Monday, 2 December 2019

महामानवाचे बोल - एकीचे महत्व

महामानवाचे बोल..."एकीचे महत्व".
- शब्दांकन - मनोज काळे.
दि. ९ मार्च १९२४ ला मुंबईमधील दामोदर हॉल या ठिकाणी
डॉ बाबाााहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात 'बहिष्कृत हितकारीनी सभा' या संघटनेची स्थापना करण्यात आली होती, आपल्या समजाला शिकवा, चेतवा व संघटना निर्माण करा या ब्रीदवाक्यासह संघटनेचे काम सुरु झाले, समाजबांधवांना सुशिक्षित करणे, त्यांना गुलाम अवस्थेची जाणीव करुन देऊन त्या गुलामगीरीतुन बाहेर पडण्यासाठी प्रेरीत केले जाऊ लागले, प्रत्येक शनिवार रविवारी विविध ठिकाणी सभा घेऊन सभासद वाढवण्याचे काम उत्साहात होत होते, ब.हि. सभेचे बहुतेक जबाबदार्या शिवतरकरांकडे असायच्या, ते सर्व जबाबदार्या चोख पार पाडतही असत, पण त्यावेळी बाबासाहेबांचे समर्थक असलेल्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवतरकरांवर खुप राग असायचा, ते नेहमी बाबासाहेबांकडे तशा तक्रारी करत असत, बाबासाहेबांना आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांमधील हि धुसफुस आवडली नाही, त्यांनी एके दिवशी कार्यालयात शिवतरकरांना विरोध करणारांना समजावुन सांगताना म्हटले " शिवतरकर हे नेहमी माझ्या सहवासात रहातात, पडेल ते संस्थेचे काम करतात, तुम्ही त्यांना विरोध का करता? मी आपल्या समाजाची सर्वांगीन प्रगती व्हावी म्हणुन कसोशीने व प्रामाणिकपने काम करनार आहे, त्यासाठी मी इतका विद्याभ्यास केलेला आहे, मी मिळवलेल्या ज्ञानशक्तीचा उपयोग मी केवळ माझे कुटुंब व माझी जात यांच्यासाठी करणार नाही, मी सर्व अस्पृश्य समाजाच्या चळवळीसाठी तिचा उपयोग करणार आहे, त्यासाठी मी अनेक योजना आखल्या आहेत, त्या सफल झाल्या तर अस्पृश्य समाज व स्पृश्य समाज यांचा फायदा होईल. अस्पृश्यांचे प्रश्न फार बिकट आहेत, अस्पृश्यांच्या समस्या म्हणजे प्रचंड हिमालय आहे, या हिमालयाशी टकरा मारुन मी माझे डोक फोडुन घेणार आहे, हिमालय कोसळला नाही तरी माझं रक्तबंबाळ डोके पाहुन सात कोटी अस्पृश्य लोक तो हिमालय जमिनदोस्त करण्यास एका पायावर तयार होतील व त्यासाठी प्राणार्पन करतील. हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवा.
आपसात जर अशी तेढ पिकवत राहीलात तर मलाच काय प्रत्यक्ष परमेश्वरालाकी याबाबत काहीही करता येणार नाही"

बाबासाहेबांच्या या भाषनाचा सर्वांवर चांगला परिणाम झाला व त्यानंतर सर्वजन शिवतरकरांशी सहकार्याने वागु लागले.

टिप - डॉ बाबासाहेब आंबेडकरांना समाजावर किती विश्वास होता हे यातुन दिसते, व आपन बेकीने राहुन बाबासाहेबांचा विश्वास मातीत मिसळत आहोत?  आपल्या समस्या वाढत आहेत पण आपन आपसातील तेढ सोडुन एक व्हायला तयार नाहीत. यावर प्रत्येकाने आत्मचिंतन करावे लागेल

क्रमशः

- शब्दांकन - मनोज काळे, ठाणे 8169291009

_____________________________________

Friday, 11 October 2019

भांडवलदारांकडुन होणारी आधुनिक अस्पृश्यता.
- मनोज काळे, ठाणे.

आज २०१९ सालामधेही मनुवाद्यांकडुन अस्पृश्यता पाळली जाते असे विधान कदाचित कुनाला सहज रुचनार नाही, तुम्ही म्हणाल की डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहीले तेव्हाच भारतातुन अस्पृश्यतेला कायदेशीर संपवले आहे, पण मी त्या अस्पृश्यतेबद्दल लिहीत नसुन आजच्या काळात माजलेल्या राजकीय अस्पृष्यतेबद्दल लिहीत आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीने ओतप्रोत असे विशाल संविधान आपल्या देशाला बहाल केले व आपन आता एका विसंगत परिस्थितीला सामोरे जात आहोत, लोकशाही टिकवायची की संपवायची हे सर्वथा या देशील बहुसंख्य लोकांच्या मानसिकतेवर अवलंबुन आहे असा इशारा सुद्धा दिला होता, आणि आज २०१९ ला आपन तो विषय चर्चेला घेत आहोत त्याचे कारण आहे अॅड प्रकाश आंबेडकरांनी सुरु केलेली वंचित बहुजन आघाडी व या लोकचळवळीतुन उभ्या राहिलेल्या सशक्त राजकीय पर्यायाकडे पहाण्याचा उच्चवर्णिय भांडवलदार, राजकीय नेते व जनतेचा दृष्टीकोन.
लोकसभा २०१९ च्या निवडणुकी पुर्वी फक्त ४० दिवस आगोदर या पक्षाचा जन्म झाला व महाराष्ट्रातील जनतेने या पक्षाचे निश्कलंक मुत्सद्दा नेतृत्व, पक्षाची प्रामाणिक भुमिका, पक्षाचा जाहिरनामा या गोष्टीना मोकळ्या मनाने स्विकारले व एक करोड च्या वरती मदतान दिले, इविएम मशीन ने चोरुन शेवटी वंचित च्या वाट्याला फक्त ४३ लाख मते शिल्लक राहीली व तेवढेच अधिकृत मदतान मिळाले असे जाहीर झाले.
*दिडशे वर्ष जुनी राजकीय परंपरा असलेला कॉंग्रेस व जवळपास शंभर वर्षाची आरएसएस चे अपत्य असलेला भाजपा या दोन पक्षांसमोर हा चाळिस दिवसाचा नवखा पक्ष सर्वात जास्त ताकदिने उभा राहु शकला याला कारण आहे कि हा पक्ष लोकचळवळीतुन व लोकनिधीतुन उभा राहिला आहे.*
तरीही फक्त या पक्षाची मनुवाद्यांकडुन बदनामी केली गेली त्याची कारणे वरवर पहाता.

१. हा पक्ष महाराष्ट्रातील जलसाठ्यांचे नियोजन करुन पुरग्रस्त भागाचे पाणी दुष्काळी भागात नेऊन दोघांचे कल्याण करणार आहे.
२. हा पक्ष देशातील सर्व निष्कलंक लोकांनी मिळुन उभा केला आहे.
३.हा पक्ष लोकशाहीला काही कुटुंबांच्या घरानेशाहीतुन मुक्त करण्यासाठी बनला.
४.हा पक्ष लोकशाहीचे सार्वत्रीकरन करणार आहे.
५.हा पक्ष सर्व जाती धर्मातील वंचितांना त्यांची लोकसंख्या न पहाता, त्यांना प्रतिनिधित्व देत आहे.
६. हा पक्ष बलाढ्य धनगर समाजाची अस्मिता जागी करतोय.
७. हा पक्ष मुस्लिमांचे राजकीय सशक्तीकरन करतोय.
८.हा पक्ष भांडवलदारांची गुलामी नाकारुन शेतकर्याच्या बाजुन लढतोय.
९ हा पक्ष केजी ते पिजी शिक्षण मोफत करणार आहे ज्यामुळे शिक्षणाला धंदा करुन बसलेल्यांना धोकादायक वाटतोय.
१०.हा पक्ष पोलिसांना राजकीय गुलामगिरीतुन मुक्त करुन त्यांना इतर नोकरदारा प्रमाणे सुविधा देणार आहे.
११.या पक्षाकडुन शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार या सर्व ज्वलंत प्रश्नाना सोडवण्याची धोरने आखले गेले आहेत.
१२.हा पक्ष बुडत चाललेल्या बैंकाना सावरनार आहे
१३ हा पक्ष अशी लोकहिताची कामे करणार आहे जी आजवर कोणत्याही राजकीय पक्षाने करायची नियत ठेवली नव्हती.

वरिल सर्व मुद्दे देशातील प्रत्येक जाती धर्माच्या नागरिकाच्या जिवन मरनाचे प्रश्न आहेत, वरील सर्व प्रश्न त्या सर्व मतदारांची आहेत ज्यांनी आजवर कॉंग्रेस व भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांना फुकट किंवा काही ठिकाणी पाचशे रुपये, दारु मटनावर मतदान दिले गेले आहे,
- आजवर शिक्षणाचे बाजीरीकरन करुन त्यातुन नफा मिळवावा यासाठी राजकीय नेते शिक्षण माफियाचे काम करत होते,
- आजवर पोलिसांना घरातील भाजीपाला आनने, घरातील कुत्र्याला शि सु करायला बाहेर नेने व मुलांना शाळेत सोडने व आनने यासाठी नेत्यांनी वापरले,
- आजवर शिक्षकांना सेवक म्हणुन वापरले गेले
- आजवर अंगनवाडी सेविकांचे शोषन केले गेलेय
- आजवर अनेकांना आर्थिक मंदिच्या नावावर नोकर्या गमवाव्या लागल्या आहेत व उच्च शिक्षित लोक बेकार राहीलेत ( मी सुद्धा)
- आजवर लोकप्रतिनिधी म्हणुन निवडुन येने म्हणजे पुढच्या सात पिढ्यांसाठी रग्गड पैसा कमावने असेच होत राहीले.
- आजवर एकाच जातीच्या माणसाच्या चार पाच पिढ्या लोकसभा, विधानसभेवर गेले व त्यांच्या जिल्हातील जनता चार पाच पिढ्या पासुन त्याच घरान्याला मत देत आले व त्याने लोकशाहीत समांतर हुकुमशाही उभी रहात गेली.
- निवडणुक फॉर्म भरायला होणारी गर्दी दाखवली गेली नाही
- लाखांच्या सभा मीडियातुन पुर्ण दुर्लक्षित केले गेले.
- टिवी चर्चासत्रात ऐंकर भाजपची बाजु मांडु लागलेत व वंचित बहुजन आघाडी बद्दल अफवा टिवी वरुन पेरल्या जात आहेत.
- आजवर सिनेमा, क्रिकेट, सिरीयल यात मतदारांना गुंतवुन त्यांना त्याची सवय लावुन, एक नशा भिनवली गेली, जनतेला राज्यकारभार व राजकीय नेत्यांच्या भानगडी कडे लक्ष द्यायला वेळच शिल्लक ठेवला नाही.

या व अशा अनेक गोष्टी राजकीय पक्षांनी कॉंग्रेस, भाजपा, सेना,  राष्ट्रवादी, मनेसे व इतर उच्चवर्णिय पक्षांनी मिळुन जनतेला आलटुन पालटुन सतत लुट केली, कॉंग्रेस भ्रष्टाचारी म्हणुन भाजपला मतदान करा, भाजप जातावादी म्हणुन कॉंग्रेस ला मतदान करा अशीच एक परंपरा या राज्यात पडली, जनेतेला जातीवाद व भ्रष्टाचार या दोन मुद्यांवर खेळवत ठेवुन या दोन मनुवादी, संघवादी, भांडवलशाही पक्षांनी ७० वर्ष महाराष्ट्राला मुर्खात काढले, आपनही *टिवी, न्युज, मिडीया जसे आपल्या मेंदुचे कंडीशनिंग करेल तसे त्यांच्या तालावर नाचु लागलो* व आपल्याला या असा भास निर्माण करुन दिला गेला की या दोनच पक्षांपैकी एकाला तुम्ही निवडले पाहीजे, तिसरा पर्याय तुमच्याकडे नाहीच, त्यामुळे सतत ७० वर्ष छ.शिवराय,छ शाहु महाराज, क्रांतीबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, अन्नाभाऊ साठे, गाडगे बाबा यांची जन्मभुमी, कर्मभुमी असलेला हा महाराष्ट्र भाजप व कॉंग्रेस या पक्षांनी पुर्णपने पोखुन टाकला आहे, या महामानवांनी या देशाला सावरले होते पन यांचे नाव हे मनामानव ज्या वेगवेगळ्या जातीत जन्मले त्या जातीत वाद पेटवुन मनुवाद्यांनी सत्ता कायम स्वतःच्या हातात ठेवली, कारण सत्ता ही सर्व प्रश्नांची गुरुकिल्ली आहे असे बाबासाहेब म्हणत होते, हि किल्ली मनुवाद्यांनी स्वताकडे कायम ठेवली.
आता २०१९ मधे वंचित बहुजन आघाडी का महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकीय पर्याय उभा असुनही जाणिवपुर्वक मीडिया मधुन या पक्षाला बदनाम केले जात आहे, या पक्षाचे अस्तित्व नाहीच अशी प्रतिमा बनवली जात आहे.
१. लोकसभेला सर्व ४८ जागांवर उच्चशिक्षित उमेदवार देणारा एकमेव पक्ष.
२.विधानसभेला सर्व २८८ जागांवर उच्चशिक्षित उमेदवार देणारा एकमेव पक्ष
३.जनता जमेल तेवढा पैसा पक्षाला जाहीर सभांमधे दान देते आहे, असा एकमेव पक्ष
४. एक रुपया न देता लाखो लोक सभांना गर्दी करतात असा एकमेव पक्ष
५.जनतेमधुन प्रत्येकजन स्वतःला जमेल ते योगदान देऊन हा पक्ष सत्तेत यावा असा प्रयत्न होतोय, असा एकमेव पक्ष.

तरीही या देशातील  (१००% )५०० इलेक्ट्रॉनिक न्युज चैनल, सर्वच्या सर्व वर्तमानपत्रे मात्र या सर्वात मोठ्या पक्षाची एकही खरी बातमी चैनल वर दाखवत नाही किंवा वर्तनान पत्र बातमी छापत नाही, ही आहे राजकीय अस्पृश्यता.
या पक्षातील नेत्यांचे वक्तव्ये मोडुन तोडुन चुकीच्या अर्थाने लोकांपर्यंत पोचवली जातात व पक्षाची बदनामी केली जात आहे.
वंचित बहुजन आघाडी या पक्षाला मदत करने म्हणजे हा पक्ष ज्या पक्षांशी लढतोय त्यांचीच मदत केल्यासारखे आहे त्यामुळे तुमचे मतदान वाया घालवु नका असा भ्रम पसरवला जात आहे.

मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही ७० वर्ष कॉंग्रेस, भाजपा,सेना ला पोसले आहे, आता तुमच्या प्रश्नासाठी लढत असलेल्या एका प्रामाणिक पक्षाची ताकद वाढत आहे ती आणखी वाढवा, मीडीया ही भांडवलदारांच्या मालकिची आहे त्यामुळे ते लोक तुमच्या हिताच्या गोष्टी कधीच तुमच्या पर्यंत पोचु देणार नाही, त्यामुळे आपन *अशा झाडांना खत पाणी देऊन वाढवु नका ज्याच्या फांदीवर तुमच्या गळ्यातील गळफासाची दोरी बांधली गेली आहे, ते झाड ( भाजपा/ कॉंग्रेस/ सेना / राष्ट्रवादी)  जर वाढले तर तुमच्याच गळ्याचा फास आवळला जाणार आहे.* त्यामुळे आपल्या जातीचाच उमेदवार असावा असा संकुचित विचार करुन आपल्याच पुढच्या पिढ्यांना हुकुमशाहीत ढकलु नका, विचार करा,

*या देशाला लोकशाही व सर्व नागरिकांना स्वातंत्र्य, बंधुता,समता, न्याय, शिक्षण देण्यासाठी हजारो वर्षानंतर एक आंबेडकरांना जन्म घ्यावा लागला होता,* त्यांनी सर्व काही कायदेशीर मिळवुन दिले पण घरानेशाहीने त्यावर मात करत ती लोकशाही बंदिस्त करुन ठेवली होती, *आता पुन्हा एक आंबेडकर आपल्याला लाभले आहेत, कृपया यावेळी आंबेडकरांची ताकद बना, आपल्या दोशाला मोठ्या अनर्थापासुन वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ला यशस्वी करा.*
भांडवलदारांकडुन होत असलेली राजकीय अस्पृश्यता आता मतदार जनतेने हानुन पाडली पाहीजे व आम्हाला टिवी मीडिया पेक्षा सोशल मिडीयावर सतत सक्रिय राहुन जागृतीचा हा वणवा घराघरात पोचवावा लागेल. सोशल मीडियाच या मनुवादी व भांडवलदारांच्या निर्मित राजकिय अस्पृश्यतेवरचा तोडगा आहे व आपन त्याचा पुरेपुर वापर करुन वंचित बहुजन आघाडी लहानात लहान बातमी, फोटो, प्रचारगीत एकुन एक मतदारापर्यंत कसे पोचवता येईल यासाठी प्रयत्न करुयात.
*आपला विजय निश्चित आहे, आपन प्रामाणिक लोक आहोत.*
- मनोज नागोराव काळे, ठाणे 8169291009

_________________________

Friday, 20 September 2019

"वंचित बहुजन आघाडीला आता रोखणे शक्य नाही.."
- संतोष आगबोटे, नांदेड

'वंचित बहुजन आघाडी' प्रचंड वेगाने सर्व पक्षांना ओव्हरटेक करत सत्तेच्या दिशेने निघालीय. आम्हास रोखण्याची कोणत्याही पक्षात धमक नाही. त्याच कारण 'वंचित बहुजन आघाडी' Intellectual honesty चं राजकारण इथल्या व्यवस्थेत उभं करू पाहात आहे. त्यासाठी त्या प्रकारचे जाणीवपूर्वक प्रयत्नही मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत.

आजपर्यंतच्या एकाही राजकीय पक्षाने लोकांच्या जीवनात अमुलाग्र परिवर्तन करण्याच्या उद्देशाने प्रामाणिक प्रयत्न केलेला दिसत नाही. मतदारांना साधन म्हणूनच वापरण्यावर या पक्षांचा भर होता.आहे.

इथल्या राजकीय पक्षांनी मानवी विकासाची संकल्पनाच पुरती बदलवून टाकली. संकुचित केली. उच्च मानवी मूल्यांच्या संवर्धन त्याच्या उत्थानासाठी नैतिक व्यवस्था निर्माण करण्याचा विचार कुणी मांडला नाही. नैतिक मूल्यांची जोपासना करणार्या परिवर्तनवादी चळवळी इथं वाढणार नाहीत. यासाठी बहुतांशी राजकीय पक्षांनी दक्षता घेतली. त्या वारंवार मोडीत काढण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला. इथं विशिष्ट विचारांभोवती राजकारण फिरवल्या जातं.

घराणेशाहीने सर्व राजकीय पक्षात आपले स्थान निश्चित केलेले आहे.

व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याकडून इथं प्रयत्न होताना दिसत नाहीत.

शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई, गरीबी, खाजगीकरण, यावर दुरगामी आणि परिणामकारक धोरण निश्चितीचा अभाव राहिलेला आहे मग ते सरकार कोणाचेही असो.

व्यापक दूरदृष्टीचा लोकहितदक्ष फ्युचर प्लान सरकार
कडे अथवा कोणत्याही राजकीय पक्षाकडे असेल अस मला वाटत नाही.

सत्ता तुमच्या ताब्यात का द्यायची याचं यथोचित उत्तर एकही राजकीय पक्ष व्यवस्थितरीत्या देऊ शकणार नाही..

परंतु या सर्वांना एक राजकीय पक्ष अपवाद आहे तो म्हणजे 'वंचित बहुजन आघाडी' होय.

एक नियोजनबद्ध प्लाॅन-आराखडा घेऊन
वेगवान गतीने 'वंचित बहुजन आघाडी' ची
सत्तेच्या दिशेने सुसाट घोडदौड चालु आहे.

व्यवस्थेने सर्वच बाबतीत वर्षानुवर्षे 'वंचित' ठेवलेल्या
सर्व घटकांना एकत्रित करणं, एका सूत्रात बांधणं हेच मुळी मोठं आव्हान होतं. ते जिकिरीचे आव्हान बाळासाहेब आंबेडकर यांनी यशस्वीपणे पेललंय.

आजघडीला मृतप्राय झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस वा काँग्रेसमध्ये लढण्याचे बळ राहिलेले नाही. सर्वार्थाने ते खचलेले आहेत. ते खेळाआधीच मैदान सोडण्याच्या तयारीला लागलेत. सेना- भाजपकडे गाय, राममंदिर, धर्म, पाकिस्तान, कलम 370, याच्या पलिकडे मुद्दे राहिलेले नाहीत.

दिलेल्या एकाही आश्वासनांची पूर्तता ते करू शकलेले नाहीत. याऊलट नोटबंदी, जिएसटी, यासारख्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार्या बाबी त्यांनी घडवून आणल्या.

परके असणार्या इंग्रजांना देशाचं जितकं वाटोळे करता आले नाही ते या सरकारने करून दाखवले.

वरून विविधतेतही एकतेने नांदणार्या देशातील वेगवेगळ्या समुहांत असुरक्षिततेचं-अविश्वास- भीती संशयाचे वातावरण निर्माण करण्याचं श्रेय या विद्यमान सरकारलाचं जातं. सार्वभौम देशाला विघटीत करायला निघालेले हे सरकार आहे.

विद्यार्थी, शेतकरी, मजूर, शेत मजूर, कामगार, नोकरदार वर्ग, व्यापारी यासह कोणता वर्ग यासरकारच्या धोरणामुळे त्रस्त नाही ते सांगा !

परंतु वंचित बहुजन आघाडीने सर्व वर्गांच्या कल्याणाचा बारकाईने अभ्यास करून अजेंडा बनवलेला आहे.

'संविधानाचे धोरण हेच वंचित बहुजन आघाडीचे तोरण असेल..'

EVM च्या भरवशावर भाजप विसंबून आहे. बॅलेट पेपर वर निवडणूक होऊद्या भाजप हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही.

'वंचित बहुजन आघाडी'ला आता कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. अगदी सत्ताधारी धर्मांध सेना-भाजपही नाही.  पण अट एकच लढाई ही प्रामाणिकपणे व्हावी..

-संतोष आगबोटे, नांदेड.
संपर्क- 9527626968

Friday, 2 August 2019

मनसे राष्ट्रवादीचा मोर्चा म्हणजे "सोन्याचा खंजीर"
- मनोज नागोराव काळे







काल दि.२ ऑगस्ट २०१९,रोजी मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी एका मोर्चाची घोषना केली आहे, तो मोर्चा इविएम मशीन विरुद्ध असल्याचे त्यांचे म्हणने आहे. पण हा मोर्चा म्हणजे सोन्याचा खंजीर आहे व तो ज्यांना फक्त सोन्याचा आहे म्हणुन छातीत खुपसुन घ्यावा वाटतोय त्यांनी खुशाल खुपसुन घ्यावे, राजकीय आकलनशक्तीचा अभाव व वैचारिक दारिद्र ज्यांच्या डोक्यात भरलेले आहे तेच काही लोक या मोर्चाच्या ढोंगाला बळी पडुन त्या मोर्चात सामिल होतील असा मला ठाम विश्वास आहे.

या मोर्चाला सोन्याचा खंजीर बोलन्यामागे त्या मोर्चाचे म्होरके कोन आहेत व त्यांची आजवरच्या राजकारणातील भुमिका काय होत्या हे पाहिले की प्रत्येकाला या मोर्चामागील ढोंग कळायला वेळ लागनार नाही.

EVM मशीन चा मुद्दा राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसे सारख्या जातीवादी पक्षांना अचानक महत्वाचा वाटु लागला याचे कारणे उघड उघड आहेत

१) वंचित बहुजन आघाडी ने इविएम मशीन विरुद्ध पुकारलेला निर्धारपुर्वक न्यायालयीन लढा.
२) वंचित बहुजन आघाडी ची वाढती लोकप्रियता
३) मनसेच्या नेत्यांचे सेनेत व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भाजप प्रवेश
४) अॅड. प्रकाश आंबेडकरांभोवती एकवटलेला बहुजन समाज
५) धनगर, मुस्लिम, ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी, मातंग समाजाची लोकसंख्या व वंचित बहुजन आघाडी मधुन या सर्व समाजांना मिळत असलेले प्रतिनिधित्व.
६) पुरोगामी विचारांनी प्रस्थापितांना चारलेली राजकीय धुळ
७) बैलेट पेपर वर निवडणुका झाल्यास त्याचे या लढाच्या मुळ नायक असलेल्या आंबेडकरांना श्रेय मिळु न देण्याची कपटी भावना
८) मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे लोकशाहीवादी आहेत असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न.
९)  वंचित बहुजन आघाडी काबीज करत असलेली राजकीय स्पेस ब्रेक करण्याचे षडयंत्र
१०) मोदी विरोधकांना वंचित बहुजन आघाडी शिवाय इतरही उच्चवर्णिय पक्षाचे पर्याय आहेत हे निम जातीयवादी लोकांवर ठसवण्याचे प्रयत्न.

माझ्या जागृत बहुजन मतदारांनो,
       वरील काही प्रमुख कारणांमुळे मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेसने इविएम विरुद्ध मोर्चा काढत असल्याचे ढोंग करताना आपल्याला दिसत आहेत, थोडा विचार करुन पहा कि आजवर सतत उघड जातीयवादी भुमिका घेणारे राज ठाकरे, जे  कायम हुकुमशाही च्या समर्थक व लोकशाहीचे विरोधक असलेल्या बाळ ठाकरेंना गुरु किंवा सर्वस्व मानतात, त्यांना अचानक लोकशाहीचा पुळका कसा काय आला? ,राज ठाकरे लोकशाही मानतात तर मग स्वतः निवडणुका का लढत नाहीत? तेही सोडा, जो माणुस चैत्यभुमीपासुन हाकेच्या अंतरावर रहात असुन जन्मात कधी  चैत्यभुमीवर दर्शनाला गेला नाही, कारण त्यांच्यात ठासुन भरलेला लोकशाही व बाबासाहेबाप्रतीचा त्यांचा द्वेश ते करु देत नाही, हेच लोकशाही समर्थक बनलेले राज ठाकरे ऐट्रोसिटी ऐक्ट रद्द करावा असे बिनधास्त बोलतात व तशी मागणी करतात, हेच राज ठाकरे आरक्षण रद्द करावे अशी मागणी करतात व ते आज तुम्हाला लोकशाहीवादी वाटु लागले, हे तुम्हाला पटले तरी कसे? इतकी आपली बुद्धी बालिश बनलिय का? आपन आपलीच नव्याने निर्माण झालेली राजकीय ताकद अशा भामट्यांच्या ढोंगापुढे झुकवणार आहोत का?

आंबेडकरी विचारातुन कोणापुढे लोटांगन न घालता, स्वाभिमानाने सत्ता मिळवता येते हे जेव्हा बाळासाहेब आंबेडकर सिद्ध करुन दाखवत आहेत तेव्हा अनेक जातीवाद्यांना पुतना मावशीचा पान्हा फुटला आहे व त्यांना आता लोकशाही वर जिव जडल्याचा दिखावा करने भाग पडले आहे.

याच मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजव व सेनेला सक्षम व अनुभवी उमेदवार सप्लाय केले आहेत, गेल्या महिनाभरात पन्नास एक लोक तिकडे गेलेत व  काही बोटावर मोजन्या इतके लोक यांच्याकडे शिल्लक राहीलेत, आजनर बहुजनांना, आंबेडकरी समाजाला ज्या पक्षांनी वंचित ठेवले त्यांना वंचित बहुजन आघाडीने लाचार स्थितीत आणुन उभे केले असताना या राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसे ला भक्कम करण्यासाठी कोण कोण पुढे सरसावले आहेत त्यांची नावे पहा एकदा सुषमा आंधारे, जोगेंद्र कवाडे, सुरेश माने, वामन मेश्राम ( मुलनिवासींचा म्होरक्या). आजवर हे लोक आंबेडकरी राजकारण अपयशी का होते यावरुन प्रकाश आंबेडकरांवर टिका करत होते पन आज प्रकाश आंबेडकरांनी सर्व प्रतिगामींनी गुडघ्यावर आणले असताना हेच बांडगुळ नेते प्रस्थिपित पक्षांची डागडुजी करुन त्यांना पुन्हा सक्षम करण्यासाठी झटताना आपन पहात आहोत व ती गद्दारी करत असताना बहुजनांच्या एकमेव लोकनेते बाळासाहेब आंबेडकरांवर खोटे आरोप करुन त्यांची बदनाम  करण्याचे प्रयत्नही करत आहेत, जनता त्यांच्या खोट्या प्रचारांना आता बळी पडताना दिसत नाही याचे खुप समाधान वाटत आहे.
  काल एका अर्धवटरावाने सोशल मिडीयावर पोस्ट लिहीली की "प्रकाश आंबेडकरींनी या मोर्चाला पाठींबा द्यायला पाहीजे",
 यांना हे माहीत नाही की प्रकाश आंबेडकरांनी इविएम विरुद्ध घंटानाद आंदोलन करुन सर्व महाराष्ट्राच्या प्रशासनाला जागे केले, इविएम काऊंटींग मधील फरक हा विषय न्यायालयिन प्रक्रियेत आणले, दिल्लीत जाऊन निवडणुक आयोगावर दबाव आनला तेव्हा कुठे निवडणुक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आम्ही काही सांगीतले तर आमच्या जिवाला धोका आहे असे जाहीरपने जगासमोर सांगीतले आहे, त्यामुळे आम्ही वाजवलेल्या घंटानादाने जागे झालेल्यांनी आम्हाला धडे शिकवु नयेत, ज्यांना तो सोन्याचा खंजीर खुपसुन घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा पन प्रकाश आंबेडकरांना राजकीय सल्ले देण्याआधी जरा अभ्यास करावा. बहुजन समाजाची राजकीय गुलामगीरी संपवणार्या आंबेडकरांसोबत प्रत्येक लोकशाहीवादी समाजघटक जुडतो आहे, प्रत्येक राजकीय पक्षातुन लोकशाहीवादी लोक वंचित बहुजन आघाडीत येत आहेत व हुकुमशाही व घरानेशाहीवाले नेते भाजपात जात आहेत, हकुकुमशाही व लोकशाही या दोन्ही ठिकानी ध्रुवीकरन होत आहे, आता लढाई सरळ व थेट आहे त्यामुळे कोणत्याही अपप्रचाराला बळी पडु नये, ढोंगी व जातीवादी लोकांच्या गोंडस शब्दांना बळी पडुन स्वताचा राजकीय घात करुन घेऊ नये असे मला वाटते.

जय वंचित,  जय संविधान

- मनोज नागोराव काळे  8169291009
____________________________


Friday, 10 May 2019

वंचीतांचा एल्गार महताब होवो...

वंचीतांचा एल्गार महताब होवो...   

-राजेंद्र पातोडे, प्रदेश प्रवक्ता 

गेली अनेक वर्षे  महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर “ अकोला पॅटर्न “ जन्माला घालनारे एड. बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचीत बहुजन आघाडीच्या निम्मीतीने डिप्रेस/ सप्रेस क्लासेसच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.आज साहेबांचा वाढदिवस आहे. हा दिवस राज्यभरात स्वाभिमान दिन म्हणून साजरा केला जातो.ह्या दिवसाला एड. बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकीय सामाजिक कार्यकर्तृत्वाचा ओझरता आढावा घेणे संयुक्तिक ठरेल.बाळासाहेब आणि त्यांची चळवळ ही प्रबंधाचा विषय आहे, त्यामुळे केलेली मांडणी ओझरती आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे. 


 अशी झाली सुरुवात ... 


 १९८० साली सामाजिक क्षेत्रातून कार्यकर्ता  म्हणून सुरुवात करणा-या बाळासाहेबांचा जन्म १० मे १९५४ चा आहे.त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सेंट सँटेनिस लेंस हायस्कुल मुंबई मध्ये तर उच्च शिक्षण सिद्धार्थ महाविद्यालयात  झाले.आपल्या आजोबांच्या नावावर वारस म्हणून येणा-या नेतेपणाच्या तकलादू बाबी टाळून एक कार्यकर्ता म्हणून मला चळवळ करण्याचा अधिकार आहे, असे ठरवून सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी सुरूवात केली. १९८२ साली मुंबईत बहिष्कृत हितकारीणी सभेच्या सुवर्ण महोत्सव मेळाव्यात त्यांनी सम्यक समाज आंदोलन स्थापन झाल्याची घोषणा केली.बाबासाहेबानी आपल्या राजकीय सामाजिक जीवनाची सुरुवात बहिष्कृत हितकारीणी सभेपासून केली होती.बाळासाहेबांनी बहिष्कृत हितकारीणी सभेच्या सुवर्ण महोत्सव मेळाव्यात आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. इतिहासाला कलाटणी देणारा हा दिवस ठरला.


बाबासाहेबांचा शेडूलड कास्ट फेडरेशन पक्ष नुसता दलीतांचा नव्हे तर सर्व भारतीयांचा असावा म्हणून बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली.त्यांचे हयातीत पक्ष स्थापन होऊ शकला नाही.त्यांचे महापरिनिर्वाणा नंतर स्थापन झालेला पक्ष पुन्हा एक जातीय आणि एककल्ली ठरला होता.नेतृत्वाचे वाद, अनेक गटाचा उदय आणि १९७० च्या दशकात उदयास आलेले दलित पँथरचे वादळ १९७७ साली शमले होते.त्यातही १९७७ साली  'भारतीय दलित पँथर' निर्माण झाले.परंतु समाजाला एकसंघ पक्ष नव्हता , नेतृत्व उभे झाले नव्हते.बाळासाहेबांनी सम्यक समाज आंदोलनाचे माध्यमातून २ मार्च १९८३ रोजी नाशिक मधून स्त्रियांचे प्रश्न, भूमिहीन शेतकरी शेतमजुरांच्या साठी मुंबई विधान भवनावर पायी मोर्चा काढला.मराठवाडा विषयापीठाचे नामांतर झाले पाहिजे.वाढत्या महागाईला विरोध, भूमिहीन शेतमजुरांना पडक्या जमिनी देण्यात याव्यात,नवबौद्ध आणि आदिवासींना सवलती देण्यात याव्यात ह्या मोर्च्याच्या मागण्या, दादासाहेब गाईकवाडांच्या भूमिहानाच्या लढ्याची आठवण करून देणारे आंदोलन होते.ह्यातून आंबेडकरी चळवळीने एकजातीय राजकारणातून मुक्त होऊन सर्वसमावेशक प्रश्नावर लढण्याची सुरुवात केली.


शेकाफे व रिपब्लीकन पुढा-यांनी पक्ष आणि स्वतःचे नेतृत्व काँग्रेसच्या दावणीला बांधले होते. त्या मुळे महाराष्ट्रात जातीय अन्याय अत्याचारांनी उचल खाल्ली होती.प्रभावहीन झालेल्या चळवळीला उभारी देण्यासाठी बाळासाईब आंबेडकरांनी  २७ नोव्हेंबर १९८३ रोजी सिद्ध्यर्थ विहार वडाळा येथे काही समविचारी मंडळींना निमंत्रित करून बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचा निर्णयावर सखोल चर्चा केली.आणि ६ मी १९८४ साली पूणे येथील नानापेठेतील अहिल्याश्रम येथे अधिवेशन बोलाविले.ह्याच अधिवेशनात भारतीय रिपब्लिकन पक्ष ह्या राजकीय पक्षाची बांधणी केली.ह्या अधिवेशनाचे वैशिष्टय म्हणजे ह्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान मिनाबाई गायकवाड ह्यांनी भूषविले होते.सम्यक समाज आंदोलन ते भारतीय रिपब्लिकन पक्ष हे आवर्तन पूर्ण झाले होते. 

१९८३ मध्ये त्यांनी शेतक-याचा गायरान जमिनीचा लढा उभा केला.वसंत दादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी गायरान जमिनीसाठी मोर्चा काढला.हे मोर्चे आंदोलन सुरु होते, भुमिहीनांचे मोर्चे काढल्याने १४ एप्रिल १९९० साली सुधाकरराव नाईक मंत्री मंडळाने गायरान जमिनीचा शासन निर्णय बाळासाहेबांचे नावाने काढला आणि गायरान जमिनी मिळण्याचा प्रश्न मार्गी लागला, भूमिहीनाना जमिनीचे पट्टे मिळाले. 

 


 अकोला जिल्ह्याचा ऋणानुबंध  –


१४ ऑगस्ट १९८० ला विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे नातू एड. बाळासाहेब आंबेडकरांचे अकोल्यातील सर्किट हाऊस येथे प्रथमच आगमन झाले होते. कृष्णा इंगळे व एक रेल्वे कर्मचारी त्यांचे सोबत होते.नगर परिषद येथे आयोजित बाळासाहेबांचा कार्यक्रम काही कारणास्तव रद्द झाला होता.ही बातमी अकोल्यातील तत्कालीन नेतृत्व दिनबंधू गुरुजी, केरुबुवा गायकवाड ह्यांचे कार्यकर्ते लंकेश्वर गुरुजी, गुणवंतराव पाटील,पी. आर. महाजन,शत्रुघन मुंडे, कृष्णराव मोहोड, यादवराव पाटील व भाऊसाहेब इंगळे ह्यांना समजली.बाबासाहेबांचे नातू अकोला जिल्ह्यातून सभा न होता परत जाणे ही आपल्या जिल्ह्यासाठी नामुष्कीची बाब आहे, हे हेरून त्या सर्व कार्यकर्त्यानी दुपारी बाळासाहेबांची भेट घेतली.रात्री ८ वाजता अकोट फैल येथे सभेची निश्चिती झाली.तत्पूर्वी सायंकाळी सहा वाजता भीम नगर येथे तत्कालीन जुने पुढारी शंकरराव खंडारे ह्यांचे घरी बाळासाहेबाना नेण्यात आले.साक्षात बाबासाहेबांचे नातूच मोहोल्यात आल्याने बाळासाहेबांना पहायला तोब्बा गर्दी झाली.प्रत्येकाला ह्या तरण्याबांड आंबेडकरां मध्ये बाबासाहेबच दिसत होते.भारावलेली जनता डोळे भरून हे प्रतिरूप पाहत होते.त्यांच्या पाया पडत होती, त्यांना स्पर्श करत होती, त्यांच्या पायाची माती कपाळावर लावत होती.सर्व आसमंत भारवला होता.ह्या प्रचंड गर्दीत पहिली सभाच भीमनगर मध्ये पार पडली.अर्थातच त्या नंतर रात्री ८ वाजताची नियोजित सभा भारतीय बौद्ध वाचनालय अकोट फैल येथे प्रचंड गर्दीत संपन्न झाली.

दरम्यान अकोला जिल्ह्याला भारावून टाकणारा एक प्रसंग घडला होता तो अगदी पहिल्याच धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यात.ह्या पहिल्या सोहळ्यात मीराताई आंबेडकर ह्या भाषणासाठी उभ्या राहिल्या ,त्यांनी सांगितल की “ बाबासाहेबांनी आपल्या हयातीत जे काही कमवलं ते सर्व समाजाला देवून टाकलं, माझ्या कडे बाबासाहेबांनी कमाविलेल्या संपत्तीचे काहीही नाही.परंतु आज समाज आंबेडकर कुटुंबांकडे प्रचंड आशेने पाहतो,माझ्या कडे बाबासाहेबांची संपती नसली तरी माझ्या कडे बाबासाहेबांचा नातू आहे आणि तो मी आज समाजाच्या ओटीत टाकते ....” सभा स्तब्ध झाली, मीराताईंच्या भाषणाने उपस्थित समूहाच्या काळजाचा वेध घेतला. जनतेच्या डोळ्यात अश्रू तराळले.टाळ्यांचा कडकडाटात बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा स्विकार केला गेला.आणि नेता, पक्ष, संघटना फिनिक्स पक्षा प्रमाणे झेपावली.पुढच्या काळात ’बहुजन सारे एक होवू सत्ता आपल्या हाती घेऊ ‘हा नारा देत सत्ताबाह्य समूहाला सत्ताधारी होण्याचा राजमार्ग प्रशस्त करणा-या ‘अकोला पॅटर्नने’ जन्म घेतला. महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटा वरील अनेक प्रस्थापितांना सत्तेतून बेदखल केले.आणि बहुजनांची सत्ता प्रस्थापित केली.ह्यात अनेक ज्ञात अज्ञात कार्यकर्ते पदाधिकारी ह्यांचे मोलाचे योगदान आणि आंबेडकर कुटुंबाची ३८ बहुमुल्य वर्ष आहेत हे विसरता येणे शक्य नाही.

या प्रसंगा नंतर बाळासाहेबांशी जुळलेल्या कार्यकर्त्यानी लगेच दोन महिन्यात बाळासाहेबांची सभा ११ ऑक्टोबर १९८० रोजी अकोट येथील खरेदी विक्री संघाच्या पटांगणावर घेतली.त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला.त्या मुळे वातावरण निर्मिती झाली.भारावलेले कार्यकर्ते संपूर्ण ताकदीने कामाला लागले आणि खिशात पैसा, साधने, मोटर वाहने किंवा साधा लाऊडस्पिकरची सोय नसताना केवळ चळवळ मोठी झाली पाहिजे ह्या ध्यासाने खेडोपाडी, वस्त्यांमध्ये सायकलवर फिरत अकोला जिल्हा बांधू लागले, गाजवू लागले.

तसा अकोला जिल्हा चळवळीचा बालेकिल्लाच होता..डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा भारताच्या सामाजिक राजकिय क्षितिजावर नेतृत्व उदय झाल्यानंतर त्यांचे पाठीशी हा जिल्हा प्रचंड ताकदीने उभा झाला.आंबेडकरी चळवळीतील कलापथके,गीतकार, शाहीर, जलसे, कलापथके, धंडारी,भजनी मंडळानी जागृतीचा वणवा सतत पेटत ठेवला होता.शेड्यूल कास्ट फेडरेशनचे व-हाड प्रांतिकचे ९ व १० डिसेंबर १९४५ ला बाबासाहेबांच्या उपस्थितीत अकोल्यात भरले होते.भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, शेकाफे चे कार्य मोठ्या गतीने सुरु होते.भय्यासाहेब आंबेडकरांनी देखील पाच वेळा ह्या जिल्ह्याचा दौरा केला होता.तसेच रिपब्लिकन पक्षाच्या प्रेसिडीयमची पहिली बैठक देखील २८,२९ व ३० डिसेंबर १९५७ साली अकोल्यातच संपन्न झाली होती.बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्विकाराच्या आवाहना नुसार १००% बौद्ध धम्म स्वीकारणारा जिल्हा अकोलाच आहे.१९०१ सालच्या जनगणनेत एकही बौद्ध धर्मीयांची नोंद नसलेल्या अकोला (वाशीम संयुक्त) जिल्ह्यात १९५६ ला धम्म स्वीकाराच्या नंतर १९६१ च्या जनगणनेत दोन लाख बेचाळीस हजार चारशे चौसष्ट बौद्ध धर्मीयांची संख्या नोंदविण्यात आली होती.एवढी प्रचंड आंबेडकरी निष्ठा असलेला जिल्ह्या म्हणून अकोल्याचा लौकिक होता.त्या मुळे हे तरूण आंबेडकर पहिल्याच दिवशी नेते म्हणून स्विकारले गेले.भारतीय बौद्ध महासभेचे कार्य व महाउपासिका मीराताई आंबेडकर व बाळासाहेबांचा राबता ह्या जिल्ह्यात वाढविण्यात तत्कालीन पदाधिकारी कार्यकर्ते यशस्वी झाले.


भारिपचे विलीनीकरण .. 


१९८५ साली त्यांनी ऊस उत्पादक शेतका-या साठी पूणे ते माणगाव लॉंगमार्च काढला.साखर कारखाने केंद्रबिंदू न धरता ऊस उत्पादक शेतकरी केंद्रस्थानी असावा ही मुख्य मागणी होती.ह्या आंदोलनामुळे शेतक-यांना उसाला योग्य भाव मिळाला आणि साखर कारखान्यातील राखीव जागा भरल्या गेल्या. 

महाराष्ट्रातील विखुरलेल्या बहुजन समाजाला एकत्र करून एक प्रचंड मोठी राजकीय शक्ती निर्माण करण्यासाठी १९९० साली अकोला जिल्हा निवडला.१९९० साली मूर्तिजापूर विधानसभेत अपक्ष उभे असलेल्या मखराम पवारांना पाठिंबा देऊन निवडून आणले.हा बहुजन समाजाच्या विजयाचा मानदंड ठरला."बहुजन सारे एक होऊ सत्ता आपल्या हाती घेवू" हा नारा बुलंद झाला.पवारांच्या विजया मुळे प्रस्थापित व्यवस्थेला पराभूत करता येते हे आत्मभान बहुजन समाजाला प्राप्त झाले.२३ ऑगस्ट १९९० साली अकोला शहरातील प्रमिलाताई ओक हॉल येथे बहुजन समाजातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता.बहुजन समाजाचे स्वतंत्र संघटन उभे करणे हा त्या मागील मूळ उद्देश.ह्या मेळाव्यात "अकोला जिल्हा बहुजन समाज महासंघाची" स्थापना झाली, याच अधिवेशनात अकोला जिल्हा बहुजन समाज महासंघ हा भारिप सोबत राजकीय आणि सामाजिक वाटचाल करेल हे ठरविण्यात आले.

त्यातूनच बहुजनांच्या सत्तेचा स्वबळाचा मार्ग यशस्वी करणारा 'अकोला पॅटर्न' जन्माला आला.हाच बाबासाहेबानी अपेक्षिलेला रिपब्लीकन पक्ष होता. 

बहुजन महासंघाच्या स्थापने नंतर भारिप बहुजन महासंघाच्या विलीनीकरणाचा पहिला एपिसोड पार पडला तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथील अधिवेशनात.२१ मार्च १९९३ साली शेगांव येथे बहुजन महासंघाचे अधिवेशन मखराम अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.ह्या अधिवेशनाला  बाळासाहेब आंबेडकर उद्घाटक होते.प्रमुख पाहुणे म्हणून सिने कलावंन्त निळू फुले आणि राम नगरकर प्रामुख्याने उपस्थित होते.ह्याच अधिवेशनात भारिप आणि बहुजन महासंघाचे विलीनीकरण झाले.हे दलितांच्या राजकीय सामाजिक चळवळीचे दुसरे आवर्तन नव्या आयामाला जन्म देत होते. एकजातीय, एक धार्मीय राजकीय कूस त्याने मोडून निघाली.

भारिप बहुजन महासंघाच्या उदयाचे पहिल्या टप्यात बाळासाहेबांचे नेतृत्वातील भारिप बमसंने आपला पहिला आमदार नांदेड जिल्ह्यातील किनवट मध्ये भीमराव केराम ह्यांचे रुपाने निवडून आणला.आणि बघता बघता बहुजनाना सत्तेची दालने बाळासाहेबांनी उघडी करून दिली.ह्या नंतर महाराष्ट्रात झंझावात निर्माण केला.त्यातून अनेक लहान लहान घटकांना विविध ठिकाणी सत्तेची पदे मिळालीत.विविध आंदोलने आणि मोर्चे ह्यांनी तो काळ प्रचंड गाजला होता.त्यात खो घातला तो शरद पवारांनी, भारिप बमसंचा पहिला आमदार फोडण्या पासून ते सत्तेतील भारिप बमसंचे मंत्री फोडण्याचे काम पवारासोबत काँग्रेसने केले. त्या वेळी बाळासाहेबांनी दिलेले भाषण शरद पवारांना मोठा धडा होता, " तुम्ही माझे मंत्री आमदार पळवू शकता, परंतु जनता नाही ".हे वाक्य प्रचंड आश्वासक होते. मराठवाडा विध्यापीठाचे नामांतर असो की रिडल्स बाळासाहेबांनी कधीही शरद पवारांवर किंवा काँग्रेसवर विश्वास ठेवला नाही. 


वंचित प्रयोगाचे दूरगामी परिणाम ... 

आताच्या लोकसभा निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडी ही राजकीय चमत्कार आहे.२४ मार्च २०१९ रोजी नोंदणी झालेला पक्ष राज्यात ४८ जागा स्वबळावर उभ्या करून लढतो काय आणि कुणीही स्पर्धेत धरत नसताना अल्पावधीत राज्यात प्रस्थापित पक्षांचा विरोधात तिसरा सक्षम पर्याय निर्माण होतो काय, सर्वच अनाकलीय आहे.प्रस्थापित राजकीय घराणी आणि पक्ष व नेत्याच्या उरात धडकी घडविणारी ताकद बाळासाहेबांनी वंचीत बहुजन आघाडीच्या रूपाने उभी केली आहे.सर्व बहुजन समाजाने देखील हा पक्ष आणि नेता स्वीकारला आहे.त्यामुळे आता खरे लोकशाहीचे विकेंद्रीकरण होऊन सत्ता वंचीताचा उत्कर्ष होईल. बाळासाहेबांचे नेतृत्वात लोकसभेच्या ह्या दमदार प्रदर्शना नंतर विधानसभेत वंचीतचे ४० प्लस आमदार असतील ह्यात मला कसलीच शंका नाही. 

बहुजनांच्या राजकीय सामाजिक चळवळीचा वेलू लोकसभा आणि विधानसभेच्या मांडवावर नेणा-या बहुजन नायक एड बाळासाहेब आंबेडकरांना वाढदिवसा निमित मंगल कामना.       

              

राजेंद्र पातोडे

(प्रदेश प्रवक्ता) 

वंचीत बहुजन आघाडी 

महाराष्ट्र प्रदेश 

९४२२१६०१०१

Tuesday, 7 May 2019

वंचितांच्या राजकारणाचा सर्वव्यापी अवकाश: अँड.बाळासाहेब आंबेडकर

वंचितांच्या राजकारणाचा सर्वव्यापी अवकाश: अँड.बाळासाहेब आंबेडकर 

डॉं.बाबासाहेब आंबेडकर हयात असेपर्यंत दलित समाजात त्यांच्या तोडीचं राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक समज असणारं सर्वव्यापी नेतृत्व उभं राहू शकलं नाही. शेवटी शेवटी बाबासाहेबांना ही जाणीव फार छळायची. इतक्या कष्टाने इथवर आणलेला हा गाडा पुढे घेवून जाणारा कुणी द्रष्टा कार्यकर्ता आसपास दिसत नव्हता. म्हणून किमानपक्षी मागे तरी घेवून जावू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. झालेही तसेच. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर देशात कुळ कायद्याची चर्चा होत होती. तेंव्हा कसेल त्याची जमीन पण नसेल त्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित करत दादासाहेब गायकवाड यांनी उभारलेली भूमिहीनांची चळवळ वगळता देशाच्या राजकारणाला रिपब्लिकन नेतृत्वाची दखल घ्यायला भाग पाडणाऱ्या व्यापक चळवळी आणि सर्वव्यापी नेतृत्व उभे राहिले नाही. त्या नंतरचे बहुतांश आंबेडकरी राजकारण भावनिक आणि अस्मितेच्या मुद्द्याभोवती फिरत राहिले. मधल्या काळात दलित पँथरने देशभरात झंझावात निर्माण केला होता. दलितांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराला प्रखर विरोध करत सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेविरुद्ध मोठे बंड पुकारले होते. ती त्या काळाला दिलेली प्रतिक्रिया होती. दशकभराच्या आतच तीही संपुष्टात आली. त्यानंतर तब्बल १६ वर्षं नामांतराचे आंदोलन चालले. त्यात आंबेडकरी तरुणांची जवळ जवळ एक पिढी खर्ची पडली. मराठवाड्यासह महाराष्ट्रभरातील संपूर्ण दलित समाज अक्षरशः होरपळून निघाला. त्याचे फलित काय? तर फक्त नामाविस्तार ! त्यानंतर सामाजिक चळवळी मंदावत गेल्या आणि हळूहळू दलित चळवळींमधली दाहकता देखील कमी होत गेली.


या संबंध पार्श्वभूमीवर अँड.बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व आकार घेत होते. डॉं. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून आयत्या वंशाचे राजकारण त्यांना खेळता आले असते. पण तसे न करता आधी त्यांनी स्वतःतल्या नेतृत्व गुणांचा विकास केला. बाबासाहेबांप्रमाणे कायद्याचे पंडित आणि घटनेचे जाणकार बनले. इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या ज्ञानशाखांसोबतच भाषा- साहित्य- संस्कृती – धर्म – जात - वर्ग -वर्ण- लिंग यांचा खोलवर अभ्यास केला. राजकारणाआधी समाजकारण सुरु केलं. इ.स. १९८३ च्या ६ दिवसाच्या लॉंगमार्चने  आंदोलनाला सुरवात केली. अस्मिता आणि भावनिकतेचं राजकारण नाकारून रिडल्स, गायरान जमीनी, शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी व्यवस्थापन, भ्रष्टाचार असे भौतिक प्रश्न घेऊन व्यापक चळवळ उभारण्याचा प्रयत्न केला. त्यांचं राजकारण केवळ दलीतांपुरतं मर्यादित नाही. शेतकरी, शेतमजूर, कामगार, आदिवासी ,ओबीसी ,भटके विमुक्त, अल्पसंख्य, स्त्रिया या सर्व घटकांना सोबत घेवून शोषित वंचितांची एक मोठी मोट बांधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु प्रस्थापित राजकारण्यांनी गेल्या साठ वर्षात जे राजकारण उभं केलं आहे त्याचा सांगाडा लोकशाहीचा असला तरी आत्मा जातशाही-धर्मशाही आणि भांडवलशाहीचा आहे. त्यामुळे भारतीय लोकांच्या मनात अजूनही लोकशाही रुजू शकली नाही. राजकारणाचे सगळे ठोकताळे जातीने बांधले जातात. आज जातीव्यवस्था ही राजकारणाची गरज बनलेली आहे. अशावेळी बाळासाहेब आंबेडकर जातीअंताचा अजेंडा घेवून जातीनिरपेक्ष राजकारण करत असतील तर त्यांच्या पाठीमागे नेमकी कोणती जनता उभी राहणार आहे हा खरा प्रश्न आहे. आरक्षणाने बुर्ज्वा बनलेला आंबेडकरी मध्यमवर्ग त्यांच्या पाठीमागे येणार नाही. कारण अनुसूचित जातीअंतर्ग आरक्षणाची वर्गवारी ते अजिबात मान्य करत नाहीत आणि बाळासाहेब नेमके त्यालाच सहमती दर्शवित आहेत. अशावेळी रीपब्लीकनचे छोटे छोटे तुकडे वाटून घेवून त्यावर पोट जाळणारी मंडळी या गोष्टीचं भांडवल करणार नाहीत तर नवलच! दुसरीकडे अनुसूचित जातीतील नव बौद्धेतर जाती बऱ्यापैकी त्यांच्या त्यांच्या जातीतील नेतृवाखाली उभ्या आहेत. तसाच प्रकार एसटी, एनटी, ओबीसी प्रवर्गातील सगळ्या जातींमध्ये आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससारख्या पक्षांनी याधीच प्रत्येक जातीत आपापलं नेतृत्व पेरून ठेवलं आहे. भाजप देखील आता तिच नीती अवलंबतो आहे. कारण त्यांना पक्कं ठाउक आहे, कि जातशाही आणि भांडवलशाही एकत्र आल्यावर मतदार बाहेर जात नाही. भावनिक आणि आर्थिक दृष्ट्या त्यांना बांधून ठेवता येतं. त्यामुळेच भौतिक प्रश्नांची लढाई लढणारे राजकारणी इथं निवडून येणं आणि प्रस्थापित होणं ही अत्यंत दुरापास्त गोष्ट बनलेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांचं सर्वसमावेशक लोकशाहीवादी राजकारण समजून घेणारा आणि अमलात आणणारा सुजाण वर्ग कितीसा आहे ? मराठा क्रांती मोर्चावेळी दलितांना प्रतीमोर्चे काढू नका असं म्हटल्याने त्यांचं कौतुक करणारे मराठे आज त्यांच्या पाठीमागे उभे राहतील का हाही प्रश्नच आहे.

भारतातल्या शोषण व्यवस्थेची मूळं बाळासाहेबांना पक्की ठाऊक आहेत. संघाने पेरलेल्या हिंदुत्ववादाच्या विषाची फळं आज भाजपच्या रूपाने भारतीय राजकारणाला लगडलेली आहेत. भाजपाने देशाला पाच वर्षात पन्नास वर्ष मागे नेले. अजून पाच वर्ष मिळाली तर देशाचा सिरीया झाल्याशिवाय राहणार नाही. तेंव्हा हे विष लवकरात लवकर नष्ट केलं पाहिजे. पण गेल्या नव्वद वर्षापासून सातत्याने पसरणारं हे विष असं अचानक नष्ट करणं एकट्या दुकट्या पक्षाचं काम नाही. त्यासाठी थोडेफार सेक्युलर थोडेफार लोकशाहीवादी असलेल्या सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. पण उजव्या पक्षांची नीती हिंदुत्ववाद नष्ट करणे नसून हिंदुत्ववाद्यांच्या हातातील सत्ता मिळवणे एवढीच आहे. त्यामुळे हिंदुत्ववादाला विरोध हे त्यांचे साधन राहिले आहे, साध्य नव्हे. सत्तेसाठी ते हिंदुत्ववाद्यांनाही विनाशर्त पाठींबा देवू शकतात हे आपण मागे अनुभवलेच आहे. सत्तेसाठी थुका चाटणाऱ्या या मत्सुद्यांचा काही भरोसा नसतो. ते कधीही पलटी मारू शकतात. बाळासाहेब मत्सुद्दी राजकारणी नाही, तर अभ्यासू राजकारणी आहेत. त्याहीपेक्षा अधिक विचारवंत आहेत. सामाजिक न्याय व मानवी अधिकारांसाठी लढा उभारणारे ते लढवय्ये नेते आहेत. तेच खरे बाबासाहेबांच्या सर्वव्यापी विचारांचे, बौद्धिक गुणांचे वारसदार आहेत. बाबासाहेबांचा गाडा पुढे घेवून जाण्याची क्षमता केवळ त्यांच्यात दिसते आहे. आज या देशातली लोकशाही आणि संविधान फार मोठ्या संकटात आहे. आपण त्यांच्या मागे सर्व ताकदीनिशी उभे राहिलो नाही तर नवी पेशवाई येण्यास उशीर लागणार नाही.  

बाळासाहेबांचा अजेंडाच शोषणाचं,विषमतेचं मूळ असणाऱ्या हिंदुत्ववादाच्या विरोधात आहे. देशाला हिंदुत्ववादाच्या जोखडातून मुक्त करणारं हे एकमेव नेतृत्व आहे. भिमाकोरेगावच्या दंगलीनंतर त्यांनी जाहीरपणे घेतलेल्या हिंदुत्ववाद्यांच्या विरोधी भूमिकेमुळे संघ भाजप प्रचंड खवळले आहे. त्यांना नक्षलवाद्यांचे समर्थक ठरवून बदनाम करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. हिंसेने हिंसा वाढते, नक्षलवादाचं मूळ असणारी व्यवस्था नष्ट करा, नक्षलवाद आपोआप नष्ट होईल असं म्हणणं नक्षलवादाचं समर्थन ठरतं काय ? यावर आरएसएस ही दहशतवादी संघटना आहे, भाजप ही त्या दहशतवादी संघटनेची शाखा आहे. त्यामुळे भाजप समर्थक तो दहशतवादाचा समर्थक ठरतो असा युक्तिवाद करता येतो. पण उलट मागे काही मूर्ख दलित ब्राम्हणवाद्यांनी आनंद तेलतुंबडे, मिलिंद तेलतुंबडे आणि बाळासाहेब आंबेडकर यांचे नाते जोडणारे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून त्याचा नक्षलवादाशी संबंध जोडला होता. हे असले प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्याला ताबडतोब उत्तर देणे गरजेचे आहे. बाळासाहेबांकडे पूर्णवेळ कार्यकर्ते नाहीत. त्यांना पोसण्यासाठी सहकारी साखर कारखाने, दुध डेर्या, बँका नाहीत. आर्थिक रसद पुरवणारे व्यापारीही नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांना पगार देणे, सभांसाठी लाखो रुपये खर्च करणे त्यांना शक्य होत नाही. आपल्याकडे पैसा नाही पण बाबासाहेब आहेत, ज्ञानाची, विचारांची श्रीमंती आहे, शिक्षण आहे, लढाऊ बाणा आहे, व्यवस्थेला अंगावर घेण्याची ताकद आहे. ही सर्व ताकद आज बाळासाहेबांच्या पाठी उभी करणं ही आपलीच नव्हे तर लोकशाहीची गरज आहे.  

प्रा.सुदाम राठोड


साभार - मित्रवर्य Sudam Rathod

Friday, 19 April 2019

साध्वी प्रज्ञा सिंग म्हणजेच भाजपाचा खरा चेहरा

मालेगाव बॉंबस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रद्न्यासिंग ठाकुर  ला खासदारकीचं तिकिट देऊन RSS आणि भाजपाने हे सिद्ध केलय कि भाजपा हा पक्ष आपल्या देशा साठी किती घातक आहे . ही सामान्य बाब अजिबात नाही . हा शहिद हेमंत करकरे आणि त्यांच्या संपुर्ण टीमचा अपमान आहे असे म्हणायला हरकत नाही . 


         विचार करण्यासारखी गोष्ट आहे कि , मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणी तब्बेतीच कारण दाखऊन  जामिनावर बाहेर असलेली आणि आतंकवादी कृत्यात प्रत्यक्ष सहभाग असलेली व्यक्ती खासदारकीच्या निवडणुकीला उभी राहते . ही बाबच मुळी भयंकर आहे . इतक्या मोठ्या हत्याकांडाची आरोपी आणि इतके वर्षे जेलमध्ये राहिलेल्या व्यक्तिच समर्थन करणारा भाजप पक्षाची काय विचारधारा असु शकते हे वेगळ सांगायला नकोय . नथुराम ज्यांचे वंशज आहेत , त्यांच्याकडुन वेगळ्या काय अपेक्षा करणार . उद्या आसाराम बापु सारखे लिंगपिसाट आणि दळभद्री लोक तुरुंगातुन जामिनावार बाहेर आल्यावर निवडणुकीला उभे राहिले व अश्यांच्या समर्थनार्थ जनता रस्त्यावर उतरली तर आश्चर्य वाटण्याचं अजिबात कारण नाही . 


       मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणाचा सत्य खुलासा असलेले " हु किल्ड करकरे ? " आणि शहीद करकरेंच्या सुविद्य पत्नी स्मृतीशेष करकरे मॅड्म ह्यांनी लिहिलेले " द लास्ट बुलेट " हे पुस्तक वाचल्यावर डोक ठिकाणावर राहात नाही. किती अमानवीय पद्धतीने कट करुन हा हमला केला गेला .. आणि नियोजनबद्ध रित्या करकरे, कामठे आणी साळसकर ह्याना मारण्यात आले . ह्याचे हसन मुश्रीफ ह्या तत्कालिन पोलीस अधिकार्याने केलेल भाष्य अगदी जबरदस्त आहे . कॉ. गोविंद पानसरे ह्यान्नी कोल्हापुरमध्ये ह्याच विषयावर जेव्हा मुश्रीफांचा कार्यक्रम आयोजीत केला .. त्यांच्या नंतर त्याना खुनाच्या धमक्या RSS वाल्यांकडुन आल्या आणि नंतर त्यांची नियोजनबद्ध हत्या झाली . 


       हार्दिक पटेल सारख्या ओबीसी कुणबी पाटीलला कोर्ट निवडणुकीत अर्ज भरु देत नाही .. ज्याच्यावर कोणताही मनुष्यवधाचा गुन्हा नाही आणि ज्यांच्यावर गुन्हा आहे .. त्यांना परवानगी दिली जाते . हे अगदी अकल्पित आहे . आम्ही नेमके कुठ जात आहोत ह्याच भान सुद्धा आम्हाला नाहीये . जनता जनार्दन १००-५०० रुपयाच्या आहारी जाऊन, खोट्या राष्ट्रप्रेमवर विश्वास ठेउन तोंडाला कुलुप लावुन बसली आहे . 


        करकरे हे संपुर्ण टिमसह मालेगाव बॉंबस्फोटातील ह्या हिंदुआतंकवाद्यांना लॅपटॉपसहित अटक करुन त्यांच्यावर आरोप सिद्ध करणार होते व शिक्षा होणार होती . मात्र ह्या अगोदरच त्यांचा गेम केला गेला . नासिकच्या तुरुंगात असताना RSS चा भागवत करकरेंना भेटायला गेला . मात्र करकरे खरा देशभक्त होता . जिवाशी गेला . 


      साध्वी बोलत आहे की करकरेला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली . साध्वी जे बोलतेय .. ती तीची विचारधारा आहे . करकरे हे बहुजन होते . साध्वी ही RSS ची कट्टर कार्यकर्ता अर्थात मनुवादाची आणि हिंदुराष्ट्र संकल्पनेची सक्रिय समर्थक ! ह्यांना देश्यात हिंदुराष्ट्राच्या नावाखाली ब्राह्मणांची संपुर्ण सत्ता व्यवस्था आणायची आहे . त्यात ते जवळ जवळ ९५% यशस्वी झालेले आहेत. संविधान संपऊन मनुस्मृतीवर आधारीत ब्राह्मणराष्ट्र अर्थात हिंदुराष्ट्र ! ह्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे कालपरवाला कोणतीही परिक्षा न देता केंद्रात सचिव पदावर  झालेल्या नऊ ब्राह्मणवाद्यांची  एकजात निवड होय . 


        ब्राह्मणादी सवर्णान्ना शिक्षा देण्याचा अधिकार ओबीसी , एससी ,  एसटी ला नाही .. म्हणुन सुप्रिम कोर्टात आजही सगळेच एकजात ब्राह्मण आहे . हे आहे हिंदुराष्ट्र ! ब्राह्मणराष्ट्र म्हटल्यास ह्यांना कुत्र पण विचाराणार नाही , म्हणुन हिंदुच्या आड आम्हाला अधिकारवंचित ठेवण्याच ब्राह्मणांच खुप मोठ षडयंत्र यशस्वी होताना दिसत आहे .


        जो ब्राह्मणाला शिक्षा देईल .. त्याला मृत्युदंडाची शिक्षा मनुस्मृतीत आहे. हाच प्रकार छत्रपती संभाजी महाराजांबरोबर ब्राह्मणांनी घडवला होता .. कारण त्यांनी मोरोपंत पिंगळे .. आण्णाजी दत्तो आणि राहुजी सोमनाथ ह्या तिघा ब्राह्मणान्ना शिवरायांच्या हत्येच्या गुन्ह्यात रायगडावर हत्तीच्या पायी देऊन देहदंडाची शिक्षा दिली होती . संभाजी महाराज शुद्र होते आणि मनुस्मृतीत शुद्राला ब्राह्मणाला शिक्षा देण्याचा अधिकार सपशेल नाकारते . हा इतिहास आहे . 


       ब्राह्मण फक्त आमच्यावर अन्याय करण्याची फक्त पद्धत बदलतो .. मुळ विचारधारा कधीच बदलत नाही . त्यांना मनुस्मृतीवर आधारीत व्यवस्था आजही निर्माण करायची आहे . म्हणुन हा सर्व EVM चा घोटाळा सुरु आहे . साध्वी तीची मुळ ब्राह्मणी विचारधारा बोलत आहे आणि आमचे उपटसुंभ अंधभक्त त्याचे समर्थन करत आहे . ह्याचा अर्थ आम्हीच आमच्या हातानी आमच्या पायावर कुऱ्हाड मारुन घेत आहोत. 


     प्रतिक्रांतीसाठी तयार रहा ! 

Sunday, 14 April 2019

रोग, रोगी आणि डॉक्टर - मनोज काळे,ठाणे.

रोग, रोगी आणि डॉक्टर - मनोज काळे,ठाणे.


एखाद्याच्या रोगाचे जोवर निदान होत नाही तोवर त्यावर इलाज करणे कोणत्याही डॉक्टराला शक्य नसते, त्यामुळे सर्वात पहिला टप्पा असतो रोग काय आहे हे शोधण्याचा, त्यानंतर त्या रोगाची कारणे तपासुन त्यानुसार त्यावर औषध दिले की तो रोग निश्चितपने बरा होतो, हे झाले आजच्या व्यवहारातील सत्य.


1) या सत्याचा शोध अडीच हजार वर्षांपुर्वी तथागत सम्यक संबुद्धांनी घेतला होता, मानव प्राणी दुःखी आहे हे तथागतांनी जानले, दुखाचे अस्तित्व मान्य केले व त्याची कारणे शोधली ( चार आर्य सत्य)  त्यातुन कायमची मुक्ती मिळवण्याचा मार्गही सांगीतला ( आर्य आष्टांगिक मार्ग) . व त्या मार्गाने जाऊन आजपर्यंत हजारो वर्षापासुन लोक दुखमुक्त होत आहेत.


2) त्यानंतर छ.शिवाजी महाराजांनी तोच फॉर्मुला वापरला, आपन बहुसंख्य असुन मोगलांचे गुलाम का आहोत याचा महाराजांनी शोध घेतला, त्यांच्या लक्षात आले की चातुर्वर्णामुळे या देशाचे करे रक्षक असलेल्या सर्व लढाऊ जातीच्या लोकांच्या हातातुन धार्मिक बंधने घालुन शस्र काढुन घेतली गेली आहेत व त्यांना जाती पातीत विभागुन त्यांच्यात फुट पाडुन त्यांच्यावर राज्य केले जात आहे, या मनुवादी काव्याला ओळखुन महाराजांनी यावर उपाय केला की सर्व बारा बलुतेदार व अठरा अलुतेदारांना एकत्र करुन, त्यांच्यावर ब्राह्मनी व्यवस्थेने लादलेली गुलामी हटवु  सर्वांना स्वराज्याचे सैनिक बनवले व मुठभर सैन्याने मोघलांना जेरीस आनत स्वराज्य मिळवले. पुढे शिवशाही ला घातपाताने संपवणार्या पेशव्यांनाही भिमा कोरेगावात यात स्वाभिमानी लढाऊ अलुतेदार बलुतेदारांनी संपवले हा जाज्वल्य इतिहास आहे.


3) डॉ बाबासाहेब आंबेडकरांनीही अलुतेदार बलुतेदार समाज हा येथील व्यवस्थेने बहिष्कृत ठरवला आहे हे मान्य केले व त्या बहिष्कृत रोगापासुन मुक्ती मिळवण्यासाठी बहिष्कृत भारत नावाचे पाक्षिक सुरु केले, नंतर सामाजिक संघटना स्थापन केली त्याचे नावही 'बहिष्कृत हितकारीनी सभा' ठेवल्याचे आपनास माहीत असेल. त्याअंतर्गत लढा दिला गेला.


4) आता 2019 ला आपन स्वतंत्र आहोत, आपन लोकशाही असलेल्या देशात जगतोय पन 70 वर्ष लोकशाही येऊनही या देशातील तळागाळापर्यंत ती पोचु दिली गेली नाही, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क, अधिकार दिले पन त्यापासुन आज 85% लोक वंचित ठेवले गेले, त्यामुळे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या काळातील रोगाचे निदान अगदी अचुक केले व वंचित हा शब्द अधोरेखित करत त्याची कारणे शोधली, आज प्रजासत्ताक भारतात लोकशाहीचे सामाजिकीकरन न होऊ देण्यात 169 घराणे जबाबदार आहेत हे त्यांच्या निदर्शनास आले, व या घराण्यांनी कैद करुन ठेवलेल्या लोकशाही ला मुक्त करण्यासाठी अठरा अलुतेदार व बारा बलुतेदारांना एकत्र करुन "पुन्हा स्वराज्य" म्हणत वंचित बहुजन आघाडी या लोकचळवळीला जन्म दिला. 


आज आपन पहात आहोत की वंचित बहुजन आघाडी ला जनतेने स्विकारले, लहान मुलांनी खाऊच्या पैशापासुन काही बापांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी ठेवलेला पैसा दान दिला, काहीं बायांनी गळ्यातील मंगळसुत्र दान केले. सर्व जनतेने या आघाडी च्या प्रामाणिक भुमिकेला डोक्यावर घेतले व आज सारा महाराष्ट्र संविधानाच्या रक्षणासाठी एकवटला आहे, सर्व 169 घराण्यांचा देशाला लागलेला रोग संपलाच पाहीजे यासाठी जो तो आपापल्या परीने कष्ट घेत आहे, कुनी लेख लिहीत आहे, कुनी पोस्टर बनवत आहे, कुनी दारोदार फिरुन लोकांना समजावत आहे तर कोन गाडी घर दारावर स्टिकर्स लावुन हे औषध समाजाला वाटत आहे.


"गुलामाला त्याच्या गुलामीची जानीव करुन द्या तो आपोआप बंड करुन उठेल" असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, त्यांनी ते औषध देऊन एका मोठ्या समाजा बहिष्कृतातुन स्विकृत करुन घेतले, तेच महान कार्य आज आद. बाळासाहेब आंबेडकर करत आहेत, त्यांनीही धनगर, ओबीसी,भटके विमुक्त, मुस्लिम, होलार, चांभार, मातंग व इतर सर्वच्या सर्व जातींना गुलामीची जानीव करुन देण्यात यश मिळवले आहे, प्रत्येकजन आता या लोकचळवळीच्या ऐतिहासिक कार्यात आपापले योगदान देताना दिसत आहे. कुनीही आता बघ्याची भुमिका घेत नाही, प्रत्येक जन काही ना काही योगदान द्यायचा प्रयत्न करत आहे हे अतिषय क्रांतीकारी काम आहे. आपल्या समाजाचे एकमेव डॉक्टर  बाळासाहेब पुर्ण प्रयत्न करत आहेत चला आपनही त्यांना समाजाचा इलाज करुन लोकशाही ला घराणेशाहीच्या रोगातुन मुक्त करुन एक सशक्त लोकशाही निर्माण करण्यात मदत करुयात.


भिक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची.

माझ्या खाली कुनी नाही, माझ्या वरती कुनी नाही, आम्ही सर्व समान आहोत.


- मनोज नागोराव काळे, 8169291009

Thursday, 11 April 2019

भाजपने केला अकोल्यातील कुणब्यांचा घात- सुमित वासनिक

भाजपने केला अकोल्यातील कुणब्यांचा घात- सुमित वासनिक

अकोला लोकसभा मतदारसंघात कुणबी नेते भाजपचे भाऊसाहेब फुंडकर सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. पण 1998 सालि निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर भाजपने अकोल्यात कुणबी समाजाला हळू हळू राजकारणातुन हद्दपार करण्याचा डाव खेळायला सुरुवात केली. लोकसभेला पराभव झाल्यानंतर 2004 मध्ये पुन्हा भाजप कडुन निवडून यायची संधी होती तेंव्हा भाजपने भाऊसाहेबांचं तिकीट कापलं आणि संजय धोत्रे यांना उभं केलं. भाऊसाहेबांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्यानंतरही भाजपने जाणीवपूर्वक भाऊसाहेबांना उमेदवारी नाकारून संजय धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळेस भाऊसाहेब संसदेत गेले असतेतर केंद्रीय मंत्री झाले असते हे ओळखूनच अकोल्यातील सहकार लॉबीने आपले वजन वापरून भाऊसाहेबांचं तिकीट कापायला लावले होते असे आजही जिल्ह्यातील जुने जाणकार सांगतात. भाऊसाहेब फुंडकरांच्या जागी संजय धोत्रे खासदार झाल्यावर धोत्रेंनि अकोल्यातील कुणबी नेते संपविण्याचा सपाटाच सुरू केला. भाऊसाहेब फुंडकरांच्या नंतर 2004 मध्ये भाजप कडुन आमदार असलेले नारायण गव्हाणकर यांना राजकारणातुन संपविण्याचा नवीन डाव भाजपने आणि खासदार संजय धोत्रेंनि आखला होता.


2004 ते 2009 मध्ये बाळापूर मतदारसंघातून आमदार असलेले भाजपचे नारायणराव गव्हाणकर यांना पाडण्यासाठी 2009 मध्ये त्यांच्या विरोधात मराठा समाजातील अपक्ष उमेदवार उभे करण्यात आले होते. हे अपक्ष उमेदवार संजय धोत्रे यांनीच उभे केले होते हे कोणापासूनही लपलेले नाही. मराठा अपक्ष उमेदवारांचा परीणाम असा झाला की गव्हाणकरांना अपेक्षीत असलेले मतदान मिळालं नाही आणि यामुळे गव्हाणकारांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 2009 मधील निवडणुकि पासूनच नारायण गव्हाणकारांना राजकारणातुन संपवायची कसरत सुरू झाली होती. ज्या पक्षाला कुणबी समाजाने वाढविले त्याच पक्षाने जिल्ह्यातून कुणबी नेतृत्व संपविण्याचे काम केले. भाजप मध्ये खासदार संजय धोत्रें कडुन होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून गव्हाणकारांना भाजप सोडावी लागली होती. भाजप सोडून काँग्रेस मध्ये गेलेल्या गव्हाणकरांना आश्वासन देऊनही 2014 मध्ये लोकसभेचि उमेदवारी नाकारण्यात आली होती. गव्हाणकारांना उमेदवारी नाकारून काँग्रेसनेही कुणब्यांची अवहेलनाच केली होती. गव्हाणकर आता पुन्हा भाजप मध्ये आले आहेत पण खासदार धोत्रें कडुन त्यांना त्रास देणे अजूनही थांबलेले नाही. जिल्ह्यात भाजपमध्ये कोणताही कुणबी नेता मोठा होऊ नये असे संजय धोत्रेंना वाटते म्हणून ते जिल्ह्यात कुणबी नेत्यांचे पंख छाटण्याचे काम विना थांबता करत असतात असे ठाम मत अकोल्यातील कुणबी समाजाचे झाले आहे.


ज्या भाजप पक्षाला जिल्ह्यात आपण उभे केले त्याच पक्षातून आपल्यावरच अन्याय करण्यात येत असल्याची भावना अकोल्यातील कुणबी समाज बांधवांमध्ये वाढीस लागली आहे. ज्याने जिल्ह्यातून आपले नेतृत्व संपविले त्याला यावेळी निवडणुकीत पाडून आपण धडा शिकवला पाहिजे असे कुणबी युवक उघडपणे बोलत आहेत.

एकंदरीत म्हणायचे तर संजय धोत्रे यांनी भाजपमध्ये पूर्ण जिल्ह्यात इतर कोणासही मोठं न होऊ देण्याचा जो कार्यक्रम चालविला त्याचे परिणाम त्यांना या निवडणुकीत भोगावे लागतील असे दिसते आहे.

Sunday, 7 April 2019

प्रस्थापितांना वंचित बहुजन आघाडीची एवढी धास्ती का वाटते? - सुमित वासनिक

प्रस्थापितांना वंचित बहुजन आघाडीची एवढी धास्ती का वाटते? -  सुमित वासनिक

ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ओबीसी, भटक्या आणि इतर अनेक जाती सोबत आल्या आहेत. हजारो वर्षे आपले शोषण झाल्यावर स्वातंत्र्योत्तर काळातही प्रस्थापित पक्षांनी आपले शोषण संपविले नाही, उलट आपल्या मतांवर निवडून येऊन प्रस्थापित पक्षांनीही आपले शोषणच केले आहे अशी भावना आता या सर्व वंचित जातींमध्ये वाढीस लागलेली आहे. सत्तेतील आपला वाटा मिळावा, आपल्यालाही प्रतिनिधित्व मिळावं या हेतूने हे सर्व जातीसमूह एक झालेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 48 च्या 48 जागांवर प्रस्थापितांसमोर दंड थोपटून उभे झालेत.

वंचित बहुजन आघाडीच्या या झंझावाताला पूर्ण महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे. आघाडीला मिळत असलेला हा प्रतिसाद पाहून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शीवसेना या पक्षांनी आणि स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या काही पत्रकारांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात गरळ ओकणे सुरू केलेले आहे. यासर्वांचा एककलमी कार्यक्रम झालेला आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या एकाही उमेदवारास विजयी न होऊ देणे. या लोकांनि वंचित बहुजन आघाडीचा एवढा धसका का घेतला आहे? ज्यांना हजारो वर्षे वंचित ठेवण्यात आले आहे त्यांच्यापैकी एकही जण संसदेत पोहचावा असे यांना का वाटत नाही? हे वंचितांचा विरोध का करतायत?

 वरील प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या जागा निवडून आल्यावर राजकारणात  काय फरक पडेल हे समजून घेतले पाहिजे. आघाडीच्या जागा निवडून आल्यास महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील वंचित जातींमध्ये एक विश्वास निर्माण होईल तो म्हणजे आपल्या सारख्या वंचित जातींनी मिळून प्रस्थापितांना आव्हान दिल्यास आपण या प्रस्थापितांना हरवू शकतो. आपल्या जवळ कोणतेही  संसाधन नसलेतरि, पैसे नसलेतरी आपण या जातीयवादी धनदांडग्यांना हरवून सत्ता मिळवू शकतो. हा विश्वास , ही भावना एकदा का वंचितांच्या डोक्यात घट्ट बसली की देशातील सर्व वंचित आपआपल्या राज्यात एक होतील आणि महाराष्ट्रा प्रमाणे प्रस्थापितांच्या समोर आव्हान उभे करतील. वंचितांच्या एकत्र शक्तीने प्रत्येक राज्यात प्रस्थापितांची सत्ता , प्रस्थापितांचे वर्चस्व संपुष्टात येईल. यासोबतच फक्त लोकसहभागाने कमी पैश्यात निवडणुका जिंकता येतात हे सुद्धा समाजमनावर आपोआप बिंबविले जाईल, यामुळे भारतातील निवडणुकांना धनदांडग्यांच्या कचाट्यातून मुक्तता मिळेल. पैश्या अभावी निवडणुकांपासून दूर राहणारे वंचित आत्मविश्वासाने निवडणुका लढवायला लागतील. एकदा का हा बदल झाला की भारतातील राजकारणावर असलेली सवर्णांची एकाधिकारशाही संपुष्टात येईल आणि पूर्ण देशात वंचितांच्या राजकारणाचे नवे पर्व सुरू होईल. प्रस्थापित पक्षांना नेमके हेच नको आहे. 

महाराष्ट्रात येत्या सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. लोकसभेत वंचित बहुजन आघाडीच्या काही जागा निवडून आल्यास  महाराष्ट्रातील वंचित जातींमध्ये जो आत्मविश्वास आणि सत्तेची ओढ निर्माण होईल त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेला आघाडीच्या कमीतकमी 60-70 जागा स्वबळावर निवडून येतील. वंचित बहुजन आघाडीच्या 50च्या वर जागा निवडून आल्यातर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा वंचित समूहातून असेल. प्रस्थापित पक्षांना याच बदलाची धास्ती लागलेली आहे. याच कारणातून काँग्रेसने वंचितांसोबत युति केली नाही, याच कारणाने वंचित बहुजन आघाडिला बदनाम करायचा प्रयत्न केल्या जात आहे. 

वंचित बहुजन आघाडिला मिळत असलेला अतिप्रचंड पाठिंबा पाहून देशातील अनेक राज्यांमधून ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांना वंचितांचा हा पॅटर्न त्यांच्या राज्यातही राबविण्यासाठी बोलविणे सुरू झाले आहे , यावरूनच लक्षात घ्या वंचित बहुजन आघाडी देशातील राजकारणात वंचितांचे स्थान निर्माण करणार आहे याची चाहूल प्रस्थापितांना लागलेली आहे. त्यामुळेच प्रस्थापित आणि त्यांचे दलाल असलेले पुरोगामी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते बिथरले आहेत. मित्रांनो वंचित बहुजन आघाडीच्या जागा निवडून आणा आणि या बिथरलेल्या प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून द्या. तुम्ही दिलेलं मत हे वंचित समूहांच्या येणाऱ्या पिढ्यांचे वंचितपण दूर करेल हे लक्षात ठेवा.

Wednesday, 3 April 2019

......सेम बाबासाहेबच - मनोज काळे, ठाणे

......सेम बाबासाहेबच

- मनोज काळे, ठाणे


फुरोगामी पनाचा बुरखा पांघरलेले नकली लोकशाहीवादी लोक गोपिचंद पडळकरांच्या वंचित बहुजन आघाडीतील  सहभागाबद्दल जराही तारतम्य न बाळगता, जराही विचार न करता द्वेश, राग व तिरस्कार व्यक्त करताना दिसले, तेव्हा याचा मी विचार केला व मला काय जानवले ते वाचा,

काही काळ भाजपा पक्षात काम केलेल्या गोपीचंद पडळकर या धनगर समाजाच्या एक अतिषय लोकप्रिय, हुशार नेत्याने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला, वंचित बहुजन आघाडी चा कणा बनलेल्या धनगर समाजाचे ते एक अतिषय भक्कम नेते आहेत, धनगर आरक्षणावरुन त्यांचा भाजपाशी वाद झाला व त्यांनी वैचारिक मतभेदातुन भाजपा सोडली व इतर धनगर नेत्यांप्रमाणे बाळासाहेबांचे नेतृत्व स्विकारले. आता असे भरकटलेले तरुन जर मनुवादी संस्कृती व घरानेशाहीची मुजोरी लक्षात आल्यास त्यापासुन दुर जाऊन आंबेडकरी चळवळीत येऊन  मनुवादी संस्कृतीशी लढुन त्यांच्या भुतकाळातील चुकांचे प्रायश्चित करणार असतील तर आपण त्यांना का स्विकारु नये? त्यासाठी आपन बाबासाहेबांच्या जीवनातील एक प्रसंग आठवुन पाहु.


बाळासाहेबांंना पाहुन ग भीम परतुन आल्यासारख वाटतय...हे गीत आपन रोज ऐकतोय पन बाळासाहेब खरोखरच बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकुन हा चळवळीचा रथ पुढे चालवत आहेत हे आपनास पटेल.

ज्यावेळी बाबासाहेबांना भारतातील अस्पृश्यांना ब्राह्मणी धर्माच्या जाचातुन मुक्त करण्याचे पहीले चवदार तळ्याचे आंदोलन छेडले होते त्यावेळी काही ब्राह्मणांच्या विरोधात काम करणारे लोकही त्यांचे काम करत होते, त्यांच्या संघटना कार्यरत होत्या त्यापैकि एक होते प्रसिद्ध *जेधे जवळकर ,या दोघांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहुन सुचना केली होती की "आंबेडकर साहेब, तुम्ही जे अस्पृश्यता निवारनाचे काम करत आहात ते अतिषय मोलाचे आहे, आम्ही पन तुमच्या कार्यात सहभाग घेऊ इच्छितो पन अट आहे की आपल्या संघटनेत एकाही ब्राह्मणाला घेऊ नये"*


डॉ बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड लोकशाहीवादी होते, *बाबासाहेबांनी जेधे जवळकरांची ती कट्टरवादी मागणी फेटाळुन लावली  इतकेच नव्हे तर चवदार तळे मुक्तीच्या त्या आंदोलनात चित्रे, टिपनीस, सहस्त्रबुद्धे यांना बाबासाहेबांनी पुढाकार दिला, त्यांच्याच हातुन मनुस्मृतीचे दहन करुन घेतले*


आता आपन बाळासाहेबांनी सुरु केलेल्या वंचित बहुजन आघाडी या लोकचळवळीकडे पाहुयात, आज संविधान विरोधी विरुद्ध संविधान समर्थक अशी राजकीय लढाई होत आहे, त्या चळवळीचे नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर करत आहेत, त्यामुळे संविधानाच्या रक्षणाचा मुद्दा आजवर ज्या ज्या लोकांना महत्वाचा, जिव्हाळ्याचा वाटतो त्यांनी बाळासाहेबांचे नेतृत्व माणुन काम करण्याची तयारी दाखवली आहे, ही मोठी क्रांतीकारी घटना आहे, आपनही अशा *भरकटलेल्या पण आता आंबेडकरी वादळ पाहुन जागृत झालेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्यात सामावुन घेऊन आपली संविधान रक्षणाची लढाई लढले पाहीजे.*


राजगृहाकडे चला चा नारा देत असताना जे लोक राजगृहाकडे येत आहेत त्यांचे खुल्या दिलाने स्वागत केले पाहीजे, बाबासाहेबांनी जी लोकशाही आपनास दिली ती तशीच आपन ती जपायची आहे व ती वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातुन तळागाळापर्यंत पोचवायची आहे, 

बाबासाहेबांच्या चवदार तळ्याच्या आंदोलनातुन आपल्या अस्पृश्यतेला वाचा फुटली व त्या अस्पृश्यतेला संविधानाने कायद्याने समाप्तच केले. 


संविधानाने आपल्याला उन्नतीसाठी लोकशाही दिली, पन लोकशाही घरानेशाहीने कैद केली, त्या कैदेतुन लोकशाहीला मुक्त करण्यासाठी मोठ्या व्यापक भावनेतुन वंचित बहुजन आघाडी निर्माण झाली आहे, चवदार तळ्याच्या आंदोलना प्रमाणेच 2019 ची वंचित बहुजन आघाडीची ही लोकचळवळ महत्वपुर्ण आहे, आपन त्या वेळी नव्हतो पन आज आपन या आंदोलनात सहभाग घ्यावा, बाबासाहेबांना आपन साथ द्यायला नव्हतो, आपन बाळासाहेबांना साथ देऊयात, बाळासाहेब हे प्रति बाबासाहेबच आहेत, त्यांची प्रत्येक कृती ही लोकशाही व आंबेडकरी चळवळ यासाठी मैलाचा दगड आहे.


ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी चवदार तळ्याच्या हजारो वर्षांचा बामनवादाशी लढा देताना काही परिवर्तनवादी ब्राह्मणांना सोबत घ्यायला संकोच केला नाही, सेम तसेच आज बाळासाहेब आंबेडकरांनीही सत्तर वर्षांची घरानेशाही मोडण्याच्या या लढ्यात गोपीचंद पडळकर सारखा विरोधी गोटात राहुन, तिकडची कार्यप्रणाली,तिकडचे मनुवादी वातावरन, जातीवादी धोरने पाहुन त्यांना लाथाडुन आज जागृत होऊन वंचित आघाडीला साथ द्यायला तयार झाले त्यांचे कौतुक करीवे ते कमीच आहे, पण त्यांना स्विकारुन श्रद्धेय बाळासाहेबांनी जो लोकशाहीवादी निर्णय घेतला ते पाहिल्यास मनात आपसुकच शब्द आले.... 

सेम बाबासाहेबच


- मनोज नागोराव काळे, 8169291009

Tuesday, 26 March 2019

या गर्दीमागचे कोडेे काय- राजेंद्र पातोडे

या गर्दीमागचे कोडेे काय- राजेंद्र पातोडे

आज उभ्या महाराष्ट्राला एकाच गहन प्रश्नाचे कोडे उकलत नाहीय आणि ते म्हणजे वंचीत बहुजन आघाडीच्या प्रत्येक सभेला रेकॉर्डब्रेक लाखोंची गर्दी कशी जमते? जिथे सत्ताधारी आणि विरोधकांना पंचवीस-पन्नास हजार माणसे गोळा करायला घाम फुटतोय, तिथे बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेला सलग जमणारा लाखोंचा जनसागर येतोच कसा हा यक्ष प्रश्न सध्या देशातील मनुवाद्यांची झोप उडवीत आहे.बरं ह्या ‘मास चा एकच क्लास आहे’ असेही नाही.अगदी उच्च शिक्षित, गर्भ श्रीमंत, उद्योजक व्यापारी, वकील, प्राध्यापक, इंजिनीयर,आयटीयन्स पासून ते थेट कलावन्त,विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी – शेतमजूर ते अगदी सामान्य माणूस अगदी तृतीयपंथी देखील ह्या सभेला आवर्जून हजर असतात.प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस आणि गुप्तचर खातं देखील हैरान असतं. नेमका आकडा किती द्यायचा हा अंदाजच बांधता येत नाही.


कारण त्या त्या जिल्ह्यात आर्थिक परिस्थिती बेताचीच असलेले भारिप बहुजन महासंघ, वंचीत बहुजन आघाडीच्या घटक असलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते आहेत.त्यात कुणीही गडगंज संपत्तीचे मालक नाहीत.म्हणावी तशी कार्यकर्त्यांची कुमकही नाही. इतर राजकीय पक्षा प्रमाणे पुरविली जाणारी रसद नाही, कुणीही स्पॉन्सर नाही.कुठेही पावती पुस्तकं नाही, वर्गणी नाही.नियोजन आणि सभेची तयारी म्हणून विशेष काही दिसत नाही.राबणारे हात देखील लिमिटेड दिसतात.तरीदेखील सभेचे भले मोठे मैदानच बुक केले जाते.लोकवर्गणीतून उभा केलेला भव्य स्टेज आणि क्वालिटी साउंड सिस्टीम तसेच सभा लाईव्ह दिसावी म्हणून लावलेले स्क्रीन्स ह्या पलीकडे कोणताही तामझाम दिसत नाही.


वर्तमानपत्रात किंवा मीडियात जाहिराती नसतात.माणसं आणायला वाहनं व्यवस्था नसते, जेवणाची पाकीटं, बिसलेरी आणि मजुरी दिली जात नाही, मैदानात बसायला खुर्च्या नाहीत की रखरखत्या उन्हात डोक्यावर मंडप नाही.तरीही तौबा गर्दी होते.शहर पूर्णवेळ जाम झालेलं असते.महिला पुरुष आणि युवक युवतींनी मैदानं ओव्हरफ्लो होतात.दुपारी २ पासून मैदान भरायला सुरुवात होते ते थेट रात्री सभा संपेपर्यंत कायम असते.प्रत्येक सभेला हा आकडा वाढतच आहे.त्या मुळे संघ भाजपासहीत काँग्रेस-राष्ट्रवादीला धडकी भरली आहे.पूर्वी दखल न घेणा-या मिडीयाला आता ह्या सभा लाईव्ह करावं लागताहेत, कव्हर करावं लागते.सम्पूर्ण महाराष्ट्रात हाच पॅटर्न कायम झाला आहे.राज्यात सलग होत असलेल्या वंचीत बहुजन आघाडीच्या सभांना जनप्रतिसादाचा आलेख वाढत गेलेला दिसतो.नव्या इतिहासाची नांदी ठरणा-या सभांच्या यशाचे गमक काय असावे? हा प्रश्न एकदाच उलगडून दाखवावा म्हणून केलेला लेखन प्रपंच.


इतिहासात प्रथमच ‘वंचित’ ह्या शब्दाची व्याख्या वंचीत समूहाच्या लक्षात आली आहे.आणि ह्या आत्मभानातूनच अनेक लहान लहान जाती समूहांनी आपला आवाज बुलंद करण्यासाठी वंचीत बहुजन आघाडीत ऍड बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची कास धरली आहे.त्यामुळे आजवर सत्ताधारी म्हणून वावरलेल्या सर्व पक्षांनी आपला ‘वोटींग मशीन’ म्हणून कायम कसा वापरच केला आहे हे मांडलं जाऊ लागले आहे. ७० वर्षात आम्ही सत्ता आणि संपत्ती, संधी वंचित कसे राहिलो हे अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, भटके विमूक्त, अल्पसंख्यांक समूहाला ह्या सभेच्या माध्यमातून पटायला लागले आहे.त्यातून दररोज अगदी लहान लहान समूहाच्या संघटना, नेते, कार्यकर्ते ह्या लोकजागरात सहभागी व्हायला लागलेत.कुठलंही आर्थिकच पाठबळ नसलं तरी आपण हा लोकलढा उभा करू शकतो.यशस्वी करू शकतो, हे सभेगणिक सिद्ध व्हायला लागल्याने.कार्यकर्ते आणि पदाधिका-यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.त्या मुळे ह्या सभा वंचीतांचा संवाद,वंचीतांचा हुंकार,वंचीत एल्गार, आणि वंचितांचा सत्ता संपादन निर्धार ह्या वेगवेगळ्या टायटलखाली गाजायला लागल्यात.


सभेच्या सुरुवातीला ऍड बाळासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर अससोद्दीन ओवेसी ह्यांचेसह नेते मंडळींची एंट्री हा ग्रँड इव्हेंट ठरतो.पांढ-या एसयूव्ही मध्ये असलेले बाळासाहेब,त्यांचे पाठोपाठ आलेला गाड्यांचा काफिला, त्याला एस्कॉर्ट करणारे काळ्या कपड्यातील सोशल कमांडो, गाड्यापाठी उस्फुर्तपणे ध्वज घेऊन धावणारे तरुण आणि स्टेजवरून दिल्या जाणा-या घोषणांना तेवढाच बुलंद प्रतिसाद देणारा लाखोंचा समूह यामुळे सभेत जोश भरतो.अगदी रणमैदानावरील रणभेरी आणि युद्धाची सुरुवात वाटावी असा तो क्षण असतो.स्टेजवर बसलेल्या नेत्यांना बांधलेले विविध रंगांचे फेटे हे तमाम वंचितांचे सामाजिक प्रतिनिधीत्व करीत एक विशिष्ठ रंग आणि धर्माची मक्तेदारी आम्ही मोडून काढलीय हे दिमाखाने सांगत असतो. त्या स्टेजकडे पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील आणि संकल्पनेतील धर्मनिरपेक्ष भारत आणि रिपब्लीकन पक्ष प्रत्यक्षात उतरल्याचे दिसते.


त्या नंतर सभेला साज चढतो तो सभेतील वक्त्यांच्या पोटतिडकीने मांडलेल्या अभ्यासू व जोशपूर्ण भाषणांनी.त्यात देश, संविधान आणि सर्वहारा समूहाचा उत्थानाची भलावण केली जाते.सत्ता हस्तगत करण्याचा निर्धार असतो.येथल्या व्यवस्थेला आपला वाटा मागण्याचा इशारा असतो.वंचीताच्या विविध घटकातील वक्ते त्यांच्या समूहाच्या वेदना मांडताना उपस्थितांच्या काळजाचा वेध घेत असतात.आमदार इम्तियाज जलील आणि खासदार ओवेसी ह्यांची उर्दू हिंदीतील फटकेबाजीने सभेचा नूर बदलून जातो.


सरतेशेवटी एड बाळासाहेब आंबेडकर आपली भूमिका मांडतात.अत्यंत संयमितपणे,अभ्यासपूर्ण भाषणातून आपण हा वंचितांचा लढा का उभा केलाय, तो कसा यशस्वी होणार, त्यासाठी काय पथ्य पाळली पाहिजे, सत्ताधारी होणे म्हणजे काय आणि सत्ता कशी मिळवायची हा मूलमंत्र ते सांगतात.सोबतच भाजप आणि संघ हा कसा विषमतावादी आहे, सनातनी आहे, देशातील मनुवादी व्यवस्थेने देशातील संविधान आणि संवैधानिक व्यवस्था कशी धोक्यात आली आहे.२०१९ लढा जिंकल्याशिवाय देशातील मनुवाद पराभूत होऊ शकत नाही.ही अभ्यासपूर्ण मांडणी करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे खरा चेहरा देखील जनतेसमोर आणतात.


बाळासाहेब बोलायला उभे राहिले की प्रचंड घोषणा व आतिषबाजी होऊन पिनड्रॉप सायलेन्स होतो.जसजसं भाषण पुढे जाते तसे टाळ्यांचा व घॊषणाचा आवाज व प्रतिसाद अधिक वाढतो.ते जेव्हा मोदी आणि संघाला आव्हान देतात तेंव्हा जनतेने अख्ख मैदान डोक्यावर घेतलेलं असते.”स्वतःचा मिडीया स्वतः उभा करा.माझा कार्यकर्ताच माझा मिडीया आहे”.ह्या त्यांचे आवाहनाला अनुसरून लाखोचा समूह स्वतः तल्लीन होऊन ऐकत असताना बाळासाहेबांचा मिडीया म्हणून आपल्या मोबाईलवर हे भाषण लाईव्ह करीत असतात.सोबत प्रबुद्ध भारत ची टीम देखील हे सर्व जनतेपर्यंत पोहचवीत असते.त्यातून इतर जिल्ह्यातील वंचीत समूह ऊर्जावंत होत जातो.


आपल्या जिल्ह्यात वंचीत बहुजन आघाडीची सभा कधी आहे, ह्याची माहिती होताच त्या त्या जिल्ह्यातील सामाजिक संघटना भारिप बमसं,एमआयएम, वंचीतचे पदाधिकारी कार्यकर्ते आम्हीही सत्ताधारी होणार ह्या निर्धाराने कामाला लागतात.त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळतो तो महाराष्ट्रातील जनतेचा.हजारो वर्षे माणूसपण नाकारलेल्या आणि व्यस्थेने गुलाम केलेल्या व्यवस्थेच्या मुळावर घाव घालण्याचा निर्धार घेऊन वंचीत समूह सहभागी होत चाललेत.त्यांनी आता ऐक्य, युती, आघाडी ह्या शब्दांना कायमची मूठमाती दिली आहे.’बहुजन सारे एक होऊ, सत्ता आपल्या हाती घेऊ’ या निर्धाराने पेटून उठलेल्या समूहांनी ही आरपारची लढाई लढण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात आपली ताकद वंचीत बहुजन आघाडीच्या पाठीशी उभी केल्याने ह्या विक्रमी सभा सलगपणे यशस्वी होत आहेत.लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनीज बुक मध्ये ह्या सलग सुरु असलेल्या लाखोंच्या सभांची नोंद व्हावी असा प्रयत्न तर होणारच आहे.सोबतच देशाची सत्ता वंचितांची असावी हाच अंतिम लढा यशस्वी करण्याची लोकभावना बाळासाहेबांनी वंचीत समूहात पेरली.त्याच भावनेचे मूर्त रूप म्हणजे लाखोंच्या सभा आहेत.शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार, एड. बाळासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व,वंचीत समूहाची साथ, सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य जनतेचे पाठबळ हेच सर्व ऐतिहासिक सभाच्या विक्रमी उपस्थितीच्या यशाचे गमक आहे.


ह्याचे रूपांतर वंचीत बहुजनांच्या सत्तेत झाल्या शिवाय राहणार नाही हे मात्र निर्विवाद सत्य आहे.


-राजेंद्र पातोडे,अकोला

वंचितांना विनातारण कर्ज - सुमित वासनिक

वंचितांना विनातारण कर्ज - सुमित वासनिक

केस कापणे हा नाभीकांचा व्यवसाय पण आज भारतात केस कापणाऱ्या ज्या सर्वात मोठ्या आणि महागड्या सलून आहेत त्यामध्ये एकही नाभिकाची सलून नाही.

चामड्याच्या आणि चपलांचा व्यवसाय करणाऱ्या चांभार समाजातील एकाही व्यक्तीचा मोठा चामड्याच्या व्यवसाय नाही, चप्पल आणि बूट बनविणाऱ्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये एकही कंपनी चांभाराची नाही.

आपल्या हाताच्या जोराने लोखंडाला आकार देऊन आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या लोहार समाजातील एकही व्यक्ती लोखंडाच्या व्यवसायात पुढे येऊ दिला गेलेला नाही.

वंचित बहुजन असलेल्या असंख्य अलुतेदार बलुतेदार जातींवर मनूच्या व्यवस्थेने जन्मजात काही कामे लादली ,त्यांना शिक्षणापासून दूर ठेवले. त्यासर्व जातींमधील लोक आपल्यावर लादण्यात आलेल्या  कामात निपुण झाली आहेत. आपल्या अंगी तयार झालेल्या या गुणांमुळे काही लोकांची कामे करून या जातींमधील लोक आपला उदरनिर्वाह चालवायचे. पण या जाती करीत असलेल्या कामांचे जेंव्हा व्यावसायिकरण झाले तेंव्हा या जातींना त्यांच्याच कामात पुढे जाण्यापासून थांबवण्यात आले. वर नाभिक, चांभार आणि लोहार जातींची उदाहरणे दिली आहेत त्यावरून आपण हे समजू शकतो. ज्यावेळी या जाती करीत असलेल्या कामांना व्यावसायिक रूप आले तेंव्हा सवर्ण जातींमधील लोकांनी या कामांची मोठमोठी उद्योगं सुरू केली आणि त्यातून भरमसाठ कमाई केलि. 

इथे अनेकांना हा प्रश्न पडला असेल की अलुतेदार, बलुतेदार करीत असलेले काम येत नसतांनाही सवर्ण या कामांचे मोठमोठे उद्योग कसे उभे करू शकले? आणि ज्यांची ही कामे होती त्या वंचित जाती मागे का पडल्या? या वंचित अलुतेदार-बलुतेदार जाती म्हणजे गरीब लोक, यांच्याकडे आपला व्यवसाय वाढवायला पैसा नाही, भांडवल उभे करायला पैसे नाही. बँकेकडे तारण ठेवायला मालमत्ता नाही , विनातारण बँक कर्ज देत नाही. या कारणामुळे हा वंचित समाज व्ययसायात पुढे येऊ शकलेला नाही. त्याचवेळी हजारो वर्षे सत्ता, संपत्ती आणि शिक्षणावर ठाण मांडुन बसलेल्या सवर्णांनी वंचितांचा वाटा बळकावून जमा केलेल्या मालमत्तेच्या जोरावर मोठमोठे व्ययसाय उभारले, यासाठी बँकांनी यांना हवे तेवढे कर्ज सुद्धा दिले.

या वंचित अलुतेदार-बलुतेदार जातींनाही जर व्यवसाय वाढविण्यासाठी कर्ज मिळाले असतेतर आज या जातींमधील व्यक्ती सुद्धा नावाजलेल्या उद्योगपती तयार करू शकल्या असत्या पण या देशातील प्रस्थापित काँग्रेस आणि भाजप सारख्या पक्षांनी हे कधीही होऊ दिले नाही, या प्रस्थापित पक्षांनी सवर्णांचे हित जोपासण्यासाठी वंचितांवर केलेला हा सर्वात मोठा अन्याय आहे. व्ययसायात पुढे जाण्यात येणारी ही अडचण ओळखून ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास सर्व वंचित जातीसमूहांना व्यवसायासाठी विनातारण कर्ज देण्यात येईल असे जाहीर केले आहे.

मित्रानो आपले प्रश्न ओळखा, ज्या गोष्टी आपला विकास होण्यापासून थांबवत आहेत त्यांच्या विरोधात लढणाऱ्या ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून लढा. लक्षात ठेवा संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही!

Friday, 22 March 2019

तुमचा मतदानाचा तो एक प्रामाणिक क्षण इतिहास घडवेल - मनोज नागोराव काळे

तुमचा मतदानाचा तो एक प्रामाणिक क्षण इतिहास घडवेल - 
मनोज नागोराव काळे, ठाणे 8169291009



 लोकशाही म्हणजे सर्वच भारतीय नागरिकांचे राज्य, म्हणजेच रयतेचे राज्य अर्थात आधुनिक शिवशाही, पन या रयतेच्या राज्याला काही पाताळतंत्री लोकांनी गेल्या ७० वर्षात खुप कल्पकतेने आपल्या कुटुंबापुरती मर्यादित करुन ठेवली, एकाच घरातील चार ते पाच लोक पिढ्यान पिढ्या खासदार, आमदार व मंत्री बनत राहीले, काहींना ते टिकवण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांशी रोटी बेटी व्यवहार करावा लागला, यांनी तेही केले पन सत्ता आपल्या नातेवाईकांतच खेळत राहीली पाहीजे याची या लोकांनी काळजी घेतली, त्यामुळे लोकशाही ही कुटुंबशाही व घरानेशाही ने संपुर्ण गिळंकृत केल्याचे आपनास दिसते, पंडीत नेहरु पासुन राहुल प्रियंका पर्यंत त्यांनीच सत्ता भोगली, तसेच देशातील अनेक घराण्यांनी आपापल्या विभागातील सत्ता आपापपल्या नातेवाईकातच ठेवली, जनतेला मुर्ख बनवुन, साम,दाम,दंड,भेद या नीतिची वापर करुन लोकशाही ला संपवण्याचा घाट घातला गेला.

महाराष्ट्रात अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी या घरानेशाही ला उध्वस्त करुन लोकशाही वाचवण्याचे, पर्यायाने संविधान वाचवुन ती लोकशाही तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्याचा विडा उचलला आहे, लोकशाहीचे सामाजिकीकरन, सार्वत्रीकरन करुन वंचित बहुजन आघाडी ही घरानेशाहीतील लोकशाही आता सामान्य जनतेपर्यंत पोचवत आहे, महाराष्ट्रातील जनतेने या वंचित बहुजन आघाडीला डोक्यावर घेतले आहे हे आपन पहात आहोत.कोनकोनत्या नेत्यांचे आपसात काय नाते संबंध आहेत ही माहीत पुढे देत आहे.
मतदारांनो जरा खालील नात्या गोत्यांवर ( सोर्स - सोशल मीडिया) नजर टाका व विचार करा की तुम्हाला या लोकांनी आजवर किती फसवले की एकमोंकांचे राजकीय हे विरोधक आहेत, पन ते फक्त बनवाबनवी करुन सत्ता भोगत आलेत हे आता स्पष्ट झाले आहे.

शरद पवार व एनडी पाटील, शंकरराव मोहिते-पाटील - बाळासाहेब देसाई, दिलीप देशमुख (विलासराव देशमुखांचे बंधू) - माजी राज्यमंत्री अजित घोरपडे (परस्परांचे साडू)

अजित पवार यांची पत्नी - खासदार पद्मसिंह पाटील यांची धाकटी बहीण आहे

जयंत पाटील यांची बहीण - माजी आमदार अहमदनगर जिल्ह्यातील प्रसाद तनपुरे यांची पत्नी आहे ( मेहुणे)

जयंत पाटील - शिराळ्याचे सत्यजीत देशमुख (परस्परांचे साडू)

आमदार विलासराव शिंदे यांची बहीण - शिवाजीराव देशमुख (सभापती) यांची पत्नी आहे

आमदार शिवाजीराव नाईक (शिराळा) यांची पत्नी - सांगलीचे मंत्री मदन पाटील यांच्या मातोश्री सख्या बहिणी आहे.

प्रमोद महाजन - गोपीनाथ मुंडे = मेहुणे
प्रमोद महाजनांची बहिण गोपीनाथ मुंडेंच्या सौ

शरद पवार - बाळासाहेब ठाकरे = व्याही
शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे ही बाळासाहेब ठाकरेंच्या सख्ख्या बहिणीची सूनबाई; भाचा सदानंद सुळे यांच्या सौ.

सचिन पायलट - फारूक अब्दुल्ला = जावई
केंद्रीय मंत्री सचिन पायलट जम्मू काश्मीरच्या फारूक अब्दुल्ला यांचे जावई

कलमाडी - निंबाळकर राजघराणे = व्याही
निंबाळकर घराण्याची मुलगी सुरेश कलमाडी यांच्या घराच्या सुनबाई

शरद पवार - सुशीलकुमार शिंदे = साडू
शरद पवारांच्या सौ. प्रतिभा पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या सौ. उज्ज्वला शिंदे बहिणी-बहिणी

स्व. विलासराव देशमुख - डिसुझा / भागनानी /हुसैन = व्याही
विलासराव देशमुख यांच्या तीनही सुनबाई ३ वेगवेगळ्या धर्माच्या आहेत.
जेनेलिया डिसुझा क्रिस्तिअन, एक सुनबाई मुस्लिम कम हिंदू आणि एक सुनबाई हिंदू मारवाडी फिल्म डिरेक्टर वासू भागनानी यांची मुलगी !

मोहिते-पाटील हे घराणे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे घराणे समजले जाते. 

विजयसिंह मोहिते-पाटलांची थोरली बहीण बाळासाहेब देसाईंच्या घरात दिल्याने शिवसेनेचे पाटणचे माजी आमदार शंभूराजे देसाई हे विजयसिंह यांचे भाचे आहेत. 
विजयसिंह यांच्या मामांची मुलगी ही शंभूराजेंची पत्नी, तर मोहित्यांच्या मामांची दुसरी मुलगी ही विलासकाका पाटील-उंडाळकर यांची सून. 

विलासकाका पाटील हे फलटणचे माजी आमदार चिमणराव कदम यांचे सासरे. 

चिमणराव कदमांची मुलगी ही संभाजीराव काकडे यांची सून. 

पूर्वी पुणे जिल्ह्यात शरद पवार आणि संभाजीराव हे परस्परांचे मोठे विरोधक होते. त्या काकडेंचे भाऊ बाबालाल यांचीही मुलगी बाळासाहेब देसाई यांच्या घरात दिल्याने काकडे मोहिते यांचे नाते. 

शिवाय, विजयसिंहाची आत्या ती बाबालाल काकडे यांची पत्नी. इतकेच नव्हे तर विजयसिंहाची एक बहीण अॅड. विराज काकडे यांची पत्नी आहे. 

कोल्हापूरचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिग्विजय खानविलकर यांच्या मुलाला विजयसिंहांच्या भावाची मुलगी दिल्याने दोघेही सोयरे झाले! 

दिग्विजय खानविलकरांची मुलगी कोल्हापूरच्या शाहूराजेंच्या घरात दिली असून काँगेसचे माजी आमदार मालोजीराव यांची पत्नी. 

राष्ट्रवादी काँगेसचे नेते रामराजे निंबाळकर यांची पत्नी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पत्नी या दोघी चुलत भगिनी. 

शरद पवार यांची एक मेहुणी नामजोशींच्या घरात दिली असून त्याच घरात रामराजेंची बहीणही दिली आहे.

पृथ्वीराज चव्हाणांची मावशी ही दादाराजे खडेर्कर यांची पत्नी. दादाराजे खडेर्कर यांची बहीण ही दिवंगत माजी मंत्री अभयसिंहराजे भोसले यांची पत्नी. 

दादाराजेंचे भाऊ बंटीराजे यांची मुलगी ही सातारचे माजी आमदार शिवेंदराजे यांची पत्नी. 

कोल्हापूरचे सदाशिवराव मंडलिक याची बहीण चंदगडचे माजी आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील यांची पत्नी असल्याने दोघेही मेहुणे लागतात. 

 बाळासाहेब थोरात आणि पाथर्डीचे माजी आमदार राजीव राजळे हे मामा-भाचे. 

राजळे यांची आई ती थोरातांची बहीण. 

राजीव राजळे यांची बहीण ही यशवंतराव गडाखांची सून आणि नेवासे येथील राष्ट्रवादीचे शंकरराव गडाख यांची पत्नी. 

आमदार डॉ. सुधीर तांबे हे थोरातांचे मेव्हणे व राजळेंचे मावसे.

नाशिकचे राष्ट्रवादीचे नेते स्व. डॉ. वसंत पवार हे अहमदनगर जिल्ह्यातील माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे जावई. 

अहमदनगर जिल्ह्यात आबासाहेब निंबाळकर हे माजी मंत्री काँग्रेसचे नेते होते. त्याची नात ही खासदार निलेश राणे यांची पत्नी.

कर्जत जामखेडचे काँगेसचे बापूसाहेब देशमुख व नारायण राणे हे दोघे व्याही. 

जालन्याचे अंकुशराव टोपे त्यांचे चिरंजीव राजेश टोपे आणि कर्जतचे निंबाळकर यांचे नातेसंबध असल्याने टोपे आणि राणे हेही सोयरे धायरे.

ही काही नाते सोशल मीडियावरुन मिळाली आहेत, बाकी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर याही पेक्षा खतरनाक राजकारन असते,अशा प्रकारे उमेदवार कोनत्याही पक्षाचा, कोनतीही निवडुन आला तरी मंत्रालय, लोकसभा, विधानसभा यांच्याच ताब्यात रहाते, हे कितीही भ्रष्टाचार केला तरी यांच्यावर काही कारवाई होत नाही.

सध्या वंचित बहुजन आघाडी ने या सर्व घरान्यांशी समोरासमोर लढा पुकारला आहे, बाळासाहेबांच्या या हिम्मतीची दाद द्यावी लागेल, आपन एखाद्या नेत्या विरुद्ध बोलायची आपली हिम्मत होत नसते पन यांच्या संपुर्ण कुटुंबशाहीलाच अाव्हान देऊन त्याला सुरुंग लावन्याचे शौर्याचे काम आद.बाळासाहेब आंबेडकरांनी केले आहे, जनतेने आता कचखाऊ भुमिका घेऊ नये, आता ही रात्रच नाही तर दिवसरही वैर्याचा आहे.

वरील घराण्यांसाठी आमचे आजोबा, आमचे बापजादे, व ाता आम्ही सतत मतदान करत आलो आहोत,  आपल्या मागील पिढ्यांनी ही घरानेशाही फोफावन्यात हातभार लावला असेल पन आपन ही घरानेशाही संपवुन लोकशाहीला मुक्त करायचे आहे.
आपल्यासाठी वंचित बहुजन आघाडी ने सुरु केलेला हा लःा स्वातंत्र्य युद्धा इतकाच महत्वाचा आहे.

70 वर्षात फक्त 169 घरात लोकशाही ला कैद केले होते तीला स्वतंत्र करुन सामान्य जनतेला लोकशाहीत समान स्थान देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ला यशस्वी करा, आपल्या पुढील पिढ्या सुरक्षित करा, नवा जन्म घेत असलेला हिटलर ला मातीत गाडा.

ब्रिटीशांपासुन स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपनास 150 वर्ष प्रदीर्घ संघर्ष करावा लागला होता पन या घरानेशाही ला कुटुंबशाहीतुन मुक्त करण्यासाठी तुमचा फक्त एक क्षण पाहीजे, पन तो प्रामाणिक असला पाहीजे, फक्त मतपेटीवर मतदान करताना लोकशाही, संविधान व मुक्तीदाते महामानव शिव,शाहु,फुले आंबेडकर यांच्याशी इमान राखुन वंचित बहुजन आघाडी चे बटन दाबा, आपन लोकशाही ला एका दिवसात मुक्त करुन घेऊ.
आपल्याकडे सच्चा, सक्षम,प्रगल्भ, विद्वान नेता आहे, आपल्याकडे सोशल मीडिया आहे, आपल्याकडे जागृत झालेले तरुण आहेत, आपल्याकडे स्वाभिमान आहे.

आपन हि लढाई जिंकनारच आहोत, आपला मतदान करतानाचा तो एक कृतज्ञ व प्रामाणिक क्षण या देशाचे भविष्य घडविणार आहे हे लक्षात ठेवा, आपला विजय निश्चित आहे. लोकशाही ला स्वतंत्र करायचे आहे, संविधानाला सुरक्षित करायचे आहे, स्वताला सुरक्षित करायचे आहे.
आता भिक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची

- मनोज नागोराव काळे 8169291009

( नात्या गोत्यांची यादी मागच्या वर्षी फेसबुक वर मिळाली होती, संकलन करणारांचे नाव माहीत नाही, तरी त्यांचे आभार) 

Sunday, 17 March 2019

चित भी मेरी, पट भी मेरी और अंटी भी मेरे बाप की ! - भिमराव तायडे.

चित भी मेरी, पट भी मेरी और अंटी भी मेरे बाप की ! 

- भिमराव तायडे.

अशी गत सुप्रिम कोर्टाचे निव्रुत्त न्यायाधीश बी जी कोळसे यांनी वंचित बहुजन आघाडी बद्दल जे स्टेटमेंट दिले यावरुन वाटते. खरे तर ते दिशाभूल करणारे आहे।

एकतर ते वंचित बहुजन आघाडी मध्ये सामील नसून त्यांनी vba ला पाठिंबा दिलेला होता. त्यांना जनता दल (एस) या पक्षाकडून लढायचे होते त्यास एड. प्रकाश आंबेडकर यांनी संमती दिली होती. पण कोळसे-पाटील हे जर कॉंग्रेस महाआघाडी झाली तरच ते निवडणूक लढवतील अशी त्यांनी आपली भूमिका सुध्दा मांडली होती. म्हणजेच त्यांनाही  VBA चा पाठिंबा होता, ते VBA मध्ये सामील नव्हते.

कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर चर्चेच्या वंचित बहुजन आघाडीच्या अनेक फैरी झाल्यात. पण युती झाली नाही. याबद्दलची इत्तंभूत माहिती वाचकांना जाणीव असेलच. पुन्हा नव्याने या ठिकाणी मांडत नाही.

इकडे कोळसे-पाटील यांचे दोन्ही कॉंग्रेसशी स्वतःचे बोलणे सुरुच होते व एड प्रकाश आंबेडकर यांना युती होणे किती जरुरी आहे अशी त्यांची बतावणी सुध्दा सुरु होती.

अखेर युती झाली नाही, म्हणून औरंगाबादच्या एका जागेसाठी तरी दोन्ही कॉंग्रेसने पाठिंबा द्यावा अशी मागणी कोळसे-पाटील यांनी केल्यावरही ती कॉंग्रेस कडून नाकारल्या गेली. त्यांना खात्री होती की, जनता दल (एस) ची युती कर्नाटक मध्ये कॉंग्रेसशी असल्याने कॉंग्रेस त्यांना पाठिंबा देईल, पण सगळं मुसळ केरात !

एड प्रकाश आंबेडकर यांनी केवळ 4/5 जागांवर महाआघाडीत समझोता करुन युती करावयास पाहीजे होती असे कोळसे-पाटील यांची आग्रहाची भूमिका होती.

तर, एकून असे प्रकरण होउन बी जी कोळसे-पाटील यांची माघार झालेली आहे. यात वंचित बहुजन आघाडी कडून त्यांना तिकीट नाकारण्यात कोणतीही कारवाई झालेली नाही.

आता प्रश्न असा आहे की, निव्रुत्त न्यायाधीश बी जी कोळसे-पाटील कोणती भूमिका घेतात ते ?

 का ते कॉंग्रेस/ राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाणार आहेत का ? 

त्यांची शरद पवार यांचेशी एव्हढी जवळीक कशी ?

ते वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करणार नाहीत का ? 

त्यांना सॉफ्ट हिंदुत्ववाली कॉंग्रेस जवळची का वाटते ?

जशी कोळसे-पाटील यांची RSS बद्दल विरोधी भूमिका आहे तशी दोन्ही कॉंग्रेसची का नाही ? तरीही कॉंग्रेसला समर्थन का ?

-भीमराव तायडे, 9420452123

 नांदुरा (जि: बुलडाणा - 443404)

Friday, 15 March 2019

वचितांचा नविन 'ट्रेंड सेट' झालाय.. -राजेंद्र पातोडे

वचितांचा नविन 'ट्रेंड सेट' झालाय.. 

-राजेंद्र पातोडे

वंचीत हा शब्द तसा लौकिकार्थाने "डिप्रेस क्लास" चे मराठी भाषांतर.डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी हाच शब्द इथल्या शोषित पिडीत सर्वहारा समुहासाठी वापरला होता.मात्र कालांतराने त्याला 'दलित' किंवा 'पददलित' ठरवुन त्याची लढण्याची उर्मी घालविण्यात आली.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कालानुरूप त्यांच्या संस्था संघटना आणि पक्षाचे नाव बदलविताना काळाची मुस बदलून टाकली होती.

 अगदी तोच ट्रेंड आता एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी सेट केला आहे.वंचित म्हणजे सत्ता आणि संधी वंचित असलेल्या अठरा पगड जाती ,अलुतेदार बलुतेदार,आदिवासी, अल्पसंख्याक अश्या सर्व बहुजनांच्या वर्जमुठीला एक व्यापक आकार दिला आहे.त्याला महाराष्ट्रभर मिळणारा प्रतिसाद हा चर्चेचा विषय न ठरता तर नवलच होते.

वंचितच्या सभांना अभूतपूर्व गर्दी असली तरी ती मतदानात रूपांतर होईल का असा एक बुरसटलेला सवाल सोयीने चर्चेत आणला गेला.परन्तु ही गर्दी नुसते भाषणं ऐकायला आलेली नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. भरउन्हात दुपारी १ पासून रात्री १० वाजेपर्यंत तप्त मैदानावर बसलेला हा समूह पहिल्यांदा काही तरी ठरवून आलेला आहे.नाही तर नुसते भाषण ऐकायचे असते तर लाईव्ह होणाऱ्या सभा चॅनेल वर आणि मोबाईलवर अधिक चांगल्या पद्धतीने पाहता येतात.हा नवा बदल कुणी समजून घेत असेल तर तो फक्त वंचित समूह आहे.

त्या नंतर नवा ट्रेंड साहेबांनी सेट केलाय, तो म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या मुजोर आणि आश्रित बनविणाऱ्या राजकीय समझोता आम्हाला मान्य नसेल हे ठणकावून सांगितले गेले. एक जागा घ्या आणि बदल्यात सर्व आंबेडकरी बहुजन मतदान काँग्रेसचे ही सौदेबाजी मोडीत काढली.तुम्ही आम्हाला जागा देणारे कोण हा प्रश्न विचारला गेला.

आघाडी करायची असेल तर ती 'रामदासी अग्रीमेंट' नसेल. स्वाभिमान आणि समान वागणूक दिली पाहिजे हे ठासून सांगितले गेले.त्यासाठी सहा महिन्याआधी आघाडी साठी काँग्रेस कडे प्रस्ताव पाठविला गेला.

शेवटच्या क्षणापर्यंत आघाडीसाठी झुलवायचे आणि शेवटच्या क्षणी बाद करायचं हा काँग्रेसी खेळ ह्या वेळी मोडून काढला गेला.

तिसरा ट्रेंड सेट झाला तो मीडिया बाबत.ह्या आधी निवडणूक जाहीर झाल्या झाल्या आंबेडकरी पक्ष हे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडीया मधून बेदखल असायचे.त्यांचे अस्तित्वच नसल्या प्रमाणे निवडणूक काळात सैराट झालेला मीडिया वागत असे.जाहिराती आणि पेडन्यूज असतील तर कव्हरेज मिळेल. हा ट्रेंड देखील ह्या वेळी मोडीत निघाला आहे.

वंचित आघाडीचे प्रणेते एड बाळासाहेब आंबेडकर काय बोलतात, कुठली भूमिका घेतात ही मिडीया मध्ये लीड न्यूज असते. किंवा ब्रेकिंग न्यूज असते.सलग तीन दिवसांत तीन पत्रकार परिषद घेतल्या तरी त्या प्रेस साठी पत्रकार मंडळी गर्दी करतात हे दुर्मिळ चित्र आज बाळासाहेबांनी बदलेले आहे.

अधिक एक महत्त्वाचा ट्रेंड जो सेट होणार आहे तो म्हणजे येतील वंचीत समुहाला प्रथमच आपल्या अल्पसंख्या प्लस केली की  विजय हमखास आहे हे पटणार आहे.सत्ता आणि संधी वंचित असलेल्या अठरा पगड जाती ,अलुतेदार बलुतेदार,आदिवासी, अल्पसंख्याक लहान लहान समूहाची बेरीज ही ४०% होते.आणि एकमेकाला मदत आणि मतदान केले की तेच विंनिंग कॉम्बिनेशन ठरते.२९% मतावर भाजप देशाची सत्ता मिळवते तर ४०% वंचित सहज सत्ताधीश होऊ शकतात.हा नवा फंडा ह्या वेळी असणार आहे.

हे सर्व ट्रेंड सर्वात आधी थोरल्या पवारांनी ओळ्खले आणि निवडणुकीतून माघार घेतली आहे.

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेकांना हे उमगले आहे त्या मुळे वंचित सुनामीत आपल्या राजकीय कारकिर्दीची वाट लागणार हे ओळखून अनेकांनी लढायलाच नकार दिला आहे. किंवा आपल्या चिल्यापिल्याना भाजप सेनेच्या सेवेत रुजू केले आहे. ही राजकीय  दहशत ह्या पूर्वी फक्त शेड्युल्ड कास्ट फेडरेशन मध्ये होती ती बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी परत आणली आहे.

२०१९ ची निवडणूक त्या अर्थाने "डिप्रेस क्लासेस" अर्थात "वंचित बहुजनांच्या" राजकीय शक्तीच्या उदयाने अनेक प्रस्थापित राजकीय पक्षाचे भवितव्य बिघडविल्या शिवाय राहणार नाही ह्यात शंकाच नाही


राजेंद्र पातोडे

प्रदेश प्रवक्ता

भारिप बहुजन महासंघ 

वंचित बहूजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश

9422160101

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...