतरी व्यक्त केली आहे का..??

  सत्तेशिवाय सहकाराचे मोठे क्षेत्र मराठा समाजाच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राने विकसित केले,देशाला दिलेली ती महाराष्ट्राची देणगी आहे एवढं महत्त्वाचं आणि पुढचं पाऊल टाकणार काम महाराष्ट्राने केले आहे...!!
 सहकार क्षेत्राचं खोबरं कुणी केलं...??
 कारखान्याच्या नांवावर किती सरकारी निधी मिळविला आणि तरीही कारखाना अवसायनात कसा गेला,?? हेही समजून घ्यावे लागेल...!!
  सहकारी कारखाना घाट्यात आणि तोच कारखाना खाजगी झाला की,नफ्यात चालतो हे गौडबंगाल सुद्धा समजुन घ्यावे लागेल...!!
     एका साखर कारखान्याच्या बाजुला तीस पस्तीस छोटे छोटे ऊद्योग उभे राहू शकतात अशी रोजगार निर्मिती आणि समाज विकासाची संधी असुनही ते छोटे ऊद्योग महाराष्ट्रातील साखर कारखान्याच्या बाजुला उभे का राहिले नाही.?? याच्या पाठिमागचे कारण काय..??
साखर कारखानदारांना विकासाची बुद्धी नाही का..??
 साखर सम्राटांना विकासाची दृष्टी आहे मात्र स्वत:पुरती मर्यादित आहे, समाजासाठी नाही...!!
  त्यांना कुणीही प्रतिस्पर्धी तयार होऊ द्यायचा नव्हता म्हणूनचं तर छोटे ऊद्योग उभे राहू दिले नाही...!!
  आणखी एक बाब समजून घेतली पाहिजे, राजकीय पटलावर रामदास आठवले सारखा रोडवरचा तरुण उचलून गरीब घरचा पोरगा ऊचलला आणि कॅबिनेट मंत्री बनविला,त्याला कायम सत्तेतच बसविले तसे किती गरीब मराठा तरुणांना संधी दिल्या गेली याही दिशेने गरीब मराठा बांधवांनी विचार केला पाहिजे...!!
  अनेक अर्थाने आणि चौफेर विचार करून गरीब मराठा बांधवांनी आपल्या विकासासाठी आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे हे लक्षात घ्यावे...!!
 कु-हाडीचा दांडा गोतास काळ...!!
 घरका भेदी लंका ढाये....!!
 या बोध वाचनातून काही बोध घेता येईल का...??
  जयभीम.
@.. भास्कर भोजने.

Thursday, 24 September 2020

वंचित बहूजन आघाडीची राष्ट्रीय पक्षाच्या दिशेने वाटचाल...!!




       देश पातळीवर आंबेडकरवादी विचाराचा पक्ष ऊरला नाही, जी अपेक्षा बसपा कडुन जनतेला होती त्या अपेक्षेला छेदून बसपाने राजकीय डावपेच खेळले...!!
   बसपा भाजपच्या मांडीवर जाऊन बसली सत्तेची फळे चाखली आणि जनतेच्या मनातून बसपा हद्दपार झाली...!!
   त्याचाच परिणाम म्हणजे उत्तरेकडील राज्यांत पंजाब हरियाणा बिहार आणि दिल्ली मधील बसपाचा जनाधार संपला , आणि बसपा केवळ ऊत्तरप्रदेशा पुरती सीमित झाली...!!
  एवढेंच नाही तर बसपाचा उत्तर प्रदेशातील जनाधार सुद्धा घसरला आहे, हे २०१४ आणि २०१९ च्या निवडणूकीत सिद्ध झाले आहे...!!
   म्हणून देश पातळीवर आंबेडकरवादी विचाराचा पक्षाची नितांत गरज लक्षात घेऊन वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी, वंचित बहूजन आघाडीचा परिघ विस्तारायला सुरुवात केली आहे...!!
  मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीच्या २७ जागा वंचित बहूजन आघाडी लढवित असुन,आता बिहार विधानसभेत सुद्धा बहूजन आघाडी ऊतरली आहे...!!
   यापुर्वीही वंचित बहूजन आघाडीने कर्नाटक विधानसभेच्या आठ जागांवर उमेदवार ऊभे करुन जनतेचा कौल घेतला होता...!!
     आज रोजी देशात फॅसिस्ट शक्ती विरोधात लढण्यासाठी आंबेडकरवादी विचारधारेची नितांत गरज निर्माण झाली आहे...!!
   वंचित बहूजन आघाडीचा विस्तारलेला परिघ देशातील वंचित समुहाला निश्र्चितच न्याय देऊ शकेल याची शाश्वती वाटते...!!
 कारण गेल्या ४० वर्षाच्या राजकीय जीवनात वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी कधीही विचारांशी तडजोड केली नाही हेचं त्यांच साफसुथर चारित्र्य उद्याच्या जनसामान्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणू शकते हा विश्वास वाटतोय...!!
      जयभीम.
@.. भास्कर भोजने.

Tuesday, 22 September 2020

श्रीमंत मराठ्यांचा कांगावा...!!

श्रीमंत मराठ्यांचा कांगावा...!!

       मराठा आरक्षणाच्या निमित्ताने श्रीमंत मराठे विरुद्ध गरीब मराठे असा शब्दप्रयोग करुन वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी विचार मांडले, म्हणून श्रीमंत मराठ्यांचा तिळपापड झाला...!!
   म्हणे प्रकाश आंबेडकर मराठ्यांमध्ये भांडणं लावतं आहेत...!!

   श्रीमंत मराठे पुढे येऊन रोखठोकपणे बाळासाहेब आंबेडकरांना ऊत्तर मागू शकले नाही म्हणून श्रीमंत मराठ्यांनी आपल्या मर्जीतील लोकांना कामाला लाऊन आरोप करु लागले की,प्रकाश आंबेडकर मराठ्यां मध्ये भांडण लावीत आहेत...!!
   टि.व्ही चॅनल वरुन तशी हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे...!!

   श्रीमंत मराठ्यांनो तुम्ही सत्य किती दिवस झाकून ठेऊ शकता...??

    महाराष्ट्रात मोजकेच मराठे आहेत की,ज्यांच्याकडे अरबो खरबो रुपयांची संपत्ती आहे...!!
   साखर कारखानदार आहेत,सुत गिरणीचे मालक आहेत, दूध डेअरीचे मालक आहेत,शिक्षण महर्षी आहेत,सतत सत्तेत आहेत, हे सत्य तुम्ही नाकारु शकता का..??
   परंतु महाराष्ट्रात संख्येने सर्वात मोठ्या असलेल्या मराठा जातीत मोठा वर्ग असा आहे की,तो अल्पभूधारक शेतकरी आहे, शेतमजूर आहे, शेतीशी निगडित अकुशल कामगार आहे, आर्थिकदृष्ट्या कमजोर आहे. हे सत्य तुम्ही नाकारु शकता का...??
 मराठा जातीत सरळ सरळ दोन वर्ग आहेत एक श्रीमंताचा आणि दुसरा गरीबांचा, हे सत्य तुम्ही नाकारु शकता का..??
 महाराष्ट्राच्या सत्तेत केवळ १६९ घराणेच आलटून पालटून सत्ता ऊपभोगतात हे सत्य तुम्ही नाकारु शकता का..??
   आज रोजी जे मराठे श्रीमंत आहेत,त्यांची आर्थिक सुबत्ता कशामुळे...??
   या प्रश्नाचे उत्तर शोधले तर सहजच लक्षात येते की, सत्तेतून आणि सहकारातून या वर्गाने आर्थिक संपन्नता मिळविली आणि सत्ता जातीच्या नावावर राजकारण करुन मिळविली हेही सत्य तुम्ही नाकारु शकता का...??
   श्रीमंत मराठयांनी इतरांकडे बोट दाखविण्याच्या ऐवजी सरळ सरळ ऊत्तर द्यावे की,ज्या जातीच्या नांवावर तुम्ही गेली साठ वर्षे सत्तेत आहात त्या जातीसाठी तुम्ही काय केले..??

      मराठा जातीचा आर्थिकदृष्ट्या विकास झाला असता तर आज आरक्षण मागण्याची वेळ आली असती काय..??

   एकटे प्रकाश आंबेडकर यांनी रोखठोक आणि सत्य मांडले म्हणून तुम्ही त्यांना भांडणे लावता का.??
असा प्रश्न विचारता.मात्र मराठा आरक्षणावर विनायक मेटे यांनी सुद्धा शंका उपस्थित केली की, काही मराठ्यांनाच मराठा जातीला आरक्षण मिळू द्यायचे नाही, विनायक मेटे तर स्वत: मराठा आहेत आणि मराठा आरक्षणासाठी झटत आहेत त्यांचेंवरही हाच आरोप करणारं का.??
   छत्रपती चे वंशज उदयनराजे भोसले आणि संभाजी राजे यांनी सुद्धा तोच सुर आवळला आहे की, काही मराठ्यांनाच मराठा आरक्षण मिळू द्यायचे नाही,त्यांचेवरही भांडणे लावण्याचा आरोप करणारं आहात का..??
    श्रीमंत मराठ्यांच्या दहशतीमुळे गरीब मराठ्यांमधील अनेकजण सत्य मांडण्यास कचरतात हे वास्तव आहे...!!
    आपल्या संपत्तीच्या आणि सत्तेच्या माजोरीतुन अनेकांना झुलवत ठेऊन, कित्येकांना बरेच आमिषे देऊन,तर कित्येकांना बर्बाद करुन तुम्ही जी दहशत निर्माण केली आहे त्यामुळे ब-याच जणांना सत्य समजूनही ते तोंड ऊघडतं नाहीत हे जमीनी वास्तव आहे...!!
   जातीच्या नांवावर जी सत्ता मिळविली जाते ती जाऊ नये म्हणून श्रीमंत मराठे हा कांगावा करीत आहेत...!!
 ज्या सहकारातुन संपन्नता मिळविली त्याच सहकाराच्या आडून किती शेतकऱ्यांना बर्बाद केले त्याचे उत्तर तुमच्याकडे आहे का..??
  एका साखर कारखान्याच्या बाजुला तीस पस्तीस छोटे ऊद्योग उभे राहू शकतात ते तुम्ही ऊभे केले नाही याचे समर्पक उत्तर देऊ शकता का..??
    रामदास आठवले सारख्या रोडवरच्या तरुणाला डायरेक्ट कॅबिनेट मंत्री बनविले आणि सतत सत्तेत बसविले तसे किती मराठा तरुणांना तुम्ही सत्ताधारी केले..??
 या प्रश्नाचे समर्पक उत्तर तुमच्याकडे आहे का..??
   प्रश्न अनेक आहेत, श्रीमंत मराठे त्या प्रश्नांची उत्तरे देण्याच्या भानगडीत पडत नाहीत,केवळ आपली आणि आपल्या नातेवाइकांची सत्ता कशी अबाधित राहील यासाठी नेहमीच दक्ष असतात म्हणून ती सत्ता जाऊ नये यासाठी श्रीमंत मराठयांनी कांगावा करायला सुरुवात केली आहे हे समस्त महाराष्ट्रातील जनतेने समजून घ्यावे हीच अपेक्षा...!!
     जयभीम.
@.. भास्कर भोजने.

Sunday, 20 September 2020

मराठा आरक्षण -कळीचे मुद्दे पण उकल नाही. एकेकाळचा संपन्न समाज सर्वाधिक काळ सत्ता असताना आज मागासला कसा ? - मनोज काळे.

मराठा आरक्षण -कळीचे मुद्दे पण उकल नाही.  
एकेकाळचा संपन्न समाज सर्वाधिक काळ सत्ता असताना आज मागासला कसा ? - मनोज काळे.



मराठा आरक्षण प्रकरण अंतिम निर्णयासाठी मोठ्या खंडपीठाकडे सोपवताना सध्याच्या आरक्षणाला स्थगितीचा निर्णय आल्याने या निर्णयाचे तीव्र पडसाद सध्या राज्यभरात उमटत आहेत.आरक्षण स्थगिती मुळे महाराष्ट्र धुमसायला सुरु झाला.आघाडी सरकारने मराठ्यांची फसवणूक केली, राज्य सरकारकडून मराठा समाजाबाबत दुजाभाव केला.महाविकास आघाडी सरकारनं ठरवून हलगर्जीपणा केला, मराठा आरक्षणाच्या हुतात्म्यांचा अवमान असे गंभीर आरोप सुरु झाले.निवेदन, आंदोलने, मोर्चे, घेराव, आरोप खुलासे ह्याने राज्य ढवळून निघाले आहे.सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश आल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढणे, सर्वोच्च न्यायालयाच्या सध्याच्या खंडपीठाकडे जाऊन फेरविचार याचिका करणे, घटनापीठाकडे जाऊन आदेश निरस्त करण्याची विनंती करणे, मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्या मागास घटकांच्या आरक्षणाचा लाभ देणे, विविध अभ्यासक्रमांच्या जागा वाढवणे असे अनेक पर्याय चाचपले जाताहेत. यातील नेमके कोणते पर्याय योग्य आणि टिकणारे आहेत यावर कायदेशीर मत घेऊन सोमवारी सर्वोच्च न्यायालयात फेरयाचिका करणार असल्याचे जाहीर झाले आहे.ह्या सर्व रणधुमाळी मध्ये मराठा आरक्षणाच्या अनेक कळीच्या मुद्द्यावर चर्चाच होऊ दिली जात नाही.ह्या मध्ये सत्ताधारी आणि आरक्षणाचे समर्थक कमालीचे यशस्वी झालेले दिसतात.मूळ विषयाला बगल दिल्याने मराठा समाजाच्या मागासलेपणाची जबाबदारी आपल्यावर येऊ नये ही काळजी घेतली जात आहे.  

आरक्षणाची पार्श्वभूमी -

मराठा आरक्षणाची मागणी ही तशी १९८९ पासून केली जात आहे.अलीकडच्या काळात, मराठा क्रान्ती मोर्च्याच्या माध्यमातून झालेल्या मूकमोर्च्याने व अनेकांच्या बलिदानातून मराठा समाजाला महाराष्ट्रात शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ देण्यासाठी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाबाबतचा अधिनियम, २०१८ लागू करण्यात आला होता. या नुसार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये एकूण १६ टक्के आरक्षण दिले होते. मात्र ते उचित नसल्याचे म्हणत कोर्टाते मराठा समाजाला १२ टक्के आणि १३ टक्के कोटा प्रदान करण्यात आला होता. या अध्यादेशामुळे इंदिरा साहनी प्रकरणात निर्धारित तत्वांचे उल्लघन होत असल्याचे म्हणत सुप्रीम कोर्टात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हानही देण्यात आले होते.पुन्हा हे प्रकरण मोठ्या पीठाकडे असल्याने न्यायालयाच्या निर्णयातून हा निर्णय होणार आहे.आजच्या लेखाचा विषय आहे तो सर्वाधिक मुख्यमंत्री, आमदार - खासदार, मंत्री हे मराठा समाजाचे झालेत. शैक्षणिक संस्था, सहकार, कारखानदारी, पतसंस्था, बँक तसेच ग्रामपंचायत पासून स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तेत अनेक वर्षे सत्ताधारी असलेल्या समाजाला गरीबी आणि मागासलेपण आले ते कुणामुळे ? ह्यावर चर्चा का होत नाही ? सर्वात अधिक सत्तेचा वाटा मिळालेला असताना समाज मागासलेपणाकडे कुणी ढकलला ? ह्या कळीच्या मुद्द्यावर कुणीही बोलताना दिसत नाही.अनेक वर्षे सत्तेत असलेले मराठा नेते त्यावर भाष्य करीत नाहीत.त्याचे कारण उघड आहे.परंतु काही अपवाद सोडले तर बहुतांश बहुजन बुद्धीजीवी, विचारवंत  देखील समाजाच्या मागासलेपणाचा दोष सत्ताधारी विशिष्ट घराण्यांवर येऊ नये, ह्यासाठी लेखण्या झिजवताना दिसतात.

नेतृत्वानेच समाज वंचित बनवला ?

आजवर मराठा समाजाचे ११ मुख्यमंत्री महाराष्ट्रात होऊन गेले.महाराष्ट्रात होऊन गेलेले मराठा समाजातील मुख्यमंत्री यशवंतराव  चव्हाण (१ मे १९६० ते १६ नोव्हेंबर १९६२), पी.के. सावंत (२५ नोव्हेंबर १९६३ ते ४ डिसेंबर १९६३), शंकरराव चव्हाण (२१ फेब्रुवारी १९७५ ते १६ एप्रिल १९७७), शरद पवार (१८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८०),बाबासाहेब भोसले (२१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३),वसंतदादा पाटील (२ फेब्रुवारी ते १ जून १९८५), शिवाजीराव निलंगेकर (३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६), शरद पवार (२६ जून १९८८ ते २५ जून १९९१), शरद पवार (६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५), नारायण राणे (१ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९),अशोक चव्हाण (८ डिसेंबर २००८ ते १५ ऑक्टोबर २००९), अशोक चव्हाण (७ नोव्हेंबर २००९ ते ९ नोव्हेंबर २०१०), विलासराव देशमुख (१८ ऑक्टोबर १९९९ ते १६ जानेवारी २००३), पृथ्वीराज चव्हाण (११ नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४)  परंतु, या मुख्यमंत्र्यांना आपल्या समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक पीछेहाटी बाबत जाणीव झाली नव्हती की विशिष्ट घराण्यात असलेली सत्ता आणि संपत्तीचा वाटा गरीब मराठा समुहा पर्यंत जाणीवपूर्वक जाऊ दिला नाही का, असा सवाल सर्वांकडून उपस्थित केला पाहिजे होता.मात्र कुणीही ह्यांना जबाबदार धरत नाही. जगाच्या पाठीवर ही अत्यंत दुर्मिळ घटना म्हणावी लागेल.सर्वाधिक काळ आणि संख्यने जास्त आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री ज्या समाजातून झालेत.तो समाज देश स्वातंत्र्य मिळाले असताना सुखवस्तू, प्रगत आणि सपंन्न होता.परंतु गेली अनेक वर्षे राज्यातील अर्थकेंद्रे मराठा समाजाच्याच असताना समाजातील मोठा घटक गरीब का बनला ? मागासलेला का झाला ? ह्याचे उत्तर सत्ताधारी नेतृत्वाला कधीच मागितले गेले नाही.

शेतकरी आत्महत्या आणि मराठा समाज.

मराठा समाज हा प्रामुख्याने शेतकरी कष्टकरी समूह.महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या ह्या मराठा - कुणबी समाजाच्या शेतक-यांच्या आहेत.ही आकडेवारी चिंताजनक असताना कुणालाही मराठा समाजाच्या राजकीय नेतृत्वाला प्रश्न विचारण्याची हिंम्मत झाली नाही.राजकीय नेतृत्वाने देखील शेतकरी आत्महत्या मान्य केल्या नव्हत्या.प्रचंड जनरोष, आंदोलना नंतर शासन दरबारी त्याच्या नोंदी सुरु झाल्या.परंतु ह्या मध्ये सर्वाधिक आत्महत्या करणा-या समूहाच्या कुणबी मराठा शेतकरी असल्याची आकडेवारी खुबीने दडविण्यात आली.वाढलेली कुटुंब, शेतीचे तुकडे आणि नापिकी ह्या गर्तेत असलेल्या शेतक-याना समाजाच्या मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी कधीच न्याय दिला नाही.म्हणून शेती आजही नफ्याचे साधन नाही.

मराठा कुणबी वाद -

ज्या काळी ओबीसी म्हणून नोंद होऊ शकत होती.त्यावेळी कुणबी - मराठा वाद आणि शहान्नव कुळी वगैरे वाद रंगविण्यात आला.त्यामुळे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ह्यांचे ऐकून मराठा समाजातील विदर्भ खान्देश आणि मराठवाड्यातील काहींनी कुणबी असणे स्विकारले.कुणबी म्हणून ते इतर मागासवर्गीय आरक्षणास पात्र ठरले.इतर मराठा समूहाला मात्र मागासवर्गीय म्हटले जाण्याचा राग आणि चीड यावी अशी त्यांच्या जातीय अस्मितेला फुंकर घालण्यात आली.त्यातून राजकारणातील विशिष्ट घराणे कायम सत्ताधारी, कारखानदार, सहकारातील बडी आसामी बनत गेली.गरीब मराठा अधिकच गरीब आणि मागास होत आहे, ह्याकडे लक्ष दिले नाही.कुळाच्या, आपल्या भागाच्या, आप्त स्वकीयांच्या अस्मिता कुरवाळत बसल्याने काहीही झाले तरी जाती  बाहेर मतदान करायचे नाही.हा आत्मघातकी पवित्रा स्वीकारला गेला.  
 

शिवबांचा मराठा विरुद्ध मोगली मराठा -

ह्या दोन शब्दात मराठा समाजाच्या मागासलेपण आणि गरिबीची कारणे दडली आहेत.शिवबांच्या रयतेचे राज्य स्थापन करताना त्यांचे सोबत आणि जीव ओवाळून टाकणारी माणसे ही सर्व जाती धर्माची होती.रयतेच्या भाजीच्या देठाला देखील हात लावण्याची, अन्याय करण्याची बिशाद कुणात नव्हती.कारण शिवाजी महाराज न्याय करताना जात, धर्म नातेवाईक ह्याला महत्व देत नसत.ह्या उलट मोगलांची चाकरी करणारे मराठा सरदार हे सत्ता संपत्ती आणि वतन इमान मिळविण्यासाठी छत्रपती विरुद्ध तलवारी उपसून मोगलांना साथ देत होते.दोन्ही ठिकाणच्या मराठा सरदारांत मूळ फरक होता तो मनोवृत्तीचा.रयतेचे राज्य की वतन आणि स्वकीयांचे चांगभलं ? ह्या पैकी ज्यांना सर्व जाती समूहाची एकी आणि  विकास हा धर्म वाटत होता ते शिवबा सोबत राहिले.तर ज्यांना नुसती सत्ता संपत्ती आणि वतन मोठे वाटत होते, त्यांनी परकी गुलामी स्वीकारली.राज्यात देखील ह्याच मनोवृत्तीने मराठा समाजाचा घात झाला.श्रीमंत मराठयांना गरीब मराठ्यांच्या जीवन मरणाचे प्रश्न, त्यांचा विकास ह्या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले.त्या ऐवजी विशिष्ट घराणी आणि त्यांचे नातेवाईक ह्या पलीकडे सत्ता आणि श्रीमंती जाऊ दिली नाही.

 
प्रकाश आंबेडकर आणि उदयनराजे भोसले -

छत्रपतींचा मराठा विरुद्ध मोगली मराठा ही संकल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदा वंचितचे नेते एड प्रकाश आंबेडकरांनी पहिल्यांदा समजवून सांगितली.गरीब मराठा विरुद्ध श्रीमंत मराठा ह्या हिमनगाचे टोक किती भीषण आहे, गरीब मराठा समूहाच्या गरीबी आणि मागसलेपणाला महाराष्ट्रातील विशिष्ट घराणी कशी जबाबदार आहेत, हे त्यांनी निडरपणे मांडले.त्यांना समजून घेण्या ऐवजी मराठा समूहातील काहींचे पित्त खवळले.शेलक्या भाषेत एड. आंबेडकरांवर टीका झाली.सत्ताधारी सरंजामी मराठा नेतुत्व सुखावले.त्यांची गोची केली ती उदयनराजे भोसले ह्यांनी." प्रकाशराव जे बोलले ते योग्य आहे".अश्या शब्दात त्यांनी  जबरी वार केल्याने अनेक जुने जाणते प्रस्थापित मंडळी उघडी पडली.मराठा समूहाच्या गरीबी आणि मागासलेपणावर जबाबदार असलेल्याना थेट आरोपी म्हणून आंबेडकरांनी समोर आणणे आणि छत्रपतींच्या वारसांनी त्याला दुजोरा द्यावा ह्यातून मराठा आरक्षणाच्या मार्गातील खरे चेहरे पुढे आलेत.त्यासाठीच अनेक वर्षे मराठा समूहाच्या मागासलेपणा आणि गरिबीवर सत्तेतील मराठा नेतृत्वाने चर्चाच होऊ दिली नव्हती.  

मुस्लिम आरक्षणावर चर्चाच नाही -

विशेष म्हणजे राज्यात आणि देशात मुस्लिमांचे कैवारी असल्याचा आव आणणा-या काँग्रेस राष्ट्रवादीला ५ टक्के मुस्लिम आरक्षणावर चर्चा देखील करावी वाटली नाही.महाराष्ट्रात मराठा आरक्षणा सोबत मुस्लिम आरक्षण देखील जाहीर केले होते.आघाडीच्या राजवटीत मिळालेल्या मुस्लिम आरक्षणाला उच्च न्यायालयाचाही विरोध नव्हता, केवळ नौकरी मधील आरक्षण मान्य केले नव्हते.'महाराष्ट्रातील मुस्लिमांना धार्मिक निकषांवर आरक्षण देता येणार नाही', असे भाजपने स्पष्ट केले होते.आघाडी सरकारने शिक्षणातील ५ टक्के मान्य केले.तथापि नौकरीतील आरक्षणावर मुस्लिम समूहाला वा-यावर सोडले आहे.त्यावर कुठेच चर्चा किंवा विरोध काहीही होताना दिसत नाही.
   
तो सुदिन असेल -

मराठा समाजाच्या गरीबी बाबत मराठा समाजाच्या तरुणाने आत्मचिंतन केले पाहिजे.समाजाच्या मागासलेपणाला त्यांच्याच समाजाचे ११ मुख्यमंत्री कसे जबाबदार आहेत.हे त्याने समजून घेतले की आपोआप त्याला घराणेशाही आणि नातेसंबंधातील सत्ता कशी राज्यातील १७८ घराण्यात वाटून घेतली ते समजेल.राजकारण हा कसा विशिष्ट कुटुंबांचा कौटुंबिक व्यवसाय बनला.सत्ता, सत्तेतून संपत्ती, कारखाने, शाळा कॉलेज, बँका, व्यवसाय फोफावले आणि गरीब
मराठा कसा अधिक गरीब बनला ह्याचे उत्तर मिळेल.आपल्या माणसाला प्रश्न विचारण्याची हिम्मत त्याने दाखविली पाहिजे.
तो सुदिन लवकर उजाळवा हीच अपेक्षा .

मनोज काळे,
 

Friday, 18 September 2020

बोधिसत्व बाबासाहेबांचे सर्वसमावेशक राजकारण म्हणजे सॉफ्ट हिंदुत्वच होते का?

 बोधिसत्व बाबासाहेबांचे सर्वसमावेशक राजकारण म्हणजे सॉफ्ट हिंदुत्वच होते का? -  मनोज काळे, ठाणे.


बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय भुमिकांना अजिबात समजुन न घेणारांनी वंचित बहुजन आघाडी व अॅड बाळासाहेब आंबेडकर यांची बदनामी करण्याचे अभियान आरंभले आहे, ते पाहुन त्या सर्व अज्ञानी विद्वानांबद्दल मी प्रथम करुणा व्यक्त करतो. ज्या प्रमाने एका राजकीय पक्षाने छ.शिवरायांना मुस्लिमांचा शत्रु ठरवु स्वताच्या राजकीय पोळ्या भाजल्या त्याच प्रमाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वसमावेशक, पितृतुल्य राजकारनाला हिंदु विरोधी राजकारन म्हणुन सतत प्रचार करुन प्रज्ञासुर्याला एका राज्याच्या एका जातीपुरतेच मर्यादित करण्याच्या मनुवादी डावपेचाला बळी पडलेल्या अज्ञानी विद्वांनांसाठी बाबासाहेबांच्या सर्वसमावेशक राजकीय भुमिकांतुन काही निवडक मुद्दे संदर्भासह या लेखात चर्चेला घेतले आहे.

दि. ३१ ऑगस्ट २०२०, भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल असा दिवस, काही वर्षानंतर या दिवसाचे महात्म्य गायले जाईल व यावर पोवाडे लिहीले जातील यात तिळमात्र शंका नाही, कारण या दिवशी अॅड प्रकाश आंबेडकर यांनी विश्व वारकरी सेनेच्या लॉकडाऊन तोडुन मंदिर प्रवेश मिळावा या आंदोलनाला यशस्वी केले. इतिहासाचा मानबिंदु ठरावा अशी हि घटना पन या घटनेमुळे देशभरात एक वैचारिक घुसळन सुद्धा घडली, वैचारिक मतभेदामुळे अनेक चर्चांना उधान आले, प्रत्येकानेच या घटनेला आपापल्या बौद्धिक कुवतीनुसार,आपापल्या मानसिकतेनुसार मुल्यमापन केले व प्रत्येकजनच या घटनेवर व्यक्त होताना दिसला, या घटनेमुळे पुरोगामी व प्रतिगामी यामधील पुसट रेषा स्पष्ट झालेली आढळली, कसे ते मी पुढे सविस्तर चर्चेला घेत आहे. या आंदोलनाला काहींनी समर्थन केले तर काहींनी कडवा विरोधही केला व विशेष म्हणजे विरोधक व समर्थक दोन्ही बाजुकडुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे दाखले दिले जात होते.

यामुळे आंबेडकरी समाज डॉ बाबासाहेब आंबेडकरांना ,त्यांच्या विचारांना किती आत्मसात करु शकला आहे, किती समजु शकला आहे हे स्पष्टपने जानवले,

मी हा लेख लिहीतोय कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने काही लोक समाज माध्यमावर  स्वतःच्या डोक्यातील विचार मांडताना मला अनेक फेसबुक वाचाळ विर दिसले, त्यांनी कोणते बाबासाहेब वाचले असतील याचा मला प्रश्न पडला, ते "बाबासाहेब" असे नाव तर घेत होते पन ते आंबेडकर की पुरंदरे? नक्की कोणत्या बाबासाहेबाचे ते अनुयायी होते असा प्रश्न मला पडला. कारण हे दोन बाबासाहेब आहेत पण एक समतेचे पुरस्कर्ते तर दुसरे विषमतेचे वाहक आहेत. मी या लेखात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी म्हणुन लिहीत आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे राजकीय जीवन न अभ्यासल्यामुळे आपन अज्ञानातुन बाबासाहेबांच्या आंदोलनात कसे अडथळे आनतोय याची किमान जान वंचित बहुजन आघाडी च्या विरोधकांना व्हावी ही माफक अपेक्षा आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष चालवला, भारतीय राजकारणातला तो पहिला सक्षम विरोधी पक्ष होता, त्यामुळे तत्कालिक एकमेव प्रस्थापित पक्ष कॉंग्रेस ने बाबासाहेबांचे राजकीय खच्चीकरन करण्यासाठी अनेक हतखंडे वापरले, बाबासाहेबांच्या विरुद्ध हरिजनांना भडकावुन वापरुन घेतले, बाबासाहेब हे त्याकाळचे देशाचे शत्रु समजल्या जाणार्या ब्रिटीशांचे हस्तक आहेत असा प्रचार रुढ केला होता पन बाबासाहेबांनी त्यांचे देशहिताचे, लोकहिताचे कार्य सतत सुरु ठेवले, त्यांनी कॉंग्रेसींना आपन कसे देशभक्त आहोत हे सिद्ध करण्यात वेळ घालवला नाही, बाबासाहेब कॉंग्रेसींना एका ओळीत म्हणाले होते...Time will tell.

आणि खरोखरच आज वेळ सांगत आहे की बाबासाहेब ब्रिटीशांचे हस्तक नव्हते तर तेच एकमेव या देशाचे व देशवासियांचे मायबाप होते, हे आज कॉंग्रेसी लोकही जाहीरपने कबुल करताना दिसतात, अगदी त्याकाळी बाबासाहेबांचे राजकीय खच्चीकरन करण्यासाठी वापरलेले हतखंडे कॉंग्रेस वाले यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांचे राजकीय खच्चीकरन करण्यासाठी वापरताना दिसतात, आज देशाचा,संविधानाचा, लोकशाहीचा शत्रु असलेल्या आरएसएस चे बाळासाहेब हस्तक आहेत असा खोटा प्रचार कॉंग्रेस करताना दिसते व हरीजन सेवक त्यांच्या मालकांशी इमानदारी दाखवण्यासाठी त्यांना सामिल होताना दिसतात.

अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष काढला व त्याला गेल्या निवडणुकात तुफान प्रतिसाद मिळाला, हे प्रस्थापित पक्षांना पचले नाही त्यामुळे त्यांनी बाळासाहेबांची यथेच्छ बदनामी सुरु केली व या प्रचाराला स्वताला आंबेडकरवादी म्हणवुन घेणारे काही अज्ञानी हरीजन बळी पडताना दिसले.

ज्यांना बाळासाहेबांच्या राजकीय भुमिका पटत नाहीत त्यांनी एकदा बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय भुमिकांचा अभ्यास करावा अशी मी त्यांना विनंती करतो, कारण अविद्या हे अनर्थाला जबाबदार असते असे क्रांतीबा फुले आपनास सांगुन गेलेत, आपली राजकीय अविद्याच आपल्या राजकीय अनर्थाला कारनीभुत आहे त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय प्रवास, राजकीय दृष्टीकोन, राजकीय सर्वसमावेशक भुमिका याचा अभ्यास केल्याशिवाय राजकीय टिका टिप्पनी करने हे स्वतःच्या अकलीचे जाहिर अपमान केल्यासारखेच ठरत आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष काढला, दोन सार्वत्रिक निवडणुका त्यातुन लढले, माझी वंचित बहुजन आघाडीच्या विरोधकांना विचारने आहे की तुम्ही बाबासाहेब व शेकाफे यांचा अभ्यास केला आहे का?

नसेल केला तर करावा, मी बाबासाहेबांच्या लिखान व भाषनातुन काही महत्वाचे मुद्दे खाली चर्चेला घेत आहे.

ज्या मुद्यांना आज बाळासाहेब वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातुन राजकारन करत आहेत ते सर्व मुळ मुद्दे हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचेच आहे, त्यामुळे बाबासाहेबांचा राजकीय वारस कोण आहे हे समजने सोपे होईल,

मी फक्त काहीच निवडक मुद्दे घेत आहे, बाकी तुम्ही स्वता वाचन कराल व समजुन घ्याल असा मला विश्वास आहे.

या लेखाचे सर्व संदर्भ Dr Babasaheb Ambedkar Writing and speeches Vol 18, Part 3 मधे तुम्हाला पहायला मिळतील.

१.  "आपले घर सोडून दुसऱ्याच्या हवेलीत शिरणे म्हणजे मोठा मुर्खपणा आहे आपली झोपडी शाबूत राखा तसे न झाल्यास ब्राह्मणेतर पक्षाप्रमाणे आपली स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही ब्राह्मणेत्तर पक्षाची काय दुर्दशा झाली?

 1932 साल पर्यंत आम्ही संगनमताने काम करीत होतो त्यावेळी काही ब्राह्मणेतर पुढाऱ्यांना वाटले की काँग्रेस बाहेर राहून उपयोग नाही आज शिरून आतून पोखरून काँग्रेसचा किल्ला फोडता येईल बाहेरून किल्ला फोडता येणार नाही या समजुतीने ते काँग्रेसमध्ये शिरले मी त्यांना पुष्कळदा बजावून सांगितले परंतु त्यांनी माझे ऐकले नाही आपण आज श्रुती भयंकर चूक झाली असे आज ब्राम्हणेत्तर पक्षाच्या लोकांना वाटत आहेत आज ब्राह्मणेतर नामशेष झाला आहे ते आपली राहुटी कितपत बांधू शकतील याबद्दल मला शंका आहे"( पान क्र १७६)

वरील आदेशानुसार बाळासाहेबांनी स्वताचा पक्ष कदीच कुणाला विकला नाही, कुनाला कधीच शरन गेले नाहीत त्यामुळे बाळासाहेबांना अहंकारी व घमंडी म्हणुन बदनामी केली जात आहे, बाळासाहेब बाबासाहेबांचा राजकीय आदेश पालन करत आहेत, याउलट बाबासाहेबांनी सुचवलेला धोका सत्य झाला आहे,जे लोक स्वताची झोपडी मोडुन या भाजप,सेना,राष्ट्रवादी व कॉंग्रेस या प्रस्थापित पक्षात सामिल झाले त्यांचे अस्तित्व आज संपले आहे पन ते लोक त्यांच्या संपण्याचा दोष बाळासाहेबांवर टाकुन बदनामी करताना आपल्याला दिसतात. याची नोंद वाचकांनी घ्यावी. मागे आठवले नी लाचारी पत्करुन मंत्रीपद मिळवले व ते पद भोगत असतानाच रिपबल्किन संपले असे वक्तव्यही केले, त्यामुळे ते का संपले हे बाबासाहेबांच्या वरील विधानातुन स्पष्ट होते.

२.  गेली वीस वर्ष पर्यंत माझ्यावर नाना प्रकारचे आरोप करण्यात येत होते मी व माझा पक्ष व  अराष्ट्रीय आहे इंग्रजांचा साथीदार आहे मुसलमानांचा बद्दलच्या आहे अशा प्रकारचे धादांत खोटे आरोप माझ्यावर करण्यात येत होते. 

 त्या लोकांची आता खात्री  पटली ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट झाली वीस वर्षे आमच्या पक्षात जो कलंक लागला होता तो आता साफ धुतला गेला आहे आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा एक सुसंघटित मजबूत राजकीय रूप धारण करणारा व राष्ट्रविरोधी कृत्यात कधीही सामील न होणारा पक्ष आहे ही सर्वांची पूर्ण खात्री झाली आजच्या राजकारणात मी आता विशेष जाऊ इच्छित नाही परंतु काही गोष्टी अवश्य सांगाव्या वाटतात 

"पूर्वी आपले राजकारण शत्रुत्वाच्या पायावर चालले होते काँग्रेसवाले आपल्याला व आपल्या काँग्रेसवाल्यांना शत्रूप्रमाणे मानत होतो माझ्या दृष्टीने पूर्वीचे अस्पृश्य वर्गाचे सर्व पुढारी थोड्या संकुचित दृष्टिकोन आणि पाहत होते व तसे वागत होते मी ह्या दोशाला थोडाबहुत पात्र होतोच आमचे काय होईल हिंदूंच्या हाती राज्य सत्ता आली तर काय होईल असे आम्हाला वाटत होते पण हा राजकारणाचा रोख आता बदलला पाहिजे आता आपण एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवली पाहिजे की आपण आपल्या लोकांचे आपल्या समाजाचे हित पाहत होतो ते तर पुढे चालू ठेवले पाहिजे परंतु त्याचबरोबर आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य कसे राखून ठेवता येईल त्याचाही विचार केला पाहिजे."

या ठिकाणी बाबासाहेबांनी शत्रुत्वाच्या वृत्तीने केलेल्या राजकारनाचा धिक्कार केला आहे व त्यांनी स्वता ती चुक काही प्रमाणात केली हे कबुल केले व स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर पुढे तसे होऊ नये असा संदेश दिला आहे.

३. २४ जानेवारी १९५४ रोजी मुंबई येथील अखिल भारतीय साईभक्त संम्मेलनाचे उद्धाटन हे स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते.( पान ३१३) हे बहुतेक विचारवंतांना माहीत नसावे, नाहीतर आजपर्यंत या राजकिय निरक्षरांनी बाबासाहेबांनाही सॉफ्ट हिंदुत्ववादी किंवा साईभक्त म्हणुन हिनवले असते. सदर साईभक्त संमेलनात बाबासाहेब म्हणाले होते की "साईबाबांना प्रत्यक्ष भेटण्याचे किंवा पहाण्याचे भाग्य मला लाभले नाही,त्यांच्याबद्दल मी थोडेफार ऐकुन आहे एवढेच. ...

बाबासाहेबांच्या या भुमिकेला राजकीय म्हणुन पहाणार की धार्मिक?  हे आताच्या उथळ बुद्दिच्या विद्वानांना माझा प्रश्म आहे.

४. दिनांक 20 एप्रिल 1954 रोजी फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना हितोपदेश करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले गेल्या निवडणूकीत शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या झालेल्या पराभवामुळे माझे सहकारी हाताश झाले असावेत आणि काहींना या निवडणुकाच नको असेही वाटत असावे परंतु त्यांनी असे हतबल होण्याचे काही कारण नाही राजकारण हे पायरी पायरीने चढत जाते, मी तरी  अपयशाची कधीच पर्वा केली नाही करीत नाही आणि यापुढेही करणार नाही केवळ निवडणुकीत जागा मिळवणे हे फेडरेशनचे ध्येय नाही निवडणुकीद्वारे जागा मिळवणे हे एक साधन आहे साध्य नव्हे फेडरेशनचे साध्य- ध्येय अस्पृश्य जनतेचा उद्धार करणे हे आहे आणि जोपर्यंत अस्पृश्य समाजाची सर्वांगीण उन्नती होत नाही तोपर्यंत शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाची जरुरी आहे,नव्हे अत्यंत निकड आहे आणि फेडरेशन तोपर्यंत जिवंत राहील असे मी निक्षून सांगत आहे ज्या काही फुटीवर वावटळी उठले असतील त्या वारा संपल्यावर नाहीशा होतील त्याची खंत बाळगू नका फेडरेशन फक्त पक्ष नसेल तर अस्पृश्यांना भारताच्या राजकारणात स्वाभिमानाचे स्थान उरणार नाही फेडरेशनला अपयश आल्यामुळेच दिवसेंदिवस आपण आपल्या उद्धारासाठी नवनव्या कार्यक्रमाची आखणी करीत आहोत जे फेडरेशनचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे त्या सर्वांना असे सांगणे आहे की फेडरेशनला अपयश येणे हे वाऱ्याने झोडलेल्या झाडासारखे आहे परंतु त्यामुळे त्या फेडरेशन रुपी झाडाचे मूळ मरून गेले असा अर्थ लावणे चुकीचे ठरेल तेव्हा डोळे उघडून सत्कार्य करीत रहा (जनता 24 एप्रिल 1954)

वरील आदेशाचे पालन करुन स्वाभिमानाचे राजकारन करणारा भारतात आज फक्त बाळासाहेब आंबेडकरच आहेत, त्यांनी निवडणुकांच्या निकालांचा चळवळीवर परिणाम होऊ दिला नाही, स्वताचे राजकीय अस्तित्व उभे करताना स्वाभिमान गहान टाकला नाही, 

जसे बाबासाहेबांनी सुरवातीला बहिष्कृत समाजाचे नेतृत्व केले म्हणुन बहिष्कृत हितकारीनी सभा सुरु केली, त्या बहिष्कृतांना समता मिळावी म्हणुन "समाज समता संघ" संघटना सुरु केली,नंतर मजुरांचे नेतृत्व करताना स्वतंत्र मजुर पक्ष असे संघटना केली, त्यानंतर राज्यघटनेत शेड्युल्ड कास्ट हि संकल्पना आनली व त्यानुसार शेड्युल्ड कास्ट फेडरेशन असा पक्ष उभा केला, पण बाबासाहेबांना दोन वेळा हरिजन उमेदवारांसमोर निवडणुकात पराजयाला सामोरे जावे लागले, तेव्हा एका जातीचे किंवा एका वर्गाचे राजकारण लोकशाहीत यशस्वी होऊ शकत नाही त्यासाठी संविधानाच्या सरनाम्याला प्रमाण माणुन सर्वसमावेशक पक्ष काढावा असे बाबासाहेबांनी ठरवले, ती संकल्पना होती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया पन त्या आगोदरच बाबासाहेबांचे महापरिनिर्वान झाले, बाबासासाहेबांच्या खुल्या पत्रानुसार नंतर तो पक्ष काढला गेला व ७० वर्षात भाजप, कॉग्रेसच्या प्रस्थापित राजकारना समोर कमकुवत,संधिसाधु राजकीय नेतृत्व व राजकीय निरक्षर जनता यांच्या संयुक्त विद्यमाने रिपब्लिकन पक्ष हे प्रस्थापितांचे पाळीव बनुन राहीले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत लोकशाही रुजु शकली नाही, बाबासाहेबांनी दिलेले राजकीय, सामाजिक,शैक्षणिक व आर्थिक हक्क तळागाळा पर्यंत पोचली नाहीत, अशा सर्व समाजांमधील संविधानातील हक्क अधिकारा पासुन वंचित राहिलेला एक मोठा वर्ग या देशात निर्माण झाला, हे वंचित सर्व जाती सर्व धर्मात आहेत, प्रत्येक जात धर्मातील प्रस्थापितांनी वंचित ठेवलेल्या समाजाचे पितृत्व पुन्हा अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी स्विकारले व या सर्व वंचितांना संविधानिक हक्कांसाठी जागृत करुन सर्वांचे प्रश्न सुटावेत यासाठी मोठी राजकीय ताकद निर्माण करण्यात बाळासाहेब आज यशस्वी झाले आहेत हे आपन पहात आहोत.

पन बाबासाहेबांच्या आदेशानुसार काम करणार्या या एकमेव शिलेदारालाच बाबासाहेबांच्या विचाराचा मारेकरी म्हणुन प्रचार सुरु करुन आपला राजकीय सत्यानाश करण्यासाठी काही अतिहुशार हरिजनांना कामाला जुंपले आहे.

५. " माझे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन कडे गेले दहा वर्ष दुर्लक्ष झाले. या दहा वर्षाच्या गैरहजेरीत  शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन मध्ये पुष्कळ मतभेद निर्माण झाले आहेत यापूर्वी असले मतभेद नव्हते, प्रत्येक माणसाने फेडरेशन मध्ये गटबाजी सुरू केली आहे प्रत्येकाने आपापले लहान लहान गट निर्माण केले आहेत एकाचे वर्चस्व दुसऱ्यास नको आहे त्यामुळे आपले लोक अजून तरी राजकारणात पक्के मुरले नाहीत, राजकारण म्हणजे काय याची त्यास पूर्णपणे जाणीव नाही. आपल्या समाजात आपापसात फार मतभेद असतात ते मतभेद ताबडतोब नष्ट होत नसतात त्या मतभेदाची झाडे त्यांच्या पोटात वाढू लागतात त्यांचे मते त्यांच्या मुलांच्या पोटात वाढतात अशा रीतीने मतभेद हे वाढत जातात हा गुणधर्म आपल्या लोकांत जास्त प्रमाणात आहे काँग्रेससारख्या पक्षात सुद्धा मतभेद आहेत त्याचबरोबर त्यांच्या जवळ काही सद्गुणही आहेत असे अनुभवाने म्हणावे लागेल त्यांचा एक गुण फार महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे बहुमताने ठेवलेले ते सर्व मान्य करतात.

 मग त्या गोष्टीचे विरोधक सुद्धा खोटे समर्थन करु लागतात ही कृती राजकारणात फार आवश्यक आहे "माझ्या मता प्रमाणे जर कारभार चालला तरच मी संस्थेत राहील अशी वृत्ती फार वाईट आहे हम करे सो कायदा नको". ( पान ३९५)

या ठिकाणी बाबासाहेबांनी ज्या राजकीय पक्व नसलेल्या लोकांबद्दल खंत व्यक्त केली तेच लोक आज वंचित बहुजन आघाडी ची बदनामी करताना आपणास दिसतील.

एखादा मुद्दा मनाप्रमाने घडला नाही तर संघटना सोडणारे किंवा नेत्यावर टिका करणारे अनेक आहेत. बाबासाहेबांना सुद्धा समाजाच्या गटबाज संधीसाधुंनी त्यावेळी किती छळले होते हे वरील बाबासाहेबांच्या विधानांवरुन लक्षात येते. ज्या कॉंग्रेसचा बाबासाहेबांना चिड होती त्यांच्यातलाही एक सद्गुण आपल्या कार्यकर्त्यांनी घ्यावा असा सल्ला देणारे बाबासाहेब आपणास कधी कळतील?

६. राखीव जागा नकोत म्हणून फेडरेशनने ठराव केला आहे त्या ठरावास मी चिकटुन  राहू इच्छितो या ठरावा पासून ढळण्याची माझी इच्छा नाही, राखीव जागा दहा वर्षांसाठी आहेत त्या जागा आता या निवडणुकीनंतर राहणार नाहीत आपल्या समाजाचे ऐक्य ही कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट आहे या राखीव जागा गौण आहेत आपल्या आजपर्यंतच्या फेडरेशनच्या चळवळीने स्वाभिमान आवश्य निर्माण केला आहे ही गोष्ट फेडरेशनला भूषणावह आहे त्यामुळे संघटना झाली तथापि त्यामुळे एक प्रकारची तटबंदीही निर्माण झाली दुसरे लोक आम्हाला मत देत नाही आणि आपण लोकांना मत देत नाही ही एक प्रकारची तटबंदी होईल , 

दुर्दैवाने आपली लोकसंख्या कमी आहे आपण केवळ अल्पसंख्यांक आहोत अशा परिस्थितीत फेडरेशन आहे त्या स्थितीत ठेवणे कठीण आहे त्यासाठी इतर समाजातील आमचे दुःख जाणारे लोक कोण आहेत हे पाहिले पाहिजे अशा सर्वांना आपण एकत्र करून त्यांच्या सह जगण्याची आपली सिद्धता पाहिजे अशा लोकांना एकत्रित करण्याचा मी प्रयत्न करीत आहे तो प्रयत्न यशस्वी झाल्यास आपल्याला नवीन पक्ष स्थापावा लागेल व त्या पक्षात आपल्याशिवाय इतरांनाही दार मोकळे राहतील,

 तुमच्यातच नव्हे तर या देशात एक विचित्र विकृती दिसून येते ती ही की आज झाड लावले की त्याचे दुसऱ्याच दिवशी फळ खावयास पाहिजे असे लोकांना वाटते राजकारणात की अशी अपेक्षा करणे चूक आहे"  ( पान ५६८)

बाबासाहेब म्हणतात आपन स्वाभिमानी पक्ष बनवला परंतु तो एकजातिय पक्ष बनु लागलाय, आपन समविचारी लोकांना एकत्र घेऊन त्यांच्याह जगण्याची सिद्धता ठेवली पाहीजे, त्यासाठी मी नविन पक्ष काढणार आहे, तो संकल्पित नविन पक्ष होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया, व सर्वांनी सोबत येऊन काम करण्यासाठी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेला बाबासाहेबांनी पक्षाचा जाहिरनामा केला होता व आज वंचित बहुजन आघाडीनेही संविधानाचा सरनामा हा आमचा जाहिरनामा आहे असे ठरवुनच पक्ष काढला आहे , बाबासाहेबांनी नाकारलेले राजकीय आरक्षण संपवावे ही भुमिका एकटे बाळासाहेब मांडत आहेत कारण त्यांना स्वाभिमानी राजकारनावर विश्वास आहे, प्रस्थापितांचे पाळीव असणारांनी यावेळीही बाबासाहेब व बाळासाहेब यांच्या राजकीय आरक्षणाच्या विरोधाला चुकिच्या पद्धतीने समाजासमोर मांडले,आजच्या राजकीय निरक्षरांनी बाळासाहेबांची याबाबतीतही बदनामीच करण्याचा प्रयत्न केला.

बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले सर्वसमावेशक राजकारण काही लोकांना का नको आहे याचा अभ्यास होणे आवश्यक आहे.

७.  इतर समाजाच्या सर्व लोकांबरोबर काम करावयास तुम्ही शिकले पाहिजे तुमच्या तुम्ही फोन ठेवून चालणार नाही माझ्या दबावामुळे अजून काही वेडेवाकडे करत नाही पण मी तुम्हा साठी कुठपर्यंत राहणार?

 आता उमेदवार निवडण्याचे काम लोकांनी केले पाहिजे, लोकांमध्ये तुम्ही काम केले पाहिजे त्यांच्या अडीअडचणींना तुमच्या ताकदीप्रमाणे वाचा फोडली पाहिजे त्यांच्या सुखदुःखाची समरस होण्याची तुम्ही प्रयत्न केला पाहिजे मी भंडाऱ्यातील निवडणुकीत पडलो त्याचे मला कधीच वाईट वाटले नाही तरी या निवडणुकीत मला बरीच मते पडली आपली मते सोडली तर इतर समाजाने देखील मला मते दिलेली आहेत ही गोष्ट माझ्यासाठी समाधानाची आहे ,मी पडलो की निवडून आलो हा प्रश्न विचारात घेत नाही तुम्ही अशा प्रकारचे कर्तबगार होण्याचा प्रयत्न करून इतर समाजास देखील तुम्हास मते द्यावीत असे वाटले पाहिजे माझी खात्री आहे की या गोष्टीचा विचार करून तुम्ही तुमचे राजकीय जीवन व कार्यक्रम चालवाल यापेक्षा अधिक काही मी सांगत नाही

 ( पान ५२९)

राजकीय अपयश पचवण्याला बाबासाहेब "कर्तबगारी" म्हणतात, व तसे कर्तबगार सर्वांनी व्हावे असे अपेक्षा करतात, सोबत आपन इतर समाजांच्या सुखदुखात त्यांच्या अडी अडचनीत धावुन जा असा आदेश देतात, याची नोंद घ्यावी. आता बाबासाहेबांनाही सॉफ्ट हिंदुवादी म्हणायचे का हे प्रत्येकाने ठरवावे.

८. हिंदु कोड बिलासाठी राजीनामा -

       डॉ बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते, फक्त नावापुरते मंत्रीपद मिळावे म्हणुन आज समाजाला,निळ्या झेंड्याला मनुवादी आरएसएस कडे गहान ठेवनारे लोक आता आहेत, काही लोक पद, पैसा यासाठी जातीवाद्यांशी घरोबा करुन बसलेत तरी समाज त्यावर व्यक्त होत नाही पण बाळासाहेब आंबेडकर एक लोकनेता म्हणुन वारकर्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एक ऐतिहासिक आंदोलन करतात तेव्हा शिकलेला पन बाबासाहेबांना न समजलेला वर्ग बाळासाहेबांना सॉफ्ट हिंदुत्ववादी ठरवुन मोकळा झाला त्यांना सागु इच्छितो की बाळासाहेबांनी तर फक्त वैदिक धर्माचे विरोधक असलेल्या वारकरी लोकांसाठी धावुन जाऊन बाबासाहेबांचा आदेशच पाळला आहे, त्यांना आपन हिंदुत्ववादी ठरवले, मग आपन लोक बाबासाहेब आंबेडकरांना हार्ड हिंदुत्ववादी ठरवाल का?  

कारण बाबासाहेबांनी हिंदु महिलांच्या प्रश्नासाठी शासनाशी भांडताना मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, हिंदु कोड बिल हे हिंदुंच्या महिलांसाठी होते मग हिंदुंच्या प्रश्नासाठी राजीनामै देणार्या बाबासाहेबांनाही तुम्ही हिंदुत्ववादी म्हणणार आहात का? याचे चिंतन करावे लागेल.

९. भारतीय संविधानामध्ये फक्त वंचित बहुजन आघाडीची बदनामी करण्यासाठी पाळुन ठेवलेल्या हरीजनांसाठीच बाबासाहेबांनी  कलमे लिहीली आहेत का? बाबासाहेबांनी संविधान लिहीताना पुर्ण देशाचे पितृत्व स्विकारुन सर्वांनाच समान हक्क अधिकार दिलेत. व या देशात हिंदुंची संख्या 85% आहे, मग आपन बाबासाहेबांना हिंदुत्ववादी म्हणायचे का?

१०. ज्यावेळी एका सामाजिक आंदोलन प्रकरनी काही कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना कॉंग्रेसचे कार्यकर्ते म्हणुन   पहाता त्यांच्यावर झालेला अन्याय पाहिला व त्यांना स्वता त्यांचे वकिलपत्र घेऊन कोर्टातुन न्याय मिळवुन दिला. या घटनेतुन समाज काय शिकणार आहे की नाही?

बाबासाहेब हे बोधिसत्व होते, ते कोणालाही फक्त जाती धर्माच्या नजरेने पहात नव्हते व समाजानेही तसे पाहु नये अशासाठीच पुर्ण जीवनभर प्रयत्न केलेत, पन आज काही स्वताला आंबेडकरी समजणारे  वामनसेनेचे लोक समाजातील सलोखा टिकु नये, समाजात जातीवाद टिकावा, जातीजातीने आपापल्या जातींचा गर्व करावा यासाठी सतत प्रयत्न करताना दिसतात, एकटे बाळासाहेब बाबासाहेबांचा राजकीय व सामाजिक रथ खेचत आहेत पन हे काही दिडशहाणे कैडर लोक बाळासाहेबांच्या प्रत्येक भुमिकांना पातळी सोडुन विरोध करतात व बदनामी करतात, अफवा पसरवतात.

मनुवादी विचारधारेला विरोध करणारांना इतर बिनकामाच्या वादात गुंतवुन ठेवुन त्यांची शक्ती वाया घालवतात.

वरील १० मुद्दे हे सर्वांनी स्वता अभ्यासावित, बाबासाहेबांनी असे लाखो विचार मांडलेत जे आजच्या कैडर बेस राजकीय निरक्षरांना माहीतही नाहीत. समाजाने स्वता बाबासाहेब आंबेडकरांनी लिहुन ठेवलेले लिखान व भाषने वाचावित.

जे लोक स्वता वाचतात ते बाळासाहेब आंबेडकरांसाठी प्राण तळहातावर घेऊन काम करतात हे मी गेली १० वर्ष स्वता काम करताना पहातोय.

कोणत्याही राजकीय पक्षासाठी व लोकप्रतिनिधी साठी संविधान हे प्रथमस्थानी असले पाहीजे, लोकप्रतिनिधींनी संविधाना पेक्षा आपापल्या धर्माला प्राथमिकता दिली तर लोकशाही काही दिवसात संपुष्टात येईल, हे माहीती असुन स्वताला आंबेडकरी म्हणवुन घेणार्या कार्यकर्त्यांनी "आपल्या नेत्याने सार्वजनिक जिवनात संविधान न मानता धार्मिक कट्टरवाद जोपासावा" असे म्हणने म्हणजे बुद्धा पासुन बाबासाहेबा पर्यंत च्या संघर्षाला मातीत घालण्यासारखेच ठरेल. कोणताही धर्म देशा पेक्षा मोठा नाही याचे भान किमान आंबेडकरी लोकांनी तरी ठेवावे. लोकप्रतिनिधींसाठी संविधान हाच धर्मग्रंथ असला पाहीजे, वैयक्तिक जिवनात आपापल्या घरी धर्माचे पालन केले पाहीजे पन सार्वजनिक जिवनात कुनीही आपला धर्म आणु नये. 

मी समाजातील प्रत्येक नागरिकाला विनंती करतो की *बाबासाहेबांना एका जातीतुन मुक्त करा, ज्यांनी आमच्या हजारो पिढ्यांना मुक्त केले त्यांना आता समाजानेही मुक्त केले पाहीजे, बाबासाहेब हे सर्व समाजांचे, देशाचे उद्धारकर्ते होते ही सत्य मांडनी केली पाहीजे* .त्यासाठी बाबासाहेब नक्की काय होते हे स्वता वाचुनच समजुन घेतले पाहीजे, स्वताला बाबासाहेबा पेक्षाही विद्वान समजणार्या बोलक्या पोपटांनी मांडलेले बाबासाहेब हे शिवसेना व आरएसएस ने मांडलेल्या शिवाजी महाराजासारखे एकतर्फी वाटतील, पण स्वता वाचले तर बाबासाहेब महाकारुणिक बुद्धांचे खरे अनुयायी आहेत हे पटेल.

- मनोज नागोराव काळे, 8169291009



_________________________

Thursday, 17 September 2020

बाबासाहेबांचे संकल्पनेतील राजकीय प्रशिक्षण विद्यालय 'अर्थात अकोला पॅटर्न'

 बाबासाहेबांचे संकल्पनेतील राजकीय प्रशिक्षण विद्यालय 'अर्थात अकोला पॅटर्न'.



ह्यापूर्वी अनेकांनी आपापल्या पद्धतीने भारिप बहुजन महासंघाची चळवळ, बाळासाहेब आंबेडकर व अकोला पॅटर्नची मांडणी केली आहे.मी बाबासाहेबांच्या स्वप्नातील राजकीय पक्ष व त्यांनी सुरु केलेल्या राजकीय प्रशिक्षण केंद्राशी जोडून, भारिप, भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी कशी समर्पक आहे, ही मांडणी करणार आहे.हे दोन दुवे प्रथमच अश्या पद्धतीने जोडले जाणार आहेत.बाबासाहेबांच्या संकल्पनेतील राजकिय पक्ष आणि राजकीय प्रशिक्षण विद्यालय समजून घेताना बाळासाहेब आंबेडकरांचा 'अकोला पॅटर्न' हा कश्या पद्धतीने बाबासाहेबांच्या संकल्पनेतील प्रत्यक्ष राजकीय प्रशिक्षण विद्यालय ठरलाय हे आपण समजून घेऊया.

आपण सर्वजण जाणतो की, बाबासाहेब  ’रिपब्लीकन पक्ष’ नावाचा पक्ष स्थापन करणार होते.त्यासाठी ३० सप्टेबर १९५६ रोजी शेडुल्ड कास्ट फ़ेडरेशन च्या कार्यकारणीची बैठक बाबासाहेबांच्या दिल्ली निवासस्थानी बोलविण्यात आली होती. बैठकीत ’शेडुल्ड कास्ट फ़ेडरेशनचे’विसर्जन करून 'रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडीया’ स्थापनेचा निर्णय घेण्यात आला होता.तत्पूर्वी बाबासाहेबांनी हे देखील हेरलं होते की देशातील लोकशाहीला परिणामकारक चालना देणे गरजेचे आहे.देशाला लोकशाही पद्धती नवीन असल्याने राजकीय प्रशिक्षण असलेले कार्यकर्ते घडविणे गरजेचे आहे.त्या प्रमाणे नियोजित रिपब्लिकन पक्षात तरुणांची भरती होत रहावी आणि राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घेणारांसाठी एक प्रशिक्षण विद्यालय असावे. करिता  मुंबई मध्ये  ’प्रशिक्षण विधालय’ सुरु करण्याचे बाबासाहेबांनी ठरविले होते.ज्यांना विधीमंडळात कामकाज करण्याची महत्वाकांक्षा आहे, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था या विद्यालयात करावयाची होती.त्या प्रशिक्षण विधालयाचे  मुख्याध्यापक पदासाठी त्यांना सक्षम व्यक्ती हवी होती.उत्तम व्याख्याता,विषयात पारंगत असलेला आणि आकर्षक व्यक्तीमत्व असलेला व्यक्ती त्यांना मुख्याध्यापक हवा होता.त्या साठी सिध्दार्थ विधालयाचे ग्रंथपाल रेगे यांचे सहाय्याने हे प्रशिक्षण विधालय स्थापन करुन चालविण्याचा त्यांचा मानस होता.ह्या विधालयाचा लौकीक हा तेथील शिक्षकांच्या प्रतिभा आणि वक्तॄत्व सामर्थ्यावर अवलंबुन असेल, असे बाबासाहेबांना वाटत होते.१ जुलै १९५६ ते मार्च १९५७ पर्यंत रेगे यांच्या देखरेखी खाली ते प्रशिक्षण विधालय कार्यरत होते.बाबासाहेबांच्या अकाली जाण्याने हे राजकीय प्रशिक्षण केंद्र पोरके होवुन कायमचे बंद पडले.प्रशिक्षण केंद्राची संकल्पना मांड्णा-या बाबासाहेबांना कधीच ह्या प्रशिक्षण केंद्राला भेट देता आली नाही, हे देखील त्या केंद्राचे दृभाग्य होते.

बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष त्यांच्या हयातीत आणि त्यांच्या मार्गदर्शनात उभा होवु शकला नाही.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणा नंतरच्या निवडणुकीत शेडुल्ड कास्ट फ़ेडरेशन वर अनेक आमदार खासदार निवडुन आले.तत्कालीन नेतुत्वाने जसे ३० सप्टेबर १९५६ च्या शेकाफ़े बर्खास्ती  आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडीया स्थापनेच्या ठरावाला मुठमाती दिली.तशीच ती ह्या प्रशिक्षण केंद्राला सुद्धा दिली गेली.बाबासाहेबांच्या संकल्पनेतील राजकिय प्रशिक्षण विद्यालय त्यांचे हयातीत सुरु होऊन अवघ्या नऊ महिन्यात बंद पडले.बाबासाहेबांच्या दूरदृष्टीने  स्थापन झालेले राजकीय प्रशिक्षण केंद्राला संजीवनी देवुन कार्यरत करता आले असते.त्यातून देशाला ख-या अर्थाने लोकशाही बळकट करणारे साधन मिळाले असते.शिवाय राज्यकारभाराला योग्य वळण लावणारे निष्णात, विद्वान, कर्तूत्ववान आमदार, खासदारांचा विधीमंडळ, लोकसभा, राज्यसभेला लाभ झाला असता.सोबतच बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाला देखील सक्षम नेते आणि कार्यकर्ते मिळाले असते.असे एखादे प्रशिक्षण केंद्र उभे झाले तर रिपब्लिकन चळवळ आणि पक्षाला उज्वल भवितव्य देणारे उमदे तरूण नेते, कार्यकर्ते निर्माण होवु शकतात.असे सातत्याने मांडणी केली जाते.ती उणीव काही अंशी अकोला जिल्हाने भरून काढली आहे.दिग्विजयी नेते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ’ शासनकर्ती जमात’ होण्याच्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवित आहे.बाबासाहेबांच्या स्वप्नातील राजकीय प्रशिक्षण केंद्र अकोला जिल्हा बनलाय.अनेक नेते, पदाधिकारी घडविण्याचे कार्य  अकोला पॅटर्नच्या माध्यमातून उभे झालेले आपण पाहतोय.ज्यातून सर्वहारा समूहाला सत्तेचा वाटा तर मिळालाच सोबतच सामान्य कार्यकर्ते कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना सत्तेतील मोठया पदावर पोहचु शकले.

 

अकोला पॅटर्न समजून घेताना आपण अकोला जिल्ह्यातील बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे राजकीय क्षितिजावरील कारकीर्द सुरु होण्या पूर्वीची अर्थात १९८४ पुर्वीची आंबेडकरी चळवळ व बाळासाहेबांचे आगमना नंतर त्या चळवळीने राज्यात घडविलेला मोठा राजकीय व सामाजिक बदल समजून घेवुया.अकोल्यातील आंबेडकरी चळवळीचे १९५२ ते १९८४ सिंहावलोकन केले असता ह्या काळात आंबेडकरी चळवळ विशेष प्रभावी होती असे दिसते.अकोला जिल्हा चळवळीचा बालेकिल्लाच होता. कलापथके,गीतकार, शाहीर, जलसे, धंडारी,भजनी मंडळानी जागृतीचा वणवा सतत पेटत ठेवला होता.१९४२ साली परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे शेडूल्ड कास्ट फेडरेशन स्थापन केले.त्याकाळी व-हाड प्रांतिक शेडूल्ड कास्ट फेडरेशनची पहिली परिषद ९ आणि १० डिसेंबर १९४५ ला अकोलयात संपन्न झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर परिषदेचे अध्यक्ष म्हणून अकोल्यात आले होते.शेडूल्ड कास्ट फेडरेशन ने अकोला लोकसभा निवडणूकीत १९५२ साली व बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाना नंतर १९५७ च्या निवडणूकीत दुसऱ्या आणि तिस-या क्रमांकाची मते घेतली होती.अकोला जिल्हा बाबासाहेबांच्या आदेशाचे काटेकोर पालन करणारा जिल्हा आहे.  .१९०१ सालच्या जनगणनेत अकोला - वाशीम संयुक्त जिल्ह्यात बौद्ध धर्मीय म्हणून शून्य नोंद होती.१९५६ साली बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्विकाराच्या आवाहना नुसार १००% बौद्ध धम्म स्वीकारणारा जिल्हा अकोलाच आहे.धम्म स्वीकाराच्या नंतर १९६१ च्या जनगणनेत दोन लाख बेचाळीस हजार चारशे चौसष्ट बौद्ध धर्मीयांची संख्या नोंदविण्यात आली होती.एवढी प्रचंड आंबेडकरी निष्ठा असलेला जिल्हा म्हणून अकोल्याचा लौकिक होता.१९५६ साली बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले.एकूणच आंबेडकरी चळवळीवर त्याचे दुरगामी परिणाम झाले.अकोला जिल्हा देखील त्याला अपवाद राहिला नाही. रिपब्लीकन पक्षाची स्थापना ३ ऑक्टोबर १९५७ झाली.रिपब्लीकन पक्षाच्या प्रेसेडीयमची बैठक देखील अकोल्यात संपन्न झाली होती.१९५७ च्या निवडणूकीत रिपब्लीकन पक्षाला लोकसभेत ५ जागा व विधानसभेत १३ जागांवर विजय मिळाला होता.१९६४ ला पक्ष फुटला त्या मुळे गायकवाड - गवई यांचा एक आणि खोब्रागडे यांचा दुसरा गट निर्माण झाला .गटबाजी मुळे अकोल्यातील कार्यकर्ते  देखील विभागले आणि ताकदवान पक्ष कमकुवत बनला. १९७१ आणि १९७७ च्या निवडणूकीत अकोला लोकसभेत कोणत्याही आंबेडकरी गटाचा अधिकृत उमेदवार नव्हता.विधानसभेत मात्र रिपाइं उमेदवारांना दुस-या, तिस-या क्रमांकाची मते मिळत होती. गटबाजी होती मतदार मात्र कायम होता.त्या काळी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, शेकाफे कार्य जिल्ह्यात मोठ्या गतीने सुरु होते.भय्यासाहेब आंबेडकरांनी देखील पाच वेळा ह्या जिल्ह्याचा दौरा केला होता.

 

 

अश्या वातावरणात बाळासाहेबांचे अकोल्यात पहिल्यांदा आगमन झाले ते १४ ऑगस्ट १९८० रोजी. अकोल्यातील रेल्वे स्टेशन नजीकच्या सर्किट हाऊस येथे ते उतरले होते. नगर परिषदेत आयोजित बाळासाहेबांचा कार्यक्रम काही कारणास्तव रद्द झाला होता.ही बातमी अकोल्यातील तत्कालीन नेतृत्व दिनबंधू गुरुजी, केरुबुवा गायकवाड ह्यांचे कार्यकर्ते लंकेश्वर गुरुजी, गुणवंतराव पाटील,पी. आर. महाजन,शत्रुघन मुंडे, कृष्णराव मोहोड, यादवराव पाटील ह्यांना समजली.बाबासाहेबांचे नातू सभा न होता परत जाणे ही आपल्या जिल्ह्यासाठी नामुष्कीची बाब आहे, हे हेरून त्या सर्व कार्यकर्त्यानी दुपारी बाळासाहेबांची भेट घेतली. सभेसाठी वेळ देण्याची मागणी केली.साहेबांचा होकार घेऊन रात्री ८ वाजता अकोट फैल येथे सभा ठरविण्यात आली.तत्पूर्वी सायंकाळी सहा वाजता भीम नगर येथे तत्कालीन जुने पुढारी शंकरराव खंडारे ह्यांचे घरी बाळासाहेबाना नेण्यात आले.साक्षात बाबासाहेबांचे नातू भिम नगर मोहोल्यात आल्याने बाळासाहेबांना पहायला तोब्बा गर्दी झाली.प्रत्येकाला ह्या तरण्याबांड आंबेडकरां मध्ये बाबासाहेबच दिसत होते.भारावलेली जनता डोळे भरून हे प्रतिरूप पाहत होते.त्यांच्या पाया पडत होती, त्यांना स्पर्श करत होती, त्यांच्या पायाची माती कपाळावर लावत होती.सर्व आसमंत भारवला होता.ह्या प्रचंड गर्दीत पहिली सभाच भीमनगर मध्ये पार पडली.अर्थात त्या नंतर रात्री ८ वाजताची नियोजित सभा भारतीय बौद्ध वाचनालय अकोट फैल येथे प्रचंड गर्दीत संपन्न झाली.या दोन सभा नंतर बाळासाहेबांशी जुळलेल्या कार्यकर्त्यानी लगेच दोन महिन्यात बाळासाहेबांची सभा ११ ऑक्टोबर १९८० रोजी अकोट येथील खरेदी विक्री संघाच्या पटांगणावर आयोजित केली.त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला.त्या मुळे वातावरण निर्मिती झाली.भारावलेले कार्यकर्ते संपूर्ण ताकदीने कामाला लागले. त्याकाळी कार्यकर्त्या कडे पैसा, साधने, मोटर वाहने किंवा साधा लाऊडस्पिकरची सोय नव्हती.केवळ चळवळ मोठी झाली पाहिजे ह्या ध्यासाने खेडोपाडी, वस्त्यांमध्ये सायकलवर फिरत कार्यकर्त्यानी अकोला जिल्हा बांधायला सुरुवात केली.अश्या पद्धतीने बाळासाहेब आंबेडकरांना अकोला जिल्ह्याने नेता स्वीकारून कामाला सुरुवात केली. एखाद्या जिल्ह्याने स्वतःचा नेता निवडून एकदिलाने त्यांचे नेतृत्वात काम करायला सुरु करण्याचे हे दुर्मिळ उदाहरण आहे.

अकोला जिल्ह्यास जातीय दंगली व अत्याचाराचा मोठा इतिहास आहे.त्यात प्रामुख्याने मराठा विरुद्ध बौद्ध असा संघर्ष होत असे. त्यात धाकली येथील गवई बंधूचे डोळे काढण्याचे प्रकरण, सुकळी नंदापूर येथील सामाजिक बहिष्कार, मुंडगाव लोहारी, कान्हेरी,देगांव, देऊळगांव, चान्नी चतारी, कोठारी,कळंबा, बोरगाव, पळसो बढे दंगल, मिरवणुकीवर हल्ले अश्या दंगलीच्या नोंदी होत्या.हा रक्तरंजित इतिहास देखील बाळासाहेबां मुळे कायमचा बदलला.त्याकाळी जे समुह एकमेकांशी संघर्ष करीत होते ते पक्ष म्हणून एकत्र आणण्यास यश आल्याने अकोला जिल्ह्यातील दंगली जवळ जवळ हद्दपार करण्यात यश आले. ही अकोल्यातील चळवळीची महत्वाची सामाजिक उपलब्धी आहे.

 

'अकोला पॅटर्न' नेमका आहे तरी काय ? असा प्रश्न अनेकांना असतो. त्याचे उत्तर सोपे आहे, सर्व वंचित जाती समूहांना एकत्र करून एकमेकाला मते देऊन सत्ता हस्तगत करणे.ही अकोला पॅटर्नची सोपी व्याख्या आहे.बाळासाहेब आंबेडकरांचा 'अकोला पॅटर्न' सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेने अनेक वर्षे वंचित ठेवलेल्या जातीसमूहांना संघटित करणारा आहे.  ' भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची, ' हा स्वाभिमानी विचार बहुजन समाजात पेरणी करणारा ठरला."नही भी होगी संख्या भारी फिर भी मिलेगी भागीदारी" हे सूत्र बाळासाहेब आंबेडकरांनी पुढे आणलं.त्यातून बहुजनांमध्ये ठाम विश्वास निर्माण केला. लोकशाही व्यवस्थेत सत्तेमध्ये सर्व समाज घटकांना योग्य न्याय मिळावा, सत्तेचा लाभ सर्व समाज घटकांना व्हावा. त्यातून सामाजिक न्याय,सत्तेचे सार्वत्रीकरणाची बांधणी सुरु झाली.निर्णायक सत्तेचे स्वरूप बहुजनांना अनुकूल व्हावे आणि समाजातील अन्याय व विषमतेचा प्रतिकार करणे शक्य व्हावे, हा मुद्दा बाळासाहेबांनी प्रभावीपणे मांडला.बौद्ध समाजाची एकगठ्ठा मते अल्पमतात असलेल्या समूहाला देणे आणि त्याच बरोबर बौद्ध समूहाला इतर सर्व बहुजन समाजाची मते ट्रान्सफर होणे हा राजकीय चमत्कार घडविला.त्यातून प्रस्थापित, घराणेशाही कडून राजकीय सत्ता हिसकावून बहुजन वर्गाकडे आणता येते, हे महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब आंबेडकर यांनी 'अकोला पॅटर्न'च्या माध्यमातून दाखवून दिले आहे.

बाळासाहे बांनी १९८४ साली आपल्या राजकीय जीवनाला प्रारंभ केला.त्याआधी ते भारतीय बौद्ध महासभा व सम्यक समाज आंदोलन मार्फत सामाजिक कार्यात अग्रेसर होते.त्याला आता ३६ वर्षे पूर्ण झाली आहेत. १९८४ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची हत्या झाल्याने ८४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला देशपातळीवर व राज्यपातळीवर सहानुभूती होती. इंदिरा गांधींच्या हत्येच्या सहानुभूतीने काँग्रेसविरोधातील अनेक दिग्गज पराभूत झाले होते. याच ८४च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकर यांनी ईशान्य मुंबई व अकोला या दोन लोकसभा मतदारसंघांतून निवडणूक लढविली होती. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात साहेबांना ४९ हजार ७५८ मते मिळाली होती, तर अकोला लोकसभेत मधूसुदन वैराळे यांच्या विरोधात निवडणूक लढवून १,६५,६६४ मते मिळवली होती .वैराळे यांना १,७८,८७४ मते मिळाल्याने १३,२१० इतक्या अल्प मतांनी वैराळे विजयी झाले होते.अकोला मतदारसंघात अत्यंत कमी मतांनी पराभूत झाल्याने ह्या मतदार संघातील स्पार्क त्यांनी ओळखला आणि अकोला ह्या खुल्या लोकसभा मतदार संघाची  आगामी राजकारणासाठी निवड केली.

दरम्यान १९८७ साली नांदेड लोकसभेची पोटनिवडणुक लागली.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवाजी पाटील निलंगेकर मुलीच्या गुणवाढ प्रकरणात पदावरून पायउतार झाले होते. त्या वेळी शंकरराव चव्हाण यांची मुख्यमंत्री म्हणून वर्णी लागली.शंकरराव चव्हाण यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याने ८७ मध्ये नांदेडची पोटनिवडणुक जाहीर झाली होती.कॉंग्रेस कडून अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली होती.तर भारिपच्या वतीने बाळासाहेब उभे होते.नांदेड पोटनिवडणुकीत बाळासाहेबांच्या प्रचाराला जॉर्ज फर्नांडिस आले होते .या निवडणूकीत सात उमेदवार उभे होते. परंतु खरी लढत झाली ती अशोक चव्हाण आणि बाळासाहेब यांच्यात. अशोक चव्हाण यांना २,८३,०१९ तर बाळासाहेबांना १,७१,००१ इतकी मते मिळाली. ह्या संघर्षमय लढतीत बाळासाहेबांचा पराभव झाला. प्रचाराची साधने,पैसा,राजकीय पाठबळ नसताना मुख्यमंत्र्याचे मुलाच्या विरोधात पावणेदोन लाख मते घेणे हा मोठा राजकीय चमत्कार होता. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी अनेक मतपेट्या वाजंरा नदीच्या पात्रात बुडविल्या होत्या, असे आजही नांदेड मध्ये जुने कार्यकर्ते बोलतात.

बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भारिपला ६ लाख २ हजार १७४ मते मिळाली होती. यात अकोला लोकसभा मतदारसंघात साहेबांना ३ लाख ३२ हजार २४२ मते मिळाली होती. उर्वरित मतदान इतर लोकसभा मतदारसंघांत झाले होते.आताच्या शिवसेना नेत्या डॉ. नीलम गो-हे यांनी भारिपच्या वतीने ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.त्यांना १ लाख ९ हजार २५३ मते मिळाली होती. प्रत्येक निवडणूकीत भारीपच्या मतांमध्ये वाढ होत होती.

 १९९० साली बाळासाहेब राज्यसभेवर खासदार होते. त्याकाळी भारिप हा पक्ष स्वतंत्र होता.१५ फेब्रुवारी १९९३ रोजी बहुजन महासंघाची स्थापना झाली होती.अकोला पॅटर्न चा पहिला प्रयोग यशस्वी झाला तो फेब्रुवारी १९९२ साली.भारतीय रिपब्लीकन पक्ष आणि बहुजन समाज महासंघाच्या वतीने संयुक्तपणे लढविण्यात आली होती.अकोला जिल्हा परिषद वर १९६२ पासून प्रस्थापित काँग्रेसचे बडे नेते व त्यांचे नातेवाईकांची मक्तेदारी होती.त्याकाळात काँग्रेसच्या नेत्यांच्या किंवा त्यांनी नेमलेल्या प्रशासका मार्फत जिल्हा परिषद चालवली जात होती.विशिष्ठ घराणे सोडले तर इतर कुणाला ह्या सत्तास्थानां मध्ये शिरकाव नव्हता.राखीव जागेवर देखील कामावरचे घरगडी किंवा सालदार निवडून आणून सत्ता ताब्यात ठेवली जाई, त्याला कुणाचाही निर्बंध नव्हता.

अकोल्यात धोत्रे, कोरपे, भुईभार, सपकाळ व धाबेकर ही त्या काळची प्रस्थापित घराणी.एकमेकांचे नातेवाईक असलेल्या ह्या कुटुंबांनी जिल्ह्यातील सर्व सत्ता आपापल्या कुटुंबात वाटून घेतली होती.घराणेशाही आणि मक्तेदारीच्या ह्या सत्तेला पहिला सुरुंग लागला १९९२ सालच्या निवडणुकीत. 'अकोला पॅटर्न' ने जिल्हा परिषद निवडणुकीत हादरा दिला.भारतीय रिपब्लीकन पक्ष आणि बहुजन समाज महासंघाचे ६० पैकी १५ उमेदवार जिल्हा परिषदेत विजयी झाले.२० उमेदवार १०० ते २०० मतांनी पराभूत झाले होते.ह्या निवडणुकीत भाजप सेनेचे सर्व उमेदवार पराभूत झाले होते, त्यापैकी अनेकांच्या अनामत रकमा देखील जप्त झाल्या होत्या. दोन माजी आमदारांना निवडणुकीत आस्मान दाखविण्यात आले होते. एक आमदार भारतीय रिपब्लीकन पक्ष आणि बहुजन समाज महासंघाच्या आदिवासी उमेद्वारा विरोधात राजकीय बनाव करून विजयी झाले होते.अकोला जिल्हा काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष भारतीय रिपब्लीकन पक्ष आणि बहुजन समाज महासंघाच्या मुसलीम उमेद्वारांमुळे तिस-या क्रमांकावर फेकले गेले होते.अनेक करोडोपती उमेदवारां विरोधात शेतकरी, कष्टकरी, मजूर उमेदवार असताना देखील कोट्याधीश उमेदवारांना दारुण पराभव स्विकारावा लागला होता.

अकोला जिल्ह्याच्या १३ पंचायत समितीच्या निवडणुकीत फेब्रुवारी १९९२ मध्ये १२० उमेद्वारां पैकी ३० उमेदवार भारतीय रिपब्लीकन पक्ष आणि बहुजन समाज महासंघाचे निवडून आले होते.४८ उमेदवार अत्यल्प मतांनी पराभूत झाले होते. अकोला व बार्शीटाकळी ह्या दोन अत्यंत प्रतिष्ठेच्या पंचायत समित्या धनदांडग्याच्या व कुटुंबशाहीतील प्रस्थापिता कडून हिसकावून घेण्यात आल्या.बार्शीटाकळी पंचायत समितीत बौद्ध तर अकोला पंचायत समिती मध्ये धनगर समाजाचे सभापती विजयी झाले.मूर्तिजापूर पंचायत समितीत टाकोनकर समाजाचे बबन डाबेराव हे पक्षाचे सहकार्याने सभापती झाले तर दर्यापूर पंचायत समिती मध्ये कोळी समाजाचे वासुदेवराव खेडकर सभापती झाले.बाळापूर व कारंजा पंचायत समिती मध्ये एक एक सदस्य कमी पडल्याने पक्षाला सभापती पदाने हुलकावणी दिली.विशेष म्हणजे अकोला जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या १५ पैकी ५ सदस्य हे त्यांच्या तालुक्याचे बाहेर निवडणूक लढून विजयी झाले होते.त्यापैकी चारजण बौद्ध होते आणि ते खुल्या प्रवर्गातून निवडून आले होते.हा 'अकोला पॅटर्न'चा उदय होता.

बाळासाहेब आंबेडकर यांचा अकोला पॅटर्न हा एवढा जबरदस्त ठरला कि पुढे अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते विधानसभा, लोकसभेपर्यंत आपले अस्तित्व निर्माण केले.बहुजन सत्तेच्या अकोला पॅटर्न अनेक दालने काबीज केली. २१ मार्च १९९३ साली शेगांव येथील राज्यस्तरीय अधिवेशनात भारिप व बहुजन महासंघ विलीन झाला.१९९३ मध्ये नांदेड मधील किनवट येथून पोटनिवडणुकीत आदिवासी समाजातील भिमराव केराम यांना विधानसभेत आमदार म्हणून निवडून आणले. १९९५ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत मखराम पवार आमदार म्हणून निवडून आले तसेच इतर उमेदवारांना लक्षणीय मते मिळाली होती. १९९८ आणि १९९९ मध्ये लोकसभेत बाळासाहेब आंबेडकर खासदार म्हणून संसदेत गेले. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब यांचे तीन आमदार निवडून आले.याच काळात कॉंग्रेसच्या सरकार मध्ये भारिप बहुजन महासंघाला दोन कॅबिनेट व एक राज्यमंत्री पद होते.२००४, २००९ आणि २०१४ मध्ये भारिप बहुजन महासंघाचे आमदार निवडून आले.२०१२ साली अकोल्याचे महापौर पदावर बौद्ध समाजाची महिला विजयी झाली.अनेक पंचायत समित्यावर सत्ता आली.त्यात भारतीय बौद्ध महासभेच्या आयोजनातील अकोल्यातील धम्मचक्रप्रवर्तन दिन सोहळा आणि भव्य मिरवणुकीचा देखील मोठा वाटा आहे.

 

१९९२ च्या पहिल्याच दणक्याने अकोला जिल्हा परिषदेत प्रस्थापित, धनदांडगे व कुटुंबशाहीच्या पाट्या पुसण्यात यश आले.सर्वसामान्य आणि वंचित बहुजन समाजाला पहिल्यादा स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रवेश मिळाला.पुढे भारिप बहुजन महासंघाचे कोळी,माळी,बौद्ध,तेली, मुस्लिम, कुणबी व बौद्ध हे जिल्हा परिषद अध्यक्ष बनलेत.विशेष म्हणजे राज्य मंत्री दर्जा असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपद खुल्या प्रवर्गाकरिता राखीव असताना पुष्पाताई इंगळे आणि प्रतिभाताई भोजने ह्या जिल्हा परिषद अध्यक्षा बनल्या आहेत.ही किमया अकोला जिल्हा परिषद सोडली तर संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही पहायला मिळत नाही.राखीव जागा असल्या शिवाय बौद्ध पदाधिकारी होऊ शकत नाही, महिला तर अजिबातच होऊ शकत नाही असा जणू अलिखित नियमच ! तो नियम देखील भारिप बहुजन महासंघाने अकोल्यात मोडून काढला.खुल्या प्रवर्गात दोनवेळा बौद्ध महिला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निवडून आणल्या. सामान्य गृहिणी आणि सर्वसामान्य कुटुंबातील वंचित, दुर्लक्षित घटकांना आपली नावे जिल्हा पातळीवर कोरण्यात यश प्राप्त झाले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती-धर्मांतील लोकांना एकत्र केले.अनेक वर्षे सत्तेपासून वंचित राहिलेल्या छोट्या-मोठय़ा समूहाचे सरपंच, सभापती व जिल्हा परिषद अध्यक्ष,महापौर, आमदार,मंत्री हे केवळ बाळासाहेब आंबेडकर व अकोला पॅटर्नमुळेच बनू शकले.

अकोला पॅटर्नमध्ये वेगवेगळ्य़ा जाती-धर्माचे नेते सत्तेतून मोठे झाले.काहीनी अति महत्त्वाकांक्षेसाठी पक्ष सोडला.इतर पक्षात मध्ये गेलेले हे नेते राजकीयदृष्ट्या संपलेत.आज हे नेते कुठे आहेत? त्याचा शोध घ्यावा लागतो.अकोल्यात पक्षाची राजकीय ताकद कायम आहे.

असाच राजकीय पक्ष बाबासाहेबांना अपेक्षित होता. ज्यात सर्व जाती समूहाचा सहभाग असेल आणि त्याची मार्गदर्शक तत्वे ही स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव असतील.त्याचाच अंगीकार भारिप बहुजन महासंघ - वंचित बहुजन आघाडीने केला आहे. १ जानेवारी २०१९ रोजी स्थापन झालेल्या आणि २४ मार्च २०१९ रोजी निवडणूक आयोगा कडे नोंदणी झालेल्या वंचित बहुजन आघाडीने तर भारतीय घटनेचा सरनामा हाच पक्षाचा जाहीरनामा घोषित केला आहे.

अकोल्यातील कार्यकर्ते हे ग्राम पंचायत, नगर पालिका, कृषी उत्पन्न बाजार समित्या, खरेदी विक्री अश्या सर्व निवडणुका लढतात. त्यातून जिल्हा परिषद, महापालिका, विधानसभा उमेदवार म्हणून पुढं येतात. किंवा पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणायला आपले कसब पणाला लावतात.पक्षासाठी जीवाचे रान करतात.भारिप बहुजन महासंघ - वंचित बहुजन आघाडीने असे हजारो जनप्रतिनिधी घडविले आहेत.बाबासाहेबांना असेच प्रशिक्षित नेते आणि कार्यकर्ते घडवायचे होते. आणि म्हणूनच अकोला पॅटर्न हे बाबासाहेबांच्या स्वप्नातील राजकीय प्रशिक्षण महाविद्यालय बनले आहे.


राजेंद्र पातोडे

प्रदेश प्रवक्ता

वंचित बहुजन आघाडी.  

9422160101

भिती घालणाऱ्या बातम्या आणि कोविडची वस्तुस्थिती. राजेंद्र पातोडे.

 भिती घालणाऱ्या बातम्या आणि कोविडची वस्तुस्थिती.


राजेंद्र पातोडे.


अकोल्यात कोरोनाचा उद्रेक , रुग्ण संख्या सहा हजारा कडे ! 

असल्या सनसनाटी आशयाखाली दररोज बातम्या प्रसारित होत आहेत.परिणामी जनमानसात कोरोनाच्या नावावर प्रचंड दहशत निर्माण केली जात आहे.समूह संसर्ग सुरू झाला असून आता अकोलकरांनी ठरवायला हवं की कोरोनाच्या सोबत जगायचे कसे ? अश्या बातम्या मुळे ही भिती अधिकच गडद केली जात आहे. खरोखरच अकोल्यात सहा हजार रुग्ण आहेत का ? तर त्याचे उत्तर येते अजिबात नाही.मग हा मोठा आकडा येतो कुठून ? हा प्रश्न सामान्य माणसाला पडणे स्वाभाविक आहे.

चला वस्तुस्थिती जाणून घेऊया.

नेमके एक्टीव्ह रुग्ण किती ?

कोरोनाच्या सद्यस्थिती पहा एकूण पॉझिटीव्ह अहवाल आहेत ५८९५ म्हणजे अकोल्यात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्या पासून आजवर ५८९५ लोक बाधित होऊन तपासणीत पॉझिटिव्ह आलेत.त्यांचेवर उपचार झाले.अर्थातच १६ सप्टेंबर २०२० ह्या तारखेपर्यंत ४७६६ + ९७४ + १५५ = ५८९५ असे एकूण बाधित व तपासणी मध्ये पॉसिटीव्ह रुग्ण आहेत.हा आकडा एक्टीव्ह रुग्णाचा नाही तर सहा महिन्यांत बाधित व तपासणी मध्ये पॉसिटीव्ह आलेल्या एकूण रुग्णांचा आहे.त्या मधील कोरोना मुक्त ४४१३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. अर्थात दाखल (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह) तसेच उपचार सुरू असलेली रुग्ण संख्या केवळ - १२९३ इतकी आहे.पाच हजार आठशे पंचानव नाही.एकूण बाधित संख्या पैकी ४४१३ जनांना डिस्चार्ज मिळाला असताना कोरोना उद्रेक, रुग्णसंख्या सहा हजारा कडे ...ह्या  सारख्या सनसनाटी टायटल मुळे अकोल्यात साडेपाच हजार पेक्षा जास्त रुग्ण असल्याचा भास निर्माण होतो.

दरम्यान कोरोना कालावधी मध्ये मयत झालेले रुग्ण आहेत १८९ आहेत.ह्या १८९ मृत्यूचे विश्लेषण जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा प्रशासन निटपणे केले जात नाही.मृत्यू झालेले सर्व रुग्ण हे कोरोना मुळे दगावले की अन्य आजाराने ? ह्याची माहिती सादर केली जात नाही.त्यामुळे देखील गोंधळ आहे.बरं अकोल्यातील सामान्य परिस्थिती मध्ये जिल्ह्यात अपघात, आजार व नैसर्गिक कारणांमुळे किती मृत्यू होत होते ? हे तपासून पहिल्यास तो आकडा कमी होता की कोरोनामुळे मृत्यू अधिक झाले हे देखील स्पष्टपणे जाहीर केले जात नाही.

 

भिती कोरोनाची नाही तर .....


आता कम्युनिटी स्प्रेड अर्थात समुह संसर्ग सुरु झाला आहे.लोकांमध्ये भिती काय निर्माण झाली आहे ? तर ती आहे, वेळेवर उपचार न मिळण्याची,बेड / हाॅस्पीटल न मिळण्याची,

ऍब्युलन्स न मिळण्याची,ऑक्सीजन/ व्हेन्टीलेटटर वेळेवर न मिळण्याची,शासकीय रुग्णालयात रुग्णाची योग्य देखभाल नसल्याची, जेवण अयोग्य असल्याची, खाजगी रुग्णालयात सुरू असलेल्या आर्थिक लुटीची ! ही भिती निराधार आहे का ? तर अजिबात नाही.औषधे,ऑक्सिजन, पीपीई किट, मास्क चा तुटवडा ह्या नित्याच्या बातम्या.त्यात जिल्हा रुग्णालयात खाटेवरून पडून कोरोना पोजिटिव्ह रुग्णाचा मृत्यू.अकोल्यात बेड उपलब्ध होत नसल्याने मित्राच्या वडिलांना नागपुरात हलवून देखील प्रचंड त्रास झाल्याचा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी ह्यांनी फेसबुकवर मांडलाय.त्यावर जिल्हाधिकारी ह्यांनी कालच्या अर्थात १६ तारखेला प्रकाशित लोकमत मध्ये खुलासा केला आहे.हॅलो, अकोला जिल्हा पानावर जिल्हाधिकारी ह्यांचा खुलासा असून " जीएमसी मध्ये पुरेसे बेड उपलब्ध असल्याचे" वृत्त आहे.बातमीनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये ९०, आयकॉन मध्ये २४, ओझोन मध्ये २८, बाबन हॉस्पिटल मूर्तिजापूर येथे आवश्यकते नुसार बेड, अवधाते हॉस्पिटलमध्ये २०, युनिक हॉस्पिटलमध्ये १८, अकोला ऍकसिडेंट हॉस्पिटलमध्ये १६ असे एकूण १९६ आणि बाबन हॉस्पिटलमध्ये आवश्यकतेनुसार उपलब्ध होणार बेड पाहता २०० पेक्षा अधिक खाटा उपलब्ध असल्याचे जिल्हा प्रशासन जाहीर करते ! मग प्रश्न पडतो तो असा की नेमकं खोटं काय आहे? खाटा उपलब्ध नसणे की अधिक काही तरी ?

जर एवढ्या मोठ्या संख्येने खाटा उपलब्ध असतील तर त्याची माहिती सामान्य जनतेला देणारी हेल्पलाईन जिल्हा प्रशासन गेली सहा महिने विकसित करू शकली का ? तर त्याचे उत्तर नकारार्थी येते.


खाजगी रुग्णालयात ठराविक रक्कम जमा केल्या शिवाय रुग्ण दाखल केला जाणार नाही असे बोर्ड खाजगी रुग्णालयात लावण्यात आले.त्यावर उपचारासाठी जास्त दराने पैसे घेतल्यास कार्यवाही करण्याचा जिल्हा प्रशासनाने दिलेला हवाई इशारा सुद्धा आलाय.परंतु त्यावर काही होणार नाही हे जिल्ह्यातील नागरिकांनी अनुभवले आहे.खाजगी डॉक्टर सेवा आणि खाजगी रुग्णालये अधिग्रहित करण्याचा शासन निर्णय आला.नोटीस निघाल्या परंतु लुटुपुटूच्या लढाई पलीकडे कार्यवाही गेली नाही.

आजारा पेक्षा सुविधा आणि अंमलबजावणी चा केमिकल लोचा झाला आहे. त्यात अश्या मोठया आकडेवारी मुळे जनमानस ढवळून निघाले नाही तर नवलच आहे.


राजेंद्र पातोडे

प्रदेश प्रवक्ता

वंचित बहूजन आघाडी 

9422160101

Tuesday, 18 August 2020

 #वैचारिक गोंधळ नको...भास्कर भोजने


:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

    #मनुवादी नेहमी प्रत्येक नेत्याला एका जातीत बांधून ठेऊन त्याचा राजकीय परिघ संकोचून त्याला एका मर्यादेत बंदिस्त करतात.मात्र त्याच वेळी वैदिकांचा नेता हा देशातील समस्त समाजाचा नेता ठरवितात.हा बामणी कावा आहे...!!

उदा:- शरद पवार...मराठा नेता.

       वारीस पठाण..... मुस्लिम      

                                       नेता.

     अनिल अण्णा गोटे.. धनगर नेता.

     आनंदराव अडसूळ... चर्मकार

                                     नेता.

    लक्ष्मणराव ढोबळे.... मातंग नेता.

  सुधाकरराव नाईक... बंजारा नेता.

   बबनराव पाचपुते...वारक-यांचा

                                     नेता.

    

    रामदास आठवले... दलित नेता.

    गोपिचंद पडळकर..... धनगर नेता.

    छगन भुजबळ......माळी नेता.

  गोपीनाथ मुंडे..... वंजारी नेता.

          बहूजनांचा कुणीही राजकीय पुढारी असो,त्याला त्याच्या जातीच लेबल लावून त्याचा राजकीय परिघ संकोचून त्याची मर्यादा खुंटविली जाते...!!

   महाराष्ट्रातील या वरील नेत्यांची ही ओळख कुणीही नाकारु शकतं नाही.,

       मात्र

देवेंद्र फडणवीस, नितिन गडकरी तथा शरद जोशी,मनोहर जोशी यांची अशी कोणतीही ओळख निर्माण झाली नाही. असे का.??

   या प्रश्नाचे उत्तर खूप सोपे आहे...!!

आपणं आपली भूमिका कशी तयार करतो,??किंवा आपला समज कसा समृद्ध होतं जातो...??

   ज्ञात असलेल्या साधनांचा वापर करून समाजातील तरुण आपली वैचारिक भुमिका दृढ करीत असतो...!!

 राजकीय पुढाऱ्यांच्या संदर्भात कुठलेही पुस्तक वा साहित्य उपलब्ध नसते मग वाचक वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया वरील माहितीच्या आधारे त्या त्या नेतृत्वाच्या पैलूंचा शोध घेत घेत त्याच्या बद्दलची समाजात भूमिका किंवा मतं तयार होतं जाते....!!

   सगळ्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियात वैदिक धर्मीय कावळ्यांनी कब्जा मिळवला आहे,ते सरळ सरळ प्रत्येक नेत्यांच्या जातीचा उल्लेख करुन त्याची तशी ओळख निर्माण व्हावी म्हणून शब्दांचे खेळ करीत असतात दृष्टबुद्धीने खोट्या गोष्टी पण रेटून बोलतात आणि शब्दांचा भडिमार करीत करीत त्या नेत्यांचं आपणं जातीय वर्गीकरण करून बसतो आणि त्या नेत्याला आपणही त्याचं जातीचं लेबल लावून मोकळे होतो...!!

     जर देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी सारख्यांना ब्राम्हणांचे नेते म्हणून मान्यता दिली तर ते बहुमताच्या राजकारणात अत्यल्प संख्याक असल्यामुळे यशस्वी झाले असते का.??

 याची अजिबात शक्यता नाही परंतु आपणं त्यांना तशी ओळख दिली नाही कारण त्यांच्या जातीचा कोणत्याही वृत्तपत्राने वा टि.व्ही.चॅनलने आपणांस नेहमी नेहमी शब्दांचा खेळ करुन त्यांची ओळख करुन दिली नाही....!!

त्याच्या उलटं ते कसे मानवतावादी आहेत,ते कसे आक्रमक आहेत,ते कसे विद्वान आहेत,ते कसे कर्तृत्वान आहेत,त्यांनी किती आणि कशा पदव्या संपादन केल्या आहेत याचाच भडिमार केला जातो आणि त्यांचं नेतृत्व बहूजन समाजाच्या मेंदूत फिट बसविले जाते.हेच वास्तव आहे, हेच सत्य आहे...!!

   मिडियातील जातियवादी किड्यांनी, अतिशय विकृत बुद्धीने, समाजाची मानसिकता तयार करुन सर्वच नेत्यांच्या मर्यादा आखून त्यांना एका छोट्या परिघात बंदिस्त करून आपलं राजकीय नेतृत्व पुढे दामटतात...!!

  समाज मनं मात्र जातिय विखारात डुंबून राजकीय नेतृत्वाची मर्यादा आखून त्या नेत्याला त्याच्याच जातीचा नेता म्हणून संबोधतो किंवा तश्याच मानसिकतेने पाहतो वा विचार करतो.हा अनुभव आहे,हीच वास्तविकता आहे,हेच सत्य आहे...!!


    वैदिकांची ही दृष्टबुद्धी परास्त करायची असेल तर जातीच्या पलिकडे जाऊन नेतृत्वाला काम करावे लागेल ही काळाची गरज ओळखून वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी गेल्या चाळीस वर्षांपासून आपलं राजकीय धोरण बहूजन समाजाच्या हितासाठी झटणारे नेते म्हणून आखलं आणि त्याच दिशेने कामही केले आहे...!!

    त्या संदर्भात गेल्या चाळीस वर्षाचा अॅड बाळासाहेब आंबेडकरांच्या कामाचा आलेख बघा...!!

  #मंडल आयोग लागु करा म्हणून महाराष्ट्रभर दौरे. आंदोलन केले,परिषदा घेतल्या...!!

 #एनरॉन प्रकल्प रद्द करा म्हणून आंदोलन...!!

#गायरान जमीनी तथा अतिक्रमीत जमीनीसाठी लढा...!!

#ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून आंदोलन आणि लढा...!!

#धोबी समाजाचा एस.सी.प्रवर्गात समावेश व्हावा म्हणून मोर्चा...!!

#वारकरी संप्रदायाच्या मागणी साठी नागपूर विधानभवनावर मोर्चा...!!

#संत तुकाराम महाराजांची समाधी वाचविण्यासाठी डाऊ कंपणी विरोधात भामरागड डोंगर वाचविण्यासाठी आंदोलन...!!

#महिला मुक्ती परिषदांचे सलग दहा वर्षे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात आयोजन...!!

 #वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन...!!

#शेतकयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून आंदोलन, रस्ता रोको आंदोलन...!!

#शेतक-यांचे कर्ज माफी साठी मोर्चा, आंदोलन...!!

#कापूस परिषदेचे आयोजन...!!

 #१३महामंडळामधून देण्यात आलेले कर्ज माफ करावे म्हणून मुंबई आझाद मैदानावर विशाल मोर्चा...!!

#सच्चर समितीच्या शिफारशी लागू कराव्यात म्हणून आंदोलन...!!

#जाचक पोटा कायदा रद्द करावा म्हणून यवतमाळ, परभणी येथे परिषदांचे आयोजन...!!


    वरील आंदोलने,लढे आणि परिषदांचे विश्लेषणात्मक विवरण केले तर अॅड बाळासाहेब आंबेडकरांनी समाजातील ओबीसी, मुस्लिम, दलित, महिला,विद्यार्थी, शेतकरी,कष्टकरी,भुमिहीन,अशा सर्वच घटकांसाठी काम केले आहे हा लेखाजोखा आहे. आधी केले मग सांगितले...!!

   आता अॅड बाळासाहेब आंबेडकरांनी ३१अॉगस्ट ला पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासाठी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्यावर काही स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवून घेणाऱ्या मित्रांनी आक्षेप नोंदवला आहे...!!

    मित्रांनो वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर हे सर्वधर्मसमभाव मानणारे राजकीय पुढारी आहेत...!!

  समतेचा संदेश देणा-या वारकरी संप्रदायाचे मंदिर खुले व्हावे म्हणून आंदोलन करीत आहेत ही भुमिका समजून घ्या...!!

वैदिक धर्मीयांशी वारकरी संप्रदायाचे काहीही नातं नाही...!!

आंबेडकरी विचारधारेचा विरोध वैदिक धर्मीयांच्या विचारधारेशी आहे, समतावादी वारकरी संप्रदायाशी नाही...!!

 तुम्ही आंबेडकरवादी असाल तर (?)

   तुम्ही स्वत: मनुवादी मिडियाने तुमच्या डोक्यात निर्माण केलेला वैचारिक गोंधळ काढून टाका...!!

   वैदिकांना अॅड बाळासाहेब आंबेडकर हे एका जातीचे नेते आहेत ही भुमिका मांडायची आहे,त्यांची तशीच मनिषा आहे, मात्र बाळासाहेब आंबेडकरांचे गेल्या चाळीस वर्षातील काम तर बहूजनांचे नेते म्हणून आहे,मग तुम्ही वैदिकांना अभिप्रेत असलेली भुमिका का मांडता...??

  तुम्ही आंबेडकरवादी असुनही तुम्हाला समतावादी वारकरी संप्रदाय मान्य नाही का.??

   तुम्ही आंबेडकरवादी असुनही तुम्हाला समतावादी वारकरी संप्रदायाचा ऐतिहासिक संदर्भ माहिती नाही का..??

  तुम्ही आंबेडकरवादी आहात की पुरोगाम्या सारखे ,ढोंगी आहात...??

   तुमच्या मनातील वैचारिक गोंधळ काढून टाका आणि स्वतंत्र बुद्धीने विचार करून वैचारिक विरोध करा.तुमचे स्वागत होईल,मात्र मनुवादी वैदिकांचीच री ओढली तर तुम्ही ढोंगी आहात हेचं सिद्ध होईल...!!

      जयभीम.

@.. भास्कर भोजने.


Monday, 25 May 2020

कोरोना व्हायरस ,आयोध्या वाद व एक मोठे षडयंत्र - मनोज नागोराव काळे, ठाणे

कोरोना व्हायरस ,आयोध्या वाद व एक मोठे षडयंत्र
- मनोज नागोराव काळे, ठाणे


आयोध्या येथील राम मंदिर ( पुर्वीची बाबरी मज्जीद)  हे प्राचिन बौद्ध स्थळ आहे व ते बौद्धांच्या ताब्यात दिले पाहीजे असा या आठवड्यात अचानक एकदम उद्रेक झाला, सोशल मिडीयावर सगळीकडे तीच चर्चा सुरु झालेली दिसली, जो तो सर्व मुद्दे विसरुन फक्त आयोध्या मंदिर आता बौद्धांनी मिळवले पाहीजेच असा सुर उमटायला सुरवात झालेले दिसले, यात भाजपात असलेले रामदास आठवले व इतर संघाचे गुलाम असलेले बहुजन नेते प्रामुख्याने ही मागनी करताना दिसले या गोष्टीला अधोरेखित केले पाहीजे.

★आयोध्या हे बौद्ध क्षेत्र आहे यासाठी जे कोर्टात केस लढत आहेत त्या वीनीतभाई मौर्य यांच्याशी स्वतः फोनवर बोललो आहे, ते म्हणाले की सोशल मीडियावर जी कोर्टाने बौद्धांच्या बाजुने निकाल दिला आहे अशी बातमी व्हायरल होत आहे ती फेक आहे ,कोर्ट त्यांचे काही ऐकुनही घेत नाही, मागच्या तारखेला तर यांना बोलुही दिले नव्हते,तरी या बद्दल खोट्या बातम्या पसरवुन समाजात संभ्रम व अस्थिरता निर्माण केली जात आहे, आद विनीत मौर्य यांनी खंत व्यक्त केली की त्यांच्याकडे केस लढायला पैसेही कमी पडत आहे, सोबत त्यांचा नंबर देतो ज्यांना सविस्तर माहीती हवी असेल त्यांनी विनीत मौर्य स्वता कॉल करुन मिळवावी हि विनंती ( 9919519333 )

कोरोना ने जगात थैमान घातले, भारतातही मार्च महिण्यापासुन लॉकडाऊन लावला गेला,
कोणत्याही नियोजनाशिवाय देशात लॉकडाऊन लावला गेला, भारतीय मजुर, कामगार, हातावर पोट असणारा प्रत्येक नागरिक उद्धस्त झाला, देशातील जवळपास शंभर कोटी पेक्षा जास्त नागरिकांचे जीवन उध्वस्त झाले,पन मीडिया मधुन मात्र ईतर देशांपेक्षा भारत किती चांगल्या स्थितीत आहे असाच प्रचार लावुन धरला, हजारो किलोमिटर चालुन घरी पोचलेला कानगार किंवा गावाबाहेर अस्पृश्यासारखे जगत असलेला क्वारंटाईन मजुर याची व्यथा मिडीयाने लपवली, नियोजन शुन्यता किंवा जानीवपुर्वक केले असेल पन आज देश उद्धस्त झालेला आहे, या सर्वांचा रोष मीडिया व आरएसएस भाजपाच्या आयटी सेलने चायना कडे वळवण्याचा प्रयत्न केला, पन हा रोग चायना ने भारतात आणुन सोडलेला नाही तर जे भारतीय कामगार विदेशात कामाला होते त्यांच्याकडुन नकळत हा आजार भारतात आलेला आहे हे सर्वांना मान्य असेल,

जगभरातुन भारतात आलेल्या प्रत्येक प्रवाशांचा विजा नंबर, पासपोर्ट नंबर व पत्ता सरकार कडे असतो तरीही या सर्वांना न तपासता त्यांना आपापल्या घरी जाऊ दिले गेले,
त्यांच्यापैकी ज्यांना या वायरस ची लागन झालेली त्यांनी तो व्हायरस देशात पसरवला व आज संपुर्ण देश मरन संकटात आलाय,

सरकारने सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळे लॉक करुन तेथे सर्व प्रवाशांची तपासनि केली असती,विदेशातुन आलेल्या फक्त लाखभर प्रवाशांची तपासनी करुन त्यांना घरी सोडले असते तर 130 कोटी नागरिक उद्धस्त झाले नसते, त्यामुळे याला मी पुर्वनियोजित कट म्हणतोय.

सरकारने नोटबंदी करुन जनतेचे कंबरडे मोडले, नंतर जिएसटी लावुन व्यापार्यांचे कंबरडे मोडले, आता लॉकडाऊन लावुन 100% मजुरांचे जीवन मातीत मिळवले आहे,  इतके सर्व करुनही पुन्हा मिडीयाच्या आधारे हेच लोक देशाचे तारनहार घोषित केले जातील, पन देश म्हणजे जनताच ना, जी आज पुर्नतः उद्धस्त झालेली आहे,

★सरकारच्या मागच्या सात वर्षातील अपयशांना झाकण्यासाठी कोरोनाचा रामबाण म्हणुन उपयोग करुन घेण्यात संघ परिवाला यश आले आहे, सरकाने सहा वर्षात बुडवलेल्या अर्थव्यवस्थेचे खापर आता लॉकडाऊनवरच टाकले जाणार आहे,
 या सर्व पार्श्वभुमीवर भारतातील बौद्ध समाजच फक्त सरकारला धारेवर धरत होते, सरकारच्या प्रत्येक गोष्टीवर बारिक नजर ठेवुन होते,

मागच्या आठवड्यातच अॅड प्रकाश आंबेडकरांनी कोरोना हा रोग मोदीने देशात आनला आहे, व कोरोना मुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या परिवाराने मोदीवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा असे अवाहन जनतेला केले होते व त्याच बरोबर देशातील सर्व मंदिरांची संपत्ती ही सरकारने ताब्यात घेऊन त्याचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी करावी असे सुचवले होते. पन हे सरकार धर्मवेडे व धर्मांध लोकांच्या खांद्यावर तरले आहे, उभे आहे, त्यांनी या बौद्ध समाजाला बदनाम करण्यासाठी किंवा बौद्धांना डायवर्ट करण्यासाठी
नवा मुद्दा चर्चेत आनला आहे की आयोध्या मंदिर हे प्राचिन बौद्ध मंदिर आहे व ते आता बौद्धांनी ताब्यात घेतले पाहीजे...

होय, तेच नाही तर भारतातील सर्वच प्राचीन मंदिले ही बुद्ध विहारे व स्तुपेच आहेत हे आम्हालाही माहीत आहे, तिरुपती बालाजी, पंढरपुरचे विठ्ठल मंदिर, उडीसाचे, केरळे सर्व मंदिरे ही प्राचीन बौद्ध मंदिरेच आहेत, यावर शंभर वर्षांपासुन संशोधन होत आहेत,
महान सम्राट अशोकाने ८४,००० स्तुपे बनवली होती त्यामुळे भारतातील कोणत्याही डोंगरावर टिकाव मारला तर तेथे फक्त बुद्ध सापडतात,  या देशाचा सुवर्ण काळ बौद्ध काळालाच म्हटले जाते.

★ ऐन लॉकडाऊन काळात बौद्धांना राम मंदिर की बुद्ध विहार या वादात गुंतवण्यामागचे कारण काय?

भाजपाचे राजकीय अपयश जनतेसमोर मांडणार्या बौद्ध समाजाला मोदी कडुन एका वेगळ्या विषयाकडे वळवले पाहीजे हा एकच मुद्दा यामागे आहे, सहा दिवसा पासुन बौद्ध लोक मोदीच्या कुकर्मावर चर्चा करने बंद करुन बौद्ध मंदिर की राम मंदिर यावरच अडकुन पडलेले दिसत आहेत यातच संघ परिवाराचा विजय आहे.

 ★ काही बोद्ध म्हणत आहेत की हा मुद्दा अंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायची वेळ आहे.
 मित्रांनो, सार्या जगाला माहीत आहे की भारत ही बुद्धभुमी आहे व येथे सम्राट अशोकाने हजारो विहार स्तुपे बांधली होती व ती सर्व मुस्लिम व हिंदु कर्मठांनी मोडुन तोडुन टाकली होती,

जगाला हे पन माहीत आहे की जगातील प्रत्येक बौद्धाचे श्रद्धास्थान असलेले महाबोधी विहार, बुद्धगया हे ब्राह्मनांच्या ताब्यात आहे व त्यासाठी शंभर वर्ष लढा सुरु आहे.

जगाला हे पन माहीत आहे की या देशात ज्यांनी बौद्ध धम्म संपवला त्या विचारांचे लोक आता सत्तेवर आले आहेत

जगाला हे पन माहीत आहे की २००७ साली बुद्धगया विहारात झालेले बॉम्बस्फोट हे हिंदु अतिरेक्यांनी केले होते.

वरील कोणता मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर निकालात निघाला आहे का? कोणत्या मुद्याला न्याय मिळाला आहे का?  याचे एकच उत्तर आहे .....नाही.

म्हणुन आपन थोडा वेळ संयंम पाळावा लागेल,
जग कोरोनाशी लढत असताना बौद्ध लोक मात्र एका मंदिरासाठी झगडत होते असा आपल्यावर कंलंक लावला जाईल, जो बौद्ध समाज आज मोदीच्या कोरोना आडुन होत असलेल्या षडयंत्रांना उघडे पाडतोय तोच समाज देश संकटात असताना मंदिर विहार वाद करत होता असा डाग आपल्यावर लावला जाणार आहे त्यामुळे आपन लॉकडाऊन संपेपर्यंत तरी संयम ठेवायला हवा.

आयोध्या बुद्धकालीन साकेत या पुस्तकात सविस्तर सिद्ध केले आहे की तेथे बुद्ध विहारच होते, व असे अनेक संशोधने आहेतच, आपल्यासाठी हा मुद्दा खुप महत्वाचा आहे पन त्या मुद्यावर आपन कोरोना संकट व लॉकडाऊन अासताना अडुन बसलो तर आपले तिहेरी नुकसान होणार आहे ते असे
१. बौद्ध लोक मोदीला घेरत आहेत ते काम मागे पडेल
२. बोद्धांना पुन्हा आयसोलेट करने त्यांना सोपे जाईल
३.बौद्ध लोक देशापेक्षा धर्माला महत्व देतात असा प्रचाल होईल..

संघ परिवाराचे हे हातखंडे नविन नाहीत त्यांनी मुस्लिमांसोबतही हेच खेळ खेळुन मुस्लिमांना आज अविश्वसनीय ठरवले आहे, मुस्लिमां विरुद्ध सर्व ओबीसी, बहुजनांना कंडीशनिंग केले गेले आहे तसेच आता बौद्धांबद्दल करण्याचे संघाचे मनसुबे आहेत.

त्यामुळे लॉकडाऊन संपेपर्यंत तरी आयोध्या राम मंदिर की बुद्ध विहार ही चर्चा थांबवावी असे मला वाटते आहे, आपन या देशाचे सच्चे नागरिक आहोत, भाजपाचा राजकीय नालायकपना झाकण्यासाठी आपला हातभार लागु नये साठी सतर्क राहीले पाहीजे, त्यांच्या जाळ्यात आपन अडकले नाही पाहीजे, नंतर आपन आपले सर्व मुद्दे घेऊन लढायचेच आहे.
भाजपाला तारक ठरेल अशा मुद्यांना आपन तुल दिली नाही पाहीजे. आपन त्यांचे काम सोपे करु नये.

★ या वादाला हवा देणारे नेते मंडळी आहेत रामदास आठवले, वामन मेश्राम, राजरत्न आंबेडकर व इतर भाजप धार्जिन नेते...माझे या महान नेत्यांना माझे खुले अवाहन आहे की जर तुम्हाला लॉकडाऊन काळात भाजपाने या मुद्याला समाजात पेरुन समाजाला व लोकशाहीला अडचनीत टाकण्याचे काही कारस्थान केले असेल असे वाटत नसेल किंवा तुम्हाला ते कळत नसेल तर

१. रामदास आठवले केंद्रात मंत्री आहेत त्यांनी राम मंदिर बद्दल सुप्रिम कोर्टात ती वादग्रस्त जागा राम लल्लाची आहे असा निर्णय दिला तो बदलण्यासाठी लोकसभेत कायदा करुन घ्यावा कारण त्याशिवाय सुप्रिम कोर्टाचा निर्णय बदलता येत नाही,

२ वामन मेश्राम - यांच्या संघटनेकडे समाजाचे अनगिनत रुपये जमा आहेत त्यातुन त्यांनी राममंदिर विरुद्ध केस लढणार्या विनीत बौद्ध यांची आर्थिक मदत करावी, कारण त्यांची आर्थिक अडचन आहे असे त्यांनी सांगीतले आहे.

३.राजरत्न आंबेडकर यांनी या लढाईचे स्वता नेतृत्व करावे,

नुसते सोशल मीडियावर मोठमोठे बोलुन काही होणार नाही, या तीन नेत्यांनी आयोध्या मंदिर की बौद्ध विहार याबद्दल नेतृत्व केले पाहीजे.जे लोक कायदेशीर लढत आहेत त्यांची मदत केली पाहीजे,
फेक बातम्या वाचुन कोर्टात प्रलंबित वादग्रस्त व अतिसंवेदनशील मुद्यांना पेटवुन संपुर्ण समाज अडचनीत येईल अशी भुमिका घेणे आता तरी टाळावे.

हे माझे वैयक्तिक विश्लेषन आहे, याच्याशी कुनी सहमत असावे असा अग्रह नाही. फक्त डोकं वापरावे व विचार करावा एवढी माफक अपेक्षा ठेवतो.

- मनोज नागोराव काळे, ठाणे
__________________________________

Saturday, 18 April 2020

बामसेफ - संविधानाला समाज पातळीवर उध्वस्त करण्यासाठी कार्यरत असलेली संघटना. - मनोज नागोराव काळे.


बामसेफ - संविधानाला समाज पातळीवर उध्वस्त करण्यासाठी कार्यरत असलेली संघटना.
- मनोज नागोराव काळे.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील लोकशाही कशामुळे उध्वस्त होऊ शकते हे ठामपणे मांडले आहे, बंधुत्व किती महत्वाचे आहे हे मांडले आहे, सामाजिक लोकशाही निर्माण झाली नाही तर संविधानातुन मिळालेली राजकीय लोकशाही संपुष्टात येइल असा इशारा बाबासाहेबांनी दिला आहे. आणि लोकशाही टिकवण्यासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यावर आधारित सामाजिक लोकशाही निर्माण करणे हे सर्वात मोठी देशसेवा आहे असे स्वतः बाबासाहेबांनी सांगीतले आहे.

आता आपन मुुख्य विषयाकडे वळुया, गेली जवळपास ४० वर्षांपासुन भारतात एक संघटना काम करते ती कामगारांची संघटना म्हणुन सुरु झाली, जी संघटना स्वताला सामाजिक, अराजकिय संघटन आहे असा दावा करते व बहुतेक काही अपवाद सोडला तर सर्व सरकारी कर्मचारी या संघटनेसाठी काम करत होते कालांतराने या संघटनांमधे नेतृत्व, पद प्रतिष्ठेच्या लालसेपोटी फुट पडल्या व आज अनेक शकले झालेले आपन पहात आहोत ती संघटना आहे बामसेफ.

बामसेफ ही संघटना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाला मुळातुनच उपटुन टाकण्यासाठी कार्यरत आहे असे माझे निरिक्षण आहे व ते मी आपणासमोर मांडतो आहे, आपन बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा सरनामा व बाबासाहेबांचे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आगोदर भारतातील लोकशाहीच्या भवितव्या बद्दल दिलेले २५ नोव्हेंबर १९५० चे संविधान सभेतले शेवटचे भाषण वाचले असेलच, आता आपन संविधानाचा सरनामा, बाबासाहेबांनी लोकशाही संपण्यासाठी कारणीभुत ठरण्यासाठी वर्तवलेले धोके यांच्या अनुशंगाने बामसेफची थोडी उलटतपासनी करुयात. व त्यानंतर तुम्ही स्वतःच तुमच्या निष्कर्षाला पोचाल असा मला तुमच्या बुद्धीमत्तेवर विश्वास आहे.

1) आम्ही भारताचे लोक - म्हणुन बाबासाहेबांनी संविधानाची सुरवात केली आहे, त्यात सर्व 100% भारतीय लोकांना गृहित धरलेले आहे त्यात जात, धर्म, पंथ, लिंग असा कोणताही अपवाद ठेवला गेलेला नाही, त्यातुन कुणालाही कोणत्याही द्वेशापोटी वगळले गेले नाही.
पण गेली जवळपास चाळीस वर्षांपासुन बामसेफ ही संघटना काही जातींना या देशाचे नागरिक नसल्याचा प्रचार करत आहे, ज्या समाजांना खुद्द डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे नागरिकत्व बहाल केले त्यांचे भारतीय नागरिकत्व जातीय द्वेशातुन नाकारनी हि एकमेव संघटना असावी. त्यासाठी त्यांना संविधाना पेक्षा DNA रिपोर्ट महत्वाचा वाटतो.

2) धर्मनिरपेक्षता - बाबासाहेबांनी या राष्ट्राला कोणत्याही एक विशिष्ट धर्माचे राष्ट्र ठरवण्यास विरोध होता कारण त्यामुळे देशात धार्मिक तेढ कायम राहीली असती, सर्व धर्मांना या देशाने स्विकारले आहे, पण बामसेफ हि संघटना धर्मद्वेश शिकवणारी शिबीरे, कैडर कैम्प आयोजित करते व त्यात उपस्थितांचे ब्रेनवॉशिंग करुन, हजारो वर्षा पुर्वी तुमच्यावर या समाजाने अन्याय केला आहे तुम्ही त्यांना या देशाबाहेर घालवले पाहीजे असा प्रचार करते, त्यासाठी ते स्वताला या देशाचे मुलनिवासी म्हणुन घेतात, हा मुलनिवासी शब्द संविधानात कुठेही सापडत नाही, या देशातील मुळ नागरिकांना आदिवासी म्हणुन ओळखले जाते पन बामसेफ या संघटनेने स्वताला या देशाचे आपण मुलनिवासी आहोत व ब्राह्मन विदेशी आहेत असा प्रचार करुन संविधानातील आम्ही भारताचे लोक या पहिल्या ओळीलाच निकालात काढले आहे.

3) बाबासाहेबांनी सांगीतले आहे की बंधुत्वाशिवाय स्वांतंत्र्य किंवा समता अस्तित्वात रहाणार नाही - बामसेफ या संघटनेचा बंधुत्वाशी दुरदुर पर्यंत काही संबंध दिसत नाही, हि संघटना देशात लोकशाही अासतानाही टोकाचा जातीवाद करते व जे कुनी परिवर्तनवादी यांच्या विचारांशी सहमत नसते त्यांना हे दलाल, गद्दार म्हणुन हिणवतात त्यामुळे काही लोक मजबुरी ने यांच्या जातीवादी भुमिकेला बळी पडलेले दिसतात.

4) श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य - हा अधिकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानातुन दिलेला अधिकार आहे पन बामसेफ संघटनेचे सर्व कार्यकर्ते हे प्रचंड कर्मठपने त्यांची विचारधारा मानण्यासाठी समाजाला जबरदस्ती करताना दिसते, एससी एसटी एन टी, ओबीसी या समाजातील हिंदु व्यक्तींनी त्यांच्या घरात हिंदु देव देवतांची उपासना केलेली यांना पटत नाही, हे लोक त्या लोकांना आंबेडकरद्रोही समजतात, ज्या आंबेडकरांनी श्रद्धा व उपासनेचा घटनेतुन अधिकार दिला त्याच आंबेडकरांचे नाव वापरुन सदर दलित बहुजनांवर विचार थोपवण्याचा प्रयत्न केला जातो. अन्यथा त्यांच्यावर बहिष्कार टाका असा उपाय सुचवतात, बहिष्कार हा मनुवादी संस्कृतीचा भाग आहे हे नोट केले जावे.

5) एकात्मता - भारतीय समाजात एकात्मता रहाणार नाही यासाठी हे संघटन त्यांच्या कार्यकर्त्यांकडुन जे लोक हिंदुंच्या सार्वजनिक सण उत्सवात सामिल होतात त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचे फतवे काढतात, त्यांना गद्दार म्हणुन हिनवतात, बाबासाहेबांनी सांगीतले होते की धर्म ही प्रत्येकाची आवश्यक व खाजगी बाब आहे तरीही त्यात हि संघटना हस्तक्षेप करताना दिसते.
धर्म हा वैयक्तिक आहे, आपल्या घरात आपन आपल्या धर्माचे हवे तसे पालन केले पाहीजे पन दरवाज्याची चौकट ओलांडुन जेव्हा आपन समाजात जातो तेव्हा आपले धर्म नियम न मानता आपन भारताचे नागरिक म्हणुन आपन संविधाााच्या सरनाम्यानुसार समानता व बंधुभावाने वागले पाहीजे या गोष्टीचा या संघटनेला काहीच गंध नाही.

6) विभुतीपुजा - व्यक्तीपुजा हा लोकशाहीतील सर्वात मोठा अडसर आहे असे बाबासाहेबांनी सांगुनही बामसेफने बाबासाहेबांच्या नावानेच हा सर्व खेळ मांडला आहे, बाबासाहेबांच्या नावाने हि संघटना बाबासाहेबांचेच विचारांची मोडतोड करताना दिसते.

7) डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या सर्व संघटनांची बदनामी करणे, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियांची बदनामी करने हा एककलमी कार्यक्रम गेली चाळीस वर्ष हि संघटना करत आली आहे.

8) डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा उद्देश्य होता, या देशातील जातीव्यवस्था संपवने व जातीविहीन, वर्गविहीन समाजाची निर्मिती करणे. संविधानातुन बर्याच प्रमाणात ते झालेही पन बामसेफने बाबासाहेबांच्या जाती तोडो आंदोलनाला जाती जोडो आंदोलनाने रिप्लेस केले, जाती संपवण्याचे सोडुन प्रत्येक जातीची अस्मिता जागी करुन त्यांना त्यांच्या जातीचा अभिमान बाळगायला या संघटनेने शिकवले त्यासाठी यांनी प्रत्येक जातीतील एक महापुरुष शोधुन दिला व सर्व जातींमध्ये चढाओढीची स्पर्धा लावण्यात या संघटनेला यश आले.
आज मातंग फक्त जय लहुजी बोलतो, जय आण्णा बोलतो, माळी फक्त जय सावता, जय ज्योती बोलतो, चांभार जय रविदास बोलतो, वाल्मिकी समाज जय वाल्मिकी बोलतो...अन्यायाच्या प्रतिकारासाठी तयार झालेला जय भीम शब्द फक्त बौद्धांपुरता राहीला, त्याला तेथेही जय मुलनिवासीने बदलण्याचा डाव यांनी आखला होता पन तो फारसा यशस्वी झाला नाही.
उदा. मातंगाला बौद्धाने जय भीम केला तर तो उत्तरात थोड्या चढ्या आवाजात जय आण्णा किंवा जय लहुजी बोलतो,यामुळे समाजात दुरावा होत गेलाय हे आपन पहात आहोत. समाजाची एकात्मता तोडण्यासाठी असे अनेक हातखंडे बामसेफने तयार केलेत.

9) या संघटनेत सामिल होण्याची एकच अट असते तुम्ही ब्राह्मनाचा टोकाचा द्वेश केला पाहीजे, तुम्ही शीलवान नसाल, तुम्ही चारित्र्यवान नसाल तरी चालते पन तुम्ही बामनाला चोविस तास शिव्या देऊ शकत असाल तरच या संघटनेत तुम्हाला प्रवेश आहे. यामुळे 3% वाल्यांना नको तेवढे महत्व प्राप्त झाले आहे, चाळीस वर्ष हि संघटना बामनांना शिव्या देत राहीली व बामन हळुहळु गल्ली ते दिल्ली पर्यंतची सत्ता काबीज करुन बसला, बामसेफच्या चाळीस वर्षांच्या संघटनात्मक कार्याचे हे फळ आहे. निगेटिव पब्लिसीटीचा सिद्धांत बामनांनी योग्य रित्या वापरुन घेतला.
बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या संघटनेत ब्राह्मनांना येण्यास कधीच विरोध केला नाही, त्यांचा विरोध प्रवृत्तीला होता मानसाला नव्हता ( जेधे जवळकरांची ब्राह्मनांना चळवळीत सामिल करुन घेऊ नये हि सुचना बाबासाहेबांना धुडकावुन लावली होती)

बाबासाहेब आयुष्यभर सांगत राहीले की जन्माने कुणी ब्राह्मन होत नाही कुनी दलित होत नाही तर कर्माने दलित किंवा ब्राह्मन होतो.
पन बाबासाहेबांच्या या विचारांना पायदळी तुडवत बामसेफ सर्वच्या सर्व ब्राह्मनांचा सारखा द्वेश करते व तसा प्रचारही करते यामुळे आगरकर, दाभोळकर सारखा परत कुनी एखादा ब्राह्मन समाजसुधारक देशात तयारच होणार नाही याची पुर्ण खबरदारी बामसेफ घेते.

10) धर्मांतर चळवळ - डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी Anhilation of caste जातीसंस्थेचे उच्चाटन या ग्रंथात जाती च्या निर्मुलनाचे दोन मार्ग सुचवलेत धर्मांतर व अंतरजातीय विवाह. बाबासाहेबांनी या दोन्ही मार्गांचा स्वतः अवलंब केला आहे. बाबासाहेबांनी धर्मांतर केले व हिंदु धर्म सोडुन तथागतांचा धम्म स्विकारला व बाबासाहेबांनंतर आद भैयासाहेब आंबेडकरांनीही देशभरात धर्मांतर सोहळे घेतले पन या धर्मांतर चळवळीला रोखण्यासाठी बामसेफने मुलनिवासीची संकल्पना निर्माण केली, आपन आहोत त्या जातीत राहुन फक्त ब्राह्मनांना शिव्या देऊन क्रांती करु शकतो असा भ्रम तयार केला. बामसेफ ने तथागत बुद्ध सोडुन इतर सर्व महापुरुषांना त्यांच्या बैनर व हैंडबिलावर स्थान दिले, धर्मांतर चळवळीसाठी बामसेफने कधीही कसलेही कार्य केले नाही.

11) अंतरजातिय विवाह - जातीसंस्था मोडण्याचा दुसरा जालिम उपाय हा अंतरजातीय विवाह करने हाच आहे असा विश्वास बाबासाहेबांना होता, वंशशुद्धी राहीलेली नाही व ती नसेल तर जातीनिर्मुलन सोपे जाईल असा विश्वास बाबासाहेबांना होता म्हणुन त्यांनी स्वता दुसरा विवाह ब्राह्मन मुलीशी केला व समाजाला तसे करण्यासाठी मार्ग शोधुन दिला.
बामसेफने आरएसएसच्या विवाह न करताच कार्यकरण्याचे तत्व स्विकारले व बाबासाहेबांच्या अंतरजातीय विवाहाचा फॉर्म्युला कसा फेल करता येयील यासाठी सतत प्रयत्न केले.
ब्राह्मणांच्या मुली विषकण्या असतात असा प्रचार बामसेफने केला. यांच्या सर्व प्रमुख नेत्यांनी आरएसएस चे ब्रम्हचर्य स्विकारले व बाबासाहेबांसह सर्वच आंतरजातीय विवाह करणारांची बामसेफने अत्यंत खालच्या पातळीवर बदनामी केली.

12) महिलांशी गैरवर्तणुक - ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांकडे सर्व जग सर्वश्रेष्ठ शीलवान, चारित्र्यवान, प्रज्ञावान म्हणुन पहाते त्यांच्या नावाने चालणारी ही संघटना स्वतःच्या महिला कार्यकर्त्यांशी अतिषय नीचपनाने वागते, याबद्दल त्या संघटनेत काम केलेल्या महिलांनी तसे जाहीरने सांगीतले आहे, यु ट्युबर बर वामन मेश्राम एक्सपोज टाकले तरी सर्व विडीयो दिसतात ते आपन पाहु शकता, महिलांना,मुलींनी पुर्णवेळ कार्यकर्त्या व्हा असे सांगुन त्यांना परिषदेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी सात सात दिवसासाठी यायला सांगीतले जाते, स्वतः वामन मेश्राम वर तसे अनेक आरोप आहेत. विलास खरात चा तर कल्याण स्टेशनवर महिलांनी चपलांनी सत्कार केल्याचे मी ऐकले आहे.

13) आंबेडकर कुटुंबाची बदनामी - हा बामसेफ च्या कार्यकर्त्यांचा सर्वात आवडता छंद म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. बामसेफ आंबेडकर कुटुंबाची बदनामी कसे करते त्याचे काही ठळक मुद्दे

- बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर नेहरु साठी घरात दारुच्या बाटल्या ठेवायचे असे वामन मेश्राम जाहिर सभेत सांगतात.
- भैयासाहेब आंबेडकर सभेला आल्यास दारु मागायचे
- प्रकाश आंबेडकरांच्या घरात गणपती बसवतात
- सुजात आंबेडकरांची मुंज केली आहे.

पहा बाबासाहेब ते सुजात साहेब, बाबासाहेबांसह सर्व कुटुंबातील प्रत्येकावर वामन मेश्राम ने खोटे आरोप केलेले आहेत,
- भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व आता वंचित बहुजन आघाडी यांची बदनामी करने, यांच्याबद्दल अफवा पसरवने, हा वामन मेश्राम व गैंग चा धंदा आहे.
भिडे विरुद्ध प्रकाश आंबेडकर असा राज्यभर संघर्ष पेटला होता तेव्हा सुद्धा मेश्राम व गैंग प्रकाश आंबेडकरांची बदनामी करत होते,
तेलतुंबडे विरुद्ध आरएसएस असा संघर्ष पेटलाय यावेळी ही बामसेफने तेलतुबंडेची बदनामी सुरु केली.
आंबेडकर भवन पाडले तेव्हा प्रकाश आंबेडकर विरुद्ध रत्नाकर गायकवाड व फडनविस असा संघर्ष होता त्यावेळोही बामसेफ ने प्रकाश आंबेडकरांचीच बदनामी केली होती.

14) राजकीय भुमिका - बामसेफ हे सामाजिक संघटन आहे असे ते बोलतात पन निवडणुकात यांचा पाठींबा नेहमी जातीवादी पक्षांनाच दिला आहे. मागील वर्षी घरानेशाही तुन लोकशाही ला मुक्त करण्यासाठी महाराष्ट्रात एक लोकक्रांती झाली, वंचित बहुजन आघाडीने मोठा तांडव केला, पन वामन मेश्राम नी यावेळी त्यांची राजकीय भुमिका मांडताना वंचित बहुजन आघाडी जो पक्ष बहुजनांची राजकीय गुलामी संपवणारे पर्व घडवत होते तेव्हा वामन मेश्राम ने वंचित आघाडीची बदनामी करत राष्ट्रवादी कॉंग्रेस ला जाहीर पाठींबा जाहीर केला. ज्या राष्ट्रवादी ला महाराष्ट्रातील जातीवादी पक्ष म्हणुन आंबेडकरी समाज त्यापासुन दुर रहातो.
तरीही बामसेफ त्यांनी राजकीय पाठींबा देतो हे विशेष.
15) आर्थिक गैरव्यवहार - बामसेफ या संघटनेकडे देशातील सर्वात जास्त पैसा जमा होतो, या हि संघटना कामगारांची असली तरी यांचा प्रमुख हा कामगार नाही, हि संघटना आजवर करोडो अरबो रुपये जमा करुन ती खाऊन बसली, कोणाला कोणताही हिशोब दिला गेलेला नाही, दिला जातही नाही.
बाबासाहेबांनी लोकवर्गनीतुन त्याकाळी एकट्याच्या जीवावर कॉलेज, होस्टेल, संस्था उभ्या केल्या पन बामसेफने अनगिनत पैसा गोळा करुन त्यातुन काहीही निर्माण केले नाही, सर्व पैसा खाऊन डकार सुद्धा दिला नाही.
यांच्या बद्दल त्याच संघटनेच्या काही पदाधिकार्यांनी 2015 ला बंड करुन वामन मेश्राम ची बदमाशी जनतेसमोर आनली होती पन बामन मेश्राम चे ब्रेनवॉश कार्यकर्ते मेश्राम समोर बाबासाहेबांचा अपमान सहन करतात तर बाकींचे काय?

16) सक्रिय आंबेडकरी कार्यकर्त्यांना डायवर्ट करने -
हा या संघटनेचा ठरलेला कार्यक्रम आहे, काही दिवस लक्ष ठेवले तरी कुनालाही याची प्रचिती येऊ शकते, ज्या ज्या वेळी आंबेडकरी कार्यकर्ते संघ भाजपाला एखाद्या मुद्दायवरुन घेरतात त्या त्या वेळी बामसेफ कडुन एखादा नविन मुद्दा चर्चेला आणुन सर्व कार्यकर्त्यांना संघ भाजपा च्या विरोधापासुन स्वताकडे डायवर्ट केले जाते, सक्रीय कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या बिनकामाच्या चर्चांमधे गुंतवुन ठेवुन संघ भाजपाचा रस्ता मोकळे करणे हाच एकमेव उद्देश्य असतो.

17) भारतीय लोकप्रतिनिधींसाठी बाबासाहेबांनी २२ प्रतिज्ञा दिलेल्या नाहीत, त्या प्रतिज्ञा धर्मांतरीत बौद्धांसाठी 1956 ला बाबासाहेबांनी दिल्या होत्या, त्या बौद्धांसाठी वैयक्तिक संविधानच आहेत पन प्रजासत्ताक भारताचा लोकप्रतिनिधी म्हणुन समाजात काम करत असताना संविधान हे त्यांच्यासाठी अनिवार्य असते, लोकप्रतिनिधी हा सर्व धर्म, पंथांचा सन्मान करणारा असावा असे बाबासाहेबांनी म्हटले आहे पण जर एखादा बहुजन लोकप्रतिनिधी सार्वजनिक धार्मिक सोहळ्यात, मंदिरात, एखाद्या सार्वजनिक समारंभात गेला तर बामसेफ चे कार्यकर्ते त्या नेत्याला गद्दार, आंबेडकर द्रोही ठरवतात, खरे पाहीले तर लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक जिवनात धार्मिक कट्टरवाद जोपासने हा आंबेडकरद्रोह आहे पण बामसेफ संविधानाच्या मोडमोडीची एकही संधी सोडत नाही. वरुन स्वताला बुद्धीजीवी असे बिरुद यांनी स्वता लावुन घेतलेले आहे.

मित्रांनो, भारतीय संविधान राजकिय पातळीवर भाजपा व आरएसएस संपवत आहे तर सामाजिक पातळीवर ते संपवायचे कठीन कार्य करण्यासाठी त्यांनी बामसेफ सारखी उपशाखा तयार करुन सोडलेली आहे हेच यातुन सिद्ध होते.
बाबासाहेबांचा धम्म, बाबासाहेबांचे संविधान, बाबासाहेबांची जाती अंताची चळवळ अपयशी करण्याचे सर्व प्रयत्न आंबेडकरी चळवळीचा बुरखा पांघरुन केले जात आहे,
हिरव्या गवतात हा हिरवा साप सोडला आहे, त्याला ओळखा व यांच्यापासुन सावध रहा.

बामसेफ नेहमी डॉ बाबासाहेबांचे रक्ताचे नाही तर आम्ही विचाराचे वारस आहोत असा प्रचार करत असते पन त्यांचे सर्व कार्य आंबेडकरांचे विचार गाडण्यासाठीच आहे हे सुर्यस्त्य आपणास दिसत नसले तर याच्यासारखे दुसरे दुर्दैव नाही.

- मनोज काळे,ठाणे 8169291009
____________________________

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...